Posts

११ जानेवारी १६८०रायगड जिल्ह्यामधील खांदेरी किल्ला बांधून पूर्ण.आज रोजी महाराजांकड़े ताब्यात आला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ जानेवारी १६६६ मुघल सरदार दिलेरखानाने छत्रपती शिवरायांना जीवे मारण्याचा कट रचल्याची खबर छत्रपती शिवरायांना गुप्तहेरामार्फत मिळाली. छत्रपती शिवराय मिर्झाराजे जयसिंगाची छावणी सोडून पन्हाळ्याकडे रवाना. पन्हाळा घेण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ जानेवारी १६८० रायगड जिल्ह्यामधील खांदेरी किल्ला बांधून पूर्ण. आज रोजी महाराजांकड़े ताब्यात आला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ जानेवारी १६८८ मातबरखानाने पट्टा गड जिंकला १६८८ साली मातबरखानाने बागलाणातील अनेक गड घेण्यास सुरवात केली होती. पट्टागडा संबंधी मातबरखान औरंगजेबाकडे अर्ज पाठवतो त्यात तो म्हणतो सेवकाने काही दिवसांपासून १००० कोळी, भिल्ल, व मावळे यांचे पथक सैन्यात घेतले आहे. मराठांच्या ताब्यात असलेले पट्टा व इतर किल्ल्यालगतच्या जमीनदारांना रकमा पुरवण्यात आल्या आहेत. ११ जानेवारी १६८८ ला खानाने काही पथके किल्ला घेण्याच्या मार्गावर धाडली. मध्यरात्रीच्या सुमारास किल्ल्याच्या तटाला दोर लावून किल्ला जिंकून घेतला. भगूरचा ठाणेदार गोविंदसिंग याची किल्ल्यावर नेमणूक करण्यात आली. मोगलांन...

८ जानेवारी १६५८कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज स्वत: माहुलीच्या किल्ल्यावर चालून निघाले माहुली - भंडारगड - पळसगड, छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूर बादशाहाकडून आज जिंकला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ८ जानेवारी १०२६ गझनिच्या मेहमुदाचे सोमनाथ मंदिरावर आक्रमण महमूद गझनिच्या हिंदुस्तानवरील १७ हल्ल्यांपैकी १६ वा आणि सर्वात भयानक असा हल्ला म्हणजे सोमनाथ मंदिरवरील हल्ला होय. सोमनाथ मंदिर त्यावेळी त्याच्या संपत्तीसाठी प्रसिद्ध होते. सोमनाथाचे शिवलिंग अनेक पाचू, हिरे, माणके यानी सजवले होते. त्यामुळे ते शिवलिंग अक्षरशः लखलखत होते. डिसें.१०२५ च्या दरम्यान महमूद गझनी सोमनाथ मंदिराजवळ पोचला. ३ दिवसानी हिंदूंचा प्रतिकार मोडून काढण्यात मुस्लिम यशस्वी ठरले आणि त्यानी मंदिरात प्रवेश केला आणि काय???? मंदिरात होते ते फ़क्ति सोमनाथाच्या नावाने घंटानाद करणारे, कोणताही प्रतिकार करू न शकणारे असे हजारो निःशस्त्र हिन्दू....!!! मग काय?? मेहमुदाने त्या सर्वांची थंड डोक्याने कत्तल केली. यावेळी सुमारे ५०००० हिंदूंची कत्तल करण्यात आली होती. तसेच त्याने शिवलिंग उपटून काढले. वैभव संपन्न असे सोमनाथ मंदिर पूर्णपणे लुटले गेले. तसेच त्यावेळी केलेल्या लुटित जवळपास ६.५ टन सोन्याचा समावेश होता एवढे ते मंदिर वैभव संपन्न होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ८ जानेवारी १६५८ ...

२३ डिसेंबर इ.स.१६७०*छत्रपती शिवाजी महाराजांनी अहिवंतगड जिंकला.

*आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष* *२३ डिसेंबर इ.स.१५३४* बहादुरशहाबरोबर वाटाघाटी करुन २३ डिसेंबर १५३४ ला वसई पोर्तुगिजांकडे आली. तेथील स्थानिक जनतेने प्रथम त्यांचे स्वागत केले कारण मुघली सत्तेला ते वैतागले होते. पण पोर्तुगिजांनी सक्तीचे धर्मांतर, मंदिरे उध्वस्त करून, हिन्दु पूजा व उत्सवांना बंदी सुरु केल्यानंतर तेथील जनतेने पेशव्यांपुढे आपली कैफियत मंडली आणि त्यानंतर १७३७ साली पेशव्यांनी मोहिम सुरू केली. *२३ डिसेंबर इ.स.१६७०* छत्रपती शिवाजी महाराजांनी अहिवंतगड जिंकला.१६७० मध्ये मोगलांच्या बरोबर संघर्ष सुरू झाल्यावर शिवाजी राजांनी बागलाणातील किल्ले जिंकून घेण्याचा सपाटा सुरू केला. डिसेंबर १६७० मध्ये राजांनी अहिवंतचा किल्लाही जिंकून घेतला यावेळी खानदेशचा मोगल सुभेदार दाऊदखान कमालीचा अस्वस्थ झाला. 'मराठे बर्‍हाणपूरची पेठ लुटणार आहेत', अशी बातमी शिवाजी महाराजांच्या सहकार्‍यांनी हेतुपुरस्पर पसरवली होती त्याचा परिणाम म्हणजे दाऊदखान प्रचंड फौज घेऊन बर्‍हाणपूरच्या रोखाने निघाला परंतु अजिंठ्याच्या लेण्याजवळ आल्यानंतर त्याला कळले की मराठे अहिवंतच्या रोखाने गेले आहेत. दाऊदखानाने मोठ्या शीघ्र गती...

२० नोव्हेंबर १६७०छत्रपती शिवरायांची आरमारासह सुरतेकडे कूच.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० नोव्हेंबर १६३५ शाहजहान त्याच्या दुसऱ्या दख्खन मोहिमेसाठी निघाला. निजामशाही संपवायची ह्या ध्येयाने तो निघाला होता. त्याने हांडियाजवळ ४ जानेवारी १६३६ ला नर्मदा ओलांडली. इथूनच ९ जानेवारीला आदिलशाहला पत्राने तंबी दिली की निजामशाहीमधल्या शाहजी राजा बरोबर असलेल्या सरदारांना पाठिंबा मिळता कामा नये. वर हे सुद्धा लिहीले की त्याने देय असलेली वार्षिक खंडणी १० मार्च १६३६ पर्यंत दौलताबादला पाठवावी. ह्यासाठी शाहजहानने सोलापूर, त्याच्या आसपासचा परिसर व वांगीचा भाग निजामशाहिकडील भाग आदिलशाहला देऊ केले. ह्या परिसरातून वर्षाला नऊ लक्ष होनाचे उत्पन्न येत होते. १९ जानेवारी १६३६ ला शेख दबीर व इतर काही आदिलशाही वकील शाहजहानला भेटले. त्यानंतर ५ फेब्रुवारीला शाहजहानने खानजमान, खानदौरान व शाहिस्ताखान यांना निजामशाहीचा परिसर जिंकण्यासाठी धाडले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० नोव्हेंबर १६६६ ९ वर्षांचे बाल शंभूराजे आज रोजी आग्राहून सुटल्यानंतर सुखरूप "किल्ले राजगड" वर पोचले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० नोव्हेंबर १६७० छत्रपती शिवरायांची आरमारासह सुरतेकडे कू...

१३ नोव्हेंबर १६५९छत्रपती शिवरायांनी मायणी, खटाव जिंकले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १३ नोव्हेंबर १६५९ छत्रपती शिवरायांनी मायणी, खटाव जिंकले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १३ नोव्हेंबर १६६८ छत्रपती शिवरायांकडून गोव्यामध्ये सप्तकोटीश्वर मंदिर बांधण्यास सुरुवात. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १३ नोव्हेंबर १६७३ मुंबईकर सूरतकरांना १३ नोव्हेंबर १६७३ ला लिहितात: "सिद्दीने तक्रारी केल्या असताना सुभेदाराचे आमच्याबद्दल इतके मन आहे हे वाचून आनंद झाला. आता बंदरांत असलेल्या बादशहाच्या दोन गलबतांना आम्ही चांगले वागविले हे पाहून बादशाहाविषयी आमचे मनांत पूज्यबुध्दी आहे हे त्याला दिसून येईल ... फ्रेचांनी जर इतक्या तोफा आणि इतके शिसें ( गोळे ) राजापूरला पाठविले असतील, तर शिवाजीला सिद्दाविरुध्द चांगले आरमार सज्ज करणस बरे पडेल. कारण त्याने आमच्याकडे मागणी केली परंतु आमच्याजवळ पुष्कळ तोफा असूनही आम्ही तुमच्या सूरतेतील हितसंबंधाकडे लक्ष देऊन तोफा दिल्या नाहीत." सूरतकरांनी १३ नोव्हेंबर १६७४ ला उत्तर लिहिले जे:'  "शिवाजीच्या तोफांच्या मागणीबद्दल कळविण्यांत आले. त्यावर आमचे मत असे आहे की, अशा कृत्याने बादशहाला घुस्सा येईल.  फ्रेंचानी नुक...

