Posts

१९ऑगस्ट इ. स. १६८०*संत तुकाराम महाराजांचे पुत्र महादेव महाराज यांना वर्षासन!छत्रपती संभाजी महाराजांनी पुणे प्रांताचे देशाधिकारी विनायक उमाजी यांना आजच्या दिवशी, एक खास पत्र लिहिले आणि या पत्रानुसार संत तुकाराम महाराजांचे पुत्र महादेव महाराज यांना वर्षासन इनाम करून दिले.

*आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष* *१९ ऑगस्ट इ.स.१६००* बु-हाण निजामशहाच्या मृत्युनंतर मुघल सम्राट अकबर याने अहमदनगर पर्यंत सैन्य पाठवून दहशत निर्माण केली त्यावेळी चांदबिबीने पराक्रमाची शर्थ करून अहमदनगरचा बचाव केला तरीपण तिच्या मृत्युनंतर मुघलांनी पुन्हा आक्रमण करून आजच्या दिवशी अहमदनगरचा ताबा मिळवला. *१९ ऑगस्ट इ.स.१६६६* शिवाजीराजे निसटल्याची बातमी संपूर्ण आग्रा शहरात!       "फौलादखानी" चौकशीत गुन्हेगाराचा साथीदार सापडला होता. पण शिवाजीराजे हजार शाही सैनिकांच्या डोळ्यादेखत काय हुन्नर करून निघून गेले हे गूढ मात्र औरंगजेब बादशहाला व त्यांच्या बुद्धिमान वजिरांना काही केल्या उलगडेना. महाराज निसटल्याची बातमी कळल्यापासून या रहस्याचाही शोध घेणे सुरुच होते. अखेर बरेच डोके खाजविल्यानंतर शाही आधिकारी अचूक निर्णयावर येऊन पोहोचले की, "शिवाजीराजेंच्या डेऱ्यातून जे मोठमोठे मिठाईचे पेटारे जात होते त्यातच बसूनच वार रविवार दि. १९ ऑगस्ट इ.स.१६६६ शिवाजीराजे पळून गेले. प्रत्येक जण आपापल्या परीने "काहीही बोलु लागले. होते.‌ "नेतोजी पालकर यांना पकडण्याचे फर्मान निघाले. *१९ ऑगस्ट १६७५* शिवरा...

चऱ्होलीकर सरदार दाभाडे घराणे पूर्वज सोमाजीराव दाभाडे हे मूळ पुरुष होय सोमाजी दाभाडे यांना दोन मुले होती थोरले कृष्णाजी व धाकटे बाबुराव होय कृष्णाजी दाभाडे यांचा अनेक ऐतिहासिक पत्रांमध्ये उल्लेख आढळतो.काही पत्रे मिळाली ती या ठिकाणी एकत्र करत आहे.

चऱ्होलीकर सरदार दाभाडे बजाजी दाभाडे पाटील तळेगाव दाभाडे यांना दोन मुले होती पहिले येसाजीराव व दुसरे सोमाजीराव होय सोमाजी बिन बजाजी दाभाडे च-होली गावच्या वतनावर आले च-होली सरदार दाभाडे घराण्यातील सोमाजीराव दाभाडे हे  मूळ पुरुष होय सोमाजी दाभाडे यांना दोन मुले होती थोरले कृष्णाजी व धाकटे बाबुराव होय कृष्णाजी दाभाडे यांचा अनेक ऐतिहासिक पत्रांमध्ये उल्लेख आढळतो. राजवाडे यांच्या पत्र संग्रहामध्ये असणारी काही पत्रे. जशी जशी तशी मराठी अनुवादित पुढे देत आहे. श्रीमोरया.                                                            वंशावळ : दाभाडे मोकद्दम, मौजे तळेगाव, त॥ चाकण, प्र॥ जुन्नर, सुभे खुजस्तेबुनियाद, मोकद्दमी तक्षीम चवथी मौजे मजकूरची, यांचा मूळ पुरुष बजाजी पाटील दाभाडे. त्यास पुत्र दोन, (१) येस पाटील दाभाडे, (२) सोमाजी दाभाडे. वडील येस पाटिल दाभाडे हे मोकद्दमी करीत होते. यांणीं राजाराम महाराज यांची सेवा केली. चंदीचे मुक्कामीं महाराजास प...

सरदार बाबाजी घाडगे

Image
Vrds

१७ ऑगस्ट इ.स.१६६६(श्रावण वद्य द्वादशी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शुक्रवार)छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्राच्या कैदेतून सुटका करून घेतली!

⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 १७ ऑगस्ट इ.स.१६५३ चाकणचे सिद्धेश्वर भट ब्रम्हे यांना महाराजांनी वर्षासन नेमून दिले. चाकणचे सिद्धेश्वर भट ब्रम्हे हे दुसरे सत्पुरुष "त्यांच्या अनुष्ठानबळे आपण राज्यास आधिकारी झालो व सकल मनोरथ चिंतिले ते पावलो" अशी महाराजांची धारणा होती. महाराजांना औरंगजेब बादशहाचा कावा समजला आणि महाराजांनी भराभर पावले उचलायला सुरुवात केली.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/uRoN9-0r0lY?feature=share 📜 १७ ऑगस्ट इ.स.१६६२ जेधे शकावलीतील नोंदीनुसार भाद्रपदशुक्ल द्वादशी शके १५८४ म्हणजे १७ ऑगस्ट १६६२ रोजी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अण्णाजीपंतास सूरनिसी दिली. सुरनीस या फारसी शब्दाचा अर्थ “सुद सुद बार“ असा शेरा मारणारा . सनदा , हुकूमनामे , राजपत्र , महत्वाच्या निर्णयांची शासकीय कागदपत्रे तपासणे, त्यातील त्रुटि शोधून त्यातील चुकीचा मजकूर दुरुस्त करणे . महाल , परगणे यांचे हिशोब जमाखर्च तपासणारा कारकून . वित्त व लेखा अधिकारी . प्रस...

