Posts

९ डिसेंबर १६७३छत्रपती शिवराय कर्नाटकातील कारवार येथे दाखल झाले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ९ डिसेंबर १६५४ इंदापूर येथील मशिदीसाठी एक चावर जमीन व तेल इत्यादिबाबत छत्रपति शिवाजीराजांचे पत्र. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ९ डिसेंबर १६५९ दौलोजीची कोकणावर चाल जेव्हा शिवाजी राजे प्रतापगड - वाई - सातारा - कोल्हापूर भागातल्या आदिलशाही चौक्या जिंकत होते तेव्हा त्यांचा सरदार दौलोजी तळ कोकणातून थेट राजापूर पर्यंत गेला होता असे इंग्रज व वलंदेज (Dutch) साधनांमधून दिसते. राजापूरच्या इंग्रजांच्या वखारीतून त्यांच्या सुरतेच्या वखारीला ९ डिसेंबर १६५९ ला लिहीलेल्या पत्रात हा उल्लेख सापडतो. अफजलवधाच्या धक्क्यातून सावरायला वेळ मिळायच्या आत झालेल्या ह्या अकस्मिक हल्ल्याने आदिलशाहीचे सगळे अधिकारी व सरदार हदरले. इंग्रजांच्या पत्रावरुन हे स्पष्ट आहे की १० डिसेंबर पर्यंत दौलोजी राजापूरला पोहोचला नव्हता. दाभोळच्या बंदरात अफजलखानची तीन जहाजे उभी होती. ह्याची माहिती छत्रपती शिवाजी राजाला होती व त्यांनी दौलोजीला ती जप्त करायला सांगितले होते. पण दौलोजी तिथे पोहोचायच्या आत महमूद शरीफने ती तेथून हलवली व राजापूरला पिटाळली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ९ डिसेंबर १६६६ पुर...

८ डिसेंबर १६७३छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांकडून बंकापूर जिंकले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ८ डिसेंबर १६६५ नेतोजी पालकरांनी विजापूरकरांकडून ताथवडा  उर्फ संतोषगड जिंकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ८ डिसेंबर १६७३ छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांकडून बंकापूर जिंकले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ८ डिसेंबर १६८० मुंबईकर इंग्रजांनी सुरतकरांना लिहीलेल्या पत्राची नोंद...! "राजाच्या हितसंबंधांना विरोध येईल अशा तऱ्हेने सिद्दीला आमच्या कडून मिळणारा आश्रय व मदत ही राष्ट्राच्या कायद्याप्रमाणे समर्थनीय ठरणार नाहीत हे उघड आहे. परंतु हल्लीच्या परिस्थितीत तो नियम आम्हास मोडावा लागणार हे स्पष्ट आहे. दोघांपैकी कोणाचा तरी रोष पत्करल्याशिवाय गत्यंतर नाही. हे अवघड असल्याचे लिहून लंडनला आपल्या गलबतास सुरक्षितता असणे गरजेचे आहे". छत्रपती संभाजीराजेंना समाधान वाटेल अशा काही अटी सिद्दीकडून लेखी मिळतील. तर मिळवाव्या. तरीसुद्धा सिद्दीला फार दुखवू नये. यावरून इंग्रजांचे दुटप्पीपणाचे धोरण किती स्पष्ट होते हे कळून येते. पण ते कात्रीत सापडले होते, हे निश्चित. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ८ डिसेंबर १६९९ औरंगजेब बादशाह अजिंक्यतारा घेण्यासाठी सरसावला. अजिंक्यताराचे किल्...

