Posts

११ जानेवारी १६८०रायगड जिल्ह्यामधील खांदेरी किल्ला बांधून पूर्ण.आज रोजी महाराजांकड़े ताब्यात आला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ जानेवारी १६६६ मुघल सरदार दिलेरखानाने छत्रपती शिवरायांना जीवे मारण्याचा कट रचल्याची खबर छत्रपती शिवरायांना गुप्तहेरामार्फत मिळाली. छत्रपती शिवराय मिर्झाराजे जयसिंगाची छावणी सोडून पन्हाळ्याकडे रवाना. पन्हाळा घेण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ जानेवारी १६८० रायगड जिल्ह्यामधील खांदेरी किल्ला बांधून पूर्ण. आज रोजी महाराजांकड़े ताब्यात आला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ जानेवारी १६८८ मातबरखानाने पट्टा गड जिंकला १६८८ साली मातबरखानाने बागलाणातील अनेक गड घेण्यास सुरवात केली होती. पट्टागडा संबंधी मातबरखान औरंगजेबाकडे अर्ज पाठवतो त्यात तो म्हणतो सेवकाने काही दिवसांपासून १००० कोळी, भिल्ल, व मावळे यांचे पथक सैन्यात घेतले आहे. मराठांच्या ताब्यात असलेले पट्टा व इतर किल्ल्यालगतच्या जमीनदारांना रकमा पुरवण्यात आल्या आहेत. ११ जानेवारी १६८८ ला खानाने काही पथके किल्ला घेण्याच्या मार्गावर धाडली. मध्यरात्रीच्या सुमारास किल्ल्याच्या तटाला दोर लावून किल्ला जिंकून घेतला. भगूरचा ठाणेदार गोविंदसिंग याची किल्ल्यावर नेमणूक करण्यात आली. मोगलांन...

८ जानेवारी १६५८कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज स्वत: माहुलीच्या किल्ल्यावर चालून निघाले माहुली - भंडारगड - पळसगड, छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूर बादशाहाकडून आज जिंकला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ८ जानेवारी १०२६ गझनिच्या मेहमुदाचे सोमनाथ मंदिरावर आक्रमण महमूद गझनिच्या हिंदुस्तानवरील १७ हल्ल्यांपैकी १६ वा आणि सर्वात भयानक असा हल्ला म्हणजे सोमनाथ मंदिरवरील हल्ला होय. सोमनाथ मंदिर त्यावेळी त्याच्या संपत्तीसाठी प्रसिद्ध होते. सोमनाथाचे शिवलिंग अनेक पाचू, हिरे, माणके यानी सजवले होते. त्यामुळे ते शिवलिंग अक्षरशः लखलखत होते. डिसें.१०२५ च्या दरम्यान महमूद गझनी सोमनाथ मंदिराजवळ पोचला. ३ दिवसानी हिंदूंचा प्रतिकार मोडून काढण्यात मुस्लिम यशस्वी ठरले आणि त्यानी मंदिरात प्रवेश केला आणि काय???? मंदिरात होते ते फ़क्ति सोमनाथाच्या नावाने घंटानाद करणारे, कोणताही प्रतिकार करू न शकणारे असे हजारो निःशस्त्र हिन्दू....!!! मग काय?? मेहमुदाने त्या सर्वांची थंड डोक्याने कत्तल केली. यावेळी सुमारे ५०००० हिंदूंची कत्तल करण्यात आली होती. तसेच त्याने शिवलिंग उपटून काढले. वैभव संपन्न असे सोमनाथ मंदिर पूर्णपणे लुटले गेले. तसेच त्यावेळी केलेल्या लुटित जवळपास ६.५ टन सोन्याचा समावेश होता एवढे ते मंदिर वैभव संपन्न होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ८ जानेवारी १६५८ ...

२३ डिसेंबर इ.स.१६७०*छत्रपती शिवाजी महाराजांनी अहिवंतगड जिंकला.

*आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष* *२३ डिसेंबर इ.स.१५३४* बहादुरशहाबरोबर वाटाघाटी करुन २३ डिसेंबर १५३४ ला वसई पोर्तुगिजांकडे आली. तेथील स्थानिक जनतेने प्रथम त्यांचे स्वागत केले कारण मुघली सत्तेला ते वैतागले होते. पण पोर्तुगिजांनी सक्तीचे धर्मांतर, मंदिरे उध्वस्त करून, हिन्दु पूजा व उत्सवांना बंदी सुरु केल्यानंतर तेथील जनतेने पेशव्यांपुढे आपली कैफियत मंडली आणि त्यानंतर १७३७ साली पेशव्यांनी मोहिम सुरू केली. *२३ डिसेंबर इ.स.१६७०* छत्रपती शिवाजी महाराजांनी अहिवंतगड जिंकला.१६७० मध्ये मोगलांच्या बरोबर संघर्ष सुरू झाल्यावर शिवाजी राजांनी बागलाणातील किल्ले जिंकून घेण्याचा सपाटा सुरू केला. डिसेंबर १६७० मध्ये राजांनी अहिवंतचा किल्लाही जिंकून घेतला यावेळी खानदेशचा मोगल सुभेदार दाऊदखान कमालीचा अस्वस्थ झाला. 'मराठे बर्‍हाणपूरची पेठ लुटणार आहेत', अशी बातमी शिवाजी महाराजांच्या सहकार्‍यांनी हेतुपुरस्पर पसरवली होती त्याचा परिणाम म्हणजे दाऊदखान प्रचंड फौज घेऊन बर्‍हाणपूरच्या रोखाने निघाला परंतु अजिंठ्याच्या लेण्याजवळ आल्यानंतर त्याला कळले की मराठे अहिवंतच्या रोखाने गेले आहेत. दाऊदखानाने मोठ्या शीघ्र गती...

२० नोव्हेंबर १६७०छत्रपती शिवरायांची आरमारासह सुरतेकडे कूच.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० नोव्हेंबर १६३५ शाहजहान त्याच्या दुसऱ्या दख्खन मोहिमेसाठी निघाला. निजामशाही संपवायची ह्या ध्येयाने तो निघाला होता. त्याने हांडियाजवळ ४ जानेवारी १६३६ ला नर्मदा ओलांडली. इथूनच ९ जानेवारीला आदिलशाहला पत्राने तंबी दिली की निजामशाहीमधल्या शाहजी राजा बरोबर असलेल्या सरदारांना पाठिंबा मिळता कामा नये. वर हे सुद्धा लिहीले की त्याने देय असलेली वार्षिक खंडणी १० मार्च १६३६ पर्यंत दौलताबादला पाठवावी. ह्यासाठी शाहजहानने सोलापूर, त्याच्या आसपासचा परिसर व वांगीचा भाग निजामशाहिकडील भाग आदिलशाहला देऊ केले. ह्या परिसरातून वर्षाला नऊ लक्ष होनाचे उत्पन्न येत होते. १९ जानेवारी १६३६ ला शेख दबीर व इतर काही आदिलशाही वकील शाहजहानला भेटले. त्यानंतर ५ फेब्रुवारीला शाहजहानने खानजमान, खानदौरान व शाहिस्ताखान यांना निजामशाहीचा परिसर जिंकण्यासाठी धाडले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० नोव्हेंबर १६६६ ९ वर्षांचे बाल शंभूराजे आज रोजी आग्राहून सुटल्यानंतर सुखरूप "किल्ले राजगड" वर पोचले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० नोव्हेंबर १६७० छत्रपती शिवरायांची आरमारासह सुरतेकडे कू...

