Posts

व्यंकोजी/एकोजीराजे भोसले •••

••• व्यंकोजी/एकोजीराजे भोसले ••• शहाजी राजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जहागिरीचा हक्क त्यांचा मुलगा व्यंकोजी यांस प्राप्त झाला. शहाजी राजांचा थोरला मुलगा संभाजी शहाजी राजांबरोबर कर्नाटकातच होता. परंतु संभाजीचा मृत्यु कनकगिरीच्या युद्धात झाला, त्यामुळे जहागिरीची सूत्रे स्वाभाविकपणे व्यंकोजीराजांकडे आली. व्यंकोजी हे शहाजीराजांची दुसरी पत्नी तुकाबाई हिचे पुत्र होते. व्यंकोजीराजांच्या जन्मतिथी बद्दल फार थोडी माहिती उपलब्ध आहे. तंजावर च्या बृहदीश्वर मंदिरातील शिलालेखात शिवजन्माची साल १६२९ मानले आहे मात्र शिलालेखात तारखा व इ.स. च्या बाबतीत बऱ्याच चुका आहे. त्यामुळे शिवजन्माची साल ही चुकलेले आहे. व्यंकोजी हे शिवाजी महाराजांचे कनिष्ठ बंधू होते, त्यामुळे व्यंकोजीचे जन्मसाल 1629 हे मानता येत नाही. देवीसिंग चौहाण मात्र शके १५५२ माघ फाल्गुन मध्ये व्यंकोजी राजांचा जन्म झाला असे मानतात. याचा अर्थ शिवजन्मानंतर लवकरच व्यंकोजी राजांचा जन्म झाला असावा. थोरल्या संभाजी राजांच्या मृत्यूनंतर शहाजीराजांनी व्यंकोजींवर कर्नाटकातील जहागिरीची जबाबदारी सोपविली. व्यंकोजीराजांनी आपल्या जहागिरीचा कारभार सांभाळला त्या...

१८ जुलै १६७२साल्हेर गड मोहीमछत्रपती शिवरायांनी मोगलांचा पराभव करून "नाशिक" स्वराज्यात आणले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १८ जुलै १६६६ हस्ब -उल- हुक्म प्रमाणे महाराजांनी मागीतलेले ६६००० रू. कुमार रामसिंगा कडून मिळाले. या आधी महाराजांनी अनेक अर्ज बादशहाकडे केले होते. मला जाऊ द्या, मी माझे किल्ले भांडून जिंकून बादशहास देतो. बादशहा अर्ज नकारत होता १८ जुलै च्या पत्रात अर्जाचा पुनर्विचार करण्यास रामसिंगास सांगत आहेत. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १८ जुलै १६७२ साल्हेर गड मोहीम छत्रपती शिवरायांनी ठाकुरजी उर्फ पतंगराव जाधवरावांचा (जाधवरावांचा नसून मोगलांचा) पराभव करून "नाशिक" स्वराज्यात आणले. इ.स.१६७२ साल्हेर गड मोहिमेसमयी दक्षिणेत  मोगल सुभेदार बहादुरखान हा होता व नाशिकचा ठाणेदार हे जाधवरावांच्या थोरल्या शाखेचै ठाकुरजी उर्फ पतंगराव जाधवराव हे लखुजीरावाचे जेष्ठ पुत्र दत्ताजीराव यांचे द्वितीय चिरंजिव हे होते व सिद्दी हीलाल हे वणी दींडोरीचे ठाणेदार होते... छत्रपती शिवरायांच्या सैन्याचा या मोहिमैत ठाकुरजी जाधवराव व सिद्दी हीलाल यांनी पाहिजे तसा प्रतिकार केला नाही.. कारण हे दोघे शिवरायांशी संधान बांधुन होते... याकारणे ठाकुरजी आणी हीलाल यांचा सरसुभेदार बहादुरख...

