२३ जानेवारी १६६४!! स्वराज्यसंकल्पक सरलष्कर महाराजा शहाजीराजे भोसले यांची ३५९ वी पुण्यतिथी !!

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२३ जानेवारी १५६५
विजयनगरच्या हिंदु साम्राज्याचा विध्वंस :
अनेक युद्धात हरवून देखील राम राजा ने विजयनगर च्या निकटच्या मुस्लिम शासक- सुल्तान अली आदिल शाह सोबत शांती स्थापित केली होती. किंतु; कपटी सुलतान आदिलशाहने अविश्वासू काफ़िरांना दक्षिण भारतातील मुस्लिम रियासतींचे एक संघटन करून ह्या वास्तविक पंथ-निरपेक्ष, सहिष्णु साम्राज्या विरुद्ध जिहाद पुकारले. किंतु; २३ जानेवारी १५६५ ला तालीकोटच्या युद्धाच्या अंतिम दिवसी विजयनगरच्या सेन्याने अनुकुल काळी तीव्र गतीने आक्रमण केले. परिणामस्वरूप मुस्लिमांच्या संघटित सेनेच्या डाव्या व उजव्या बाजूच्या सेना भयंकर अस्तव्यस्त झाल्या आणि सेना-नायक शरण येऊन माघारी जाण्यास उद्युक्त झाले होते. किंतु हुसेन ने स्थिती पुन्हा काबूत आणली. म्हणून युद्ध पुनः प्रारंभ झाले व दोन्ही पक्ष भयंकर आघात पावले. किंतु; ह्यावेळी युद्ध अधिक काळ नाही चालू शकले, कारण की रामराजाच्या २ मुस्लिम सेनानायकांनी ऐन वेळी दगा देऊन पक्ष त्याग केला. ज्यामुळे युद्धाची स्थिती पालटली. कैसर फ्रैडरिक, ज्याने त्या काळी विजयनगर पाहिले होते, त्याने संगितले आहे की ह्या दोन्ही सेना नायकांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकी सत्तर ते ऐंशी हजार योद्धा होते. त्यामुळे ह्यांच्या पक्ष त्याग व दगाबाजी मुळेच  विजयनगर पराजित झाले. राम राजा शत्रुंच्या हाती लागले आणि हसन च्या आदेशानुसार त्याचे शिरच्छेदन केले गेले.”

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२३ जानेवारी १६६४
!! स्वराज्यसंकल्पक सरलष्कर महाराजा शहाजीराजे भोसले यांची ३५९ वी पुण्यतिथी !!
!! हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या एक मराठी झंजावती वादळाचा अपघाती अस्त !!
!! ज्यांच्या मनात पेटली स्वातंत्र्याची ठिणगी, ज्यांच्या विचारातून घडले स्वराज्य, शिवबा आणि संभाजी त्यांचे फर्जंद महाराजा शहाजी राजे भोसले म्हणजेच थोरलेमहाराजसाहेब यांचे कर्नाटकात होदेगीरीच्या जंगलात शिकार करताना अपघाती निधन झाले.

!! ज्यांच्या मनात पेटली स्वातंत्र्याची ठिणगी, ज्यांच्या विचारातून घडले स्वराज्य, शिवबा आणि संभाजी त्यांचे फर्जंद महाराजा शहाजी राजे भोसले म्हणजेच थोरलेमहाराजसाहेब यांचे कर्नाटकात होदेगीरीच्या जंगलात शिकार करताना अपघाती निधन झाले. !! 
!! महाराजा शहाजीराजे भोसले हे पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्यांचे बीजारोपण शिवाजीराजांमध्ये करणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते.जेव्हा दिल्लीमध्ये दिल्लीपती शहेनशाह शहाजान आणि महंमद आदिलशहा या दोघांनी मिळून निजामशाही संपवली, त्या वेळी निजामशहाचा वारसदार मूर्तझा या लहान मुलाला स्वत:च्या मांडीवर बसवून महाराजा शहाजीराजांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला, व जणू स्वत:वरच छत्र धारण केले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ ३ वर्षे टिकला होता. !!
!! अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही संपवण्यासाठी भारतवर्षातील सर्व इतर सत्ता एकत्र आल्या होत्या. निजामशाही वाचवण्यासाठी या एकत्रित फौजांचा सामना महाराजा शहाजीराजे वजीर मलिक अंबरच्या साथीने करीत होते (इ.स. १६२४). त्यांना त्यात यश मिळाले. शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला. याच लढाईत महाराजा शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. पण पुढे मलिक अंबरची दरबारातील राजकारणी वागणूक पाहून शहाजीराजे आदिलशाहीत गेले. त्यानंतर इ.स. १६३९ मध्ये आदिलशहाकडून "सरलष्कर" ही पदवी त्यांना देण्यात आली व बंगळूरची जहागिरीही त्यांना प्राप्त झाली. आदिलशाहीत असताना महाराजा शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता. !! 
!! शहाजीराजांना बंगळूरचा प्रदेश फार आवडला. महाराजा शहाजीराजे व त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे या ठिकाणी ठरविले. ते मुळातच उत्तम प्रशासक व पराक्रमी योद्धे होते. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणूनच त्यांनी योग्य वेळ पाहून पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवले होते. त्याचबरोबर श्यामराज रांझेकर, बाळकृष्णपंत हणमंते, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व यांच्याबरोबर इतर अनेक मातब्बरांना जय्यत तयारीनिशी शिवाजी महाराजांसोबत राज्यकारभारासाठी पाठवले होते. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही महाराजा शहाजीराजांनीच शिवरायांना दिली. !!
!! दरम्यानच्या काळात आदिलशहाचा मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, बाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतहखान, आझमखान यांच्या साहाय्याने महाराजा शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून महाराजा शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता २५ जुलै, इ.स. १६४८ चा. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वत: आपण व आपले पिता महाराजा शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे त्यांनी लिहिले. या बदल्यात महाराजा शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी महाराजा शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला. महाराजा शहाजीराजांची दि. १६ मे, इ.स. १६४९ रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली. महाराजा शहाजीराजांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही,मुघलशाही व निजामशाही - या सर्व सत्ताधीशांकडे काम केले. त्यांच्या कारकीर्दीचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे,
इ.स. १६२५ ते इ.स. १६२८ - आदिलशाही
इ.स. १६२८ ते इ.स. १६२९ - निजामशाही
इ.स. १६३० ते इ.स. १६३३ - मुघलशाही
इ.स. १६३३ ते इ.स. १६३६ - निजामशाही
इ.स. १६३६ ते इ.स. १६६४ - आदिलशाही
पुढे इ.स. १६६१-इ.स. १६६२ दरम्यान महाराजा शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व राजमाता जिजाऊ आऊसाहेब समवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. !!
!! माघ शुद्ध ५, म्हणजेच २३ जानेवारी,इ.स. १६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एक शूर मराठा सरदार. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवरायांचे पिता व राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचे यजमान. !!
!! आपल्या प्राणांची आहुती देऊन हिंदवी स्वराज्य उभारणीच्या कार्यात अतुलनीय पराक्रम करत सदैव साथ देणाऱ्या महाराजा शहाजीराजे त्यांच्या पराक्रमाला मानाचा त्रिवार मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम !!

