२३ ऑगस्ट १६६३छत्रपती शिवरायांनी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील "आचरे" ताब्यात घेतले.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ ऑगस्ट १६६३ छत्रपती शिवरायांनी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील "आचरे" ताब्यात घेतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ आॅगस्ट १६६६ छत्रपती शिवरायांच्या आग्रा सुटकेनंतर मुघल सैनिकांनी "कवी परमानंद" यांना "दौसा" येथून ताब्यात घेतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ आॅगस्ट १६६६ आग्र्याहून सुटकेनंतर छत्रपती शिवरायांनी खोटे शाही दस्तक दाखवून "चंबळ" नदीचा परीसर नावेने पार केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ ऑगस्ट १६६६ आग्य्रात असताना प्रत्यक्ष औरंगजेबाच्या दरबारातील बातम्या महाराजांना कशा ज्ञात असत, याविषयी २३ ऑगस्ट १६६६ ला आग्य्राहून लिहिलेल्या पत्रात परकलदास लिहितो, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज येथून निसटण्यापूर्वी चार दिवस त्याच्या भोवतालचा पहारा अधिकच कडक केला होता. पुन्हा एकदा बादशहाचा हुकूम आला होता की, छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारा, परंतु थोडय़ाच वेळाने त्याने आपले मन बदलले व महाराजांना विठ्ठलदासचे हवेलीत नेऊन ठेवण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांना दरबारांतील असल्या सर्व हालचालींची बित्त...