१४ जुलै १६७४"बहादूरखान कोकलताश" याच्या पेडगावची मराठ्यांनी लूट केली. राजाभिषेकानंतर प्रथमच १ कोटींची एवढी प्रचंड लूट मराठ्यांनी रायगडावर जमा केली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १४ जुलै १६५९ सोनोपंत डबीर दिल्लीहुन स्वराज्यात परत त्यासुमारास स्वराज्यावर अफजलखानाचे संकट घोंघावत होते. महाराज नुकतेच जावळीला आले होते. इस १६५७ मधे शिवाजीराजांनी मुघलांच्या ताब्यातील जुन्नरवर अचानक हल्ला करून औरंगजेबाला धक्का दिला होता खरा मात्र, त्याविरुद्ध काही तोडगा काढण्याआधीच औरंगजेबाला सत्तासंघर्षासाठी दिल्लीच्या दिशेने जावे लागले.  भाऊ आणि इतर प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढुन व बाप शहाजहानला कैदेत टाकुन निश्चिंत होऊन औरंगजेब ५ जून १६५९ रोजी थाटामाटात दिल्लीच्या गादीवर बसला. त्याप्रसंगी राजकारणाचा भाग म्हणून महाराजांतर्फे नजराणा घेऊन सोनोपंत दिल्ली दरबारात उपस्थित होते. त्यांनी तो औरंगजेबाला पेश केला त्याबदल्यात औरंगजेबानेही महाराजांना देण्यासाठी पोशाख व फर्मान सोनोपंतांना दिले. फर्मानात 'इकडील लोभ आपणावर पूर्ण आहे असे जाणून असावे' असे नमूद होते.  अफजलखानाचे प्रचंड संकट आले असताना किमान मुघलांच्या आघाडीवर शांतता होती हे तस बरच झाल मात्र, ही केवळ तात्पुरती व वरवरची गोडीगुलाबी होती हे पुढच्या काही महिन्यांतच सिद्ध झाल...

२४ जून १६७०बारा मावळाची सुरुवात जिथून होते त्या रोहिडे खोर्‍यातील "रोहिडा किल्ला उर्फ विचित्रगड" मराठ्यांनी जिंकला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ जून १५६४ गोंडवानाची महाराणी राणी दुर्गावतीचे बलिदान मोगल सम्राट अकबर संपूर्ण हिंदुस्थानात आपली सत्ता वाढवू पाहत होता. त्यावेळच्या सर्व राजा-महाराजांना त्याने, एकतर मोगल साम्राज्याचे सेवक व्हा किंवा युद्धाला तयार रहा असा प्रस्ताव पाठवला होता, ज्यामध्ये बरेच राजपूत मोगलांचा हा प्रस्ताव स्वीकारून मोगलांचे  मांडलिकत्व पत्करले होते. या प्रस्तावाला धुडकावून लावणारी मंडळी सुद्धा होती ज्यामध्ये आपणास महाराणा प्रताप ये नाव माहीतच आहे. परंतु या मध्ये एक महाराणी होती जिने त्याचा हा प्रस्ताव धुडकावून लावला आणि मोगलांशी लढली. या राणीचे नाव आहे "महाराणी दुर्गावती" !! १५४२ साली तिचे लग्न दलपत शाहशी झाला. दलपत शाह गोंड (गढ़मंडला) राजा संग्राम शाह यांचे ज्येष्ठ पुत्र होते. लग्ना नंतर फक्त चार वर्षातच दलपत शाह मरण पावला आणि राज्यकारभार दुर्गावती राणीकडे आला.  ती गोंड (गोंडवाना) राज्याची पहिली राणी झाली, अकबराच्या दबावाला बळी न पडता तीने लढा दिला आणि त्यात तीने स्वतचा जीव दिला. गोंडवाना राज्यावर मोगल सम्राट अकरबरा शिवाय बाज बहाद्दरन...

