Posts

Showing posts from August, 2025

२७ ऑगस्ट इ.स.१६५६*

*आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष* *२७ ऑगस्ट इ.स.१५३४* इस्माईल आदिलशहाचा मृत्यू छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कामी महत्वाचा अडसर राहिला तो विजापूरच्याआदिलशाहीचा  आदिलशाहीत १४९० पासून १६८६ पर्यंत ९ सुलतान होऊन गेले. आदिलशाहीचा संस्थापक युसुफ शहानंतर १५१० मध्ये त्याचा वारस इस्माईल हा विजापूरचा सुलतान बनला. याने १५१० ते १५३४ अशी २४ वर्षे कारभार पहिला. याची बहुतांश कारकीर्द इतर सुलतानाशी लढायांत गेली. इस्माईल आदिलशहा मृत्यू पावला ती तारीख होती २७ ऑगस्ट १५३४. *२७ ऑगस्ट इ.स.१६५६* जावळी प्रांत जिंकून घेऊन महाराजांनी तेथील व्यवस्था लावून घेतली. जावळीहून पळालेला चंद्रराव मोरे रायरीवर जाऊन बसला होता. महाराजानी रायरीला वेढा दिला. एका महिन्याने शिळीमकरांच्या मध्यस्तीने रायरी उर्फ रायगड महाराजांच्या ताब्यात आला. महाराजानी मोरेचा घोडा,शिरपाव देऊन सन्मान केला व मोरेंच्याकडील पराक्रमी वीर म्हणजे मुरारबाजी देशपांडे व त्यांचे चार बंधू(त्रिंबकजी,शंकराजी,संभाजी व महादजी)यांना आपल्याकडे मागून घेतले. चंद्ररावना मात्र महाराजानी कैदेत ठेवले. महाराजांशी वरकरणी सख्य दाखवत चंद्ररावाने आपल्या सुटक...

⛳२५ आॅगस्ट १६७६"किल्ले जंजिरा" च्या तटबंदीला शिड्या लावलेल्या लायजी पाटलांचा छत्रपती शिवरायांनी सन्मान केला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ आॅगस्ट १६७४ गोव्यातील "किल्ले फोंडा" वर मराठ्यांचा हल्ला. पण काही चुकीच्या धोरणामुळे हा प्रयत्न फसला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ आॅगस्ट १६७६ "किल्ले जंजिरा" च्या तटबंदीला शिड्या लावलेल्या लायजी पाटलांचा छत्रपती शिवरायांनी सन्मान केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ ऑगस्ट १८०५ यशवंतराव होळकर इंग्रजांच्या लष्करी हालचालींच्या बातम्या काढीत होते. इंग्रजानाही भरतपूरच्या लढाईनंतर आपल्या फौजेची जुळवाजुळव करण्यास सवड हवी होती. पण त्यांना यशवंतरावांचा पिच्छा सोडावयाचा नव्हता. यशवंतराव त्यांचा सदर हेतू ओळखून होते. पंजाब हा त्यानी दौडीचा प्रदेश ठरवून पंजाबातील शीख व त्यांच्या पलिकडील अफगाण यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहार सुरु होता. दिनांक २५ ऑगस्ट १८०५ रोजी यशवंतराव राजस्थानच्या बाजूस, दिल्लीच्या अलिकडे असलेल्या रेवाडी नांवाच्या गांवाहून निघाले. मीरखान तीन चार दिवस मागे राहिला होता. शिंद्यांना सामील करून घ्यावे या उद्देशाने तो रेवाडीहून हालला नाही. यशवंतरावानी शिखांशी संधान बांधून त्यांना अनुकूल करून घेतले होते. त्यांचे फ्रेंच व प...

