२ डिसेंबर १६६७छत्रपती शिवराय व पोर्तुगीज यांच्यात सहसंमतीने दोन्ही बाजुने तहास मान्यता.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२ डिसेंबर १६६७
छत्रपती शिवराय व पोर्तुगीज यांच्यात सहसंमतीने दोन्ही बाजुने तहास मान्यता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२ डिसेंबर १६६९
संभाजीराजे, सरसेनापती प्रतापराव गुजर, निराजी रावजी यांना त्यांच्या २५०० फौजेसह अटक करा, अशी खबर औरंगजेबने शहजादा  मुअज्जमकडे पत्राद्वारे पोचवली. पण हे पत्र पोचण्याआधीच मुअज्जमला ही खबर कळाली, मग त्याने शंभूराजे आणि मराठी सैन्याला निघून जायचा सल्ला दिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२ डिसेंबर १६८३ 
दुर्गादास राठोड मध्यस्थीसाठी पोर्तुगीज व्हाईसरायकडे छत्रपती संभाजी महाराजांच्या आज्ञेवरून दुर्गादास राठोड गोव्याच्या पोर्तुगिजांच्या भेटीत गेला. या भेटीत पोर्तुगिजांचा मानस काय आहे, औरंगजेबास ते कितपत मदत करणार याचा कानोसा घेण्याचे काम त्याच्यावर सोपविण्यात आले. परंतु छत्रपती संभाजी महाराजांचे अधिक्रृत  पत्र जवळ नसल्याने दुर्गादास राठोड याला भेटीस बोलावले नाही !

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२ डिसेंबर १७०२
डिसेंबर १७०२ मध्ये फोंडा किल्ला मराठयांनी सर केला, फोंड्याचा किल्लेदार म्हणून कृष्णाजी अनंत यांची नेमणूक ताराबाईंनी केली. यावेळी बादशहाचा मुक्काम भीमेच्या काठावर असलेल्या बहादूरगडावर होता. फोंडा किल्ला काबीज केल्यानंतर मराठयांनी बहादुरगडावर असणाऱ्या बादशाही छावणीभोवती धामधूम उठविली होती. तरीही बादशहास अद्यापि मराठयांचे अनेक किल्ले जिंकावयाचे स्वप्न मनात बाळगत होता. विशाळगड जिंकून घेतल्या नंतर सैन्यासह २ डिसेंबरला कोंडाणा ऊर्फ सिंहगड जिंकून घेण्यासाठी निघाला. वाटेत त्याने जेजुरीच्या खंडोबाच्या देवालयाची नासधूस केली. श्रींचा कळस व मंडप जाळून टाकला. जेजुरी हुन कूच करुन बादशाह कोंडाण्याच्या पायथ्याशी २७ डिसेंबरला पोहोचला.पुढे तरबीयतखानाने मराठा शिबंदीशी वाटाघाटी केल्या.भली मोठी रक्कम किल्लेदारास दिल्यावर किल्ला ८ एप्रिल १७०३ रोजी मोगलांच्या ताब्यात दिला. सिंहगड चे नाव बख्शीदाबख्श (ईश्वरदत्त) असे ठेविले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२ डिसेंबर १७११
खटावचे मोगली ठाणे मात्र छत्रपती शाहूंनी चढाई करून कृष्णराव खटावकर यास ठार करून त्या ठाण्याचे नामोनिशान मिटवले आहे. या २ डिसेंबर १७११ च्या कृष्णराव खटावकर विरूद्धच्या लढाईत तुकडोजी गायकवाड स्वामी कार्यासाठी ठार झाले आहेत.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२ डिसेंबर १७४८
१८ व्या शतकात हा निवतीचा किल्ला सावंतवाडीच्या सावंताच्या ताब्यात होता. २ डिसेंबर १७४८ रोजी पोर्तुगिजांनी निवतीवर हल्ला चढवला. त्या वेळी इस्माईलखान हा पोर्तुगिजांच़्या पदरी नोकरीस असलेल्या कँप्टनने शौर्याची कमाल करुन निवतीवर पोर्तुगिजांचे निशाण लावले. हा इस्माईलखान पुर्वी मराठ्यांच्या पदरी सेवेत होता. निवतीच्या किल्ल्यावर व्हाईसराय स्वता: आला होता.
काही वर्षांनी निवती सावंतानी पुन्हा जिंकून घेतला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२ डिसेंबर १७५१
२ डिसेंबर रोजी मराठयांनी निजामापासून त्रिंबक किल्ला जिंकून घेतला. या दोन महिन्याच्या युद्ध धुमाळीत बुसीच्या तोफखान्याचा मराठयांच्या गनिमी काव्याच्या लढाईपुढे काही उपयोग झाला नाही. म्हणून सलाबतजंगाने तहाची बोलणी ‌लावली. शिंगवे, परगणे राहुरी येथे ७ जानेवारी १७५२ रोजी उभयतास अटी मान्य होऊन तह झाला.  या तहात ठरल्याप्रमाणे पेशव्यांनी त्रिंबक किल्ला निजामास परत दिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२ डिसेंबर १७६०
पानिपतचा रणसंग्राम
नोव्हेंबर  सन १७६० रोजी मराठी फौजा व अहमदशाह अब्दाली याच्या फौजांची प्रथम पानिपतावर चकमक झाली. या चकमकीत अहमदशाह अब्दाली याने माघार घेऊन त्याने नोव्हेंबर सन १७६० रोजी दहाड येथे छावणी केली. 
यानंतर अब्दाली याने पुन्हा माघार घेऊन त्याने २ डिसेंबर  सन १७६० रोजी यमुनातीरावर छावणी केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

महाराज शिवाजी राजे ऑफ तंजावर साहेबांचे आज पुण्यात स्वागत व सत्कार करण्याचे संधी मिळाली. विविध इतिहास अभ्यासकांना महाराज साहेबांनी आज मोलाचे मार्गदर्शन केले.

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४