Posts

Showing posts from February, 2025

२७ फेब्रुवारी १६८३सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची मोघल सरदार बहादूरखान बरोबर कल्याण-भिवंडीच्या जवळ लढाई.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ फेब्रुवारी १६८३ सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची मोघल सरदार बहादूरखान बरोबर कल्याण-भिवंडीच्या जवळ लढाई. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ फेब्रुवारी १७१९ लाल किल्ल्यातली सगळी बादशाही फौज आणि पहारेकरी हटवण्यात आले, हुसेन अलीने स्वतःची माणसे नेमली. २८ तारखेला हरम (शयनकक्षात) मध्ये लपलेल्या फारुखसियर बादशाह ला पकडून दरबारात आणले गेलॆ कुतुब उल मुल्क सय्यद अलीने बादशहाचे डोळे काढले आणि बादशहाला बंदीखान्यात टाकले. रफी ऊत दर्जतला नवीन बादशाह घोषित करण्यात आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ फेब्रुवारी १७३१ छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापुर गादी) यांनी कर्‍हाड येथे एकमेकांची भेट घेतली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ फेब्रुवारी १७४० नासिरजंगाचा औरंगाबादजवळ बाजीरावांनी दारुण पराभव केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ फेब्रुवारी १८५४ लक्ष्मीबाईंचे पती गंगाधर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर २७ फेब्रुवारी १८५४ रोजी लॉर्ड डलहौसीने दत्तक कायद्यांतर्गत दामोदर राव यांचे दत्तकत्व अस्वीकृत असल्याचे सांगितले. झाशीचा ब्रिटीश राजवटीत समावेश करावा अशी ड...

२६ फेब्रुवारी १६४७थोरले महाराज फर्जद "शहाजीराजे भोसले" यांनी छत्रपती शिवरायांकडे पुणे जहागिरीची जबाबदारी दिली.

२६ फेब्रुवारी ⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ फेब्रुवारी १६४७ थोरले महाराज फर्जद "शहाजीराजे भोसले" यांनी छत्रपती शिवरायांकडे पुणे जहागिरीची जबाबदारी दिली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ फेब्रुवारी १७०४ किल्ले तोरणा/प्रचंडगड औरंगजेबने राजगड जिंकल्यानंतर मुघलांनी हा किल्ला सन १७०४ साली जिंकला २३ फेब्रुवारी १७०४ ला त्याने तोरण्याकडे कूच केले व २६ फेब्रुवारी १७०४ ला तो त्याच्या पायथ्याशी पोहोचला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ फेब्रुवारी १७३७ चिमाजी आप्पानी अटेर व भदावर लुटले 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ फेब्रुवारी १७३९  खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांजवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. चिमाजीअप्पांनी तुबाजीस मुर्ध्यावर मोर्चा बसविण्यास आज्ञा केली. तुबाजीपंतांचा मुर्ध्यावर दिनांक २२ फेब्रुवारी मोर्चा कायम झाला. इतक्यात पोर्तुगीजांनी त्यावर हल्ला केला. तुबाजीपंताच्या फौजेने पोर्तुगीजांचा हल्ला निकराने परतविला. इतकेच नाही तर दिनांक २६ फेब्रुवारी सन १७३९ रोजी गायमुखावर तुबाजीपंतांनी मोर्चा बसविला. धारावी किल्यात पाण्याची सोय नाही. गायमुख मराठ्यांनी काबीज केल्याने प...

