Posts

Showing posts from June, 2025

भूषणगड हा खटाव तालुक्यातील निमसोड गावाजवळ एका उंच डोंगरावर आहे.

                           भूषणगड हा खटाव तालुक्यातील निमसोड गावाजवळ एका उंच डोंगरावर आहे. अत्यंत सुंदर किल्ला असून हा तेराव्या शतकात यादव राजा सिंघण याने बांधला आहे. पुढे तो बहामनी राजवटीकडे आणि नंतर आदिलशहाकडे होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. मराठ्यांच्या इतिहासात या किल्ल्याचे महत्वचे स्थान आहे. औरंगजेबाने हा किल्ला १७०० साली बळकावला पुढे तो मराठ्यांनी जिंकून घेतला. कोट्यावधी खजिना आणि लाखोंची फौज घेऊन सतत २७ वर्षे मराठ्यांविरुद्ध लढणाऱ्या औरंगजेबाला मराठ्यांनी महाराष्ट्राच्या मातीतच गाडले, त्यामध्ये भूषणगड माण खटावच्या रणभूमीने मोलाचे योगदान दिलेले आहे .                               

२८ जून इ.स.१६७७**छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह देवेनापट्टणच्या एका कोसावर पोहोचले..

*२८ जून इ.स.१६७७* *छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह देवेनापट्टणच्या एका कोसावर पोहोचले..!*#शिवकालीनदिनविशेष #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवकालीन_इतिहास_मराठ्यांचा #chtrapatisambhajimaharaj

२७ जून १६७०कोकणातील रायगड जिल्ह्यातील "कुर्डूगड उर्फ मंदारगड" मराठ्यांनी जिंकला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ जून १६६२ छत्रपती शिवाजी महाराजांचे बाजी सर्जेराव जेधेंना पत्र शाहिस्तेखान स्वराज्यात येऊन 2 वर्षे झाली होती. स्वराज्यात येताच मुघल सैन्याने लुटालूट आरंभली होती. शाहिस्तेखानाने चाकण, पुणे प्रांत ताब्यात घेऊन लालमहालात तळ ठोकला होता. मोगली सैन्याने शिरवळ भागातही गुरेढोरे व धान्याची पेवे लुटून न्यायला सुरू केले होते. आक्रमक बनलेल्या मोगलांनी भोर, रोहीडा भागातही हालचाली सुरू केल्या होत्या. कान्होजी जेधेंच्या मृत्यूनंतर या भागाची देशमुखी बाजी सर्जेराव जेधे सांभाळत होते. मुघल सैन्याच्या दबावामुळे जेधेंचे सैन्य व नोकर आपला मुलुख सोडून शिवाजी महाराजांच्याकडे नोकरीसाठी जाऊ लागले. त्यामुळे बाजी जेधेनी महाराजाना पत्र पाठवून आपले लोक येतील त्यांना नोकरीवर ठेऊन घेऊ नये अशी विनंती केली होती. यावेळी महाराजांनीही बाजी जेधेंच्या पत्राला लागलीच उत्तर पाठवून दिलासा दिला होता. त्यात महाराज म्हणतात, "तुमचे लोक हुजूर येतील त्यास साहेब ठेवणार नाहीत. तुमचे तुम्हापासी फिराउनु पाठवितील." बाजी सर्जेराव जेधेना दिलासा देण्यासाठी पाठवलेल्या या...

