Posts

Showing posts from January, 2025

३१ जानेवारी १६६१कारतलबखानाचा समाचार घेण्यासाठी महाराजांनी किल्ले राजगड सोडला...! महाराजांनी नेतोजींसह उंबराणीच्या खिंडीकडे कूच केली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३१ जानेवारी १६६१ कारतलबखानाचा समाचार घेण्यासाठी महाराजांनी किल्ले राजगड सोडला...! महाराजांनी नेतोजींसह उंबराणीच्या खिंडीकडे कूच केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३१ जानेवारी १६६३ छत्रपती शिवरायांनी शामराज रांझेकर पंताना पत्र लिहिले. शामराज नीलकंठ रांझेकर हे पहिले प्रधान पेशवे असावेत. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३१ जानेवारी १६६५ मिर्झाराजे जयसिंग औरंगाबादेस पोहोचले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३१ जानेवारी १७२८ श्रीमंत बाजीराव पेशवे चोपड्यानजीक तापी उतरून १८ डिसेंबर १७२७ रोजी पौष वद्य प्रतिपदेला कुकरमुंड्याजवळ कुसुंबी प्रांतात आले. तेथून निजामाच्या डोळ्यात धूळफेक करण्याच्या हेतूने बुऱ्हाणपूर जाळण्याची हूल उठवून दिली. अकस्मात बाबापाऱ्याचा घाट उतरून राऊ भडोचवर गेले. अंदाजे ३१ जानेवारीच्या दरम्यान अलीमोहन गाठले. कोणासही स्वप्नातही वाटणार नाही, अशी घोडदौड करून निजामाला निष्प्रभ करून त्याच्या प्रांताची धूळधाण उडवली. गुजरातमध्ये शिरताच सुभेदार सरबुलंदखान याला (निजामाचे आणि याचे आपसात वैर होते) असे भासवले की, निजाम आणि बाजीरावाच्या संयुक्त फौजा गुजरातेत सरबुलंदख...

२९ जानेवारी १९६७छत्रपती शिवरायांनी जलदुर्गावर नव्या नेमणुका केल्या.किल्ले सिंधुदुर्गवर "रायाजी भोसले" यांस हवालदार म्हणून नेमले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २९ जानेवारी १६५७ बीदरचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात गेला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २९ जानेवारी १९६७ छत्रपती शिवरायांनी जलदुर्गावर नव्या नेमणुका केल्या. किल्ले सिंधुदुर्गवर "रायाजी भोसले" यांस हवालदार म्हणून नेमले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २९ जानेवारी १७८८ वाडीकर सावंत आणि पोर्तुगीज यांच्यात तह! "वाडीकर सावंत आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये ९१ कलमी मैत्रीचा करार होऊन वाडीकर सावंतांने पोर्तुगिजांचे मांडलिकत्व पत्करले." 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड, सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.  "जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

२८ जानेवारी १६४६२८ जानेवारी, त्याने बद-अमल केला म्हणून दोनही हात व दोनही पाय कापून काढले व त्याची पिढीजात पाटिलकी जप्त केली

⛳⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २८ जानेवारी १६४६ २८ जानेवारी, त्याने बद-अमल केला म्हणून दोनही हात व दोनही पाय कापून काढले व त्याची पिढीजात पाटिलकी जप्त केली या विषयीचे शिवरायांची सुप्रसिद्ध ‘प्रतिपच्चंद्र..’ मुद्रा असलेले हे सर्वात जुने पत्र ज्युलियन कालगणनेनुसार २८ जानेवारी १६४६चे आहे आहे. त्यावरची मुद्रा अशी आहे, प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता । शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।। [शाहजीचा मुलगा शिवाजी याची ही प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी व विश्वाला वंदनीय अशी मुद्रा (लोकांच्या) कल्याणार्थ आहे.] शाहजीराजे, जिजाऊसाहेबांपर्यंत सर्वांच्या मुद्रा फारसीत असताना महाराजांची मुद्रा संस्कृतमध्ये आहे. मुद्रेतील उल्लेख पाहता स्वाभिमानाच्या भावनेने प्रेरीत नूतनराज्यनिर्मितीची महाराजांची महत्वकांक्षा, हे राज्य लोककल्याणार्थ आहे हे जनतेच्या मनात ठसवण्याचा हेतू अगदी स्पष्ट आहे. पत्रातील मजकुराचा थोडक्यात सारांश असा, रांजे गावचा मोकदम (पाटिल) बावाजी गुजर याने बदअमल (व्याभिचार) केल्याचे सिद्ध झाल्याने त्याचे हातपाय तोडण्यात आले. त्यानंतर बावा...