स्वराज्यावर मिर्जाराजे जयसिंग हा चालून येत आहे हे समजतास छत्रपती शिवाजी महाराजांनी २३ फेब्रुवारी १६६५ रोजी कारवार सोडले आणि भिमगडाच्या मोहिमेसाठी छत्रपती शिवाजी महाराज काळी नदी (गोवा) ओलांडून रवाना झाले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ फेब्रुवारी १६२३ २३ फेब्रुवारी रोजी राजे लखुजीराव जाधवराव यांचे ज्येष्ठपुत्र राजे दत्ताजीराव यांचा स्मृती दिवस. राजे दत्ताजीराव जाधवराव यांचा मृत्यु २३ फेब्रुवारी १६२३ रोजी खंडागळे हत्तीप्रकरणात देवगिरीवर झाला.त्यांच्या सिंदखेडराजा परिसरात मुख्य व स्वतंत्र विद्यमान वंशजशाखा जवळखेड व उमरद रुसुमचे या असुन सिंदखेडराजा परिसराव्यतिरिक्त यांच्या विद्यमान वंशजशाखा भुईंज (सातारा), करवंड,करणखेड,वडाळी व सारवडी या होत.... 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ फेब्रुवारी १६६५ शिवाजी महाराजांचा कारवारच्या बाहेर खाडीच्या तोंडाशी मुक्काम होता येथे त्या शेरखानाने इंग्रज व तेथील सर्व व्यापार्‍यांकडून मोठी रक्कम जमवून ती नजराण्याच्या स्वरूपात शिवाजी महाराजांकडे रूजू केली... छत्रपती शिवाजी महाराजांना काळी नदीच्या जवळच इंग्रजांची व कंगोदेशाची अशी दोन गलबते नांगरून पडलेली दिसली, ही गलबते आपल्या ताब्यात द्यावीत असा निरोप महाराजांनी शेरखान यास पाठवला. शेरखानाने महाराजांचा गलबत ताब्यात देण्याचा निरोप इंग्रजांकडे पाठवला असता इंग्रजांनी उद्दामपणे निरोप पाठवुन गलबते ...

छत्रपती शिवरायांचा कारवारच्या खाडीच्या तोंडाशी मुक्काम होता. येथे शेरखानने इंग्रज व तेथील सर्व व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम जमवून ती नजराण्याच्या स्वरूपात छत्रपती शिवरायांच्या समोर रूजू केली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २२ फेब्रुवारी १६६५ छत्रपती शिवरायांनी कर्नाटकातील "कारवार" जिंकले. छत्रपती शिवरायांचा कारवारच्या खाडीच्या तोंडाशी मुक्काम होता. येथे शेरखानने इंग्रज व तेथील सर्व व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम जमवून ती नजराण्याच्या स्वरूपात छत्रपती शिवरायांच्या समोर रूजू केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २२ फेब्रुवारी १६८४ केग्विनने इंग्लडच्या राजाला पत्र केग्विनने २२ फेब्रुवारी १६८४ रोजी पुन्हा इंग्लडच्या राजाला पत्र पाठवून छत्रपती संभाजीराजांनी आपल्या सरहद्दीवर ३०००० सैन्य मुंबईपासून तीन मैलांवर असणार्‍या पलतात ( Paltata पलते ) या बेटावर उतरवून ते बेट व्यापण्याचा प्रयत्न केल्याचे कळवले होते. केग्विन हा सातत्याने चार्लस राजाला छत्रपती संभाजी महाराजांच्या शक्तीची व आक्रमक धोरणाची कल्पना यासाठी देत होता की, जेणे करुन छत्रपती संभाजी महाराजांशी तह करुन सलोखा निर्माण व्हावा. त्याप्रमाणे एप्रिल १६८४ पूर्वी केग्विनने तहाच्या बोलणीसाठी कॅप्टन गॅरी, थाॅमस विल्किन्स , राम शेणवी यांना तहाच्या बोलणीसाठी छत्रपती संभाजी महाराजांच्याकडे पाठवले त्यांनी बिरवाडी ...

२० फेब्रुवारी १६६१छत्रपती शिवरायांनी खारेपाटण जिंकले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० फेब्रुवारी १६६१ छत्रपती शिवरायांनी खारेपाटण जिंकले. प्राचिन काळी व्यापारी गलबते विजयदुर्गाजवळ वाघोटन खाडीत शिरत व तेथून खारेपाटण ‘‘बलिपत्तन’’ गावापर्यंत येत. येथे जहाजातून माल उतरवून तो बावडा, फोंडा घाटामार्गे देशावर पाठविला जात असे. अशा या प्राचिन बंदराचे, राजधानीचे रक्षण करण्यासाठी खारेपाटणचा किल्ला बांधण्यात आला. इ.स १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी राजापूर पाठोपाठ खारेपाटण किल्ला जिंकून घेतला. राजापूर येथे अटक करण्यात आलेल्या इंग्रज अधिकारी गिफर्ड यास खारेपाटण किल्ल्यातील अंधार कोठडीत ठेवण्यात आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० फेब्रुवारी १६७२ मराठ्यांच्या इतिहासाचा आणि कर्तृत्वाचा डंका छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्या कर्तृत्ववान मराठ्यांमुळे जगभर पोहोचला. हे आपण प्रेमापोटी बोलत असतो पण आता ही गोष्ट प्रेमापोटी नाही तर खरोखर आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल एक बातमी द लंडन गॅझेट मध्ये शिवरायांच्या हयातीत इंग्लंड मध्ये छापून आली होती. विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची ही बातमी त्यावेळी पहिल्या पान...

