Posts

Showing posts from September, 2025

३० सप्टेंबर १६७७छत्रपती शिवरायांनी मद्रास इंग्रज गव्हर्नरकडे तोफा व इंजिनिअर्सची मागणी केली

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० सप्टेंबर १६५९ स्वराज्यावर चालून आलेला आदीलशाही सरदार "अफझलखान" याने १२ मावळ मधील रोहीड खोरेचे वतनदार आणि स्वराज्याशी कायम एकनिष्ठ असणारे "कान्होजी जेधे" त्यांचे सुपुत्र व छत्रपती शिवरायांचे बालमित्र "बाजी जेधे" यांना स्वराज्यविरोधी जाण्यासाठी पत्र पाठविले. पण "बाजी जेधे" यांनी ते धुडकावून लावले आणि छत्रपती शिवाजी महाराजांसमोर मुजरा करावयास हजर झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० सप्टेंबर १६६४ १६६४-६५ वर्षाच्या मध्यान्हात औरंगजेबाचा अनेक वर्षाचा स्वराज्यावरील क्रोध चालून आला. हा क्रोध, कधीकाळचे जयपुरचे राजे मिर्झाराजे जयसिंग ह्या सरदाराच्या रूपाने चालून आला. धूर्त राजकारणी, चाणाक्ष मुत्सद्दी, महापराक्रमी आणि बुद्धिने तल्लख असलेल्या मिर्झाराजांचे हे गुणविशेष मात्र परकियांच्या पुढे झुकत होते, आणि हेच शल्य इतिहासात त्यांच्यावर दिसते. अर्थात त्यांना यात कसलाही कमीपणा वाटत नसे. तर असे हे मिर्झाराजे दख्खन मोहिमेकरीता ३० सप्टेंबर १६६४ रोजी मुक्रर झाले. दिल्ली दरबारातील मोठ्या-मोठ्या सरदारांसह दिलेरखा...

२९ सप्टेंबर १६८९सरसेनापती श्रीमंत हरजीराजे परसोजी राजेमहाडिक स्मृतीदिन

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २९ सप्टेंबर १६३५ स्वतः शहाजहान बादशहा थोरले महाराज साहेब फर्जद शहाजीराजेंचा बीमोड करण्यासाठी निघाला आणि तडक दौलताबादेस आला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २९ सप्टेंबर १६८२ मुंबईकर इंग्रजांचे सुरतकरांना पत्र छत्रपती संभाजीराजेंच्या भीतीने मुंबईकर इंग्रज सिद्दीला मुंबईत आश्रय देत नव्हते पण सुरतकर इंग्रजांच्या दडपणामुळे ९ मे १६८२ ला त्यांना सिद्दीला मुंबईत प्रवेश देणे भाग पडले. सिद्दी कासम मुंबईत आल्याचे समजताच मराठ्यांनीही आपली ४० गलबते खांदेरीवर पाठवली. तरीही सिद्दीने ऑगस्ट अखेरीस नागोठणे येथे जाऊन मराठी मुलखात लूटमार केली व बऱ्याच लोकांची नाके कापली आणि एका हवालदाराला पकडून नेले. तरीही सुरतकर मुंबईकरांना सिद्दीला १० हजार रुपयांचा सर्व प्रकारचा माल आणि त्यांच्या कुटुंबांना मुंबईत आसरा द्यायला सांगत होते. सिद्दीला मदत करण्याच्या सुरतकर इंग्रजांच्या या धोरणाबद्दल नापसंती व्यक्त करत मुंबईकरांनी लिहिले की, "मागील वेळेप्रमाणेच याही वेळी सिद्दीचे लोक राहिल्याने अन्नाचे दुर्भिक्ष वाढेल, दृष्ट लोकांना आसरा देऊन त्यांच्याशी सामोपचाराने वागणे क...

२७ सप्टेंबर १७२९सरसेनापती खंडेराव दाभाडे यांची पुण्यतिथी.त्यांची समाधी तळेगाव दाभाडे येथील 'श्रीमंत सरसेनापती दाभाडे श्री बनेश्वर मंदिर' येथे आहे.

 ⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ सप्टेंबर १६६५ औरंगजेबाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तहाचे फर्मान व शंभूराजेंच्या मनसबदारीचे फर्मान येऊन दाखल. मिर्झाराजांच्या हुकुमाने छत्रपती शिवाजी महाराज तळकोकणातून येऊन मिर्झाच्या छावणीत दाखल. ऐतिहासिक किल्ले पुरंदरच्या तहाची अंमलबजावणी सुरु. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ सप्टेंबर १७०७ शंकराजी नारायण पंतसचिवांचे देहावसान २७ सप्टेंबर १७०७ रोजी श्री क्षेत्र आंबवडे येथे झाले.  रामचंद्र पंतांबरोबर महाराष्ट्रात वावरणारा त्यांचा जोडीदार शंकराजी नारायण हा मावळातील शिरवळपासून वाई-सातारा पर्यंतच्या अवघड प्रदेशाचा माहितगार मोठा युक्तिबाज व हर तऱ्हेने कार्य सिद्धीस नेणारा होता. मावळातील लोकात त्याचे चांगले वजन होते. औरंगजेबाने मावळातील किल्ले घेण्याचा सपाटा लावताच शंकराजीने मावळी फौज उभी करून ते बादशहाच्या कब्जातून परत घेतले. तो अत्यंत धाडसी व उलाढाल्या करण्यात तरबेज होता. हाती घेतलेल्या कमी सबब सांगत तो कधी आला नाही. रामचंद्रपंतांवर त्याची पूर्ण निष्ठा होती. मावळातील किल्ले लगोलग घेण्यात त्याने चांगलीच हुशारी दाखवली. वतने प...

२६ सप्टेंबर १६८९छत्रपती राजाराम महाराज पन्हाळ्याहून जिंजीकडे रवाना झाले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ सप्टेंबर १६७३ छत्रपती शिवरायांनी श्यामजी नाईक यांना सिद्दी मसूदशी बोलणी करण्यासाठी पाठवले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ सप्टेंबर १६७७ छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमे वेळी जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला व त्याच्या बंदोबस्तासाठी पुष्कळ पायदळ व घोडदळ ठेवून दिले. त्यांनी १४ मोठे किल्ले व ७२ मजबूत टेकडया काबीज केल्या. कर्नाटकातील बहुतेक सधन लोकांकडून अपार द्रव्य घेतले. महाराजांनी कर्नाटकांत जिंकलेल्या किल्ल्यांची डागडुजी व जिंकलेल्या प्रांतांचा बंदोबस्त रघुनाथ नारायण हणमंते यांनी केली म्हणून छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी त्यांस २६ सप्टेंबर १६७७ या दसऱ्याच्या मुहूर्तावर दख्खनची मजमू व जिंजी प्रांताचा सरसुभा असे महत्त्वाचे अधिकार सोपविले. हणमंते यांनी कर्नाटक प्रांताचा बंदोबस्त चांगला ठेवून त्यांत आणखी भर घातली. पण छत्रपती श्री संभाजी महाराजांविरुद्ध जे कट रायगढला शिजले त्यांत हणमंते यांचे अंग आहे असे छत्रपती संभाजी महाराजांस कळून आले तेव्हा त्यांस कैद कर...

२४ सप्टेंबर १६७४छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेकछत्रपती शिवाजी महाराज्यांचा राज्याभिषेक जेष्ठ शुक्ल त्रयोदशी अर्थात ६ जून १६७४ रोजी रायगडावर पूरोहित गागाभट्ट यांच्या मार्गदर्शनाने वैदीक पद्धतीने संपन्न झाला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ सप्टेंबर १६५६ स्वराज्यात सुपे हा परगणा होता. हा शहाजीराजांच्या जहागिरीतच होता मात्र तो त्यांनी त्यांचे शालक (पत्नी तुकाबाईंचे सख्खे बंधू) संभाजी मोहिते यांच्या ताब्यात दिला होता. मोहिते तिथे गढीत रहात होते. या मोहित्यांची एक मुलगी अण्णुबाई हिचे लग्न व्यंकोजीराजांशी तर, मोहिते घराण्यातीलच (बहुधा संभाजी मोहित्यांचीच मुलगी) सोयराबाई यांचे लग्न शिवाजीराजांशी झाले होते. त्यामुळे मोहित्यांचे भोसले घराण्याशी मोठे नातेसंबंध होते. मात्र हे मोहितेमामा कारभार योग्य पद्धतीने करत नव्हते. लाच घेणे, दुसर्याचे वतन हिसकावून घेणे वगैरै प्रकार ते करत होते. शहाजीराजे व शिवााजीराजांनाही ते जुमानत नव्हते. एकदा शिवाजीराजांनी पत्र पाठवून त्यांना आज्ञा केली की, 'पागा  घेऊन पुणे मुक्कामी येणे!' मात्र मोहित्यांनी या पत्राचे उत्तर पाठवले नाही उलट, पत्र घेऊन आलेल्या जासूदाला उर्मटपणे म्हणाले, 'शहाजीराजे समक्ष असता हे मालक नाहीत... काही आपले पायाकडे पाहून करावे!' संभाजी मोहिते काही केल्या जुमानत नाहीत हे शिवाजीराजांना समजले. स्वराज्यात अ...