७ आॅगस्ट १६७५छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी "कोल्हापूर" जिंकले.आजच्या दिसशी कोल्हापुर स्वराज्यात दाखल झाले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ७ आॅगस्ट १६४८ महाराज किल्ले पुरंदर पाहण्यासाठी गडावर !  किल्ले पुरंदराची अभेद्यता व भव्यता पाहून महाराज बहोत खूष झाले. भविष्यात हा गड फार उपयोगी व महत्वाचा आहे. हे जाणून महाराजांनी अनेक डागडुजी आणि शिबंदीसाठी योग्य ती व्यवस्था करण्यास सांगितले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 ७ आॅगस्ट १६७५ छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी "कोल्हापूर" जिंकले. आजच्या दिसशी कोल्हापुर स्वराज्यात दाखल झाले. कोल्हापूर परिसरावर विजापूरच्या आदिलशहाची अनेक वर्षे सत्ता होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मार्च १६७३ मध्ये पन्हाळा जिंकून स्वराज्यात आणला, तसेच १६७५ मध्ये कोल्हापूर परिसर खऱ्या अर्थाने जिंकून आपल्या अखत्यारीत आणला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ७ आॅगस्ट १६७९ छत्रपती शिवरायांच्या सूचनेवरून "खांदेरी-उंदेरी" किल्ल्यावर गोड्या पाण्याचे झरे खोदून तिथे विहीरी बांधण्याचे काम चालू झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ७ आॅगस्ट १६८८ स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी औरंगजेब बादशहाने आपले मातब्बर मोहरे पाठविले. छत्रपती संभाजी महाराजांचा मुलुख जिंकण्यासाठी औरंगजेब बादशह...

६ आॅगस्ट १६४८छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी "किल्ले पुरंदर" वर हल्ला केला. किल्ले पुरंदर स्वराज्यात दाखल.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ६ आॅगस्ट १६४८ छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी "किल्ले पुरंदर" वर हल्ला केला. किल्ले पुरंदर स्वराज्यात दाखल. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ६ आॅगस्ट १६५७ छत्रपती शिवरायांनी अहमदनगरच्या मुघल छावणीवर हल्ला केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ६ आॅगस्ट १६५९ ठाण्याच्या पोर्तुगीज गव्हर्नर ने गोव्याच्या प्रमुख गव्हर्नर ला मराठ्यांच्या आरमारापासून सावध राहण्याबाबतचे पत्र पाठवले. सदर पत्राचा मराठी अनुवाद- "शहाजीचा मुलगा (शिवाजी) याने आदिलशाहीच्या ताब्यामधील वसई ते चौल मधला बराच भूभाग जिंकला असून त्याने स्वतःची लढण्याची ताकद वाढवली आहे. त्याने कल्याण, भिवंडी, पनवेल ह्या वसईच्या आसपासच्या बंदरांमध्ये काही लढाऊ जहाजे बनवली आहेत. आम्हाला आता सतर्क रहायला हवे. ही जहाजे बंदरामधून खुल्या समुद्रात बाहेर येणार नाहीत यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आदेश आम्ही पोर्तुगिझ कप्तानाला दिले आहेत." 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड, सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र. "जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष...

३ आॅगस्ट १६७७"दक्षिण दिग्विजय मोहीम"दक्षिण मोहीमेदरम्यान छत्रपती शिवरायांचा "वृद्धाचलम" येथे मुक्काम.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३ ऑगस्ट १३४७ दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलख याच्या कारकिर्दीत दक्षिणेत जाफरखान उर्फ अल्लाउद्दीन हसन याने बंड करून गुलबर्गा इथे ३ ऑगस्ट १३४७ ला बहामनी राज्याची स्थापना केली. या बहामनी राज्यात १३४७ ते १५३८ या काळात एकूण १८ सुलतान होऊन गेले. बहामनी राज्यातील १४ वा सुलतान शिहाबुद्दीन महमूद याच्या कारकिर्दीच्या दरम्यान बहामनी सत्तेचा कर्तबगार वजीर महंमद गवान याची हत्या झाल्यानंतर बहामनी सत्तेचे  वेगवेगळे सुभेदार जसे युसुफ आदिलखान (आदिलशाही), फतहुल्लाह इमाद (इमादशाही), कुत्ब उल्मुख (कुतुबशाही), अमीर कासीम बरीद (बरीदशाही) व मलिक अहमद बहिरी (निजामशाही) यांनी बहामनी सत्तेतून बाहेर पडत आपली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कामी महत्वाचा अडसर राहिला तो विजापूरच्या आदिलशाहीचा. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 ३ आगस्ट १६६४ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा आरमाराच्या हेरांनी आणलेल्या माहितीवरून पोर्तुगीज व मोगली आरमाराचा समाचार घेण्यासाठी दहा दहा गलबतांचा ताफा रवाना झाला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻?...