Posts

६ सप्टेंबर १६८२छत्रपती संभाजीराजे "संगमनेर" मध्ये दाखल

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ६ सप्टेंबर १६७५ छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी इंग्रज अधिकारी "सॅम्युअल आॅस्टीन" किल्ले रायगडवर हजर. राज्याभिषेक समारंभ आटोपताच डिसेंबर १६७४ मध्ये औरंगाबाद परिसरात आले आणि मुघली मुलखात लूट करण्याबरोबरच त्यांनी इंग्रजांच्या डूमगावच्या वखारीवर हल्ला केला आणि ती लुटून १० हजारांची लूट मिळवली. मुघल आणि आदिलशाही मुलखातील आपल्या वखारी सुरक्षित नसल्याचे लक्षात आल्याने इंग्रजानी सॅम्युअल ऑस्टिन याला आपल्या वखारीना कौल मागण्यासाठी शिवाजी महाराजांच्याकडे पाठवायचे ठरवले. याप्रमाणे महाराजांसाठी ५०० रुपयांचा नजराणा घेऊन ऑस्टिन आपला सहकारी रॉबर्ट हार्बीनसह रायगडाकडे निघाला. या भेटीत त्याने महाराजाना भेट देण्यासाठी लहान पितळी तोफ, मोरोपांत व आण्णाजीपंत यांच्यासाठी स्कारलेट कापड, १ आरसा, १ तोळा कस्तुरी, चिटणीस व सेनापती ना देण्यासाठी ३ यार्ड कापड व इतर भेटवस्तू सोबत घेतल्या. ऑस्टिन २ सप्टेंबरला निजामपूर येथे पोहोचला. तिथे त्याची भेट मोरोपंत व अण्णाजीपंतांशी झाली. पण ते पुढे जुन्नरला जाणार असल्याने त्यांच्याकडून महाराजांसाठी पत...

४ सप्टेंबर १६५६४ सप्टेंबर १६५६ या दिवशी शिवाजीराजांनी त्यांच्या ताब्यातील किल्ल्यांचे नवीन नामकरण केल्याची नोंद आहे. याचवेळी रायरीचे रायगड, तोरण्याचे प्रचंडगड, रोहिड्याचे विचित्रगड व चाकणच्या भुईकोट किल्ल्याचे संग्रामदुर्ग असे नाव ठेवण्यात आले असावे.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ सप्टेंबर १४६१ ४ सप्टेंबर १४६१ रोजी हुमायूनचा खून झाला. क्रूरकर्मा म्हणून त्याची इतिहासात ख्याती आहे. त्यानंतर त्याचा अल्पवयीन मुलगा निजामुद्दीन (कार. ४ सप्टेंबर १४६१-३० जुलै १४६३) गादीवर आला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ सप्टेंबर १६५६ ४ सप्टेंबर १६५६ या दिवशी शिवाजीराजांनी त्यांच्या ताब्यातील किल्ल्यांचे नवीन नामकरण केल्याची नोंद आहे. याचवेळी रायरीचे रायगड, तोरण्याचे प्रचंडगड, रोहिड्याचे विचित्रगड व चाकणच्या भुईकोट किल्ल्याचे संग्रामदुर्ग असे नाव ठेवण्यात आले असावे. तसेच काही महिन्यांपूर्वी जावळीतील भोरप्याच्या डोंगरावर किल्ल्याचे बांधकाम चालु झाले होते त्याला महाराजांनी नाव दिले प्रतापगड!  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ सप्टेंबर १६६० महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातुन निसटुन विशाळगडावर आले (जुलै १६६०), त्याच सुमारास किंवा लवकरच कान्होजींची प्रकृती ढासळत होती. दुर्दैवाने त्याच सुमारास कान्होजींच्या सहा मुलांमधे वाटणीवरून वाद सुरू होते. शिवाजीराजांना कान्होजींच्या आजारपणाची बातमी कळताच त्यांना एक मोठे पत्र लिहिले. त्यात ते कान्होजींना औषध व उपचार ...

३ सप्टेंबर इ.स.१६७५*महाराजांनी रामनगर पेठ वसविली! छत्रपती शिवाजी महाराजांनी पारमाची तर्फ शिवथर येथे रामनगर पेठ वसविली. राज्याभिषेका नंतर महाराजांनी इंग्रजांविरुद्ध मोहिम उघडली. महाडच्या उत्तरेस १५ कि.मि. अंतरावर असलेल्या पारमाची तर्फ शिवथर या खोऱ्यातील गावात महाराजांनी रामनगर पेठ वसविली.

*आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* *३ सप्टेंबर इ.स.१६७५* महाराजांनी रामनगर पेठ वसविली!            छत्रपती शिवाजी महाराजांनी पारमाची तर्फ शिवथर येथे रामनगर पेठ वसविली. राज्याभिषेका नंतर महाराजांनी इंग्रजांविरुद्ध मोहिम उघडली. महाडच्या उत्तरेस १५ कि.मि. अंतरावर असलेल्या पारमाची तर्फ शिवथर या खोऱ्यातील गावात महाराजांनी रामनगर पेठ वसविली. *३ सप्टेंबर इ.स.१६७९* खांदेरी किल्ल्याचे बांधकाम रोखण्यासाठी ह्युजेसच्या नेतृत्वाखाली इंग्रज आरमार मुंबईहुन रवाना झाले होते. जंजिरेकर सिद्दी आणि मुंबईकर इंग्रज यांची स्वेच्छेने नसली तरी नाईलाजास्तव मैत्री होती [कारण सिद्दीला मदत करून इंग्रज मुघलांकडून कोकणातील बराचसा महसूल माफ करून घेत असत.मुघलांचे स्वतंत्र असे आरमार अगदी कमकुवत असावे अथवा नगण्य होते कारण सिद्दीला त्याच्या आरमाराकरिता मुघलांनी आपले मांडलिक केले होते]. या मैत्रीच्या आधारे सिद्दीचे आरमार दर पावसाळ्यात मुंबईला माजगावच्या बंदरात नांगरले जात असे.याचे कारण असे की पावसाळ्यात दर्याला उधाण असते व भर समुद्रात जंजिऱ्या जवळ आरमार ठेवणे मोठे मुश्कील. तसेच जंजिऱ्याचा आसपासच...

१ सप्टेंबर १६६०छत्रपती शिवरायांनी उत्तर कोकणातील रायगड जिल्ह्यातील "चौल" ते "बांदा" हा प्रदेश जिंकून स्वराज्यात आणला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १ सप्टेंबर १४३६ अहमदशहा याने १ सप्टेंबर १४३६ रोजी मुख्य वजीर दिलावर खान याला संगमेश्वरच्या मोहिमेवर पाठवले. रायरीचा अधिपती शिर्के यांच्याशी थोड्याफार चकमकी आणि वाटाघाटी नंतर दिलावरखानाने मोहिम आटोपती घेतली. त्याने त्या बदल्यात रायरीच्या शिर्के व जावळीच्या मोऱ्यांकडुन अगणित संपत्ती व संगमेश्वर अधिपतीची कन्या घेतली. ही अगणित संपत्ती व मोऱ्यांची कन्या त्याने अल्लाउद्दीन अहमदशहा याला अर्पण केली. मोऱ्यांच्या त्या कन्येशी सुलतानाने विवाह केला व तिचे नाव ‘जेब-चेहरा’अथवा परी चेहरा ठेवले.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १ सप्टेंबर १६६० छत्रपती शिवरायांनी उत्तर कोकणातील रायगड जिल्ह्यातील "चौल" ते "बांदा" हा प्रदेश जिंकून स्वराज्यात आणला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १ सप्टेंबर १७६० सदाशिवरावभाऊंनी नानासाहेबांना पत्र लिहिले, त्या पत्रात भाऊ म्हणतात, "माझ्या छावणीत भूकमरी आहे, पैसे नाही आहेत, कर्जही मिळत नाही व माझे शिपाई उपवास करत  आहेत, लवकरात लवकर मदत पाठवावी". दिल्ली जिंकल्यामुळे, अब्दालीच्या छावणीत भीतिदायक वातावरण निर्माण...

श्री शके १६७६ वैशाख शुद्ध ३.अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य