२४ आॅगस्ट १६७७"दक्षिण दिग्विजय मोहीम"दक्षिण मोहीमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी आज "उत्तर कर्नाटक" जिंकले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ आॅगस्ट १६०८ ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत येथे दाखल झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ आॅगस्ट १६५७ औरंगजेबने जर संपूर्ण आदिलशाही बुडवली तर तो अधिक प्रबळ बनेल व "शाहजहान" नंतर आपला प्रतिस्पर्धी म्हणून "दारा शुकोह"ने शाहजहानच्या संमतीने आदिलशहाशी तह केला. त्यात कल्याणी, परिंडा व त्याभोवतालचा भाग, निजामशाही कोकणातील किल्ले, वांगणी परगणा व खंडणीदाखल दीड कोटी रुपये द्यावेत अशा तहातील मुख्य अटी होत्या.  दिल्लीला बादशहा शहाजहान आजारी पडल्याची बातमी औरंगजेबास समजली म्हणून औरंगजेबाने आपली दक्षिणेकडील मोहीम आटोपती घेतली व त्याने सरळ दिल्लीची वाट धरली. इकडे बड्या साहेबिणीने विजापूर दरबार भरविला आणि त्यांत छत्रपती शिवाजीराजांच्या पारिपत्याचा विचार केला. छत्रपती शिवाजी राजांना शासन करावे हे दरबारांत ठरले व ही कामगिरी धिप्पाड अफगाण सरदार अफझलखान याजवर सोपविण्यात आली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ आॅगस्ट १६६१ छत्रपती शिवरायांच्या राणीसाहेब "सकवारबाई" यांना कमळाबाई नावाचे कन्यारत्न प्राप्त झाले. 🏇🚩🏇🚩🏇...

२३ ऑगस्ट १६६३छत्रपती शिवरायांनी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील "आचरे" ताब्यात घेतले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ ऑगस्ट १६६३ छत्रपती शिवरायांनी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील "आचरे" ताब्यात घेतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ आॅगस्ट १६६६ छत्रपती शिवरायांच्या आग्रा सुटकेनंतर मुघल सैनिकांनी "कवी परमानंद" यांना "दौसा" येथून ताब्यात घेतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ आॅगस्ट १६६६ आग्र्याहून सुटकेनंतर छत्रपती शिवरायांनी खोटे शाही दस्तक दाखवून "चंबळ" नदीचा परीसर नावेने पार केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ ऑगस्ट १६६६ आग्य्रात असताना प्रत्यक्ष औरंगजेबाच्या दरबारातील बातम्या महाराजांना कशा ज्ञात असत, याविषयी २३ ऑगस्ट १६६६ ला आग्य्राहून लिहिलेल्या पत्रात परकलदास लिहितो, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज येथून निसटण्यापूर्वी चार दिवस त्याच्या भोवतालचा पहारा अधिकच कडक केला होता. पुन्हा एकदा बादशहाचा हुकूम आला होता की, छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारा, परंतु थोडय़ाच वेळाने त्याने आपले मन बदलले व महाराजांना विठ्ठलदासचे हवेलीत नेऊन ठेवण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांना दरबारांतील असल्या सर्व हालचालींची बित्त...

२० ऑगस्ट १६७८"दक्षिण दिग्विजय मोहीम"दक्षिण मोहीमेदरम्यान "छत्रपती शिवराय" बंकापुरात आले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० ऑगस्ट १६४३ अदिलशहाचे राजे शहाजीराजे यांना हुकुमनामा पत्र !  रणदुल्लाखान मृत्यू पावताच विजापुर दरबारात राजे शहाजीराजे यांचा पक्ष दुर्बळ झाला. तर त्यांच्या वाईटावर असलेल्या मुस्तफाखान, अफजलखान, बाजी घोरपडे इत्यादी मुत्सद्यांचे पारडे जड झाले. रणदुल्लाखानाची दौलत आता त्याचा खिजमतगार असलेल्या अफजलखानाकडे आली. तो त्यावेळी राजे शहाजीराजे यांच्या बरोबर कर्नाटकातच होता. अफजलखान राजे शहाजीराजे यांच्या कट्टर दुष्मनांपैकी एक होता. स्वाभाविकपणेच राजे शहाजीराजे यांना तो पाण्यात पाहू लागला. अफजलखानानेच चंदीच्या राचेवर मराठ्यांना राजे शहाजीराजे फितूर असल्याची "बदगोह" (अफवा) विजापूर दरबारला लिहून कळविली. या किंवा अशाच स्वरूपाच्या काही अन्य तक्रारींवरून आदिलशहाचे मत राजे शहाजीराजे यांच्या विरुद्ध कलुषित झाले. २० आॅगस्ट १६४३ एका पत्रावरून काही दिवसांपूर्वी राजे शहाजीराजे यांना आपली जमात आदिलशहाकडे हजर करण्याचा हुकुम झाल्याचे कळते.  🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 २० ऑगस्ट १६६६ आग्र्याहून निसटल्यावर छत्रपती शिवरायांनी दख्खन मध्ये येण्या...

