३ सप्टेंबर इ.स.१६७५*महाराजांनी रामनगर पेठ वसविली! छत्रपती शिवाजी महाराजांनी पारमाची तर्फ शिवथर येथे रामनगर पेठ वसविली. राज्याभिषेका नंतर महाराजांनी इंग्रजांविरुद्ध मोहिम उघडली. महाडच्या उत्तरेस १५ कि.मि. अंतरावर असलेल्या पारमाची तर्फ शिवथर या खोऱ्यातील गावात महाराजांनी रामनगर पेठ वसविली.
*आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* *३ सप्टेंबर इ.स.१६७५* महाराजांनी रामनगर पेठ वसविली! छत्रपती शिवाजी महाराजांनी पारमाची तर्फ शिवथर येथे रामनगर पेठ वसविली. राज्याभिषेका नंतर महाराजांनी इंग्रजांविरुद्ध मोहिम उघडली. महाडच्या उत्तरेस १५ कि.मि. अंतरावर असलेल्या पारमाची तर्फ शिवथर या खोऱ्यातील गावात महाराजांनी रामनगर पेठ वसविली. *३ सप्टेंबर इ.स.१६७९* खांदेरी किल्ल्याचे बांधकाम रोखण्यासाठी ह्युजेसच्या नेतृत्वाखाली इंग्रज आरमार मुंबईहुन रवाना झाले होते. जंजिरेकर सिद्दी आणि मुंबईकर इंग्रज यांची स्वेच्छेने नसली तरी नाईलाजास्तव मैत्री होती [कारण सिद्दीला मदत करून इंग्रज मुघलांकडून कोकणातील बराचसा महसूल माफ करून घेत असत.मुघलांचे स्वतंत्र असे आरमार अगदी कमकुवत असावे अथवा नगण्य होते कारण सिद्दीला त्याच्या आरमाराकरिता मुघलांनी आपले मांडलिक केले होते]. या मैत्रीच्या आधारे सिद्दीचे आरमार दर पावसाळ्यात मुंबईला माजगावच्या बंदरात नांगरले जात असे.याचे कारण असे की पावसाळ्यात दर्याला उधाण असते व भर समुद्रात जंजिऱ्या जवळ आरमार ठेवणे मोठे मुश्कील. तसेच जंजिऱ्याचा आसपासच...