१७ फेब्रुवारी १६६३छत्रपती शिवरायांनी केळशी जिंकले

१७ फेब्रुवारी ⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १७ फेब्रुवारी १६६३ छत्रपती शिवरायांनी केळशी जिंकले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १७ फेब्रुवारी १६७९ सुरतचे मुंबई इंग्रजकरांना पत्र युवराज शंभुराजे दिलेरखानाच्या छावणीत... सुरतेचे इंग्रज अधिकारी मुंबईच्या इंग्रज अधिकाऱ्यांना कळवितात, "दख्खनमध्ये बादशाही सेनापतींनी छत्रपती शिवाजी महाराजांवर मोठा विजय मिळविला आहे. सर्वात छत्रपती शिवाजी महाराजांची मनःशांती अधिक ढवळणारी गोष्ट घडली ती म्हणजे त्यांचा ज्येष्ठ पुत्र युवराज शंभुराजे बादशाही सरदार दिलेरखान यांच्याकडे गेले." 'याची नोंद मल्हार रामराव चिटणीस, बुसातिनुस्सलातीन, विजापुरची अदिलशाही, इंग्रज, भीमसेन सक्सेना, जेधे शकावली, या सर्वांनी घेतली असली तरी महाराजांचा अभ्यास करताना असे निदर्शनास येते की, "युवराज शंभुराजे दिलेरखानाच्या गटात जाणे म्हणजे महाराजांचेच राजकारण होय". युवराज संभाजीराजे दिलेरखानापासी गेले. दिलेरखानाने त्यांसी ७,०००, हप्त (सप्त) सात हजारी मनसब दिली व सन्मान केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १७ फेब्रुवारी १६८९ छत्रपती शंभूराजे व कवी कलश यांचे हालह...

१४ फेब्रुवारी १७५५रघूजी भोसले यांचा मृत्यू (जन्म १६९८)नागपूरकर भोसले घराण्यातील एक शूर व मुत्सद्दी व्यक्ती. इतिहासात हा पहिला रघूजी या नावाने प्रसिद्ध आहे.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १४ फेब्रुवारी १६५८ औरंगजेबाचे छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र 'शिवाजीचे मान्यतेसाठीचे विनंती पत्र आपल्या शाहजाद्याला आले, त्यामुळे त्याच्यापासुन आपल्याला संकट नाही', असा विचार करुन असावधानतेने जुन्नरमध्ये बादशाही सैनिक गाढ झोपलेले होते. राजांनी डाव साधला. २३ एप्रिल १६५७ रोजी वरील पत्राचे प्रकरण झाले आणि अवघ्या सात दिवसात ३० एप्रिल १६५७ रोजी राजांनी अचानक जुन्नर वर हल्ला केला. वैशाख  कृ. द्वितीयेची ती रात्र मावळ्यांनी जुन्नरच्या परकोटाला दोराच्या शिड्या लावल्या, मावळे आत शिरले. पहारेकऱ्यांना मारुन त्यांनी लुटिस सुरवात केली आणि राजांनी जुन्नर लुटली. ३० एप्रिल १६५७ रोजी जुन्नर लुटून २०० घोडे, ३ लाख होन नगद, कापड, जडजवाहीर घेऊन महाराज स्वराज्यात म्हणजे चाकणला परतले. याच वेळी औरंगजेब बीदर जिंकून कल्याणीस वेढा टाकण्यास निघाला होता. वाटेतच त्याला 'ही' बातमी समजली. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने कार्तलबखनास जुन्नरच्या बंदोबस्तसाठी व होशेदारखान, रायकरणसिंह, रायसिंह, शाएस्ताखान, अब्दुल मुनीम वगैरे सरदारांना सरह...

