Posts

मुलींची पहिली शाळा आणि श्रेयवादाचे राजकारणतंजावूरच्या सरफोजी भोसले ( दुसरे )यांनी 1820 च्या दशकात स्थापन केलेली मुलींसाठीची शाळा ही भारतातील

मुलींची पहिली शाळा आणि श्रेयवादाचे राजकारण तंजावूरच्या सरफोजी भोसले ( दुसरे )यांनी 1820 च्या दशकात स्थापन केलेली मुलींसाठीची शाळा ही भारतातील पहिली शाळा होती, हे ऐतिहासिक सत्य आज दुर्लक्षित आहे. आजही स्त्रीशिक्षणाच्या प्रारंभाची सुरुवात फक्त सावित्रीबाई फुले यांच्या शाळेपासून झाली, असा एकांगी प्रचार मोठ्या प्रमाणात केला जातो. याकमी फुले दांपत्याचे योगदान नक्कीच मोलाचं आहे, पण त्याआधीही देशात विविध ठिकाणी स्त्री शिक्षणाचे प्रयत्न झाले होते, हे विसरता कामा नये. राजा सरफोजी भोसले हे आधुनिक दृष्टिकोनाचे, विज्ञाननिष्ठ आणि शिक्षणप्रेमी शासक होते. त्यांनी तंजावूर येथे इंग्रजी पद्धतीवर आधारित शिक्षणसंस्था स्थापन केल्या. त्यात मुलांसोबतच मुलींसाठी स्वतंत्र शाळेचीही स्थापना केली होती. या शाळेच्या स्थापनेचा कालखंड 1820 च्या आसपासचा असल्याचे अनेक इंग्रजी दस्तऐवज आणि प्रवाशांचे वर्णन स्पष्ट करतात. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या गणवेशापासून अभ्यासक्रमापर्यंत सर्व गोष्टी शिस्तबद्ध होत्या. तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनीही या शाळेचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. ही शाळा सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यात...

महाराजाधिराज मराठा सम्राट बिंबदेव यादव – बिंबस्थान मुंबई (बॉम्बे) चे संस्थापक.

Image
महाराजाधिराज मराठा सम्राट बिंबदेव यादव – बिंबस्थान मुंबई (बॉम्बे) चे संस्थापक. आजही बहुतांश लोकांना असा गैरसमज आहे की मुंबई किंवा बॉम्बेचे इतिहास 1661 साली सुरू होतो, जेव्हा पोर्तुगीज राजकुमारी कॅथरिन ब्रागांझा हिचा विवाह इंग्लंडच्या चार्ल्स दुसऱ्यासोबत झाला आणि लग्नाच्या हुंड्यात सात बेटे ब्रिटिशांच्या हातात पडली. परंतु मुंबईचा इतिहास खूप पूर्वीपासून म्हणजे इ.स.च्या 5व्या शतकात कोकणातील मोरियांच्या घराण्याने घारापुरीवर राज्य केले होते तेव्हापासून सुरू होतो. पण विशेषतः उत्तर मुंबई शहराला आधुनिक रूप मिळण्यास सुरुवात झाली ती 13व्या शतकातील माहिकावती राज्याचे सम्राट महाराज बिंबदेव यादव यांच्या काळात. ते देवगिरीच्या मराठा  सम्राट रामदेवराव यादव यांचे पुत्र होते. अलाउद्दीन खिलजीने देवगिरीवर हल्ला केल्यानंतर, राजकुमार बिंबदेव यांनी किनारपट्टीकडे माघार घेतली आणि पारनेर ते आसगरपर्यंतचा प्रदेश जिंकून पर्नेर, बोडी, संजन, दमन, शिरगाव या किल्ल्यांवर अधिकार मिळवला. त्यांनी माहिकावती (आजचे माहिम) येथे आपली राजधानी स्थापन केली. त्यांच्यासोबत त्यांचे राजगुरू पुरुषोत्तम पंत कावळे व 11 सरदार होते. त...

८ एप्रिल १६७४चिपळून येथे छत्रपती शिवरायांनी मराठी लष्कराची पाहणी केली. राजाभिषेकपूर्वी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या युद्धभूमीवरील मृत्यूमुळे स्वराज्याचे सरसेनापतीपद हंबीरराव मोहीते यांना दिले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ८ एप्रिल १६५७ २७ वर्षीय छत्रपती शिवरायांचा जाधवराव घराण्यातील काशीबाई यांच्याशी विवाह झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ८ एप्रिल १६६६ छत्रपती शिवरायांनी लाल महालात केलेल्या हल्ल्यात कसाबसा वाचून औरंगजेब बादशहाचा मामा आणि मुघल सरदार शाहीस्तेखान पुणे परगणा सोडून औरंगाबादला पळून गेला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ८ एप्रिल १६६७ महाराजांनी आग्ऱ्यात कैदेत अडकलेल्या डबीर आणि कोरडे या आपल्या दोन वकीलांच्या सुटकेसाठी औरंगजेबास एक पत्र लिहिले आहे. त्याचा मराठी भाषेतील तजुर्मा सापडला आहे. संपूर्ण पत्रच वाचण्यासारखे आहे. ते मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा यात छापले आहे. आपण वाचा. त्यातील मुख्य विषय असा की, ‘मी आपली परवानगी न घेता आग्ऱ्याहून निघून आलो, याचे मला वाईट वाटते. मी पूर्वीप्रमाणेच आपल्याशी नम्र आहे.‘ औरंगजेबानेही एकूण आपली परिस्थिती ओळखली होती. त्यानेही त्र्यंबक सोनदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे या दोन वकीलांची दि. ८ एप्रिल १६६७ रोजी सुटका केली. सुमारे नऊ महिने यमयातना सहन करून ते दोघे वकील सुटले आणि राजगडावर येऊन पोहोचले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩...