१३ नोव्हेंबर १६५९छत्रपती शिवरायांनी मायणी, खटाव जिंकले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १३ नोव्हेंबर १६५९ छत्रपती शिवरायांनी मायणी, खटाव जिंकले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १३ नोव्हेंबर १६६८ छत्रपती शिवरायांकडून गोव्यामध्ये सप्तकोटीश्वर मंदिर बांधण्यास सुरुवात. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १३ नोव्हेंबर १६७३ मुंबईकर सूरतकरांना १३ नोव्हेंबर १६७३ ला लिहितात: "सिद्दीने तक्रारी केल्या असताना सुभेदाराचे आमच्याबद्दल इतके मन आहे हे वाचून आनंद झाला. आता बंदरांत असलेल्या बादशहाच्या दोन गलबतांना आम्ही चांगले वागविले हे पाहून बादशाहाविषयी आमचे मनांत पूज्यबुध्दी आहे हे त्याला दिसून येईल ... फ्रेचांनी जर इतक्या तोफा आणि इतके शिसें ( गोळे ) राजापूरला पाठविले असतील, तर शिवाजीला सिद्दाविरुध्द चांगले आरमार सज्ज करणस बरे पडेल. कारण त्याने आमच्याकडे मागणी केली परंतु आमच्याजवळ पुष्कळ तोफा असूनही आम्ही तुमच्या सूरतेतील हितसंबंधाकडे लक्ष देऊन तोफा दिल्या नाहीत." सूरतकरांनी १३ नोव्हेंबर १६७४ ला उत्तर लिहिले जे:'  "शिवाजीच्या तोफांच्या मागणीबद्दल कळविण्यांत आले. त्यावर आमचे मत असे आहे की, अशा कृत्याने बादशहाला घुस्सा येईल.  फ्रेंचानी नुक...

१२ नोव्हेंबर १६५९छत्रपती शिवरायांनी "कराड" प्रांत जिंकला

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ नोव्हेंबर १६५९ छत्रपती शिवरायांनी "कराड" प्रांत जिंकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ नोव्हेंबर १६६७ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची सरहद्द पोर्तुगीज प्रदेशाला भिडली होती. त्यावेळचा पोर्तुगीज विजरई कोंदी दि सांव्हिसेंती हा फारच धर्मान्ध होता. त्याने बारदेश मधील चार हजार हिंदूंचे सक्तीने धर्मांतर केले होते. आणि इतर हिंदू लोकांना २ महिन्याच्या आत बारदेश व गोवा सोडून जाण्यास सांगितले. शिवाय पोर्तुगीजांच्या आश्रयाला गेलेले कोकणातील देसाई त्यांच्या मदतीने स्वराज्यातील प्रदेशावर धाडी घालत असत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी बारदेशवर ५ हजार पायदळ व १ हजार घोडदळ घेऊन मोहीम काढली. १० नोव्हेंबर पासून सलग तीन दिवस महाराजांच्या सैन्याने या भागात धुमाकूळ घालत अनेक धर्मान्ध पोर्तुगीजाना ठार केले. या मोहिमेत महाराजांनी पोर्तुगीज व कोकणातील फितूर देसायांना कायमचा धडा शिकवला. महाराजानी या मोहिमेत १३०० कैदी पकडले. शिवाय त्यांना यातून १५० लक्ष होनांची लुटही मिळाली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ नोव्हेंबर १६८३ किल्ले फोंड्यावर प्रचंड...

११ नोव्हेंबर १६७५छत्रपती शिवरायांनी "सातारा" प्रांत जिंकला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ नोव्हेंबर १६५७ औरंगजेबची पत्नी दिलरास बानूचे निधन औरंगजेबाने तख्त काबीज करण्याचा जणू चंगचं बांधला. तो बिदरहून उत्तरेकडे झेपावण्याकरिता संधी शोधत होता आणि त्याला ती मिळाली. ११ नोव्हेंबर, १६५७ रोजी त्याची पत्नी दिलरास बानू त्याच्या पाचव्या मुलास जन्म देताना मरण पावली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ नोव्हेंबर १६५९ छत्रपती शिवरायांनी अफझलखानाला ठार मारले आणि नंतर लगेच त्यांनी "वाई" सोडली. त्यांच्या घोड्यांच्या टापा वळाल्या त्या थेट कराडच्या दिशेने. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ नोव्हेंबर १६७५ छत्रपती शिवरायांनी "सातारा" प्रांत जिंकला. ११ नोव्हेंबर १६७५ रोजी सातारा काबीज झाला. महाराज साताऱ्यात गेले आणि गंभीर आजारी झाले. या आजराचे स्वरूप एवढे भयंकर होते की, त्यांच्या मृत्यूची अफवा झाली.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ नोव्हेंबर १६७५ विजापूरचा सरसेनापती बहलोलखान खवासखानाचे कोणतेच हुकुम पाळीत नव्हता. खावासखानाने अफगाण गटाचा बिमोड करण्यासाठी गुप्तपणे मोगलांचा दक्षिण सुभ्याचा सुभेदार बहादुरखान यास मदत मागितली. तसे बहादूरखान १९ ऑक्टोबर १६७५...

