१५ मार्च १६७०छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी मोगलांकडून जिंकून घेतली
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ मार्च १६६१ छत्रपती शिवाजी राजांनी राजापुरची इंग्रजांची वखार खणून काढून पन्हाळ्याचा सूड उगवला. राजापूरकर इंग्रजांनी सिद्दी जौहरला सहाय्य करून महाराज वेढ्यात आडकलेले असताना, निशाण लाऊन पन्हाळ्यावर तोफा डागल्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ मार्च १६६९ पैशाअभावी मुलीच्या लग्नाची टाळाटाळ करणाऱ्या विठोजी हैबतराव शिळीमकारास जिजाऊ साहेबांनी २५ होन रोख व ५०० माणसांचे सामान देवून त्याच्या मुलीचे लग्न गोमाजी नाईक यांच्या मुलासोबत झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ मार्च १६७० छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी मोगलांकडून जिंकून घेतली. कल्याण व भिवंडीकरांनी आजचा दिवस सणासारखा साजरा करावा. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ मार्च १६७० माहुली गडावर मनोहरदासने छत्रपती शिवरायांचा छापा हेरून मराठ्यांवर हल्ला चढवला व ह्या लढाईत १ हजार मराठे कापले गेले. हि गोष्ट छत्रपती शिवरायांच्या जिव्हारी सलू लागली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ मार्च १६८० छत्रपती राजाराम महाराजांचे जानकीबाईंशी लग्न वीरगती लाभलेल्या सरनौबत प्रतापराव गुजरांची लेक जानकीबाई. छत्रपती शिवाजी महाराजांच्या च...