१३ फेब्रुवारी १६७२छत्रपती शिवराय विश्रांतीसाठी रायगडला मुक्कामी आले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १३ फेब्रुवारी १५६७ इ.स.१५६७ मध्ये अकबराने चीतोडवर आक्रमण करून चीतोडला मोघली फौजांचा वेढा दिला. मेवाडच्या सर्व सामंतांच्या सल्याने महाराणा उदयसिंह यांना चितोड सोडून अरवली पर्वतांच्या दऱ्याखोऱ्यात व जंगलात आश्रयास जावे लागले. १३ फेब्रुवारी १५६७ रोजी अकबर व मेवाडी सैन्य यांच्यात घनघोर युद्ध झाले त्यात मेवाडचा पराभव झाला तसेच राजपूत स्त्रियांनी जोहार करून आपल्या प्राणांची आहुती दिली. महाराणा उदयसिंह यांनी कुंभलगडावर आपली राजधानी स्थापन केली परंतु मोगली आक्रमणाचा धोका ओळखून त्यांनी आपली राजधानी गोगुंदा येथे प्रस्थापित केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १३ फेब्रुवारी १६३० मुघल बादशाह शाहजहाँन आदिलशाही आणि निझामशाही संपवण्याच्या उद्देशाने खानदेश येथील बुऱ्हाणपुर येथे पोचला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १३ फेब्रुवारी १६५८ महाराजांचे वाकनीसांना समर्थांना मदत पाठवण्यासाठी पत्र भास्कर गोसावी श्री गुरुमवतपरायण मोक्षश्रिया विराजित दिवाकर गोसावी श्री चे उछाहा होनु पनास भिक्षेस मिळाले ते भानजी गोसावी बराबर पाठविले पावतील शिवाजीराजे यांच्याकडे भिक्षेस गेलो. त्य...

६ फेब्रुवारी १६७१शिवकालीन पत्रसार संग्रह, मुंबई ते सुरत"दाऊदखान सालिहेरला होता. तो आपल्या मुलाच्या मदतीस बुर्हाणपूरला निघाला. तेवढ्यांत शिवाजीराजांनी साल्हेर घेतला."

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ६⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ६ फेब्रुवारी १६७१ शिवकालीन पत्रसार संग्रह, मुंबई ते सुरत "दाऊदखान सालिहेरला होता. तो आपल्या मुलाच्या मदतीस बुर्हाणपूरला निघाला. तेवढ्यांत शिवाजीराजांनी साल्हेर घेतला." 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ६ फेब्रुवारी १६७४ महाराणी काशीबाई पुण्यतिथी छत्रपती शिवाजी महाराजांची चौथी पत्नी महाराणी काशीबाई यांचे पाचाड येथे निधन... महाराणी काशीबाई सिंदखेडच्या जाधवराव घराण्यातील होत्या.. जिजाऊंचे बंधु अचलोजी जाधवराव हे त्यांचे आजोबा तर संताजी जाधवराव हे त्यांचे वडील होते.. छत्रपती शिवरायांचा आणि त्यांचा विवाह एप्रिल १६५७ मध्ये झाला... त्या निपुत्रीक होत्या. त्यांचा मृत्यु ६ फेब्रुवारी १६७४ मध्ये झाला... रायगडावर कुशावर्त तलावाजवळ उत्तरेस दोन समाध्या दिसतात या समाध्यांपैकी एक महाराणी काशीबाई आणि दुसरी मोरोपंत पिंगळे यांची आहे असे बोलले जाते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ६ फेब्रुवारी १६७५ विजापूरच्या कारवार येथील सुभेदाराने बंड पुकारल्याने विजापूरमधे जो गोंधळ माजला त्याचा फायदा छत्रपती शिवाजीरा...