२७ जानेवारी १६५८छत्रपती शिवरायांनी "माहुलीचा किल्ला उर्फ भंडारगड" जिंकून स्वराज्यात आणला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ जानेवारी १६५८ छत्रपती शिवरायांनी "माहुलीचा किल्ला उर्फ भंडारगड"  जिंकून स्वराज्यात आणला. ठाणे जिल्ह्यात आसनगावजवळ एक गडाचे त्रिकुट आहे (माहुली, पळसगड आणि भंडारगड). १४८५ च्या सुमारास हे ठिकाण नगरच्या निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद याच्याकडे आले. नंतर शहाजी राजे निजामशाहीचे संचालक झाल्यावर मुघल सेना आणि आदिलशाही संयुक्तपणे निजामशाही बुडवण्याचा प्रयत्न करत होत्या. १६३५ च्या सुमारास शहाजीराजेंनी कठीण परिस्थितीत बळकट आश्रयस्थान म्हणून शिवनेरी, जुन्नर-पुणेहून जिजाबाई राणी आणि बाल शिवबासह माहुलीला मुक्काम हलवला. खानजमानने त्यावेळी माहुलीला वेढा दिला. शहाजीराजेंनी पोर्तुगीजांकडे मदत मागितली पण त्यांनी नकार दिला. त्यावेळी शहाजीराजेंनी शरणागती पत्करली. शिवाजी महाराजांनी हा किल्ला २७ जानेवारी१६५८ ला मोघलाकडून परत मिळवला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ जानेवारी १६६७ छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल २७ जानेवारी १६६७ च्या एका पत्रात पोर्तुगीज व्हॉइसरॉय लिहतो : "धुर्तपणा, चातुर्य, पराक्रम, चपलता आणि लष्करी बुध्दी ह्या बाबतीत शिवाजीची तु...

२४ जानेवारी १६६७छत्रपती शिवरायांनी १२ मावळ मधील "कानंद खोरे"चा वतनाचा तंटा मिटवला. मरळ घराण्याकडे परत वतनदारी.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ जानेवारी १६६१ कारतलबखान स्वराज्यावर चालून आला  आणि कोकणात उतरला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ जानेवारी १६६७ छत्रपती शिवरायांनी १२ मावळ मधील  "कानंद खोरे"चा वतनाचा तंटा मिटवला. मरळ घराण्याकडे परत वतनदारी. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ जानेवारी १६८० सुरतकर इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीला लिहिलेले पत्र  पिढ्यान् पिढ्या स्थिरावलेल्या व प्रचंड लष्करी शक्ती असलेल्या शत्रूंना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्रतापाने एवढे जेरीस आणले की, नुसते त्यांचे नाव ऐकताच या शत्रूंचा थरकाप उडत असे. कर्नाटक मोहीमेच्या वेळी मार्टीनने नेमके असेच म्हटले आहे. तो लिहितो, The mere name of Chatrapati Shivaji Maharaja made them tremble. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धविषयक हालचाली एवढ्या द्रुतगतीने होत कि, शत्रू त्यांची कल्पना करू शकत नसे. दि. २४ जानेवारी १६८० रोजी सुरतकर इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीला लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, Where he attempts there is but little space betwixt his notice and appearance and to send for soliders from Bombay will t...

२३ जानेवारी १६६४!! स्वराज्यसंकल्पक सरलष्कर महाराजा शहाजीराजे भोसले यांची ३५९ वी पुण्यतिथी !!