४ डिसेंबर १६७३छत्रपती शिवाजी महाराजांनी कारवार जिंकले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ डिसेंबर १६७३ छत्रपती शिवाजी महाराजांनी कारवार जिंकले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ डिसेंबर १६७९. शंभूराजे अखेर पन्हाळ्याला परतले. औरंगजेबाने दिलेरखानाला गुप्तपणे निरोप पाठविला की, "शंभूराजेला कैद करुन दिल्लीला पाठवा...!" अन् ही बातमी खुद्द संभाजीराजांना समजली...! संभाजीराजांनी ठरवलं इथून निसटायचं. अखेर येसूबाईसाहेबांनी पुरुषाचा पोषाख केला आणि रात्रीच्या अंधारांतून शंभूराजे सहकुटुंब पळाले (दि.२० नोव्हेँबर १६७९). त्यांनी तडख विजापूर गाठले. तिथून पुढे महाराजांकडून न्यायला आलेल्या मंडळींस येऊन सामील झाले (दि.३० नोव्हेंबर १६७९). तेथून तडक लांबच्या दौडी मारत दि.४ डिसेंबर १६७९ ला शंभूराजे अखेर पन्हाळ्याला येऊन दाखल झाले. संभाजीराजे परत आलेले ऐकून महाराजांस अत्यंत आनंद झाला. ते युवराजांना भेटायला पन्हाळगडास निघाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ डिसेंबर १६८० सुरतेहून इंग्रजांच्या दुसऱ्या एका वखारीला लिहिलेल्या पत्रातून संभाजीच्या सैन्याचा त्यांनी धस्का घेतल्याचे दिसते. बहादुरखानचे मुघल सैन्य ह्या काफिल्याजवळपास असल्याने बहुदा माल सुरक्षितपण...

२ डिसेंबर १६६७छत्रपती शिवराय व पोर्तुगीज यांच्यात सहसंमतीने दोन्ही बाजुने तहास मान्यता.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २ डिसेंबर १६६७ छत्रपती शिवराय व पोर्तुगीज यांच्यात सहसंमतीने दोन्ही बाजुने तहास मान्यता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २ डिसेंबर १६६९ संभाजीराजे, सरसेनापती प्रतापराव गुजर, निराजी रावजी यांना त्यांच्या २५०० फौजेसह अटक करा, अशी खबर औरंगजेबने शहजादा  मुअज्जमकडे पत्राद्वारे पोचवली. पण हे पत्र पोचण्याआधीच मुअज्जमला ही खबर कळाली, मग त्याने शंभूराजे आणि मराठी सैन्याला निघून जायचा सल्ला दिला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २ डिसेंबर १६८३  दुर्गादास राठोड मध्यस्थीसाठी पोर्तुगीज व्हाईसरायकडे छत्रपती संभाजी महाराजांच्या आज्ञेवरून दुर्गादास राठोड गोव्याच्या पोर्तुगिजांच्या भेटीत गेला. या भेटीत पोर्तुगिजांचा मानस काय आहे, औरंगजेबास ते कितपत मदत करणार याचा कानोसा घेण्याचे काम त्याच्यावर सोपविण्यात आले. परंतु छत्रपती संभाजी महाराजांचे अधिक्रृत  पत्र जवळ नसल्याने दुर्गादास राठोड याला भेटीस बोलावले नाही ! 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २ डिसेंबर १७०२ डिसेंबर १७०२ मध्ये फोंडा किल्ला मराठयांनी सर केला, फोंड्याचा किल्लेदार म्हणून कृष्णाजी अनंत यांची नेमणूक ताराबाईंनी केल...

२६ नोव्हेंबर १६७०बागलाणची मोहिमदुसऱ्या सुरत मोहिमेनंतर छत्रपती शिवाजी महाराज बागलाण प्रांतावर निघाले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ नोव्हेंबर १६२९ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजी, जिजाबाई यांच्या सासूबाई उमाबाईसाहेब या बहुधा यावेळी येथे असाव्यात असे वाटते त्यांनी फक्त ३ महिनेपूर्वी वेरुळच्या घृष्नेश्वराची अभिषेकपूजा तिमनभट शेडगे यांस सांगून त्याबद्दल नेमणूक करून दिली त्यावरून आजीने येथे आपल्या नातवाचे आपल्या मांडीवर कौतुक केले असावे असे मानतात, तर्क आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ नोव्हेंबर १६६४ छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये कल्याण भिवंडी जिंकून कल्याणच्या खाडीत आपल्या आरमाराची स्थापना केली. पुढच्या काळात या आरमाराने परकीय सत्ताना समर्थपणे टक्कर देऊ शकेल अशी प्रगती केली होती. महाराजांच्या वाढत्या आरमारी सामर्थ्याने त्याकाळी अनेक अफवा पसरत होत्या. फेब्रुवारी १६६५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथमच आरमारी जहाजातून प्रवास करत बसरूर वर स्वारी केली होती. पण त्यापूर्वीच इंग्रजांच्या पत्रातून महाराजांच्या आरमारी सामर्थ्याचे दर्शन घडत होते. ते असे, "शिवाजी विजयी आणि अनिर्बंध असून त्याचे सामर्थ्य रोज वाढत असल्याने सभोवतालीच्या राजांना त्याची मोठी दहशत...