५ फेब्रुवारी १६६४५ फेब्रुवारी १६६४ ला महाराज सुरतेची लुट घेऊन राजगडी पोहचले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ५ फेब्रुवारी १२९४ देवगिरीचे यादव साम्राज्य संपुष्टात - महाराष्ट्र पारतंत्र्यात यादव साम्राज्यावरील पहिला इस्लामी हल्ला झाला तो १२९४ च्या काळात. जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी हा दख्खनस्वारी करिता यादवांवर लक्ष ठेउनच होता. त्याने निष्णात योजना आखली. देवगिरी वर असलेल्या यादवांचे सैन्य देवगिरी पासून दूर जाताच त्यावर हल्ला करायचा,कारण यादवांचे सैन्य विभागलेलं नसे. वर सांगितल्या प्रमाणे यादवांचे सैन्य होयसळ साम्राज्यावर मोहिमेत व्यस्त असताना अल्लाउद्दीन ला आयती संधी मिळाली आणि त्याने अत्यंत शांतपणे देवगिरीच्या दिशेने कूच केली. आपण दक्षिणेत चाललो आहोत अशी बतावणी करत, जंगल मार्गाने आपल्या छावण्या लावत अल्लाउद्दिन देवगिरीच्या दिशेने निघाला. देवगिरीपासून ८० मैलावर असलेल्या लासूर गावी जेव्हा अल्लाउद्दिन येऊन पोचला त्यावेळेस रामचंद्रदेवला येणाऱ्या संकटाची चाहूल लागली परंतु आता वेळ निघून गेली होती. रामचंद्राच्या सेनापतीने प्रतिकाराचा प्रयत्न केला खरा पण खिलजीच्या सैन्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही आणि बघता बघता देवगिरी किल्ल...

४ फेब्रुवारी बलिदान दिन* निमित्त *सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे* यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा..!!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

आपल्या राजाच्या..  नुसत्या शब्दावर .. स्वतःच्या मुलाचे..  रायबाचे लग्न सोडून..  सिंहगड जिंकायला जाणाऱ्या, आपल्या राजासाठी .. जीव ओवाळून टाकणाऱ्या..  मावळ्याच्या निष्ठेला, त्यागाला .. आणि  पराक्रमाला..  इतिहासात तोड नाही..!! धन्य ते सुभेदार..  *नरवीर तानाजी मालुसरे*, धन्य त्यांची स्वामीनिष्ठा, धन्य त्याचा महान पराक्रम  आणि  धन्य धन्य ते  *श्री छत्रपती शिवाजी महाराज*     ज्यांनी जीवाला जीव देणारे माणसे निर्माण केली.. सगळच अलौकिक..!! *४ फेब्रुवारी बलिदान दिन*                निमित्त  *सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे*                    यांच्या                     पावन स्मृतीस              विनम्र अभिवादन                  आणि            मानाचा मुजरा..!! 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

४ फेब्रुवारी १६७०नरवीर तानाजी मालुसरे बलिदान दिन

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ फेब्रुवारी १६१६ सन १६१५ व १६१६ मधे ह्या मोहिमेतील महत्वाची युद्धे झाली. निजामशाहीचा वझीर मलिक अंबर याने डिसेंबर १६१५ मधे जालन्याजवळ दोन्ही सैन्य एकत्र केली. मुघलांकडून असफखान, शाहनवाझखान, मानसिंह व इतर मातब्बर सरदार होते. जालन्याजवळच्या रोशनगाव इथे हे युद्ध झाले. ४ फेब्रुवारी १६१६ ला तुंबळ युद्ध झाले. दख्खनी सैन्याला माघार घ्यावी लागली. मुघलांनी खडकी पर्यंत, म्हणजे आजच्या औरंगाबाद पर्यंत धडक मारली. सगळे गाव व बाजूचा परिसर लुटून फस्त केला. मिळालेल्या लुटीसमवेत मग ते बालापूरच्या किल्ल्याकडे वळाले. त्या वेळी निजामशाहीची राजधानी देवगिरीला होती कारण अहमदनगरही मुघलांकडे होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ फेब्रुवारी १६६१ कोकणातील दाभोळ बंदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ फेब्रुवारी १६७० नरवीर तानाजी मालुसरे बलिदान दिन अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्‍न केले. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्रा...

