Posts

१५ जून १६७०मराठ्यांनी सिंदोळा गाव आणि किल्ला विजापूरकरांकडून जिंकून घेतला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ जून १६६५ ऐतिहासिक किल्ले पुरंदरचा तह झाल्यानंतर दाउदखानची भेट घेऊन छत्रपती शिवराय "किल्ले राजगड" कडे परतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ जून १६६५ पुरंदरच्या तहानुसार किरंतसिंह हा सरदार किल्ले कोंढाणा (सिंहगड) ताब्यात घेण्यासाठी कोंढाण्यावर आला. त्यावेळी किल्ले कोंढाण्याचा नवीन किल्लेदार "उदयभान राठोड" याला केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ जून १६७० मराठ्यांनी सिंदोळा गाव आणि किल्ला विजापूरकरांकडून जिंकून घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ जून १६७५ कारवारची मोहिम आटोपून छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर परतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ जून १६८१ शहजादा अकबरास भेटण्याबाबत छत्रपती संभाजी महाराजांची मंत्री मंडळाची बैठक !  जून महिण्याच्या पहिल्या पंधरवड्यात महाराष्ट्रात आलेल्या अकबर व दुर्गादास राठोड यांनी पाली (नागोठणे) परिसरात आपला तळ दिला होता. छत्रपती संभाजी महाराजांना याची त्वरित खबर दिली गेली. शहजादा अकबरास भेटावे की, न भेटावे या संबंधात छत्रपती संभाजी महाराजांनी मंत्रीमंडळाचा सल्ला घेण्याविषयी बैठक बोलावली. त्या मंत्रीमंडळाच्या ...

११ जून इ.स.१६७४**छत्रपती शिवाजी महाराजांनी मुंबई तहावर आपल्या मान्यतेची निदर्शक म्हणून सही केली.

*११ जून इ.स.१६७४* *छत्रपती शिवाजी महाराजांनी मुंबई तहावर आपल्या मान्यतेची निदर्शक म्हणून सही केली..

१० जून १६७६छत्रपती शिवरायांच्या 'दक्षिण दिग्विजय' मोहिमेस सुरुवात.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १० जून १२४६ अल्लाउद्दीन मसुद्शाहचा खून. नसीरुद्दीन महम्मद शाह दिल्लीचा सुलतान झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १० जून १६४० सरनौबत नरवीर पिलाजी गोळे जयंती हिंदवी स्वराज्याचे पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांच्या ३८१ व्या जयंती निम्मित विनम्र अभिवादन सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचा जन्म जावळीच्या खोऱ्यातील गणी गावात झाला. चार छत्रपतींच्या सोबत इमानाने राहिलेलं मोजक्या घराण्यातील एक गोळे घराणे, ह्याच गोळे घराण्यातील इतिहासात एकनिष्ठ म्हणून उल्लेख आढळतो. पिरंगुट या गावी त्यांची पवित्र समाधी आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १० जून १६६१ छत्रपती शिवरायांची 'कल्याण-भिवंडी'कडे मोहिम. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १० जून १६६४ विजापूर बादशाहाने सिद्दी अझीजखान यास छत्रपती शिवाजी महाराजांविरूद्ध तळकोकणावर रवाना केले.  अजीजखान आल्याचे कळताच वाडीकर लखम सावंत त्यांच्या भेटीस गेला. भेटीत ठरल्याप्रमाणे सावंत कुडाळकर चाल करून गेला. शर्थीची झुंज मांडून त्याने मराठ्यांना पराभूत केले. कुडाळ सावंतांच्या ताब्यात गेले. अजीजखान वेंगुर्ला येथे गेला होता. या मुक्कामा...

३ जून १६७४छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेकासाठी निरगती याग, पूजा, गोदान केले. ऐन्द्रिशान्ती झाली आणि उत्तरपूजनानंतर आचार्याना प्रतिमा दान देण्यात आल्या.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३ जून १६७३ छत्रपती शिवाजी महाराज व थोमास निकल्स यांची किल्ले रायगडावर भेट. हुबळीच्या लुटीच्या नुकसान भरपाईचा विषय निघताच शिवाजी महाराजांनी सांगितले की 'ही लूट नेमकी कुणी केली हे आम्हाला माहित नाही. त्यामुळे नुकसानभरपाईचा प्रश्न उरत नाही.' लाकूडफाटा व मीठ यांच्या व्यापारात सवलती देण्याचे महाराजांनी मान्य केले. थोडक्यात थॉमस निकल्सच्या भेटीतूनही फारसे काही निष्पन्न झाले नाही. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३ जून १६७४ छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेकासाठी निरगती याग, पूजा, गोदान केले. ऐन्द्रिशान्ती झाली आणि उत्तरपूजनानंतर आचार्याना प्रतिमा दान देण्यात आल्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३ जून १६७८ मौनीमहाराज मठासाठी छत्रपति शिवाजी महाराजांची सनद छत्रपती शिवाजी महाराज हे दक्षिण दिग्विजयला निघायच्या अगोदर म्हणजे १६७६ ला पाटगांवला जाऊन श्रीमौनीमहाराज यांचे दर्शन घेतले आणि नंतर लगेच दक्षिण दिग्विजयासाठी दसर्याच्या मुहूर्तावर बाहेर पडले होते.  मौनीमहाराज मठासाठी छत्रपति शिवाजी महाराज आणि पुढचे इतर छत्रपतींनी वेळोवेळी सनदा दिलेल्या आहेत. पहिली सनद सनद...