२६ जून १६७७"दक्षिण दिग्विजय मोहीम"दक्षिणेतील "तिरूवाडी" येथे छत्रपती शिवराय मुक्कामी.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ जून १६६४ सुरतच्या इंग्रजांचे कारवारच्या इंग्रजांना पत्र. पत्राद्वारे त्यांनी छत्रपती शिवरायांपासून सावध राहण्याचा इशारा दिला. पत्रातील मजकूर हा मराठ्यांचा राजा शिवाजी याविषयी होता. राजांचे फारच कल्पनातीत असे वर्णन त्यात केले होते व त्या आधीच्या पाच वर्षातल्या प्रमुख घटना पाहिल्या तर ते सत्य वाटण्याइतपत स्वाभाविक होते. खरेच, इसवी सन १६५९ ते इसवी सन १६६४ या कालावधीत शिवाजी राजांनी बलाढ्य अफझलखानास मारले होते, सिद्दी जौहर च्या वेढ्यातून राजे निसटले होते, कारतलबखनास उंबरखिंडीत पराभूत केले होते, तळकोकण जिंकले होते आणि इंग्रजांवर वचक बसवला होता, शाहिस्तेखानाची महालात घुसून बोटे तोडली होती, कुडाळ मोहीम करून डच व पोर्तुगीजांवर वचक बसवला होता आणि मोगलांची सुरत 'बदसूरत' करून टाकली होती. याचाच परिपाक म्हणून सुरतकर कारवारकराना लिहीत होते ते असे "त्याचे शरीर हवामय असून त्याला पंखही आहेत. एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रगट होतो. त्याला हर्क्युलीसचे सामर्थ्य आहे." इत्यादी... 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ जून १६७१ पुणे परगण्याच्या नीरथड...

सरदार खराडे घराणे - तडवळे सातारा जिल्ह्यातील लोणंद तालुक्यातील

सरदार खराडे घराणे  - तडवळे           सातारा जिल्ह्यातील लोणंद तालुक्यातील तडवळे गावात सरदार खराडेंची गढी आहे. तडवळे हे फलटण तालुक्याला लागून असलेले गाव लोणंदपासून १५ कि.मी अंतरावर आहे. काळज गावापासून जवळच आहे. सद्यस्थितीत गढीचे भव्य प्रवेशद्वार आणि तीन बुरूजासह तटबंदी शिल्लक आहे. प्रवेशद्वारावर शिल्पे कोरलेली आहेत. गढीतील विहीर एकदम सुबक आहे. विहिरीत एक भुयारी मार्ग गावातील भैरवनाथ मंदिरातून येतो असे स्थानिक गावकरी सांगतात. वर बुरूजावर नाथपंथीय साधूंची समाधी आहे.गढीच्या आत एक भलेमोठे दगडी कमानी असलेले तळघर आहे.       छत्रपती शिवरायांच्या काळापासून तडवळे गाव अस्तित्वात आहे. खराडे हे मराठा घराण्यातील भोसले कुळाचे एक उपकुळ असुन खराडे हे नाव सांगली जिल्ह्यातील खराडी गावामुळे पडले आहे. खराडे सरदारांनी आयुष्यभर मराठी साम्राज्याची सेवा केली. मराठा आरमाराचे सरदार सुभानजी खराडे छत्रपती शिवाजी यांचे विश्वासू सरदार होते. सरदार शिताजी खराडे आणि त्याचा मुलगा सरदार फकीरजी शिताजी खराडे यांचा अब्दालीचा वझीर शहापसंद खान याच्याशी लढताना मृत्यू झाला. सरदार...

१५ जून १६७०मराठ्यांनी सिंदोळा गाव आणि किल्ला विजापूरकरांकडून जिंकून घेतला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ जून १६६५ ऐतिहासिक किल्ले पुरंदरचा तह झाल्यानंतर दाउदखानची भेट घेऊन छत्रपती शिवराय "किल्ले राजगड" कडे परतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ जून १६६५ पुरंदरच्या तहानुसार किरंतसिंह हा सरदार किल्ले कोंढाणा (सिंहगड) ताब्यात घेण्यासाठी कोंढाण्यावर आला. त्यावेळी किल्ले कोंढाण्याचा नवीन किल्लेदार "उदयभान राठोड" याला केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ जून १६७० मराठ्यांनी सिंदोळा गाव आणि किल्ला विजापूरकरांकडून जिंकून घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ जून १६७५ कारवारची मोहिम आटोपून छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर परतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ जून १६८१ शहजादा अकबरास भेटण्याबाबत छत्रपती संभाजी महाराजांची मंत्री मंडळाची बैठक !  जून महिण्याच्या पहिल्या पंधरवड्यात महाराष्ट्रात आलेल्या अकबर व दुर्गादास राठोड यांनी पाली (नागोठणे) परिसरात आपला तळ दिला होता. छत्रपती संभाजी महाराजांना याची त्वरित खबर दिली गेली. शहजादा अकबरास भेटावे की, न भेटावे या संबंधात छत्रपती संभाजी महाराजांनी मंत्रीमंडळाचा सल्ला घेण्याविषयी बैठक बोलावली. त्या मंत्रीमंडळाच्या ...

