Posts

घाडगे

घाटगे  घाटगे घराण्याचा मूळ पुरुष कामराज घाटगे हा सोळाव्या वर्षीच हसन गंगू जाफरखान याच्या लष्करात मनसबदार झाला. त्याला मलवडी व ललगुण या दोन महालांची देशगत म्हणजे जहागीर होती. घाटगे घराण्यात अनेक शूर पराक्रमी पुरुष झाले. निजामशाहीचा दिवाण मलिकंबर याने विजापूरवर चढाई केली असताना घाटगे घराण्यातील वावजी व मिटोजी यांनी शर्थ करून आदिलशाहीचे रक्षण केले. त्या वेळी निजामशाहीत भोसले व जाधव ही घराणी व आदिलशाहीत घाटगे व घोरपडे ही घराणी फार पराक्रमी असून ती परस्परात लढाया करून आपापल्या सुलतानांची सेवा करीत असत. हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी असे त्यांना कधी वाटलेच नाही. ब्राह्मण गुरू  घाटग्यांचे मूळ पुरुष कामराज यांचे रामेश्वरभट काळे म्हणून एक गुरू होते. ते महा ईश्वरभक्त व मोठे सत्पुरुष होते. त्यांना योगविद्या व मंत्रविद्या वश होती. गंधाक्षता व तीर्थ यांनी ते कामराजांची सर्व संकटे नाहीशी करीत. पुढे काही काळाने घाटगे घराणे जरा खालावले होते. पण लवकरच बावजी झुंजारराव हा शूर पुरुष त्या काळात उदयास आला. ह्यास उदयास आणण्यास परशुराम भट हा तपस्वी ब्राह्मण कारणीभूत झाला. वावजीच्या विनंतीवरून त्यान...

यादव

उत्तरकालीन यादव  जाधव आणि भोसले या दोन घराण्यांतील कर्त्या पुरुषांची माहिती देऊन सरदार घराण्यांचा हा विचार संपवू. देवगिरीच्या यादवांनाच पुढे जाधव म्हणू लागले. यादवांचा शेवटचा राजा शंकरदेव याचा मुलगा गोविंददेव हा, हसनगंगू दक्षिणेत आला तेव्हा, चांगला प्रौढ झाला होता. महंमद तबलखाच्या क्रूर, जुलमी कारभारा मुळे सर्वत्र बेदिली माजली होती. त्या वेळी प्रत्येक प्रांतात अराजक माजून ठायी ठायी स्वतंत्र राज्ये निर्माण होत होती. हरिहर आणि बुक्क यांनी याच वेळी विजयनगरला स्वराज्यस्थापना केली. तोच पराक्रम शंकरदेवाचा मुलगा गोविंददेव याने करावयास हवा होता. पण तसे काही न करता, त्याने बहामनी राज्य स्थापन करण्याच्या कामी, हसनगंगू यास साह्यच केले. गोविंददेव याने, बहामनी राज्यस्थापना होण्याच्या आधी, खानदेशात स्वतंत्र राज्य स्थापिले होते. पण हसनगंगू येताच ती आकांक्षा सोडून देऊन, अनेक हिंदू राजांबरोबर, त्यानेही त्याला साह्य केले. पुढे बहामनी राजे कृतघ्न होऊन हिंदूंवर जुलूम करू लागले. तेव्हा पश्चात्ताप पावून गोविंददेव याने त्यांच्याविरुद्ध उटावणी केली. पण त्याचा पराभव होऊन त्यास गुजराथेत पळून जावे लागले. पु...

२४ आॅगस्ट १६७७"दक्षिण दिग्विजय मोहीम"दक्षिण मोहीमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी आज "उत्तर कर्नाटक" जिंकले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ आॅगस्ट १६०८ ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत येथे दाखल झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ आॅगस्ट १६५७ औरंगजेबने जर संपूर्ण आदिलशाही बुडवली तर तो अधिक प्रबळ बनेल व "शाहजहान" नंतर आपला प्रतिस्पर्धी म्हणून "दारा शुकोह"ने शाहजहानच्या संमतीने आदिलशहाशी तह केला. त्यात कल्याणी, परिंडा व त्याभोवतालचा भाग, निजामशाही कोकणातील किल्ले, वांगणी परगणा व खंडणीदाखल दीड कोटी रुपये द्यावेत अशा तहातील मुख्य अटी होत्या.  दिल्लीला बादशहा शहाजहान आजारी पडल्याची बातमी औरंगजेबास समजली म्हणून औरंगजेबाने आपली दक्षिणेकडील मोहीम आटोपती घेतली व त्याने सरळ दिल्लीची वाट धरली. इकडे बड्या साहेबिणीने विजापूर दरबार भरविला आणि त्यांत छत्रपती शिवाजीराजांच्या पारिपत्याचा विचार केला. छत्रपती शिवाजी राजांना शासन करावे हे दरबारांत ठरले व ही कामगिरी धिप्पाड अफगाण सरदार अफझलखान याजवर सोपविण्यात आली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ आॅगस्ट १६६१ छत्रपती शिवरायांच्या राणीसाहेब "सकवारबाई" यांना कमळाबाई नावाचे कन्यारत्न प्राप्त झाले. 🏇🚩🏇🚩🏇...