२९५ ] श्री शके १६७६ वैशाख शुद्ध ३. अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री दादो महादेव गोसावी यांसिः- सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार सु॥ अर्बा खमसैन मया व अलफ. कान्होजी मोहिते यांणी वसंतगडास राहून मुलकांत नानाप्रकारें लूट धामधूम केली. कितेक ब्राह्मण नागविले. ती त्याची वर्तणूक जगप्रसिद्ध आहे. प्रस्तुत वसंतगड राजश्री यमाजीपंत यांनी घेतला. तुमचा आश्रा कान्होजी मोहिते यांनी केला. त्याजवरून तुह्मी यमाजीपंतासी विरुद्धास्पद वर्तता. ह्मणोन कळलें. तरी हे गोष्ट काय कामाची ? कान्होजी मोहिते बदफैली होते. त्याचें पारपत्य यमाजीपंतांनी केलें. ते तुह्मी संतोषच मानोन, ते व तुह्मी एके विचारे चालोन, आज्ञेप्रमाणें वर्तणूक करावी, युक्त असतां, तुह्मीच आपल्यांत आपण वाईट दाखवूं लागल्यास पुढें योजिलें कार्य आज्ञेप्रमाणें सिद्धीस जाणें कळतच आहे ! ऐसी गोष्ट नसावी. सहसा तुह्मी न करणें. कदाचित् कारभार संमंधे यमाजीपंताकडे अंतर असिलें तर अंतराचे कलमाची याद हुजूर पाठवून द्यावी. येविशीची आज्ञा करणें ते त्यास करून, अंतरें दूर केली जातील. ते गोष्ट तुह्मीं एकीकडे ठेऊन, तेथील तेथें विरुद्ध दाखवितां, ते एकंदर न दाखवणें. आ...

घाडगे

घाटगे  घाटगे घराण्याचा मूळ पुरुष कामराज घाटगे हा सोळाव्या वर्षीच हसन गंगू जाफरखान याच्या लष्करात मनसबदार झाला. त्याला मलवडी व ललगुण या दोन महालांची देशगत म्हणजे जहागीर होती. घाटगे घराण्यात अनेक शूर पराक्रमी पुरुष झाले. निजामशाहीचा दिवाण मलिकंबर याने विजापूरवर चढाई केली असताना घाटगे घराण्यातील वावजी व मिटोजी यांनी शर्थ करून आदिलशाहीचे रक्षण केले. त्या वेळी निजामशाहीत भोसले व जाधव ही घराणी व आदिलशाहीत घाटगे व घोरपडे ही घराणी फार पराक्रमी असून ती परस्परात लढाया करून आपापल्या सुलतानांची सेवा करीत असत. हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी असे त्यांना कधी वाटलेच नाही. ब्राह्मण गुरू  घाटग्यांचे मूळ पुरुष कामराज यांचे रामेश्वरभट काळे म्हणून एक गुरू होते. ते महा ईश्वरभक्त व मोठे सत्पुरुष होते. त्यांना योगविद्या व मंत्रविद्या वश होती. गंधाक्षता व तीर्थ यांनी ते कामराजांची सर्व संकटे नाहीशी करीत. पुढे काही काळाने घाटगे घराणे जरा खालावले होते. पण लवकरच बावजी झुंजारराव हा शूर पुरुष त्या काळात उदयास आला. ह्यास उदयास आणण्यास परशुराम भट हा तपस्वी ब्राह्मण कारणीभूत झाला. वावजीच्या विनंतीवरून त्यान...

यादव

उत्तरकालीन यादव  जाधव आणि भोसले या दोन घराण्यांतील कर्त्या पुरुषांची माहिती देऊन सरदार घराण्यांचा हा विचार संपवू. देवगिरीच्या यादवांनाच पुढे जाधव म्हणू लागले. यादवांचा शेवटचा राजा शंकरदेव याचा मुलगा गोविंददेव हा, हसनगंगू दक्षिणेत आला तेव्हा, चांगला प्रौढ झाला होता. महंमद तबलखाच्या क्रूर, जुलमी कारभारा मुळे सर्वत्र बेदिली माजली होती. त्या वेळी प्रत्येक प्रांतात अराजक माजून ठायी ठायी स्वतंत्र राज्ये निर्माण होत होती. हरिहर आणि बुक्क यांनी याच वेळी विजयनगरला स्वराज्यस्थापना केली. तोच पराक्रम शंकरदेवाचा मुलगा गोविंददेव याने करावयास हवा होता. पण तसे काही न करता, त्याने बहामनी राज्य स्थापन करण्याच्या कामी, हसनगंगू यास साह्यच केले. गोविंददेव याने, बहामनी राज्यस्थापना होण्याच्या आधी, खानदेशात स्वतंत्र राज्य स्थापिले होते. पण हसनगंगू येताच ती आकांक्षा सोडून देऊन, अनेक हिंदू राजांबरोबर, त्यानेही त्याला साह्य केले. पुढे बहामनी राजे कृतघ्न होऊन हिंदूंवर जुलूम करू लागले. तेव्हा पश्चात्ताप पावून गोविंददेव याने त्यांच्याविरुद्ध उटावणी केली. पण त्याचा पराभव होऊन त्यास गुजराथेत पळून जावे लागले. पु...