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ जानेवारी १५६५ विजयनगरच्या हिंदु साम्राज्याचा विध्वंस : अनेक युद्धात हरवून देखील राम राजा ने विजयनगर च्या निकटच्या मुस्लिम शासक- सुल्तान अली आदिल शाह सोबत शांती स्थापित केली होती. किंतु; कपटी सुलतान आदिलशाहने अविश्वासू काफ़िरांना दक्षिण भारतातील मुस्लिम रियासतींचे एक संघटन करून ह्या वास्तविक पंथ-निरपेक्ष, सहिष्णु साम्राज्या विरुद्ध जिहाद पुकारले. किंतु; २३ जानेवारी १५६५ ला तालीकोटच्या युद्धाच्या अंतिम दिवसी विजयनगरच्या सेन्याने अनुकुल काळी तीव्र गतीने आक्रमण केले. परिणामस्वरूप मुस्लिमांच्या संघटित सेनेच्या डाव्या व उजव्या बाजूच्या सेना भयंकर अस्तव्यस्त झाल्या आणि सेना-नायक शरण येऊन माघारी जाण्यास उद्युक्त झाले होते. किंतु हुसेन ने स्थिती पुन्हा काबूत आणली. म्हणून युद्ध पुनः प्रारंभ झाले व दोन्ही पक्ष भयंकर आघात पावले. किंतु; ह्यावेळी युद्ध अधिक काळ नाही चालू शकले, कारण की रामराजाच्या २ मुस्लिम सेनानायकांनी ऐन वेळी दगा देऊन पक्ष त्याग केला. ज्यामुळे युद्धाची स्थिती पालटली. कैसर फ्रैडरिक, ज्याने त्या काळी विजयनगर पाहिले होते, त...

*२२ जानेवारी इ.स.१६७७**छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सरदार हुसेनखानाचा पराभव केला.*

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २२ जानेवारी १६६६ आग्र्यामध्ये औरंगजेबाच्या कैदेतच १० वर्षानंतर शहाजहानचा मृत्यू. बापाला कैदेत घालून त्याची बादशाही  आपल्या ताब्यात घेणे आणि नंतर त्याला मारणे हा मुघली कार्यक्रम "हरामी औरंगजेबाने" सुद्धा यथोचित पार पाडला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २२ जानेवारी १६७७ छत्रपती शिवरायानी हुसेनखानाचा पराभव केला. हुसेनखान मियाना, पठाण, जणू दुसरा बहलोलखान अशी त्याची ख्याती. वृत्तीने कजाख, मोठा लढवय्या. जुलमी अधिकारी - मियाना बंधूंच्या अमलाने गांजलेल्या कोप्पळ प्रांतातील रयतेची हाक छत्रपती शिवरायांच्या कानी आली, सरनोबत हंबीरराव मोहित्यांच्या हाताखाली महाराजांनी फौज रवाना केली. येल्बुर्गा जवळ मोठी लढाई झाली, मराठ्यांच्या तुलनेत पठाणीसैन्य संख्येने जास्त असूनही मराठ्यांनी निकराचे युद्ध केले, 'सहा प्रहरात कुल फौज बुडविली' (सभासद बखर), हंबीरराव, धनाजी जाधव, नागोजी जेधे (कान्होजी जेध्यांचे नातू, सर्जेराव जेध्यांचे पुत्र) आदींनी पराक्रमाची शर्थ केली. लढाईचे पारडे फिरले, हुसेनखान पळून जाऊ लागला, तेव्हा तरण्याबांड नागोजी जेध्यानी आपला...

२१ जानेवारी १६६१आदिलशहाच्या ताब्यातील कोकणपट्टी स्वराज्यात सामिल करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी कोकण मोहिम हाती घेतली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ जानेवारी १६५५ शहाजीराजांचे मोरया गोसाविंकडून नव्याने कुठलेही कर घेऊ नये याविषयी पुणे व सुपे परगण्याच्या कारकुनांना ताकीद पत्र, अज रख्तखाने राजश्री शाहाजी राजे दामदौलतहु बजानेब कारकुनांनी हाल व इस्तकबाल व देसमुखानी पा| सुपे बिदानंद सु|| खमस खमसैन अलफ राजेश्री मोरोवा गोसावी सो|| चिंचवड पा|| पुणे यांचे बाबे रघुनाथ खेडकर येही हुजूर येऊन माळूम केले जे गोसावी यास इनाम पा|| मा|| बा||फर्मान व खुर्दखते वजीरानी व बा|| खुर्दखते रख्तखाना गह्दम सालाबाद ता|| सालुगा||कुलबाब कुलकानु दुमाले चालत असता साल माराकारणे कारकून नवी जिकीर करून गोसावियाचे इनामावरी कनकगिरीपटी नवी बाब जाली आहे ते घाळून पैकीयाची तहसील लाविली आहे  व आणखी नविया पटिया जालिया आहेती त्याही घाळून घेऊन म्हणताती तरी ये बाबे माहाराज्रे ताकीद खुर्दखत मर्हामती करून कनकगिरीपटीची व आणिक नवे पटीयाची तसवीस न लगे व उसापती केली असेल टे फिराउन देती यैसा हुकुम केला पाहिजे म्हणौनू माळूम केले तरी गोसावियाचे इनाम कुलबाब कुलकानु ता|| सालगुदस्ता बा|| सनद दुमाले असता सालमा||कनकगिरीपटी घाळूनु त...