२१ मे १६७४राज्याभिषेकापूर्वी केलेला संकल्प प्रतापगडी पूर्ण करून छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर परतले

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ मे १६७२ छत्रपती शिवरायांनी कुतुबशहाला खंडणीसाठी फर्मान दिले होते, ती ६६,००० होनांची खंडणी वसूल करून 'निराजी रावजी' आजच्या दिवशी किल्ले रायगडावर दाखल झाले.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ मे १६७४ राज्याभिषेकापूर्वी केलेला संकल्प प्रतापगडी पूर्ण करून छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर परतले. आदिशक्ति छत्रचामरानी मंडीत करून झालेली होती. आता काही दिवसातच महाराज सिंहासनाभिषिक्त होणार होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड, सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र. "जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

२६ मे १६४२"शिवा जंगम'' या सद्गृहस्थास छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर येथील शिवमंदिरात दैनंदिन पुजे-अर्चेसाठी नेमले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ मे १६४२ "शिवा जंगम'' या सद्गृहस्थास छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर येथील शिवमंदिरात दैनंदिन पुजे-अर्चेसाठी नेमले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ मे १६७४ छत्रपती शिवराय व हेन्री ऑक्झन्डेन यांची रायगडावर भेट आजच्याच दिवशी २६ मे १६७४ रोजी हेन्री ऑक्झन्डेन हा शिवरायांना रायगडावर भेटला होता. इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झन्डेन हा ह्या भव्य सोहळ्यासाठी आमंत्रित दहा हजार पाहुण्यांपैकी एक होता. इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेन्डन हा राज्याभिषेकासाठी उपस्थित राहण्यासाठी १९ मे ला पाचाडला पोहोचला होता. शिवाजी महाराजांच्या मंचकारोहणा नंतर रायगडावर उपस्थित असलेला इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन ह्याने शिवाजी महाराजांना भेटवस्तू दिल्या. त्यामधे एक मुल्यवान अंगठी, एक हजार सहाशे रुपये व एक खुर्ची हे होते. त्याने शंभू बाळाला व काही मंत्र्यांना मिळून ३०६५ रुपयांची भेट दिली. हेन्रीने त्याच्या रोजनिशीत राज्याभिषेकाचा वृतांत दिला आहे. ह्या समारंभात तो काही दिवस रायगडावरच भवानी टोकाजवळ राहिला होता. इंग्रज किंवा इतर पाश्चात्य सत्तांनी राज्याभि...

२० मे १६७३छत्रपती शिवराय महाबळेश्वर येथे दाखल.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० मे १४९८ पोर्तुगालचा वास्को-द-गामा दोनशे खलाश्यांसह भारतातील कालिकत बंदरामध्ये येऊन पोहचला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० मे १६६५ किल्ले राजगडाहुन "छत्रपती शिवरायांनी" आपले वकिल 'रघुनाथपंत पंडितराव' यांना "मिर्झाराजे जयसिंह" यांच्याकडे "पुरंदर तह" संदर्भात बोलणी करण्याकरता रवाना केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० मे १६७३ छत्रपती शिवराय महाबळेश्वर येथे दाखल. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० मे १६७७ जिंजी स्वराज्यात दाखल २० मे १६७७ च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजी स्वराज्यात सामील केला. महाराजांनी नसीर मुहम्मदला ५०००० होन रोख दिले. आणि दक्षिण दिग्विजयार्थ आपली आगेकूच चालूच ठेवली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० मे १६८२ छत्रपती संभाजीराजेंच्या आदेशाने मुघल सरदार शरीफखानाच्या सैन्यावर मराठ्यांनी अचानक हल्ला केला. वाढलेल्या गवतातून मराठे आले आणि प्रमुख जाहीदखान, चुराघासी, सैफुखान, असहनउल्लाह सह इतर सैन्याची कत्तल करून मराठे पसार झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० मे १७६६ मल्हारराव होळकर यांचे निधन ( जन्म - १६ मार्च १६९३ ) ...