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२३ जानेवारी १७४५
गोपाळगड उर्फ अंजनवेल स्वराज्यात
इ.स. १७४५ मध्ये शाहू महाराजांनी आणि नानासाहेब पेशव्यांनी पुन्हा एकदा जंजिरेकर सिद्दीविरुद्ध आघाडी उघडण्याचा मुहूर्त साधला आणि यात पूर्वीप्रमाणे इंग्रज सिद्दीला मदत करू लागले ती थांबावी म्हणून म्हणून इंग्रजांना पत्रं पाठवली. शाहू महाराज २० जानेवारी १७४५ रोजी मुंबईकरांना लिहितात, “तुळाजी आंग्रे यांना अंजनवेल घेण्याचा हुकूम मी दिला आहे, आणि म्हणूनच माझी इच्छा आहे की तुम्ही त्यात कसलाही हस्तक्षेप करू नये”. यापूर्वीच दि. १० जानेवारी १७४५ रोजी नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांना कळवलं होतं, “छत्रपतींची इच्छा अंजनवेल आणि गोवळकोट सिद्दीकडून घ्यावा अशी असल्यामुळे त्यांनी दोन्ही ठिकाणे वेधण्याचा हुकूम तुळाजीला दिला आहे. तुमचं आणि आंग्र्यांचं वैर असल्यामुळे तुळाजींच्या जहाजांना तुमच्यापासून उपद्रव होईल तो होऊ नये म्हणून तुम्हाला सांगण्याचा मला छत्रपतींचा हुकूम झाला आहे, त्यानुसार मी हे लिहीत आहे. आंग्र्यांनी दोन्हीही ठिकाणे वेढली आहेत, ती पूर्णपणे कब्जात येईपर्यंत तुम्ही सिद्दीला मदत करू नये अथवा तुळाजींच्या जहाजांना विरोध करू नये. छत्रपतींना जे सुखावह आहे तेच मलाही” (कुलाबकर आंग्रे यांचा इतिहास, पृष्ठ ९२,९५).  अखेर दि. २३ जानेवारी १७४५ रोजी तुळाजी आंग्रे यांनी अंजनवेलचा किल्लेदार याकूतखान याच्याकडून कायमचा घेतला (आंग्रे शकावली पृष्ठ १००) आणि किल्ल्याचं नाव ठेवलं गोपाळगड ! याबद्दल पेशव्यांच्या शकवलीत उल्लेख आहे की, “अंजनवेल उर्फ गोपाळगड शामळ जंजीरकर याजपासून माघ शु॥ २ भौमवारी (२३ जानेवारी १७४५) रात्रौ तुळाजी आंग्रे यांनीं घेतला. नंतर तुळाजी बिन कान्होजीराव यास सरखेलीची वस्त्रें दिली”.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२३ जानेवारी १८९७
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म
(मृत्यू: १८ ऑगस्ट १९४५ – फोर्मोसा, तैवान)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

महाराज शिवाजी राजे ऑफ तंजावर साहेबांचे आज पुण्यात स्वागत व सत्कार करण्याचे संधी मिळाली. विविध इतिहास अभ्यासकांना महाराज साहेबांनी आज मोलाचे मार्गदर्शन केले.

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४