Posts

३१ जुलै १६७७"दक्षिण दिग्विजय मोहीम"छत्रपती शिवराय दक्षिणेतील "तुंदुमगुती"ला आले, तिथून त्यांनी "वृद्धाचलम"ला शिवशंकराचे दर्शन घेतले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३१ जुलै १६५७ दंडाराजपुरी मोहिम दंडा-राजपुरीचा किल्ला हा अरबी समुद्रकिनाऱ्यावर आहे. किनाऱ्यालगतच दंडा व राजपुरी अशी दोन गावे आहेत. या किल्ल्याच्या जवळच खाडीमधे एका बेटावर जंजिरा किल्ला आहे. तो किल्ला वर्षानुवर्षे सिद्दीच्या ताब्यात होता व तो स्वराज्याला उपद्रव देत होता. तसेच, स्वराज्याच्या रक्षणासाठी समुद्रावरही सत्ता प्रस्थापित करणे आवश्यक होते. म्हणुन मग १६५७ मधे ऐन पावसाळ्यात शिवाजीराजांनी सिद्द्यावर मोहिम काढली व त्याप्रमाणे रघुनाथ बल्लाळ सबनीस यांना नियुक्त केले. रघुनाथराव दंडा राजपुरीवर चालुन गेले ती तिथी होती शके १५७९, श्रावण शुद्ध १, शुक्रवार दि. ३१ जुलै १६५७. रघुनाथपंतांनी तळे-घोसाळे काबीज करून नंतर दंडा राजपुरीचा किल्ला सिद्द्याकडुन जिंकला व नंतर जंजिरा घेण्याचाही प्रयत्न केला मात्र ते शक्य झाले नाही. जंजिर्यावरची ही शिवाजीराजांची पहिलीच मोहीम. यापुढेही काही वेळा शिवाजीराजांनी व नंतर संभाजीराजांनीही जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्या प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने शक्य झाले नाही. १६५७ च्या मोहिमेत सिद्दीला मा...

२७ जुलै १६७३भर पावसाळ्याच्या सुमारास "छत्रपती शिवाजी महाराजांनी" "सातारा प्रांत" जिंकला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ जुलै १६७३ भर पावसाळ्याच्या सुमारास "छत्रपती शिवाजी महाराजांनी"  "सातारा प्रांत" जिंकला. अजिंक्यताऱ्याबरोबरच सज्जनगड पण बहुधा स्वराज्यात त्याचवेळी दाखल झाला असावा.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ जुलै १६७७ कर्नाटक मोहिमेवर असता महाराजांनी आपला सावत्र भाऊ एकोजीराजे यांस पत्रे लिहिली.  तेव्हा महाराजांच्या भेटीस एकोजीराजे यांनी आपल्यातर्फे काही पोक्त लोक पाठविले. या मंडळीशी महाराजांनी व्यवहाराची योग्यतीच बोलणी केली. “कैलासवासी शहाजी महाराजांच्या कष्टाच्या धनदौलतीत जसा एकोजीराजांचा वाटा आहे तसाच आपलाही वाटा आहे. तेव्हा अर्धावाटा बऱ्या बोलाने द्या” असे महाराजांनी सांगून पाठविले. आणि हा निरोप त्यांनी एकोजीराजांची जी माणसे भेटावयास आली त्याज बरोबर एकोजीराजांच्या भेटीस आपलेकडील थोर माणसे, बाळंभट, कृष्ण ज्योतिषी व कृष्णाजी सखोजी अशी तिघेजण पाठविले. त्याजबरोबर महाराजांनी एकोजी राजांस पत्र दिले व त्यात लिहिले की शहाजी राजांच्या जहागिरीचा अर्धा वाटा एकोजी राजे यानी संभाजी (शिवरायांचे बंधू) पुत्र उमाजी यास द्यावयास हवा आणि त्...