२४ऑक्टोंबर १६५७ साली कल्याण भिवंडीच्या लढाईत छत्रपती शिवरायांचा विजय होऊण, मराठा आरमार बंधणीला सुरवात झाली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ ऑक्टोबर १६२४ भातवडी येथे मोगलांचा सुभेदार लष्करखान व आदिलशाही मुल्ला महंमद ह्या दोघांच्या छावणीवर मलिक अंबरच्या सैन्याचा अचानक हल्ला झाला व मलिक अंबराने त्या दोघांच्या पाडाव केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ ऑक्टोबर १६५७ शिवाजी महाराजांनी उत्तर कोकणात मुसंडी मारत कल्याण - भिवंडी - शहापुर हा मूघली-विजापुर भाग काबीज केला. औरंगजेब दख्खनेवरुन दिल्लीला परतलेला आणि विजापुरच्या आदिलशहाचा मृत्यू ह्या १६५७ च्या सुरवातीच्या दख्खनेमधल्या राजकीय परिस्थितीचा फायदा उचलत शिवरायांनी उत्तर कोकण काबीज केले. १६५६ च्या जानेवारी मध्येच जावळी ते रायरी हा भाग ताब्यात घेत विजापुरचा उत्तर कोकणाशी थेट संपर्क त्यांनी जवळ-जवळ तोडला होताच. २४ऑक्टोंबर १६५७ साली कल्याण भिवंडीच्या लढाईत शिवरायांचा विजय होऊण, मराठा आरमार बंधणीला सुरवात  झाली. सागरावर प्रभुत्व निर्माण करावयाचे आसेल तर बलशाली आरमार (Navy) ऊभारले पाहीजे ही बाब शिवरायांच्या लक्षात आली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ ऑक्टोबर १६६६ आग्राच्या सुटकेनंतर, शिवाजी सुटला आता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबान...

२५ आॅक्टोबर १२९६संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ आॅक्टोबर १२९६ संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ आॅक्टोबर १६४५ छत्रपती शिवाजी महाराज लालमहल येथे मुक्कामी 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ ऑक्टोबर १६७० मोरोपंत पिंगळे पेशवे पंतप्रधान यांनी शिवनेरी जिंकण्यासाठी शिकस्त केली पण त्यात त्यांना अपयश आले. पण त्यांनी पुढे घुसून नाशिकजवळील ब्रह्मगिरी जिंकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ ऑक्टोंबेर १६७९ छत्रपती शिवाजी महाराजांचे पायदळ आणि घोडदळाप्रमाणे आरमार ही त्याच दर्जाचे होते, शिवरायांच्या आरमाराचे हालचाली इतक्या प्रभावी होत्या की त्यांचे उल्लेख पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिश साधनात आढळतात त्याचेच एक उदाहरण - २५ ऑक्टोंबेर १६७९ ला सुरतवाले लिहतात की, शिवरायांच्या आरमाराला आम्ही फार वेळ टक्कर देऊ असे आम्हास वाटत नाही आरमार उभारणीच्या वेळी लाकडाचे महत्व मोठे होते, त्याकाळी जंगले दाट होती आणि लाकूड ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची यासंबधी आज्ञा अशी होती याचा उल्लेख आज्ञापत्र साधनात येतो " स्वराज्यातील आंबे, फणस हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची परंतु त्या...