१५ जानेवारी १६५६छत्रपती शिवरायांनी छापा घालुन जावळी काबीज केली,

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ जानेवारी १६५६ छत्रपती शिवरायांनी छापा घालुन जावळी काबीज केली, या लढाईत हणमंतराव मोरे ठार झाला. मग्रुर चंद्रराव मोरे जावळीतुन रायरी उर्फ रायगडावर फरार झाला. महाराजांना जावळीच्या विजयासोबत मोर्यांच्या तुर्यातील एक अमुल्य रत्न मिळाले, त्या रत्नाचं नाव होतं "मुरारबाजी देशपांडे". 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ जानेवारी १६६० दौलोजीची कोकणावर चाल - खारेपाटण कोट जिंकला जेव्हा छत्रपती शिवाजी राजे प्रतापगड - वाई - सातारा - कोल्हापूर भागातल्या आदिलशाही चौक्या जिंकत होते तेव्हा त्यांचा सरदार दौलोजी तळ कोकणातून थेट राजापूर पर्यंत गेला होता असे इंग्रज व वलंदेज (Dutch) साधनांमधून दिसते. राजापूरच्या इंग्रजांच्या वखारीतून त्यांच्या सुरतेच्या वखारीला ९ डिसेंबर १६५९ ला लिहीलेल्या पत्रात हा उल्लेख सापडतो. अफजलवधाच्या धक्क्यातून सावरायला वेळ मिळायच्या आत झालेल्या ह्या अकस्मिक हल्ल्याने आदिलशाहीचे सगळे अधिकारी व सरदार हदरले. इंग्रजांच्या पत्रावरुन हे स्पष्ट आहे की १० डिसेंबर पर्यंत दौलोजी राजापूरला पोहोचला नव्हता. दाभोळच्या बंदरात अफजलखानची तीन...

खाशाबा_जाधव (जानेवारी १५, इ.स. १९२६ - ऑगस्ट १४, इ.स. १९८४) हे ऑलिंपिक पदक विजेते मराठी, भारतीय कुस्तीगीर होते.

Image
#खाशाबा_जाधव  (जानेवारी १५, इ.स. १९२६ - ऑगस्ट १४, इ.स. १९८४)  हे ऑलिंपिक पदक विजेते मराठी, भारतीय कुस्तीगीर होते. इ.स. १९५२ सालातल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते. जाधवांनी इ.स. १९४८ सालातील लंडन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये फ्लायवेट वजनगटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला. इ.स. १९५२ सालातील हेलसिंकी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ५२ किलोग्रॅम वजनगटात फ्रीस्टाइल प्रकारांतर्गत कांस्यपदक जिंकले. महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हयात कराड तालुक्यातील गोळेश्वर या खेडेगावात खाशाबा जाधवचा जन्म झाला. ख्यातनाम पैलवान दादासाहेब जाधव यांचा हा सर्वात लहान म्हणजे ५ क्रमांकाचा मुलगा होता. याने ८ वर्षाचा असताना त्या भागातील प्रशिद्द असणार्‍या चॅम्पियनला २ मिनिटात लोळवून त्या भागातील एक अनभिज्ञ विनातक्रार चॅम्पियन ठरला होता. त्याने सन १९४०-१९४७ दरम्यान कराड येथील टिळक हायस्कूल मधून आपले शिक्षण पूर्ण केले होते. त्याने त्याचे जीवन कुस्तिकडेच वळविले आणि त्या खेळातच मन रमविले.

१४ जानेवारी इ.स.१६८१(माघ शुद्ध पंचमी शके १६०२ संवत्सर रौद्र शुक्रवार)छत्रपती संभाजी महाराजांचे राज्याभिषेक विधी सुरू!

⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 १४ जानेवारी इ.स.१६४१ शहाजीराजांचे कोंडदेवांना पत्र शहाजीराजांना सूनमुख पाहण्याची उत्सुकता वाटली असणे स्वाभाविक आहे. पत्नीची व शिवबाराजांची भेट होऊनहि एक वर्ष झाले होते. शिवाय शिवबाराजे, जिजाऊसाहेब यांचा व शंभूराजांचीहि भेट बरेच दिवसात झालेली नव्हती, कर्नाटकचा नवा मुलुखहि त्यांनी पाहिलेला नव्हता. त्यामुळे शहाजीराजांनी दादोजींना पत्र पाठवुन त्यांना बंगरुळास बोलावुन घेतले. बंगरुळास जाण्यापूर्वी दादोजींचा इकडिल उल्लेख असलेला शेवटचा महजर १४ जानेवारी १६४१ या तारखेचा आहे. व यापुढील एकदम ३० मे १६४२ चा आहे. बंगरुळास ही मंडळि निघाली ’ते समयास राजियास वर्षे बारा होती’ असे सभासद म्हणतो. हा उल्लेख अचूक आहे कारण फेब्रुवारी १६४१ मध्ये महाराजांना १२ वे वर्ष लागते. म्हणाजे फेब्रुवारी मध्ये महाराजांसह दादोजी कर्नाटकात रवाना झाले. दादोजिंच्या अनुपस्थितीत पुणे प्रांत सिद्दि अंबर याकुतखानाकडे होता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/zKb_NxQdJmo 📜 १...

१४_जानेवारी_१७६१#पानिपतचा_रणसंग्राम.

१४_जानेवारी_१७६१ #पानिपतचा_रणसंग्राम. पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला परंतू पानिपत येथील पराभव हा मराठी राज्याला कलंक नसून अभिमानास्पद आहे, कारण यानंतर अफगानी आक्रमण पुन्हा दिल्ली पाहू शकले नाहीत, मोगल साम्राज्य संपुष्टात येत होते. राज्य टिकवण्याचा जोम किंवा वकूब मोगलांच्यात राहिला नव्हता . त्यातून नादिरशहाच्या स्वार्यापासून वायव्येकडून अफगाणांचे हल्ले हिंदुस्थानावर होऊ लागले. अहमदशहा अब्दालीच्या आक्रमणात दत्ताजी शिंदे यांना वीरमरण आले यामुळे सारा महाराष्ट्र चवताळून उठला. सदाशिवरावभाऊ पेशवे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोहिमेत विश्वासराव पेशवे, जनकोजी शिंदे सारखे अवघे सोळा सतरा वर्षांचे सेनानीही आपल्या जीवाची पर्वा न करता सामील झाले होते. हिंदुस्थानच्या रक्षणासाठी झालेल्या या लढाईत महाराष्ट्राची एक सबंध पिढी मारली गेली . हल्ली आपण पानिपत म्हणजे पराभव असे मानतो परंतु पानिपत म्हणजे पराभव नव्हे पानिपत म्हणजे मराठा सैन्याने अब्दालीला धडा शिकवायला केलेला रणसंग्राम, पानिपत म्हणजे “ बचेंगे तो और भी लडेंगे “ अस उत्तर देणारा शूरवीर दत्ताजी शिंदे, सदाशिवराव भाऊंच्या जिगरबाज लढ्याची क...

१२ जानेवारी १७०५छत्रपती शाहु महाराजांनी सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी केली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ जानेवारी १५९८ राजमाता जिजाऊ जन्मोत्सव ।। जय जिजाऊ ।। जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते झाले शिवराय नी शंभू छावा…! जिजाऊ तुम्ही नसता तर, नसता मिळाला स्वराज्य ठेवा…! जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते लढले मावळे…! जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते दिसले विजयाचे सोहळे…! १२ जानेवारी या दिवशी महराष्ट्राच्या इतिहासाला एक कलाटणी मिळाली होती. स्वाभिमानाची आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी जिजाऊ रूपाने सिंदखेड राजा येथे लखुजीराजे जाधवांच्या घरी प्रकटली. हीच ती स्वराज्य-जननी, हीच ती माता जिने स्वराज्याचे देखणे स्वप्न देखिले, हीच ती जननी जिने आमच्या रक्ता रक्ता मध्ये स्वाभिमान भिनवला. जिने 'प्रत्येक' मावळ्या मध्ये शिवबा घडवला. स्वराज्या साठी लढणाऱ्या प्रत्येकावर आगदी शिवबा प्रमाणेच प्रेम केले. जिजाऊ साहेबांनी आपल्या मायेने शिवबांसाठी जीवाला जीव देणारे मावळे घडवले, स्वाभिमानाच्या ठिणगीने त्यांना पेटवले आणि पुढे हीच स्वराज्याची मशाल क्रूर यवनांना जाळून खाक करू लागली. आमच्या ह्याच शूर मावळ्यांना स्वप्नात पण बघून हेच जुलमी दुश्मन झोपेत पण दचकून जागी व्ह...