२८ जानेवारी १६४६२८ जानेवारी, त्याने बद-अमल केला म्हणून दोनही हात व दोनही पाय कापून काढले व त्याची पिढीजात पाटिलकी जप्त केली
⛳⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२८ जानेवारी १६४६
२८ जानेवारी, त्याने बद-अमल केला म्हणून दोनही हात व दोनही पाय कापून काढले व त्याची पिढीजात पाटिलकी जप्त केली या विषयीचे शिवरायांची सुप्रसिद्ध ‘प्रतिपच्चंद्र..’ मुद्रा असलेले हे सर्वात जुने पत्र ज्युलियन कालगणनेनुसार २८ जानेवारी १६४६चे आहे आहे. त्यावरची मुद्रा अशी आहे,
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता । शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।
[शाहजीचा मुलगा शिवाजी याची ही प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी व विश्वाला वंदनीय अशी मुद्रा (लोकांच्या) कल्याणार्थ आहे.]
शाहजीराजे, जिजाऊसाहेबांपर्यंत सर्वांच्या मुद्रा फारसीत असताना महाराजांची मुद्रा संस्कृतमध्ये आहे. मुद्रेतील उल्लेख पाहता स्वाभिमानाच्या भावनेने प्रेरीत नूतनराज्यनिर्मितीची महाराजांची महत्वकांक्षा, हे राज्य लोककल्याणार्थ आहे हे जनतेच्या मनात ठसवण्याचा हेतू अगदी स्पष्ट आहे. पत्रातील मजकुराचा थोडक्यात सारांश असा, रांजे गावचा मोकदम (पाटिल) बावाजी गुजर याने बदअमल (व्याभिचार) केल्याचे सिद्ध झाल्याने त्याचे हातपाय तोडण्यात आले. त्यानंतर बावाजीकडून तीनशे होन दंड घेऊन, त्याला सोनाजी गुजर या त्याच्या नातेवाईकाकडे सोपवण्यात आले. पुन्हा दोनशे होन शेरणी सोनाजीकडून घेऊन बावाजीची पाटिलकी सोनाजीस दिली. स्वराज्यात एखाद्यावर गुन्हा दाखल झाल्यास, त्याची सर्वप्रथम चौकशी होते, गुन्हा सिद्ध झाल्यास कोणतीही हयगय न करता कठोर शिक्षा होते; पुन्हा राज्याच्या व्यवस्थेत कसूर न होता, तीसुद्धा सुस्थित राखली जाते आणि गुन्हेगाराकडून दंड, लाभार्थ्याकडून ‘शेरणी’च्या रुपात ठराविक रक्कम घेऊन राज्याचे कोशही भरले जातात, असे स्वराज्याचे कितीतरी गुण या एका पत्रात दिसतात. जुलमी मुसलमानी सत्तांच्या पार्श्वभुमीवर अशा न्यायाच्या, कल्याणकारी राज्यावर जनतेचा विश्वास दृढ होत नसेल, या स्वराज्यप्रेरक नेत्यासाठी तरुण प्राणपणाने लढण्यास तयार होत नसतील, तरंच नवल आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘मराठी राज्याची राजमुद्रा’ वापरून या संदर्भात लिहिलेले पत्र उपलब्ध आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२८ जानेवारी १६६०
शहिस्तेखान आपल्या अफाट सैन्यासह स्वराज्यावर चालून यायला निघाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२८ जानेवारी १६६४
मुघलांनी सुरतेच्या या लुटीची हाय खाल्ली. ही बातमी ऐकून अनेक जण दिड्मूढ झाले. औरंगजेब सुन्न झाला. पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच यांनी मोठमोठी बातमीपत्रे आपापल्या राजांकडे पाठवून दिली. रेव्ह. जॉन एस्कॅलियट याने २८ जानेवारी १६६४ रोजी सर टॉमस ब्राऊन यांना लिहिलेल्या एका पत्रात शिवाजी महाराजांचे वर्णन आले आहे. पत्रात लिहिले आहे,
kk .., His person is decribed by them who have seen him to bee of meane stature, lower some what then I am, errect and of an excellent proportion, active in excerisise, and when ever hee speaks seems to smile, a quicke and peercing eye, and whitter than any of his people...!ll
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२८जानेवारी १६८१
बुऱ्हाणपूरवर छापा...