१७ ऑक्टोबर इ.स. १६७०** दाऊदखान व छत्रपती शिवराय यांच्यात फार मोठे युद्ध झाले व त्यात दाऊदखानाचा दणदणीत पराभव झाला.*

*१७ ऑक्टोबर इ.स. १६७०* * दाऊदखान व छत्रपती शिवराय यांच्यात फार मोठे युद्ध झाले व त्यात दाऊदखानाचा दणदणीत पराभव झाला.*

१६ ऑक्टोबर १६८०छत्रपती संभाजीराजे यांनी कोकणातील "चाफळ" येथील रामनवमी उत्सवासाठी वार्षिक इनाम चालवण्याचा हुकूम आजच्या दिवशी दिला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १६ ऑक्टोबर १६७० युद्ध हे होणारच हे महाराजांना अचूक ठाऊक होते. प्रश्न एकच होता की सुरतेवरून आणलेला खजिना कसा राखायचा. खजिन्यासकट पळ काढणे हे शक्य नव्हते आणि काही लोकांना खजिना घेऊन पुढे जाण्यास सांगणे हे ही शक्य नव्हते कारण खजिना पुढे पाठवायचा म्हणजे घोडदळ सोबत द्यावे लागेल कारण पायदळ लवकर पुढे जाणार नाही. जर घोडदळ पुढे पाठवले तर दाऊदखानाचा सामना फक्त पायदळानिशी करणे ही सोपे नव्हते, आणि आपल्या सैनिकांना सुद्धा याची भनक लागू द्यायची नव्हती. शेवटी शिवराय ते शिवरायच, शेवटच्या क्षणाला कोणाच्या डोक्यात कधी येऊच शकणार नाही असे निर्णय घेण्याचे त्यांचे कौशल्य कामी आले. १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री त्यांना समजले की पहाटेच्या वेळी आपली व दाऊदखानाच्या सैन्याची गाठ पडणार. म्हणून रात्रीच्या वेळी खजिना वाहणारी घोडी व बैले पायदळासोबत सप्तशृंगी व वणीच्या मार्गाने पाठवली आणि मुख्य सैन्य दाऊदखानाच्या दिशेने पाठवले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १६ ऑक्टोबर १६७९ विजापूर जिंकून घेण्यासाठी दिलेरखानाने ऑगस्ट १६७९ ला कूच केले. त्यामुळे विजापूरचे रक्षण करण्यासाठी मस...

१२ आॅक्टोबर १६७३मराठा फौजेचा वाई जवळील "किल्ले पांडवगड" वर हल्ला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ ऑक्टोबर १६५९ पंताजी गोपीनाथांची वकील म्हणून निवड अफजलखानाचा वकील आला मग रिवाजानुसार आपलाही वकील खानाकडे जायला हवा हे मनोमन ठरवून गोपीनाथपंथांची निवड केली. ही निवड केवळ वकील म्हणून साधीसुधी नव्हती तर खानाच्या गोटात शिरून खानाच्या छावनीचा संपूर्ण अंदाज बांधणे शत्रुपक्षाच्या मनीचे हेतू जाणता आले तर पाहावे या हेतूने ही निवड होती. आणि म्हणूनच पंताजी गोपीनाथ यांचे बरोबर काही हुषार हेर‌ हुजऱ्यांच्या रुपाने शिवरायांनी पाठवून आपले फासे टाकायला सुरुवात केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ आॅक्टोबर १६७३ मराठा फौजेचा वाई जवळील "किल्ले पांडवगड" वर हल्ला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ ऑक्टोबर १६८० स्वराज्याचे पंतप्रधान मोरेश्वर त्रिंबक पिंगळे यांचे श्रीमान रायगडावर महानिर्वाण झाले. त्यांच्या ज्येष्ठ पुत्राचे सांत्वन करून छत्रपती शंभुराजांनी त्यांना पेशवेपद दिले. निळोपंत हे स्वराज्याचे पेशवे बनले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ ऑक्टोबर १६८१ छत्रपती संभाजी महाराज राज्यपदावर आल्यावर त्यांच्याविरोधात काही मंत्र्यानी कट केला होता. मंत्र्यानी या कटात सुलतान अ...

अक्कलकोट राज्याचे संस्थापक श्रीमंत फतेहसिंहराजे भोसले यांची समाधी, राजधानी रायगड १७३३ साली फतेहसिंह भोसले व पंतप्रतिनिधी यांच्या संयुक्त मोहिमे द्वारा स्वराज्यात शामिल झाला ..

Image
अक्कलकोट राज्याचे संस्थापक श्रीमंत फतेहसिंहराजे भोसले यांची समाधी, राजधानी रायगड १७३३ साली फतेहसिंह भोसले व पंतप्रतिनिधी यांच्या संयुक्त मोहिमे द्वारा स्वराज्यात शामिल झाला ..