१२ नोव्हेंबर १६५९छत्रपती शिवरायांनी "कराड" प्रांत जिंकला

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ नोव्हेंबर १६५९ छत्रपती शिवरायांनी "कराड" प्रांत जिंकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ नोव्हेंबर १६६७ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची सरहद्द पोर्तुगीज प्रदेशाला भिडली होती. त्यावेळचा पोर्तुगीज विजरई कोंदी दि सांव्हिसेंती हा फारच धर्मान्ध होता. त्याने बारदेश मधील चार हजार हिंदूंचे सक्तीने धर्मांतर केले होते. आणि इतर हिंदू लोकांना २ महिन्याच्या आत बारदेश व गोवा सोडून जाण्यास सांगितले. शिवाय पोर्तुगीजांच्या आश्रयाला गेलेले कोकणातील देसाई त्यांच्या मदतीने स्वराज्यातील प्रदेशावर धाडी घालत असत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी बारदेशवर ५ हजार पायदळ व १ हजार घोडदळ घेऊन मोहीम काढली. १० नोव्हेंबर पासून सलग तीन दिवस महाराजांच्या सैन्याने या भागात धुमाकूळ घालत अनेक धर्मान्ध पोर्तुगीजाना ठार केले. या मोहिमेत महाराजांनी पोर्तुगीज व कोकणातील फितूर देसायांना कायमचा धडा शिकवला. महाराजानी या मोहिमेत १३०० कैदी पकडले. शिवाय त्यांना यातून १५० लक्ष होनांची लुटही मिळाली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ नोव्हेंबर १६८३ किल्ले फोंड्यावर प्रचंड...

११ नोव्हेंबर १६७५छत्रपती शिवरायांनी "सातारा" प्रांत जिंकला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ नोव्हेंबर १६५७ औरंगजेबची पत्नी दिलरास बानूचे निधन औरंगजेबाने तख्त काबीज करण्याचा जणू चंगचं बांधला. तो बिदरहून उत्तरेकडे झेपावण्याकरिता संधी शोधत होता आणि त्याला ती मिळाली. ११ नोव्हेंबर, १६५७ रोजी त्याची पत्नी दिलरास बानू त्याच्या पाचव्या मुलास जन्म देताना मरण पावली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ नोव्हेंबर १६५९ छत्रपती शिवरायांनी अफझलखानाला ठार मारले आणि नंतर लगेच त्यांनी "वाई" सोडली. त्यांच्या घोड्यांच्या टापा वळाल्या त्या थेट कराडच्या दिशेने. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ नोव्हेंबर १६७५ छत्रपती शिवरायांनी "सातारा" प्रांत जिंकला. ११ नोव्हेंबर १६७५ रोजी सातारा काबीज झाला. महाराज साताऱ्यात गेले आणि गंभीर आजारी झाले. या आजराचे स्वरूप एवढे भयंकर होते की, त्यांच्या मृत्यूची अफवा झाली.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ नोव्हेंबर १६७५ विजापूरचा सरसेनापती बहलोलखान खवासखानाचे कोणतेच हुकुम पाळीत नव्हता. खावासखानाने अफगाण गटाचा बिमोड करण्यासाठी गुप्तपणे मोगलांचा दक्षिण सुभ्याचा सुभेदार बहादुरखान यास मदत मागितली. तसे बहादूरखान १९ ऑक्टोबर १६७५...