२३ सप्टेंबर १६८०छत्रपती संभाजीराजांनी तुळजाभवानीस श्रुन्गारलेला हत्ती व २० सहस्त्र होणांचे दान म्हणून देऊ केले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ सप्टेंबर १६३३ मुरार जगदेव हे विजापूर दरबारचे सरदार, या दिवशी सूर्यग्रहण होते, हा योग साधून त्यांनी आपले सोन्यारुपाने तुलादान केले. हे तुलादान पुण्यापासून १० कोसावर भीमा व इंद्रायणी नद्यांच्या संगमात वसलेला नांगरगावास झाले, तेथे संगमेश्वराचे मंदिर बांधले त्यामुळे या गावाचे नामकरण होऊन तुळापुर झाले. ३०० वर्षांपूर्वी यादवांचे राज्य बुडाल्यानंतर एवढा मोठा तुळादान विधी झाला नव्हता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ सप्टेंबर १६४३ अदिलशहाने पोर्तुगीजांना पत्र पाठवले, त्यांच्या चौल किल्ल्याच्या परिसरात याकुतशहा व फत्तेखान हे २ बंडखोर आणि ज्याला ते मलिक म्हणतात असा १ मुलगा अशा तिघांना आश्रय दिला आहे, त्यांना पोर्तुगीजांनी आपल्या मुलखातून हाकलून द्यावे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ सप्टेंबर १६७३ इ.स. १६६१ मध्ये शिवाजी महाराजांनी इंग्रजांची राजापूरची वखार लुटली होती, तिची भरपाई मिळावी अशा मागणीचा अनेकवेळा अयशस्वी प्रयत्न इंग्रजांनी केला. हे प्रलंबित प्रकरण मिटवण्याकरिता छत्रपती शिवाजीराजांशी बोलणीकरिता इंग्रजांनी 'नारायण शेणवी' यास २३ सप्टेंबर १...

२१ सप्टेंबर १६६५"छत्रपती शिवराय" आणि मुघल सरदार "मिर्झाराजे जयसिंग" हे ऐतिहासिक पुरंदर तहाचे फर्मान देण्या-घेण्यासाठी किल्ले सिंहगडवर आले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ सप्टेंबर १६६५ "छत्रपती शिवराय" आणि मुघल सरदार "मिर्झाराजे जयसिंग" हे ऐतिहासिक पुरंदर तहाचे फर्मान देण्या-घेण्यासाठी किल्ले सिंहगडवर आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ सप्टेबर १६८४ औरंगजेबाने "छत्रपती शंभुराजांवर" पुन्हा स्वारी सुरु केली व आजच्या दिवशी "शियाबुद्दीन खानास" किल्ले "रायगड" जिंकण्यास पाठवून दिले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ सप्टेंबर १६८७ औरंगजेबाने 'गोवळकोंड्याचा' वेढा सक्तिने चालवला असता एका फितुर अधिकार्याने २१ सप्टेबर रोजी मध्यरात्री गडाचे दरवाजे उघडून मोगलास आत घेतले. त्या फितुर अधिकार्याचे नाव अजुन ज्ञात नाही. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ सप्टेंबर १७४३ जयपूरचा राजा सवाई जयसिंगाचा मृत्यू  जयपूरचा एक कर्तबगार व विद्याप्रेमी राजा !  हा अंबेरच्या विष्णुसिंह कच्छवाहाचा मुलगा. १७०० मध्ये गादीवर येताच पूर्वापार चालत आलेले मोगलांबरोबरचे मैत्रीचे संबंध त्याने दृढ केले. बहादूरशाह व नंतरचा मुहम्मदशाह यांच्याशी त्याचे सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे १७२०-१७२२ व १७३२ मध्ये त्यास माळव्...