फेब्रुवारी १६७०राजगडावरून कोंढाणा घेण्याची जय्यत तयारी झाली.शिवछत्रपतींचा आणि माँसाहेब जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन तानाजी मालुसरे, शेलारमामा आणि सूर्याजी मालुसरे मावळ्यांच्या तीन तुकड्या घेऊन कोंढाणा घेण्यासाठी ३ फेब्रुवारीच्या रात्री तयारीनिशी बाहेर पडले.

३ फेब्रुवारी ⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३ फेब्रुवारी १६७० राजगडावरून कोंढाणा घेण्याची जय्यत तयारी झाली. शिवछत्रपतींचा आणि माँसाहेब जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन तानाजी मालुसरे, शेलारमामा आणि सूर्याजी मालुसरे मावळ्यांच्या तीन तुकड्या घेऊन कोंढाणा घेण्यासाठी ३ फेब्रुवारीच्या रात्री तयारीनिशी बाहेर पडले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३ फेब्रुवारी १७३६ पेशवे अनेक खंडण्या घेत कुकसी फत्ते करून लुनावडा, बासवाडा, डोंगरपूर आदि राजपुतान्यातील अनेक राजेरडवाड्यांकडून सत्कार स्वीकारित उदेपूर राण्याच्या भेटीस गेले. चंपाबागेत राण्याने बाजीरावांच्या भेटीसाठी खास शामियाना उभारला. पेशव्यांनी जाऊन राणाजींची भेट घेतली तेव्हा बरोबरीच्या नात्याने बाजीराव पेशव्यास जवळील सुवर्णमंडित सिंहासनावर बसण्यास राणाजीने विनंती केली. ह्या विनंतीचा अव्हेर पेशव्यांनी मोठ्या नम्रतेने केला. पेशवे राणाजीस म्हणाले, “राणाजी आपण चक्रवर्ती आहात, आपल्या बरोबरीने मी बसणे अयोग्य होईल.” असे बोलून पेशवे राणाजीच्या जवळील पण थोडेसे सखल असलेल्या आसनावर अधिष्ठीत झाले. मग उभयताचे संभाषण सुरू झाले. त्यात राण्याने पेशव्यांच्य...

तंजावरचे महाराज साहेबांचे आज पुण्यात स्वागत करण्याचे संधी मिळाली. पुणे येथील आमदार निवास या ठिकाणी मोहिते.

तंजावरचे महाराज साहेबांचे आज पुण्यात स्वागत  व सत्कार करण्याचे संधी मिळाली. पुणे येथील आमदार निवास या ठिकाणी मोहिते घराण्याचे इतिहास अभ्यासक संशोधक, क्षत्रिय जनसंसद महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव राजेंद्रजी मोहिते पाटील , वंशावळी जतन करणारे इतिहास अभ्यासक अटक वीर पायगुडे घराण्यातील वंशज मिलिंदजी पायगुडे व इतिहास अभ्यासक मुकुंदजी पायगुडे, तसेच कुडाळ परगण्याचे देशमुख व इतिहास अभ्यासक मोडीवाचक श्रीनिवासजी शिंदे देशमुख , गाव गाड्याचे इतिहास संशोधक , तसेच मोडीवाचक युट्यूबर श्री महिंद्रजी नवले, प्राणी मित्र ,इतिहास संशोधक,शेख साहेब, तसेच मोडी तज्ञ इतिहास अभ्यासक ,लेखक इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य श्री राम वाघोले , अखंड भारतामध्ये चालुक्य घराण्याचे मुख्य संघटक उपस्थित होते. इतिहास अभ्यासक लेखक श्रीराम वाघोले व महाराज साहेब  क्षत्रिय जनसंसद महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव इतिहास अभ्यासक राजेंद्र जी मोहिते पाटील व महाराज साहेब कुडाळ प्रगण्याचे देशमुख इतिहास अभ्यासक श्रीनिवासची शिंदे व महाराज साहेब गाव गाड्याचे इतिहास अभ्यासक मोडीतज्ञ युट्युबर श्री नवले साहेब  प्राणी मित्र व इतिहास अभ्या...