२४ नोव्हेंबर १६८३!! शंभू ने सुरु केले तांडव रुद्राचे तांडव !!"छत्रपति शंभूराजे" केवळ ४० मराठे सैन्यासह स्टीफन उर्फ जुवे बेटावर उतरले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ नोव्हेंबर १६७२ अली आदिलशहा द्वितीयचा मृत्यू  विजापूरचा आली आदिलशहा ह्याच्या मृत्युनंतर (२४ नोव्हेंबर १६७२) आदिलशाहीचे सारे वैभव संपुष्टात आले. होते. त्याच्या नंतर त्याचा वारस सिकंदर हा वयाने लहान असलेला गादीवर आला.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ नोव्हेंबर १६८३ !! शंभू ने सुरु केले तांडव रुद्राचे तांडव !! "छत्रपति शंभूराजे" केवळ ४० मराठे सैन्यासह स्टीफन उर्फ जुवे बेटावर उतरले. मराठ्यांच्या तोफांच्या आवाजाने गोव्यातील लोक व शस्त्र हाती धरलेले ख्रिश्चन लोक "पादरी" शहराच्या तटबंदीकडे पळत सुटले. ४०० फिरंग्यांपैकी ३०० जण जवळच्या टेकडीपर्यंत जाईपर्यंत जिवंत राहिले. टेकडीवरचे मराठे मागे फिरले व थोड्याच वेळात मराठ्यांची नवी तुकडी फिरंग्यांवर तुटून पडली. सर्वत्र अंदाधुंदी माजली. धीर खचलेले फिरंगी सैन्य सैरावैरा पळत सुटले. ४ मराठा घोडेस्वारांनी फिरंगी व्हाइसरॉय चा पाठलाग सुरु केला पण त्यांच्या तावडीतून तो जखमी होऊन वाचला आणि कसाबसा खाडीपर्यंत जाऊन पोचला. त्याला व कॅप्टनला एका जहाजात बसून पळून जाताना "छत्रपती शंभूराजें...

२२ नोव्हेंबर १६५६छत्रपती शिवरायांचा मसुरवर हल्ला२२ नोव्हेंबर १६५६ च्या एका फर्मानात शिवरायांच्या मसूरवरील छाप्याचा उल्लेख सापडतो

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २२ नोव्हेंबर १६५६ छत्रपती शिवरायांचा मसुरवर हल्ला २२ नोव्हेंबर १६५६ च्या एका फर्मानात शिवरायांच्या मसूरवरील छाप्याचा उल्लेख सापडतो. आदिलशाही सरदार मुहम्मद इखलासखानला हे फर्मान मिळाले होते. त्याला कर्नाटकाचा सुभेदार नेमले होते व शिवरायांच्या त्या भागातील हलचालींवर पायबंद घालायचा आदेश त्याला दिला होता. आदिलशाहीतील घडामोडींच्यावेळेचा शिवरायांच्या हलचालींबाबतचा हा सगळ्यात जुना संदर्भ आहे. मुहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर उद्भवलेल्या आदिलशाहीतील कलहाबद्दल शिवरायांना बहुतेक कल्पना होती. वरील फर्मान मुहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर आठरा दिवसांनी लिहीले आहे. त्यामुळे आदिलशाहीतील अस्थिरतेचा लाभ घेऊन शिवरायांनी मसूरवरील छापा घातला असावा. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २२ नोव्हेंबर १६६५ किल्ले पुरंदरच्या ऐतिहासिक तहामध्ये ठरल्याप्रमाणे विजापूरच्या मोहीमेसाठी छत्रपती शिवराय मुघलांकडून लढण्यासाठी "मिर्झाराजे जयसिंग" यांच्या छावणीत दाखल. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २२ नोव्हेंबर १६८७ गोवळकोंड्याची कुतुबशाही जिंकून घेतल्यावर औरंगजेबाने त्या राज्यातील जो भाग...