१४_जानेवारी_१७६१#पानिपतचा_रणसंग्राम.
१४_जानेवारी_१७६१ #पानिपतचा_रणसंग्राम. पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला परंतू पानिपत येथील पराभव हा मराठी राज्याला कलंक नसून अभिमानास्पद आहे, कारण यानंतर अफगानी आक्रमण पुन्हा दिल्ली पाहू शकले नाहीत, मोगल साम्राज्य संपुष्टात येत होते. राज्य टिकवण्याचा जोम किंवा वकूब मोगलांच्यात राहिला नव्हता . त्यातून नादिरशहाच्या स्वार्यापासून वायव्येकडून अफगाणांचे हल्ले हिंदुस्थानावर होऊ लागले. अहमदशहा अब्दालीच्या आक्रमणात दत्ताजी शिंदे यांना वीरमरण आले यामुळे सारा महाराष्ट्र चवताळून उठला. सदाशिवरावभाऊ पेशवे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोहिमेत विश्वासराव पेशवे, जनकोजी शिंदे सारखे अवघे सोळा सतरा वर्षांचे सेनानीही आपल्या जीवाची पर्वा न करता सामील झाले होते. हिंदुस्थानच्या रक्षणासाठी झालेल्या या लढाईत महाराष्ट्राची एक सबंध पिढी मारली गेली . हल्ली आपण पानिपत म्हणजे पराभव असे मानतो परंतु पानिपत म्हणजे पराभव नव्हे पानिपत म्हणजे मराठा सैन्याने अब्दालीला धडा शिकवायला केलेला रणसंग्राम, पानिपत म्हणजे “ बचेंगे तो और भी लडेंगे “ अस उत्तर देणारा शूरवीर दत्ताजी शिंदे, सदाशिवराव भाऊंच्या जिगरबाज लढ्याची क...