११ आॅक्टोबर १६७३छत्रपती शिवरायांनी "बंकापूर" वर चढाई केली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ आॅक्टोबर १६७३ छत्रपती शिवरायांनी "बंकापूर" वर चढाई केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ ऑक्टोबर १६७९ खांदेरीच्या नाकेबंदिकारिता पाठविलेल्या सैन्यामुळे मुंबईतील सैन्य कमी झाले व मुंबईचा धोका वाढला. मराठे साष्टी (ठाणे) मधून मुंबई वर चालून येण्याचा प्रयत्न करीत आहेत असे इंग्रजांना कळले परंतु तेथील पोर्तुगीजांनी त्यांना अडवल्यामुळे मुंबईकर इंग्रजांच्या जीवात जीव आला व त्यांनी त्वरित ५० टोपाझ सैनिकांची भरती रक्षणार्थ केली. सुंदरजी प्रभू नामक छत्रपती शिवाजीराजांचा एक हेर मुंबईमध्ये गुपचूप माहिती जमा करीत असताना इंग्रजांच्या तावडीत सापडला. इंग्रजांनी त्याच्या कडून माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात अपयश येऊन इंग्रजांनी त्याला कैदेत टाकले. तसेच मुंबईतील काही गरीब रहिवाश्यांना चौलच्या आस-पास टेहळणी करिता पाठवले व त्यांना आदेश दिला कि त्यांनी दर ३-४ दिवसांनी मुंबईला मराठ्यांच्या हालचालीबद्दल खबर कळवावी. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ ऑक्टोबर १७८० दि. ११ ऑक्टोबर १७८० रोजी हालेचा मुक्काम उल्हास नदीकाठावर असलेल्या बदलापूरानजीक कुळगाव ...

१० आॅक्टोबर १६७५"किल्ले सिंहगड" वरील सुभा कचेरीत छत्रपती शिवरायांची गोतसभा.गडाखालील ३४ गावातील कारभारी पाटील या मसलतीस हजर होते.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १० आॅक्टोबर १६६४ छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजी घोरपडेला मुधोळ येथे ठार केले. आदिलशहाने १६६४ साली छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि कोकणात अंकुश ठेवण्यासाठी खवास खानयाची नेमणूक केली आणि त्याला मदत करण्यासाठी वाडीचे देशमुख लखम सावंतआणि खेमसावंत यांनीही ठरवले परंतु खवास खानाचा या मोहिमेत पराभव झाला हे समजताच आदिलशहाने बाजी घोरपडे यास शिवरायांवर चालून जाण्यास सांगितले हे वृत्त शिवाजी महाराजांना समजता सत्यांनी मुधोळ येथे असलेल्या चालून येणाऱ्या बाजी घोरपडे वर हल्ला चढवला आणि त्याला ठार केले. याच बाजी घोरपडेच्या मदतीने शहाजीराजे यांना जिंजी जवळ अटक झाली होती. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १० ऑक्टोबर १६७३ १० ऑक्टोबर १६७३ रोजी सिद्दी संबळ आपल्या आरमारासह इंग्रजांची परवानगी न घेता मुंबई बंदरात आला आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मालकीची पेण व नागोठणे नदीवरील ठाणी त्याने उद्ध्वस्त केली. सिद्दी संबळने तेव्हा अनावश्यक रक्तपात केला आणि कित्येक माणसे, स्त्रीया व मुले पळवून गुलाम बनवून आपल्याबरोबर मुंबईस आणिली. काही प्रमाणात व्यापारास उपद्रव झाला. त्...

