१५ जून १६७०मराठ्यांनी सिंदोळा गाव आणि किल्ला विजापूरकरांकडून जिंकून घेतला.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ जून १६६५ ऐतिहासिक किल्ले पुरंदरचा तह झाल्यानंतर दाउदखानची भेट घेऊन छत्रपती शिवराय "किल्ले राजगड" कडे परतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ जून १६६५ पुरंदरच्या तहानुसार किरंतसिंह हा सरदार किल्ले कोंढाणा (सिंहगड) ताब्यात घेण्यासाठी कोंढाण्यावर आला. त्यावेळी किल्ले कोंढाण्याचा नवीन किल्लेदार "उदयभान राठोड" याला केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ जून १६७० मराठ्यांनी सिंदोळा गाव आणि किल्ला विजापूरकरांकडून जिंकून घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ जून १६७५ कारवारची मोहिम आटोपून छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर परतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ जून १६८१ शहजादा अकबरास भेटण्याबाबत छत्रपती संभाजी महाराजांची मंत्री मंडळाची बैठक ! जून महिण्याच्या पहिल्या पंधरवड्यात महाराष्ट्रात आलेल्या अकबर व दुर्गादास राठोड यांनी पाली (नागोठणे) परिसरात आपला तळ दिला होता. छत्रपती संभाजी महाराजांना याची त्वरित खबर दिली गेली. शहजादा अकबरास भेटावे की, न भेटावे या संबंधात छत्रपती संभाजी महाराजांनी मंत्रीमंडळाचा सल्ला घेण्याविषयी बैठक बोलावली. त्या मंत्रीमंडळाच्या ...