२५ जुलै १६७८छत्रपती शिवरायांनी (आत्ताच्या नवी मुंबई जवळील) उलवे ताब्यात घेतले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ जुलै १६२९ छत्रपती शिवरायांचे आजोबा आणि "राजमाता जिजाऊ" यांचे पिता "लखुजीराजे जाधवराव" यांचा मृत्यू. निजामशहाच्या आदेशाने दौलताबादच्या किल्ल्यातील त्याच्याच दरबारात लखुजीराव, त्यांची मुले आणि त्यांच्या पुतण्यांचा विश्वासघाताने खून करण्यात आला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ जुलै १६४८ विजापूरच्या आदिलशहाच्या आज्ञेने मुस्तफाखानाने "किल्ले जिंजी" जवळ शहाजीराजेंना कैद केले. शहाजीराजांना कैद करून त्यांच्या हातापायात बेड्या ठोकल्या व राजांची रवानगी कैदी म्हणून विजापूरास झाली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ जुलै १६६६ औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवरायांसोबत आग्रा येथे आलेल्या मराठा फौजेचे परतीचे परवाने मंजूर करून शिवरायांकडे आजच्या दिवशी सुपूर्द केले. या परवान्यानुसार शिवरायांना आपल्यासोबत आलेल्या मराठा फौजेला आग्र्याहून रजा देऊन महाराष्ट्रात पाठवता येणार होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ जुलै १६७८ छत्रपती शिवरायांनी (आत्ताच्या नवी मुंबई जवळील) उलवे ताब्यात घेतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ जुलै १७०० भुषनगड औरंगजेबाच्या ताब्यात  परळी...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कडून संयमित व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कडून आक्रमकता घेऊन ४२ वर्षे हिदुस्थानचे राज्य कारभारी करणार एकमेव छत्रपती थोरले छत्रपती शाहू याना मानचा मुजरा........।।

Image
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कडून संयमित व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कडून आक्रमकता घेऊन ४२ वर्षे हिदुस्थानचे राज्य कारभारी करणार एकमेव छत्रपती थोरले छत्रपती शाहू याना मानचा मुजरा........।। १८_मे_१६८२ "संभाजीराजांना" महाराणी येसुबाई पोटी 'गांगवली' उत्तर कोकण रायगड माणगाव येथे पुत्ररत्न प्राप्त झाले. "शिवाजीराजे" नाव ठेवले व नंतर "शाहू" प्रचलित झाले असे उल्लेख वाचनात आहेत. 👉मुद्रा:- श्री वर्धिष्णुर्विक्रमे विष्णोः। सा मूर्तिरिव वामनी ।। शंभूसुतोरिव।। ।।मुद्रा शिवराजस्य राजते ।। 👉 मातोश्री महाराणी येसूबाई व शाहूराजे 👉छत्रपती संभाजीराजांच्या १६८९ साली झालेल्या मृत्यूनंतर शाहूराजे आणि त्यांच्या मातोश्री महाराणी येसूबाई मोगलांच्या कैदेत सापडल्या.  👉छत्रपती शाहू महाराज  तब्बल 18 वर्षे औरंगजेबाच्या कैदेत होते. 👉शाहूराजांची पुढे तब्बल १८ वर्षे कैदेत राहून १७०७ साली औंरंगजेबाच्या मृत्यूनंतरच सुटका झाली. ज्या व्यक्तीच बालपण जितक्या खडतर आणि जास्त जबाबदारीतून जात ती व्यक्ती मोठेपणी तितकीच कर्तुत्ववान होते. 👉 छत्रपती शाहू महाराजांचं बालपण...

२४ जुलै १६७१मुघलांविरूद्ध भर पावसात सुरू असलेल्या मोहीमेसाठी "सरसेनापती प्रतापराव गुजर" यांना छत्रपती शिवरायांनी आणखी मावळ्यांची तुकडी आणि १०,००० होनांची रसद पाठवली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ जुलै १२०६ मोहम्मद घोरीचा गुलाम म्हणून प्रसिद्ध असलेला कुतुबुद्दीन ऐबकाने दिल्लीची सत्ता हस्तगत केली. कुतुबुद्दीन ऐबक हा मूळचा मुसलमान असूनही त्याच्या घरावर मुसलमानांनी दरोडा घालून त्याला पळवून नेले होते. नंतर कुतुबुद्दीन मोहम्मद घोरीच्या घोडदळाचा एक प्रमुख म्हणून काम करत होता. शत्रू प्रांतावर दरोडे घालून लूटमार करण्याचे काम त्याच्याकडे होते. ११९१ साली तो त्याच्या सेनेसह भारतात शिरला.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ जुलै १६६६ छत्रपती शिवाजीराजांबद्दल गौरवोद्गार या घटनेची नेमकी तारीख उपलब्ध नाही मात्र ती २४ ते २७ जुलै १६६६ दरम्यानची आहे. शिवाजीराजे आग्र्याच्या कैदेतुन कसे सुटावे याचा विचार करत होते. २४ जुलै रोजी रामसिंग बादशहा औरंगजेबसोबत तीन दिवसांसाठी शिकारीला गेला. त्याच्या माघारी एक दिवस त्याचीच चार माणसे शिवाजीराजांबद्दल चर्चा करत होती. त्यांची नावे होती: महासिंग शेखावत, बल्लुशाह, तेजसिंग व रणसिंग महासिंग म्हणाला 'शिवाजी खरोखरच खुप शहाणा व समंजस आहे. तो जे बोलतो ते उचितच बोलतो. त्यावर कोणी अधिक काही बोलण्याची आवश्यकताच पडत ना...