८ आॅक्टोबर १६६८"छत्रपती शिवराय" आणि "आदिलशहा" यांच्यात तह झाला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ८ ऑक्टोबर १६५९ छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडी दाखल खान वळवळ करत होता त्याला अटकाव करणे गरजेचे होते. त्यामुळे मनी ठाम निश्चय करूनच राजे स्वदुःख बाजूला सारून अफजल मोहीमेसाठी जावळी परिसराची पाहणी करून प्रतापगडी पूर्व तयारी करण्यासाठी दाखल झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ८ आॅक्टोबर १६६८ "छत्रपती शिवराय" आणि "आदिलशहा" यांच्यात तह झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ८ ऑक्टोबर १६७९ केग्वीन खांदेरीला पोचला मुंबईकरांना आता पक्की खबर मिळाली की दौलतखान मोठे आरमार (सुमारे २० गुराबा) घेवून खांदेरीच्या दिशेने येत आहे. तेव्हा युद्धासाठी सज्ज असे मोठे आरमार आता अनुभवी कॅप्टन रिचर्ड केग्वीन याच्या नेतृत्वाखाली खांदेरीच्या नाकेबंदिकारिता पाठवण्याचा निर्णय मुंबईकरांनी घेतला. ह्या नाविक सैन्यामध्ये रिवेंज ही १ फ्रीगेट तर होतीच शिवाय २ गुराबा (यातील एकीचे नाव डव्ह होते), ३ शिबाडे , २ मचवे होते. ह्या सर्व ताफ्यावर सुमारे २०० अधिक सैनिक तसे इतर नावाडी लोक होते. इंग्रजांना वाटत होते की हे आरमार पुरेसे आहे. तरी त्यांनी कॅप्टन केग्वीन ला आदेश दिले क...

श्रमनिद्रा ....तुळजाभवानी मातेची...🌹🙏🏻🌹

Image
श्रमनिद्रा .... तुळजाभवानी मातेची... 🌹🙏🏻🌹 𖣔॥श्री तुळजाभवानी आई प्रसन्न॥𖣔 ※❖!!*कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे सीमोल्लंघन व श्रमनिद्रा*!!❖※ •✦!!*श्री तुळजाभवानी देवीच्या मुळ मूर्तीस १०८ सुती साड्याची पिळे ( दिंड) नेसवून संरक्षक कवच तयार केले जाते...देवीची मुख्य चलमूर्ती पालखी मध्ये ठेवतात व पुजारी ती पालखी घेऊन मंदिरा भोवती एक पूर्ण प्रदक्षिणा घेतात व मंदिरात असलेल्या पिंपळाच्या पारा वर पालखी ठेऊन साखर भाताचा नैवेद्य दाखवून मानाच्या आरत्या ओवाळतात व सिंहाच्या गाभाऱ्यात असलेल्या मानाच्या पलंगे (तेली) लाकडी पलंगावर मूर्ती अलगद ठेवली जाते. देवी च्या निद्रेस श्रम निद्रा म्हणतात.*!!✦• •✿!!*महिषासुर दैत्याबरोबर नऊ दिवस चाललेल्या घनघोर युद्धानंतर देवीने महिषासुराचा वध केला . युद्धात दमल्याने देवी निद्रा घेण्यासाठी मंचकी जाते.*!!✿• ✦!!*आज पासून चालू झालेली देवीची श्रम निद्रा ०६ तारखेपर्यंत चालणार असून ०७ आक्टोबर च्या पहाटे देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना होईल.*!!✦ ❖!!*दि.०७-१०-२०२५* *मंगळवार* या दिवशी आश्विनी मंदीर पौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे...*!!❖ ✿*!!आईराजा उदो उदो..*!!✿ ...

इनाम कमिशन आणि तर्जुमा

Image
इनाम कमिशन आणि तर्जुमा                                  डॉ. संतोष यादव  आज महाराष्ट्रासह भारतात जमिनींचा वाद विकोपाला जाताना दिसत आहे  रोज कोर्ट, कचे-या, महसुली सुनावण्या यात सर्व सामान्य मनुष्य भरडला जातोय  नेमक्या या जमीनी आपल्या कडे आल्या कशा   इमान मिळालेली जमीन म्हणजे काय ? ती जमीन नेमकी आम्हाला दिली कोणी ? यावर टाकलेला एक प्रकाश .  मुघल काळापासून जमिनी इनाम देण्याची प्रथा होती  ती निजामकाळ, आदिलशहा, कुतुबशाही, इमादशाही, बरीदशाही यात जशीच्या तशी चालत आली  पण छत्रपती शिवाजी महाराजांनी इनामी वतने पद्धत काही प्रमाणात थांबवून रेाख रक्कम पगार किंवा तनखा दिल्या   पुढे पेशव्यांनी मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी पुन्हा इनामी पद्धती सुरू केल्या  हे इनाम कोणत्या जमीनी , गावे , देवस्थान, हाडोळा, चोळी बांगडी यासाठी दिल्या जात    *इनाम कमिशन*  सन १८५२ साली ब्रिटीश राजवटी दरम्यान स्थापन करण्यात आलेला हा एक महत्वाचा आयोग होता  हा आयोग भा...