४ एप्रिल १६७९छत्रपती शिवरायांची विजापूरजवळ 'शहापूर' येथे स्वारी.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ एप्रिल १६२३ पेट्रोडीला व्हेल पोर्तुगीज लिहितो कि, ‘मी चौल बंदरातून निघून दंडराजपुरी बंदराच्या जवळून गेलो हे एवढेच बंदर निजामशहाच्या ताब्यात आहे.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ एप्रिल १६६३ छत्रपती शिवाजी महाराज 'किल्ले सिंहगड' वर दाखल. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ एप्रिल १६७० नगरमध्ये मराठे घुसलेले पाहून 'दाऊदखान कुरेशी' हा खानदेशातून त्वरेने नगरास ७००० स्वारांसह आलेला होता. नगरमध्ये घुसलेले मराठे आजच्या दिवशी जुन्नर प्रांतात पळाले. दाऊदखान त्यांच्यामागे हाथ धुवून पळत सुटला, जुन्नर प्रांतातूनही मराठे तात्पुरते पळून गेले. मग मात्र दमलेला दाऊदखान नगरला परतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ एप्रिल १६७२ निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू ! अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंतयोगी !! दि. ४ एप्रिल १६७२ – चैत्र  वद्य द्वितीया, शके १५९४ या दिवशी समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांना एक ओवीबद्ध पत्र पाठवले. “निश्चयाचा माहामेरू...” अश्या शब्दांनी सुरुवात होणारी आणि शिवरायांचे गुणसंकीर्तन करणारी ही शिवप्रशस्ती अलौकिक आहे. हे काव्य मोठे आहे पण त्यातील निव...

हडपसर गावाची इतिहासातील सफर

Image
#हडपसर गावाची इतिहासातील सफर       काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता , होळकर आणि पेशवे यांचे युद्ध पुण्यात झाले त्यावेळी मृत झालेल्या सैनिकांच्या शरीराची विल्हेवाट ही पुण्याबाहेर ज्या ठिकाणी मुंडके टाकली ते जागा मुंढवा गाव आणि जिथे हाडे टाकली ती जागा हडपसर असाच काहीसा ते बोलणाराचा विषय होता पण यामधे काहीच तथ्ये नाही.       पुणे जिल्ह्यातील (असोत वा महाराष्ट्र मधील कोणतेही गाव) या गावांचा वारसा हा हजारो वर्षांपासून सुरू आहे ऐतिहासिक कागदपत्रे, शिलालेख ताम्रपट हाताळताना एक संदर्भ लक्षात येतो तो म्हणजे गावचा कारभार पाहणारा मुकादम/पाटील जे एकाच अर्थाचे शब्द आहेत. चालुक्य काळातील इतिहासाचे लेखन करणार्या लेखकांनी याबाबत माहिती दिली आहे चालुक्य यांनी राज्यव्यवस्थाची सोय ही गावपातळीपासून केली होती गावचा कारभार पाहणारा एक व्यक्ती नेमणूक केली होती जो कर देणे, न्यायनिवाडा, युद्ध वेळप्रसंगी सैन्य पुरवणे वैगेरे काम करत .     शाहू महाराज यांचे कागदपत्रे पाहताना शिवाजी महाराज यांचे एक पत्र उपलब्ध झाले यामधे हडपसर गावचे रायाजी #मगर_पाटील आणि #सोनजी_त...

🚩 श्रीमान रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला निधी देणारे महाराज श्रीमंत तुकोजीराव होळकर 🚩

Image
🚩 श्रीमान रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला निधी देणारे महाराज श्रीमंत तुकोजीराव होळकर 🚩

श्रीज्ञानदेवांची_गुढी

Image
#श्रीज्ञानदेवांची_गुढी श्रीज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथराज #ज्ञानेश्वरी मध्ये गुढी या शब्दाला चार वेळा स्थान दिले आहे. या चारही ओव्या वेगवेगळ्या अध्यायांत आहेत. साहजिकच श्रीमाऊलींनी या शब्दाची योजना त्यांच्या समृद्ध साहित्यात केल्याने त्याला #सौभाग्य प्राप्त झाले आहे. पण नेमका त्या शब्दाची योजना कशी केली आहे हे आपण बघुया. पहिले अध्याय चार मधील उल्लेख पाहू...  अधर्माची अवधी तोडी | दोषांची लिहिली फाडी |  सज्जनांकरवी गुढी | सुखाची उभवी || भक्तांचा कैवार घेऊन भगवंत जेव्हा सगुण साकार होऊन अवतरतो तेव्हा त्याच्याकरवी संपूर्ण अज्ञानाचा अंधकार नाहीसा होतो. #जगताचा पालन करता #जगन्नाथ इथे अधर्माचा शेवट करितो, पापांचा जमाखर्च फाडून टाकितो आणि साधुपुरुषांच्या करवी भक्तीचा प्रसार करवून सर्वत्र सुखाच्या #गुढ्या उभारतो. इथे गुढी हा शब्द #सौख्यप्राप्ती आणि धर्माची विजयपताका म्हणून योजला आहे. दुसरा उल्लेख अध्याय सहामध्ये आहे.  ऐके संन्यासी तोचि योगी | ऐसी एकवाक्यतेची जगी |  गुढी उभविली अनेगी | शास्त्रांतरी || संन्यास आणि योग यातील मूळ प्राप्तीचा उद्देश हा भिन्न नसून एकच आहे असे भगवान श...