महाराणी चिमणीबाई सयाजीराव गायकवाड यांना स्मृति दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏⛳

घोड नदीच्या काठावर वसलेले इनामगाव ऐतिहासिक प्राचीन मध्ययुगीन वारसा लाभलेलं गाव.               बडोद्याचे लोकहितवादी लोकराजा महाराजा सर सयाजीराव गायकवाड यांची सासुरवाडी. अनेकांना हे अपरिचित असेल पण हे सत्य आहे.महाराणी चिमणाबाई गायकवाड यांच्या वर्गणीतून इनामगावात त्यांनी प्राथमिक शाळा बांधली तसेच आजही देवासचे सरदार राजे घाटगे परिवाराचा वाडा इनामगाव मध्ये वैभवशाली इतिहासाची साक्ष देत उभा आहे.         The position of women in indian life ह्या इंग्रजी पुस्तकाच्या लेखिका. ज्या काळात स्त्री शिक्षणाच्या बाबतीत संघर्ष करावा लागत होता त्या काळात भारतीय स्त्रीयांच्या जीवनावर राणी साहेबांनी पुस्तक लिहिले.हे विशेष गौरवास्पद आहे.बडोदा संस्थानिकांच्या लोकहितवादी कार्याचा आजही गुजरात तसेच भारतात गौरव केला जातो. महाराणी चिमणीबाई सयाजीराव गायकवाड यांना स्मृति दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏⛳ 

२३ ऑगस्ट १६६३छत्रपती शिवरायांनी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील "आचरे" ताब्यात घेतले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ ऑगस्ट १६६३ छत्रपती शिवरायांनी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील "आचरे" ताब्यात घेतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ आॅगस्ट १६६६ छत्रपती शिवरायांच्या आग्रा सुटकेनंतर मुघल सैनिकांनी "कवी परमानंद" यांना "दौसा" येथून ताब्यात घेतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ आॅगस्ट १६६६ आग्र्याहून सुटकेनंतर छत्रपती शिवरायांनी खोटे शाही दस्तक दाखवून "चंबळ" नदीचा परीसर नावेने पार केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ ऑगस्ट १६६६ आग्य्रात असताना प्रत्यक्ष औरंगजेबाच्या दरबारातील बातम्या महाराजांना कशा ज्ञात असत, याविषयी २३ ऑगस्ट १६६६ ला आग्य्राहून लिहिलेल्या पत्रात परकलदास लिहितो, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज येथून निसटण्यापूर्वी चार दिवस त्याच्या भोवतालचा पहारा अधिकच कडक केला होता. पुन्हा एकदा बादशहाचा हुकूम आला होता की, छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारा, परंतु थोडय़ाच वेळाने त्याने आपले मन बदलले व महाराजांना विठ्ठलदासचे हवेलीत नेऊन ठेवण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांना दरबारांतील असल्या सर्व हालचालींची बित्त...

घाटगे

घाटे अंबाजीराजे - १०६ घाटगे अंबाजी राजे - ८,९,९५ घाटगे पिराजी - ३१३ घाटगे महादाजी बाजी - २१९ घाटगे साबाजी राजे - १४४, २८२, ३४७ घाटिगे माकोजी - ९

धोंडेवाडी घाडगे

अताजी जगनाथ जोसी कुलकर्णी कसबे पारनेर १ केशो लक्षुमण देसपाडे पा। सिरवल कोडापा बिन सिवपा कुलकर्णी मौजे गोटखिडी प्रा। वालवे व भडकबे प्रा। हुकेरी पत्र प्रा। साक्ष खडो श्रीधर बुचके देशपाडे प्रा। सुपे सिदोजी बिन मुधोजी घारगे देसमुख का। निंबसोड बावाजी बिन जानोजी पाटील यादव मौजे कडेगाव का। मजकूर अगनोजी बिन लखमोजी पाटील मौजे बेलिचागाव का। मा। साबजी बिन चदजी पाटील गणेश जगनाथ क्षीरसागर कुलकर्णी मौजे सेलगाव व पाचुद व बेलवडे बवाजी आबजी खीरसागर कुलकरणी जोतिसी मौजे हिंगणगाव बु॥ का। आउध मौजे येडे का। वागी रामभट्ट बि।। नरसिभट्ट ढेकणे नि।। मोरो सामराज महिपतराउ लक्षुमण खलदकर कुलकर्णी मौजे खलद प्रा। पुणेंदेस ता। क-हेपठार १ जानो रघुनाथ कुलकरणी मौजे खेडीवतडिवले व चचली व धु- मालवाडी कोरेगाव प्रा। वाई अनाजी कासी कुलकरणी मौजे माजी व मौजे खोजवडी ता। सातारा १ कीर्यात निबसोडमाइणी सिदोजी बिन बहिराजी घारगे देसमुख को। माइणी हैबतराव बेनाजी सहश्रभोजने देसपाडे का। निंबसोड व माइणी ह्मसाजी बिन कुमाजी बिन खेलोजी पाटील ईगल मौजे सिरसवाडी का। मजकूर बेनाजी बिन बहिरोजी पाटील माने मौजे माहुली का। मा। सिदोजी घाटगे मौजे धोडेवाड ...