१९ ऑगस्ट १६८९ छत्रपती राजाराम महाराज जिंजी मध्ये दाखल होण्यापूर्वी हरजीराजे महाडिक यांना ‘केसो त्रीमल पिंगळे’ यास मुक्त करून कारभारावर नेमले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १९ ऑगस्ट १६०० बुर्हाण निजामशहाच्या मृत्युनंतर मुघल सम्राट अकबर याने अहमदनगर पर्यंत सैन्य पाठवून दहशत निर्माण केली त्यावेळी चांदबिबीने पराक्रमाची शर्थ करून अहमदनगरचा बचाव केला तरीपण तिच्या मृत्युनंतर मुघलांनी पुन्हा आक्रमण करून आजच्या दिवशी अहमदनगरचा ताबा मिळवला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १९ ऑगस्ट १६६६ छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून सूटण्यात यशस्वी झाले तेव्हा शिवाजी सुटला आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि.१९ ऑगस्ट रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी पालकर या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १९ ऑगस्ट १६८९  छत्रपती राजाराम महाराज जिंजी मध्ये दाखल होण्यापूर्वी हरजीराजे महाडिक यांना ‘केसो त्रीमल पिंगळे’ यास मुक्त करून कारभारावर नेमले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड, सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र. "जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

आजच्या दिवशी "हनुमंतराव निंबाळकर" यांनी सातारा मधील "खटाव" हे ठाणे काबीज केले व मुघलांकडून लढणाऱ्या मराठी सरदाराला ठार केले.

१६ ऑगस्ट १७०० आजच्या दिवशी "हनुमंतराव निंबाळकर" यांनी सातारा मधील "खटाव" हे ठाणे काबीज केले व मुघलांकडून लढणाऱ्या मराठी सरदाराला ठार केले.

१३ आॅगस्ट १६५७विजापूरच्या आदिलशहाने थोरले महाराज साहेब" शहाजीराजे भोसले" यांना कैद केले होते. त्यांच्या सुटकेच्या बदल्यात मराठ्यांना "किल्ले सिंहगड" आदिलशहाला द्यावा लागला होता. तोच "किल्ले सिंहगड" आज मराठ्यांनी पुन्हा जिंकून घेतला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १३ ऑगस्ट १६३८ दुर्गादास राठोड याचा जन्म (मृत्यू - २२ नोव्हेंबर १७१८) औरंगजेबकालीन एक स्वामिनिष्ठ व स्वदेशाभिमानी राजपूत. जोधपूरच्या जसवंतसिंग राठोडचा मंत्री अजकर्ण याचा मुलगा. वडिलांप्रमाणे त्याने जसवंतसिंगाची प्रामाणिकपणे नोकरी केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १३ आॅगस्ट १६५७ विजापूरच्या आदिलशहाने थोरले महाराज साहेब" शहाजीराजे भोसले" यांना कैद केले होते. त्यांच्या सुटकेच्या बदल्यात मराठ्यांना "किल्ले सिंहगड" आदिलशहाला द्यावा लागला होता. तोच "किल्ले सिंहगड" आज मराठ्यांनी पुन्हा जिंकून घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १३ आॅगस्ट १६६६ औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवरायांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवल्यामुळे "कुंवर रामसिंग" हे घाबरले आणि त्यांनी छत्रपती शिवरायांची भेट घेण्याचे नाकारले. "कुंवर रामसिंग" हे मुघल सरदार "मिर्झाराजे जयसिंग" यांचे पुत्र होते तसेच छत्रपती शिवरायांची पुर्ण देखरेख ठेवण्याची जबाबदारी कुंवर रामसिंगावर होती. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १३ आॅगस्ट १७९५ महाराणी अहिल्याबाई होळकर पुण्यत...

११ आॅगस्ट १६७८"दक्षिण दिग्विजय मोहीम"छत्रपती शिवरायांनी दक्षिण मोहीमेदरम्यान "तंजावर" येथे त्यांचे सावत्र बंधू "व्यंकोजी राजे" यांची एक वर्षानंतर पुन्हा भेट घेतली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ आॅगस्ट १६७८ "दक्षिण दिग्विजय मोहीम" छत्रपती शिवरायांनी दक्षिण मोहीमेदरम्यान "तंजावर" येथे त्यांचे सावत्र बंधू "व्यंकोजी राजे" यांची एक वर्षानंतर पुन्हा भेट घेतली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ आॅगस्ट १९०८ खुदीराम बोस १८व्या वर्षी देशासाठी शहीद होणारे पहिले क्रांतिकारक ज्या वयात तरुण पिढी भावी आयुष्याची स्वप्न रंगवत असतात त्या वयात त्यांनी त्याचं पूर्ण आयुष्य देशासाठी पणाला लावलं. ते थोर क्रांतिकारक म्हणजे खुदीराम बोस. बोस यांचा जन्म ३ डिसेंबर १८८९साली बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील हबीबपूर गावात झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ ऑगस्टला १९४७ नवाबाने आपण पाकिस्तानात सामील होत असल्याचे जिना यांना कळवले, पण जुनागढ भारतात सामील सरत्या आठवडय़ात पाकिस्तानने नवा राजकीय नकाशा जारी करून जम्मू-काश्मीरबरोबरच गुजरातमधील जुनागड, माणावदर हेही पाकिस्तानच्या हद्दीत असल्याचे दाखविले आहे. नेपाळपाठोपाठ पाकिस्तानने प्रसिद्ध केलेल्या या नवनकाशामागे चीनची फूस असली, तरी या नवीन नकाशास कोणीही गांभीर्याने घेणार नाही. परंतु यानिमित्ता...