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर दोनदा छापा टाकला हे आपल्याला माहित आहे. त्याच प्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या बाहेर जावून मध्यप्रदेशातल्या बुऱ्हाणपूर वर छापा टाकला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२८ जानेवारी १७३४
श्रीमंत बाजीराव आणि मस्तानी या दोघांचा एकुलता एक मुलगा म्हणजे समशेर बहाद्दर यांचा जन्म २८ जानेवारी १७३४ ला झाला, त्याचे मूळ नाव कृष्णसिंह, पण नंतर मामाच्या नावावरून ठेवलेले समशेर नाव प्रचलित झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२८ जानेवारी १८५१
दुसरा बाजीराव पेशवे यांचे कानपूरजवळ ब्रम्हावर्त येथे निधन झाले. (जन्म: १० जानेवारी १७७५)
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
.२८ या विषयीचे शिवरायांची सुप्रसिद्ध ‘प्रतिपच्चंद्र..’ मुद्रा असलेले हे सर्वात जुने पत्र ज्युलियन कालगणनेनुसार २८ जानेवारी १६४६चे आहे आहे. त्यावरची मुद्रा अशी आहे,
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता । शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।
[शाहजीचा मुलगा शिवाजी याची ही प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी व विश्वाला वंदनीय अशी मुद्रा (लोकांच्या) कल्याणार्थ आहे.]
शाहजीराजे, जिजाऊसाहेबांपर्यंत सर्वांच्या मुद्रा फारसीत असताना महाराजांची मुद्रा संस्कृतमध्ये आहे. मुद्रेतील उल्लेख पाहता स्वाभिमानाच्या भावनेने प्रेरीत नूतनराज्यनिर्मितीची महाराजांची महत्वकांक्षा, हे राज्य लोककल्याणार्थ आहे हे जनतेच्या मनात ठसवण्याचा हेतू अगदी स्पष्ट आहे. पत्रातील मजकुराचा थोडक्यात सारांश असा, रांजे गावचा मोकदम (पाटिल) बावाजी गुजर याने बदअमल (व्याभिचार) केल्याचे सिद्ध झाल्याने त्याचे हातपाय तोडण्यात आले. त्यानंतर बावाजीकडून तीनशे होन दंड घेऊन, त्याला सोनाजी गुजर या त्याच्या नातेवाईकाकडे सोपवण्यात आले. पुन्हा दोनशे होन शेरणी सोनाजीकडून घेऊन बावाजीची पाटिलकी सोनाजीस दिली. स्वराज्यात एखाद्यावर गुन्हा दाखल झाल्यास, त्याची सर्वप्रथम चौकशी होते, गुन्हा सिद्ध झाल्यास कोणतीही हयगय न करता कठोर शिक्षा होते; पुन्हा राज्याच्या व्यवस्थेत कसूर न होता, तीसुद्धा सुस्थित राखली जाते आणि गुन्हेगाराकडून दंड, लाभार्थ्याकडून ‘शेरणी’च्या रुपात ठराविक रक्कम घेऊन राज्याचे कोशही भरले जातात, असे स्वराज्याचे कितीतरी गुण या एका पत्रात दिसतात. जुलमी मुसलमानी सत्तांच्या पार्श्वभुमीवर अशा न्यायाच्या, कल्याणकारी राज्यावर जनतेचा विश्वास दृढ होत नसेल, या स्वराज्यप्रेरक नेत्यासाठी तरुण प्राणपणाने लढण्यास तयार होत नसतील, तरंच नवल आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘मराठी राज्याची राजमुद्रा’ वापरून या संदर्भात लिहिलेले पत्र उपलब्ध आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२८ जानेवारी १६६०
शहिस्तेखान आपल्या अफाट सैन्यासह स्वराज्यावर चालून यायला निघाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२८ जानेवारी १६६४
मुघलांनी सुरतेच्या या लुटीची हाय खाल्ली. ही बातमी ऐकून अनेक जण दिड्मूढ झाले. औरंगजेब सुन्न झाला. पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच यांनी मोठमोठी बातमीपत्रे आपापल्या राजांकडे पाठवून दिली. रेव्ह. जॉन एस्कॅलियट याने २८ जानेवारी १६६४ रोजी सर टॉमस ब्राऊन यांना लिहिलेल्या एका पत्रात शिवाजी महाराजांचे वर्णन आले आहे. पत्रात लिहिले आहे,
kk .., His person is decribed by them who have seen him to bee of meane stature, lower some what then I am, errect and of an excellent proportion, active in excerisise, and when ever hee speaks seems to smile, a quicke and peercing eye, and whitter than any of his people...!ll
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२८जानेवारी १६८१
बुऱ्हाणपूरवर छापा...
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर दोनदा छापा टाकला हे आपल्याला माहित आहे. त्याच प्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या बाहेर जावून मध्यप्रदेशातल्या बुऱ्हाणपूर वर छापा टाकला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२८ जानेवारी १७३४
श्रीमंत बाजीराव आणि मस्तानी या दोघांचा एकुलता एक मुलगा म्हणजे समशेर बहाद्दर यांचा जन्म २८ जानेवारी १७३४ ला झाला, त्याचे मूळ नाव कृष्णसिंह, पण नंतर मामाच्या नावावरून ठेवलेले समशेर नाव प्रचलित झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२८ जानेवारी १८५१
दुसरा बाजीराव पेशवे यांचे कानपूरजवळ ब्रम्हावर्त येथे निधन झाले. (जन्म: १० जानेवारी १७७५)
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩
Comments
Post a Comment