३ आॅक्टोबर १६५७"छत्रपती शिवराय" कल्याण भागात पोचले, तिथल्या प्रदेशाचा आढावा घेतला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३ आॅक्टोबर १६५७ "छत्रपती शिवराय" कल्याण भागात पोचले, तिथल्या प्रदेशाचा आढावा घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३ आॅक्टोबर १६७० "द्वितीय सुरत लूट" - प्रथम दिन... छत्रपती शिवरायांनी पुन्हा एकदा सुरत लुटली. "पेशवे मोरोपंत पिंगळे" आणि "सरनोबत प्रतापराव गुजर" यांच्या समवेत १०,००० घोडदळ व ५००० पायदळ घेऊन दुसऱ्यांदा सुरत लुटण्यासाठी पहिल्या सुरत लुटीच्या मार्गानेच आज पोचले. सुरत येथील मुघल अधिकाऱ्याला पाठवलेल्या पत्राचे स्वैर मराठी भाषांतर - "बादशहामुळेच मला माझ्या जनतेचे आणि देशाचे रक्षण करण्यासाठी फौज उभी करावी लागत आहे. तेंव्हा त्या फौजेचा खर्च तुम्हीच द्यायला हवा. मी तिसर्यांदा आणि शेवटचे सुरतेच्या उत्पन्नाचा चौथा भाग मागत आहे." 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३ आक्टोबर १६७७ छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक स्वारीवर असताना त्यांनी ३ आक्टोबर १६७७ साली चेन्नईमधील काली कम्बल मंदिरात जाऊन देवीची पूजा करून बांधकामाची मुहूर्तमेढ रोवली. अगदी दोन दिवस महाराजांनी तेथेच मुक्काम केला. पुढे महाराजापासून प्रेरणा घेऊन...

२ आॅक्टोबर १६७०दुसऱ्यांदा सुरत लुटण्यासाठी छत्रपती शिवराय १५००० फौजेनिशी सुरतजवळ ५ कोस अंतरावर येऊन पोचले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २ आॅक्टोबर १६७० दुसऱ्यांदा सुरत लुटण्यासाठी छत्रपती शिवराय १५००० फौजेनिशी सुरतजवळ ५ कोस अंतरावर येऊन पोचले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २ ऑक्टोबर १६७० मोघलांच्या वतीने औरंगाबादला छावणी करून शहाजादा मुअज्जम कारभार बघत होता. पण तो शिवाजी महाराजांना फितूर असल्याची औरंगजेबाला शंका होती. म्हणून त्याने मुअज्जमला परत बोलावून त्या जागी दिलेरखानाची नेमणूक केली. या संदर्भात मुंबईकर इंग्रजांकडून सुरतेच्या इंग्रजांना पत्र गेले.  "सुलतान मुअज्जमने शिवाजी महाराज व इतर राजे यांच्या मदतीने बापाशी लढण्याकरिता मोठे सैन्य उभारले. कित्येकांच्या मते तो औरंगजेबावर स्वारी करण्याकरिता आग्र्याला गेला. दुसरे कित्येक म्हणतात की, बापाने तह करून त्यास दख्खनचे राज्य व गुजरात प्रांत दिल्याने तो परत फिरला." 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २ ऑक्टोबर १८०४ २ ऑक्टोबर १८०४ मध्ये पेशव्यांनी गायकवाडांस अहमदाबादचा इजारा वार्षिक रू. ४ लाखांच्या करारान १० वर्षाच्या बोलीने दिला. त्याची वहिवाट भगवंतराव गायकवाडांस सांगितली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २ आॅक्टोबर १८६९ राष्ट्रपिता महात्मा गांध...