पूर्ण नाव: सरदार कान्होजी नारो जेधे

पूर्ण नाव: सरदार कान्होजी नारो जेधे जन्म: अंदाजे १६०० च्या सुमारास, रोहिद खिंड, पुणे जिल्हा घराणे: जेधे घराणे, मावळ प्रदेशातील प्रमुख देशमुख कुटुंब पद: देशमुख (मावळ प्रदेश), शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार मृत्यू: अंदाजे १६६५ नंतर --- इतिहासातील स्थान 1. मावळ प्रदेशातील नेतृत्व कान्होजी जेधे हे मावळच्या देशमुखपदावर होते. मावळात त्यांचा प्रभाव आणि लोकांमधील विश्वास मोठा होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी मावळची ताकद उभी करण्यासाठी कान्होजी जेधे यांच्यावर मोठा भरवसा ठेवला. 2. शिवाजी महाराजांना साथ शाहाजी राजे भोसले विजापूर दरबारात असताना, शिवाजी महाराजांनी पुणे-मावळ भागात स्वराज्याचा पाया घालण्यास सुरुवात केली. त्या वेळी कान्होजी जेधे यांनी त्यांना आर्थिक, लष्करी आणि जनसमर्थन दिले. 3. तोरणा किल्ला जिंकणे १६४६ साली शिवाजी महाराजांनी प्रथम तोरणा किल्ला जिंकला तेव्हा कान्होजी जेधे यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. 4. अफजलखान मोहिम अफजलखानाच्या मोहिमेत मावळच्या साऱ्या ताकदीला शिवाजी महाराजांच्या बाजूला उभे करण्याचे कामही जेधे यांनी केले. अफजलखान वधानंतर स्वराज्याचा विस्ता...

६ आॅगस्ट १६४८छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी "किल्ले पुरंदर" वर हल्ला केला. किल्ले पुरंदर स्वराज्यात दाखल.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ६ आॅगस्ट १६४८ छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी "किल्ले पुरंदर" वर हल्ला केला. किल्ले पुरंदर स्वराज्यात दाखल. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ६ आॅगस्ट १६५७ छत्रपती शिवरायांनी अहमदनगरच्या मुघल छावणीवर हल्ला केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ६ आॅगस्ट १६५९ ठाण्याच्या पोर्तुगीज गव्हर्नर ने गोव्याच्या प्रमुख गव्हर्नर ला मराठ्यांच्या आरमारापासून सावध राहण्याबाबतचे पत्र पाठवले. सदर पत्राचा मराठी अनुवाद- "शहाजीचा मुलगा (शिवाजी) याने आदिलशाहीच्या ताब्यामधील वसई ते चौल मधला बराच भूभाग जिंकला असून त्याने स्वतःची लढण्याची ताकद वाढवली आहे. त्याने कल्याण, भिवंडी, पनवेल ह्या वसईच्या आसपासच्या बंदरांमध्ये काही लढाऊ जहाजे बनवली आहेत. आम्हाला आता सतर्क रहायला हवे. ही जहाजे बंदरामधून खुल्या समुद्रात बाहेर येणार नाहीत यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आदेश आम्ही पोर्तुगिझ कप्तानाला दिले आहेत." 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड, सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र. "जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष...