२२ जुलै १६७८किल्ले वेल्लोर स्वराज्यात दाखल

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २२ जुलै १६५७ मे महीन्यात मराठे अहमदनगरपर्यंत घुसले आणि लुट करुन परतले. औरंगजेब कमालीचा संतापला. त्याचे सैन्य कल्याणीच्या वेढ्यात गुंतले होते त्याचाच फायदा शिवाजीराजांनी घेतला. आदिलशहाने कल्याणीच्या रक्षणार्थ तीस हजार फौज पाठवली. दोन महिने मुघल - आदिलशहा लढत राहीले. २२ जुलै रोजी महंमद सुलताने व मीर जुम्ल्याने संयुक्त हल्ला करुन आदिलशाही सैन्याला हरवले. २९ जुलै रोजी कल्याणी किल्यात मुघलांना प्रवेश मिळाला पण पुढले ३ दिवस किल्लेदार दिलावरखानाने बालेकिल्यातून निकराचा लढा दिला. अखेर नाईलाजाने त्याने किल्ला सोडला. कल्याणी सारखा भक्कम आधार गेल्यावर आदिलशहाने तह करण्याची तयारी दाखवली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २२ जुलै १६६६ सत्पुरुष कवींद्र परमानंदांचा सत्कार आग्रा कैदेत असताना थोर सत्पुरुष कवींद्र परमानंद नेवासकर यांचा सत्कार करण्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरविले. हा सत्कार समारंभ दिनांक २२ जुलै १६६६ च्या सुमारास झाला असावा, कारण ह्याचा उल्लेख दिनांक २२ जुलैच्या राजस्थानी पत्रात आहे. दिनांक २२ जुलै रविवारी छत्रपती शिवाजीराजे यांनी राहत्या...

२१ जुलै १६७२"अब्राहम लेफेबर" हा डच वकील किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांसमोर हजर.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ जुलै १६५८ औरंगजेब दिल्लीमधे तख्तनशीन गेल्याच महिन्यात औरंगजेबाने बाप शहाजहानला आग्र्यात तुरूंगात टाकले होते व त्यानंतर ६ जुलै रोजी औरंगजेब दिल्लीला आला व तेथील व्यवस्था लावुन तो २१ जुलै रोजी तख्तनशीन झाला. याच दिवशी त्याने स्वतःला 'आलमगीर गाझी' अशी पदवी धारण केली. आलमगीर म्हणजे जग जिंकणारा व गाझी म्हणजे धर्मवीर. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ जुलै १६६२ देशबांधवांना सोडवण्यासाठी इंग्रजांचा प्लॅन !  विजापूरची राणी बडी बेगम साहिबा आपल्या मक्केच्या यात्रेवरून हिंदुस्थानला परतायच्या बेतात होती आणि तिच्या आगमनावर इंग्रज लक्ष ठेऊन होते ! पण कशासाठी ? बड्या साहेबीणीचा आणि रायरी वर अडकून पडलेल्या इंग्रजांचा एकमेकांशी काय संबंध होता ? या दोघांचा काहीही संबंध नसला तरी इंग्रजांना असे वाटत होते की बड्या साहेबिणीला जर आपण पकडले तर आदिलशहा तिच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांवर दबाव आणेल आणि त्या बदल्यात आपल्याला रायरीच्या तुरुंगातील आपल्या देशबांधवांना सोडवून घेता येईल ! वास्तविक पाहता शिवाजी महाराजांवर अशा प्रकारे दबाव टाकून आपल्या देशबांधवा...