१८ सप्टेंबर १६६७"छत्रपती शिवराय" स्वराज्याची पाहणी करण्यासाठी किल्ले राजगडाहून दक्षिण कोकणातील "कुडाळ" येथे आले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १८ सप्टेंबर १६६७ "छत्रपती शिवराय" स्वराज्याची पाहणी करण्यासाठी किल्ले राजगडाहून दक्षिण कोकणातील "कुडाळ" येथे आले. पुढे जानेवारी १६६८ मध्ये शिवरायांनी गोव्यातील फिरंग्यांवर हल्ला चढविला. याचे अवलोकन केल्यावर ते कुडाळला नेमक्या कोणत्या कारणासाठी गेले असतील याचा अंदाज बांधता येतो. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १८ सप्टेंबर १८५८ वीर बाबुराव सेडमाकेंना अटक १८५३ मध्ये लाॕर्ड डलहौसीने 'दत्तकविधान नामंजूर' करुन नागपूर संस्थान खालसा केले. त्यामूळे या संस्थानाचा अंमल असलेला चांदा जिल्हा(सध्याचा चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा) ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली आला. मार्च १८५४ मध्ये आर. एस. एलिस चांदा जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी झाले. जिल्ह्यात अनेक जमीनदारी आणि उप-जमीनदारी राजगोंड कुटुंबियांच्या मालकीच्या होत्या. या सर्व जमीनदाऱ्या भोसले राजवटीच्या आधी म्हणजेच गोंड काळापासून अस्तित्वात होत्या. स्वाभाविकपणे, या साऱ्या जमीनदारांच्या जमिनी ताब्यात घेतल्यामूळे त्यांच्या मनात इंग्रजांबद्दल प्रचंड राग उफाळत होता. अशीच एक जमीनदारी मोलमपल...

श्रीमन्छत्रपति शिवाजी उर्फ शाहू व सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचं दाभाड्यांच्या जुन्या राजवाड्यातील भिंतीचित्र जे आता अस्तित्वात नाही...

Image
श्रीमन्छत्रपति शिवाजी उर्फ शाहू व सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचं दाभाड्यांच्या जुन्या राजवाड्यातील भिंतीचित्र जे आता अस्तित्वात नाही...

११ सप्टेंबर १७५१सिंहगड किल्ल्याच्या दारूगोळ्याच्या कोठारावर ११ सप्टेंबर १७५१ रोजी वीज पडून गडावर मोठा स्फोट झाला होता. ज्यामुळे गडावरील अनेक इमारतींना हानी पोहोचली होती. ज्याच्या दुरुस्तीसाठी ८७०० रुपये खर्च पडल्याचीही नोंद आहे

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ सप्टेंबर १६५७ मुघल शाहजादा मोहंमद अकबर याचा जन्म सहावा मुघल बादशहा औरंगजेबाला एकुण पाच मुले होती. त्यातील चौथ्या क्रमांकाचा मुलगा मोहंमद अकबर हा त्याचा सर्वांत लाडका होता. याचे एक प्रमुख कारण म्हणजे म्हणजे ११ सप्टेंबर १६५७ या दिवशी अकबराच्या जन्मानंतर सुमारे एक महिन्यात त्याची आई दिलरासबानुचा मृत्यु झाला होता. तिच्यापासुन १६५३ मधे मोहंमद आझम हा सुद्धा पुत्र औरंगजेबाला होता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ सप्टेंबर १६७९ दर्यासारंग दौलतखान कुमक घेउन इंग्रजांबरोबरच्या लढाईसाठी माईनाक भंडारीच्या मदतीला खांदेरी येथे पोचला. इंग्रजांची 'हंटर', 'रिवेंज' आणि इतर ३ लढाउ जहाजे खांदेरीला वेढा टाकून उभी होती. दौलतखानाने इंग्रज अधिकारी 'केग्विन'चा पाडाव केला, माईनाक भंडारीला रसद पोचती केली आणि 'नागाव'ला पुन्हा रसद घेण्यासाठी परत गेला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ सप्टेंबर १७४१ पोर्तुगीजांनी बार्देश घेतल्यावर सावंताच्या कुडाळ परगण्यावर चाल करण्याची योजना पोर्तुगीजांनी आखली होती. त्याचा सुगावा जयराम सावंत याला लागताच त्याने ...