११ जून इ.स.१६७४**छत्रपती शिवाजी महाराजांनी मुंबई तहावर आपल्या मान्यतेची निदर्शक म्हणून सही केली.

*११ जून इ.स.१६७४* *छत्रपती शिवाजी महाराजांनी मुंबई तहावर आपल्या मान्यतेची निदर्शक म्हणून सही केली..

१० जून १६७६छत्रपती शिवरायांच्या 'दक्षिण दिग्विजय' मोहिमेस सुरुवात.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १० जून १२४६ अल्लाउद्दीन मसुद्शाहचा खून. नसीरुद्दीन महम्मद शाह दिल्लीचा सुलतान झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १० जून १६४० सरनौबत नरवीर पिलाजी गोळे जयंती हिंदवी स्वराज्याचे पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांच्या ३८१ व्या जयंती निम्मित विनम्र अभिवादन सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचा जन्म जावळीच्या खोऱ्यातील गणी गावात झाला. चार छत्रपतींच्या सोबत इमानाने राहिलेलं मोजक्या घराण्यातील एक गोळे घराणे, ह्याच गोळे घराण्यातील इतिहासात एकनिष्ठ म्हणून उल्लेख आढळतो. पिरंगुट या गावी त्यांची पवित्र समाधी आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १० जून १६६१ छत्रपती शिवरायांची 'कल्याण-भिवंडी'कडे मोहिम. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १० जून १६६४ विजापूर बादशाहाने सिद्दी अझीजखान यास छत्रपती शिवाजी महाराजांविरूद्ध तळकोकणावर रवाना केले.  अजीजखान आल्याचे कळताच वाडीकर लखम सावंत त्यांच्या भेटीस गेला. भेटीत ठरल्याप्रमाणे सावंत कुडाळकर चाल करून गेला. शर्थीची झुंज मांडून त्याने मराठ्यांना पराभूत केले. कुडाळ सावंतांच्या ताब्यात गेले. अजीजखान वेंगुर्ला येथे गेला होता. या मुक्कामा...

३ जून १६७४छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेकासाठी निरगती याग, पूजा, गोदान केले. ऐन्द्रिशान्ती झाली आणि उत्तरपूजनानंतर आचार्याना प्रतिमा दान देण्यात आल्या.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३ जून १६७३ छत्रपती शिवाजी महाराज व थोमास निकल्स यांची किल्ले रायगडावर भेट. हुबळीच्या लुटीच्या नुकसान भरपाईचा विषय निघताच शिवाजी महाराजांनी सांगितले की 'ही लूट नेमकी कुणी केली हे आम्हाला माहित नाही. त्यामुळे नुकसानभरपाईचा प्रश्न उरत नाही.' लाकूडफाटा व मीठ यांच्या व्यापारात सवलती देण्याचे महाराजांनी मान्य केले. थोडक्यात थॉमस निकल्सच्या भेटीतूनही फारसे काही निष्पन्न झाले नाही. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३ जून १६७४ छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेकासाठी निरगती याग, पूजा, गोदान केले. ऐन्द्रिशान्ती झाली आणि उत्तरपूजनानंतर आचार्याना प्रतिमा दान देण्यात आल्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३ जून १६७८ मौनीमहाराज मठासाठी छत्रपति शिवाजी महाराजांची सनद छत्रपती शिवाजी महाराज हे दक्षिण दिग्विजयला निघायच्या अगोदर म्हणजे १६७६ ला पाटगांवला जाऊन श्रीमौनीमहाराज यांचे दर्शन घेतले आणि नंतर लगेच दक्षिण दिग्विजयासाठी दसर्याच्या मुहूर्तावर बाहेर पडले होते.  मौनीमहाराज मठासाठी छत्रपति शिवाजी महाराज आणि पुढचे इतर छत्रपतींनी वेळोवेळी सनदा दिलेल्या आहेत. पहिली सनद सनद...