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* *१९ जून इ.स.१६२६*

*आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष*  *१९ जून इ.स.१६२६* बहामनी शासकाच्या वजीर निजाम मलिक अंबर याच्या काळात धोडप किल्ला नगरच्या निजामशहाकडे होता. निजामशाही नष्ट करण्यासाठी आलेल्या मुघलांच्या सरदार अलीवर्दीखानाने निजामच्या किल्लेदाराला १ लाख रुपयाच्या मनसबीची लालूच दाखवून १९ जून १६२६ मध्ये किल्ला ताब्यात घेतला आणि त्याने थोडी फार पुनर्बांधणी व डागडूजी करुन किल्ला भक्कम केला. किल्ल्यावर अलीवर्दीखानाने पर्शियन भाषेत कोरलेला शिलालेख वाचावयास किंवा पहायला मिळतो. *१९ जुन इ.स.१६३६* शहाजहान बादशहाचा गुलाम अलीवर्दीखान तुर्कमान याने १४ किल्ले ४ महिन्यात काबीज केले. इ.स.१६३५ शहाजहान बादशहाने दक्षिणेत स्वारी केली. त्याने बागलाण- नाशिककडील किल्ले घेण्यासाठी शाहिस्तेखानाच्या नेतृत्वाखाली अलावर्दीखान यांस नेमले. अलावर्दीखान याने त्या भागातील सर्व किल्ले राजे शहाजीराजे यांच्या लोकांकडून घेतले. त्यासंबंधीचा शिलालेख धोडप किल्ल्यात आहे. त्याचा सारांश पुढीलप्रमाणे:- शहाजहान बादशहाचा क्षुद्रतम गुलाम अलावर्दीखान तुर्कमान याने धोडपचा किल्ला व इतर १४ किल्ले अवघ्या ४ महिन्यांत काबीज केले. चांदवड, अंतराळ, (इंद...

१६ मे १६४८छत्रपती शिवरायांनी पहिली राजधानी राजगडबांधकामास सुरुवात केली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇  १६ मे १६४० छत्रपती शिवाजी महाराजांचा फलटणच्या नाईक निंबाळकरांची लेक सईबाई यांच्याशी लालमहाल, पुणे येथे विवाह. सईबाईंना एकूण ४ संतती. ३ मुली म्हणजे सखुबाई, राणूबाई, अंबिकाबाई आणि १ मुलगा म्हणजेच छत्रपती शंभुराजे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १६ मे १६४८ छत्रपती शिवरायांनी पहिली राजधानी राजगड बांधकामास सुरुवात केली. १६४७-४८ दरम्यान छत्रपती शिवरायांनी तोरण्याबरोबर हा किल्ला ताब्यात घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १६ मे १६४९ शहाजीराजेंची सन्मानपूर्वक मुक्तता छत्रपती शिवाजी महाराजांनी फत्तेखानाचा व संभाजी राजांनी (छत्रपती शिवरायांचे मोठे बंधु) फर्रादखानाचा पराभव केला. छत्रपती शिवाजी राजांनी दिल्लीच्या मोगलांशी संधान साधून विजापूरकरांवर दबाव आणला. असे नाक दाबल्यावर, विजापूरकरांनी कैद केलेल्या शहाजी राजांना रिहा करण्याचा हुकूम सोडला व त्यांची सन्मानपूर्वक सशर्त सुटका केली. त्या बदल्यात छत्रपती शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला तर थोरले बंधू संभाजीराजेंना बेंगलोर. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇  १६ मे १६६५ मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण दिलेरखान...

४ मे १६७७दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी 'तिरुपती' येथे भेट दिली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ मे १६४९ मोगलांविरोधात शस्त्र उचलणारा शूर राजपूत छत्रसाल बुंदेला याचा जन्म. औरंगजेबासारख्या कट्टर इस्लामी बादशहालाही शह या छत्रसालाने दिला. छत्रपती शिवाजी राजे आणि छत्रसालाची भेटही इतिहासात झाली होती. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 ४ मे १६७७ दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी 'तिरुपती' येथे भेट दिली. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 ४ मे १७३९ वसई किल्ला मराठ्यान्नी प्रचंड रणसंग्राम करून जिंकला होता. मराठ्यांतर्फे किल्ल्याचा पूर्ण ताबा 'सरसुभेदार शंकराजी केशव' यांनी पेशव्यांच्या आज्ञेवरुन घेतला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 ४ मे १७५८ बाजीराव आणि चिमाजीने खरच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासुन रुमशे पावतो पसरवला. मराठ्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडुन गेली. थोरले बाजीराव हे एकमेव अपराजित सेनापती होते. अटकेच्या मोहिमेत तुकोजी होळकर आणि त्यांच्या सोबत असणारे सरदार राणोजी शिंदे यांनी अप्रतिम पराक्रम केला होता, रघुनाथरावाने वयाच्या २३व्या वर्षी अटकेवर भगवा फडकवला. राघोबाचा राघो-भरारी झाला. याच काळातिल ४ मे रोजी र...