३ आॅगस्ट १६७७"दक्षिण दिग्विजय मोहीम"दक्षिण मोहीमेदरम्यान छत्रपती शिवरायांचा "वृद्धाचलम" येथे मुक्काम.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३ ऑगस्ट १३४७ दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलख याच्या कारकिर्दीत दक्षिणेत जाफरखान उर्फ अल्लाउद्दीन हसन याने बंड करून गुलबर्गा इथे ३ ऑगस्ट १३४७ ला बहामनी राज्याची स्थापना केली. या बहामनी राज्यात १३४७ ते १५३८ या काळात एकूण १८ सुलतान होऊन गेले. बहामनी राज्यातील १४ वा सुलतान शिहाबुद्दीन महमूद याच्या कारकिर्दीच्या दरम्यान बहामनी सत्तेचा कर्तबगार वजीर महंमद गवान याची हत्या झाल्यानंतर बहामनी सत्तेचे  वेगवेगळे सुभेदार जसे युसुफ आदिलखान (आदिलशाही), फतहुल्लाह इमाद (इमादशाही), कुत्ब उल्मुख (कुतुबशाही), अमीर कासीम बरीद (बरीदशाही) व मलिक अहमद बहिरी (निजामशाही) यांनी बहामनी सत्तेतून बाहेर पडत आपली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कामी महत्वाचा अडसर राहिला तो विजापूरच्या आदिलशाहीचा. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 ३ आगस्ट १६६४ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा आरमाराच्या हेरांनी आणलेल्या माहितीवरून पोर्तुगीज व मोगली आरमाराचा समाचार घेण्यासाठी दहा दहा गलबतांचा ताफा रवाना झाला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻?...

२ ऑगस्टला सन १६४८ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी शिरवळ जिंकून स्वराज्यात जोडले.

Image
  आदिलशाहीचा वजीर मुस्तफाखानाने 25 जुलै इसवी सन १६४८ साली दगा फटक्याने शहाजीराजांना बेसावध वेळेला गाठून कैद केले. त्याचबरोबर आदिलशाहीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात पारिपत्य करण्यासाठी सरदार फत्तेखानाला पाठवला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज किल्ले पुरंदर वर होते. साहजिकच पुरंदरच्या आसपास लढाई होणार.   शिरवळ परिसर स्वराज्य विस्तारासाठी सुरुवातीच्या  मोहिमां पैकी महत्त्वाचे यश होत. ज्यावेळेस सरदार फत्तेखान छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती स्वारीस रवाना झाला त्यावेळेस त्याच्यासोबत रतन शेख , मिलिंद शेख, बाळाजी हैबतराव, फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर, मताजी घाटगे असे आदिलशाहीतील मातब्बर सरदार होते. आदीलशाहाने केदारजी खोपडे यास ८ ऑगस्ट १६४८ रोजी फत्तेखानास मदत करण्यासाठी पत्र पाठवले होते.ते उपलब्ध आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत कावजी मल्हारी, भीमाजी वाघ, गोदाजीराजे जगताप, संभाजीराव काटे, शिवाजीराव इंगळे, भिकाजी चोर, भैरव चोर, बाजी पासलकर अशी नावे कवी परमानंद शिवभारत ग्रंथ मधून मिळतात. आदिलशहाच्या अज्ञानुसार मोहिमेच नेतृत्व करणाऱ्या फत्तेखान व व तत्का...

२ आॅगस्ट १६४८छत्रपती शिवरायांनी "शिरवळ" ठाणे ताब्यात घेतले

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २ आॅगस्ट १६४८ छत्रपती शिवरायांनी "शिरवळ" ठाणे ताब्यात घेतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २ आॅगस्ट १६७७ "दक्षिण दिग्विजय मोहीम" दक्षिण मोहीमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी "वेलवान्सोरचा किल्ला" ताब्यात घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २ ऑगस्ट १६८० २ ऑगस्टला डिचोलीच्या मराठी सुभेदाराने बारदेश मधील सिओलीम गाव लुटले.  ५ मे १६८० दरम्यान छत्रपती संभाजीराजेंनी रामजी नाईक ठाकूर या आपल्या वकिलांबरोबर गोव्याचा विजरई अंतोनियो पाईस द सांदे याला सलोख्याचे पत्र पाठवून आपल्या वडिलांच्या दुःखद निधनाची बातमी दिली आणि आपण सत्ताधारी झाल्याचे कळवले होते आणि मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात तह करण्यास सुचवले होते. विजरईनेही छत्रपती संभाजीराजेंना पत्र पाठवून महाराजांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले होते व तहाच्या सूचनेला मान्यता दिली होती. शिवाय कोकणात शांतता राखण्यासाठी गेलेल्या रायाजी पंडित याला भेटीच्या वेळी आपण साष्ट व कुडाळ येथील फिरंगी अधिकाऱ्यांना युद्धविषयक हालचाली थांबवण्याचे आदेश दिल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर रायाजी पंडितकडे सं...