१७ मे १७१५मराठ्यांनी निरनिराळ्या युद्धात वापरलेले घोडदळइ.स. १७१५ मध्ये कान्होजी भोसले या मराठा सरदाराने चंद्रपूरच्या युद्धात वापरलेल्या घोडदळाचा उल्लेख मिळतो तो याप्रमाणे, "१७ मे, १७१५ रोजी, जयपूरचा राजा जयसिंगाने पिलसूदच्या लढाईमध्ये कान्होजी भोसल्यांचा पराभव केला. त्यामुळे कान्होजींनी आपला उत्तरेतील मार्ग आडलेला पाहून चंद्रपूर प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून सहा हजार घोडेस्वारांनिशी चंद्रपूरवर आक्रमण केले. चंद्रपूरचा पराभव करून अर्धे राज्य हस्तगत केले. छत्रपती शाहू महाराजांना एक हत्ती नजराणा म्हणून पाठवून कान्होजी उत्तरेकडे वळले."
🚩 आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष 🚩 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 १७ मे १६६६ शब्दांनी उधळून लावलेले औरंगजेबाचे कारस्थान शिवाजीराजांना घेऊन काबूलच्या स्वारीवर जाण्याची तयारी रामसिंह करीत होता. बादशाहाचा लाडका क्रूर सरदार शुजाअतखान हा आपल्याबरोबर येणार आहे याचा धसका रामसिंहाला होताच. कूच करण्यास अजून पाच-सात दिवस लागणार होते. महाराज स्वत: या औरंगजेबी डावामुळे अस्वस्थ होते. त्यांनी एक वेगळेच रान यावेळी उठविले. कोणते ? महाराजांकडे रोज दिवसातून अनेकदा शाही सरदारमंडळी भेटावयास यायची. आजपर्यंत (दि. १७ मे १६६६ ) महाराज या सरदारांशी छान हसून, गोडीने बोलायचे. पण काबूलच्या वातेर्ने चिडलेले महाराज, काबूलचा विषय न काढता या येणाऱ्या सरदारांशी औरंगजेबाबद्दल सरळसरळ टीकात्मक बोलावयास लागले. त्यात चीड होती. राजांचा आशय असा होता, ‘ बादशाहांच्या वतीने केवढी वचने दिली. पण इथे आल्यापासून तुमचे बादशाह आमचा सतत अपमानच करीत आहेत. आम्हाला दिलेल्या वचनांचं काय ? हाच शाही रितरिवाज आहे काय ? शब्दांची किंमत नाही ? आम्ही उघडउघड फसलो आहोत. हे बादशाही प्रतिष्ठेला शोभतं का ?’ भेटीस येणाऱ्या सरदारमंडळींशी हे असंच रोज अन् सतत म