२० फेब्रुवारी १६६१छत्रपती शिवरायांनी खारेपाटण जिंकले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२० फेब्रुवारी १६६१
छत्रपती शिवरायांनी खारेपाटण जिंकले.
प्राचिन काळी व्यापारी गलबते विजयदुर्गाजवळ वाघोटन खाडीत शिरत व तेथून खारेपाटण ‘‘बलिपत्तन’’ गावापर्यंत येत. येथे जहाजातून माल उतरवून तो बावडा, फोंडा घाटामार्गे देशावर पाठविला जात असे. अशा या प्राचिन बंदराचे, राजधानीचे रक्षण करण्यासाठी खारेपाटणचा किल्ला बांधण्यात आला. इ.स १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी राजापूर पाठोपाठ खारेपाटण किल्ला जिंकून घेतला. राजापूर येथे अटक करण्यात आलेल्या इंग्रज अधिकारी गिफर्ड यास खारेपाटण किल्ल्यातील अंधार कोठडीत ठेवण्यात आले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२० फेब्रुवारी १६७२
मराठ्यांच्या इतिहासाचा आणि कर्तृत्वाचा डंका छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्या कर्तृत्ववान मराठ्यांमुळे जगभर पोहोचला. हे आपण प्रेमापोटी बोलत असतो पण आता ही गोष्ट प्रेमापोटी नाही तर खरोखर आहे.
कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल एक बातमी द लंडन गॅझेट मध्ये शिवरायांच्या हयातीत इंग्लंड मध्ये छापून आली होती. विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची ही बातमी त्यावेळी पहिल्या पानांवर छापून आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर टाकलेल्या दुसऱ्या छाप्याची बातमी या दैनिकात २० फेब्रुवारी १६७२ या दिवशी छापून आली होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२० फेब्रुवारी १७०७ 
(काही ठिकाणी ३ मार्च १७०७ अशी तारीख आहे)
रोजी औरंगजेबाचा मृत्यू झाला
औरंगजेब शिवराज्य संपवायला आला, आणि स्वताची कबर त्याला खोदावी लागली. महाराज म्हणायचे, "माझे छोटे-मोठे ३६० किल्ले आज दिमतीला आहेत, एक गड एक वर्ष जरी लढला तरी सर्व स्वराज्य जिंकायला ३६० वर्ष लागतील, मग इतक्या वर्ष आलमगीर तरी जगेल काय" ? अन ते खरे झाले, आलमगीराला याच भूमीत देह त्यागावा लागला.
आपण जेवढे औरंगजेबाचे मोठेपण मान्य करू तेवढे महाराज मोठे होतात. औरंगजेब म्हणायचा," माझे शहजादे, वजीर, सरदार, अमीर-उमराव, सैन्य याच्या पेक्षा एकटे छत्रपती संभाजी राजे माझ्याकडे असते तर मी कधीच झालो असतो आलमगीर पुऱ्या दुनयेचा"...! महाराजांच्या वेळी राजकीय युद्धे होती हे आपण समजून घेतले कि खरे शिवचरित्र समजायला सुरवात होते.
मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जिंकले.
औरंगजेबाच्या पाच लाख सेनासागराशी तब्बल सात वर्षे यशस्वी झुंज देऊन महाराष्ट्र गिळायला आलेल्या औरंगजेबाचे थडगे महाराष्ट्राच्या महाराणीने याच महाराष्ट्रात बांधले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२० फेब्रुवारी १८०२
शिंदेंनी इंग्रजांचा तह स्विकारला नाही
इंग्रज वकील कॉलिन्स हा उज्जैन येथे २० फेब्रुवारी १८०२ रोजी पोहोचला आणि मे महिन्यापर्यंत कॉलिन्सचा मुक्काम उज्जैन येथे होता, बडोद्याच्या गायकवाड प्रमाणेच दौलतराव शिंदे यांवरही तैनाती फौजेचा तह करावा म्हणून दडपण वाढत होते, यावेळी कॉलिन्सने दौलतराव शिंदें समोर एक चार कलमी मसुदा मांडला होता पण दौलतरावाने कॉलींस च्या बोलण्याकडे मुळीच लक्ष दिले नाही, शेवटी कॉलिन्स वैतागून मे १८०२ मध्ये शिंदेंच्या दरबारातून परत गेला,त्या अगोदर उज्जैन हून कलकत्ता येते पत्र पाठवले त्या पत्रात असे स्पष्टपणे नमूद केले होते,
"दौलतराव शिंदे तर आपले स्वतंत्र गमावणारा तैनाती फौजेचा तह करणारच नाही उलट बाजीराव पेशव्याने अशा प्रकारचा त करू नये म्हणून आपल्या प्रभावाचा पूर्णपणे उपयोग करण्यास तीळ भर ही कसर बाकी ठेवणार नाही,"

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२० फेब्रुवारी १८१८
२० फेब्रुवारी १८१८ ला आष्टी येथे झालेल्या लढाईत बाजीरावचा पराभव झाला. आष्टी येथे इंग्रजांशी झालेल्या बोलण्यानुसार प्रतापसिंह, त्यांचे दोन बंधू, मातोश्री माईसाहेब, बळवंतराव चिटणीस आदी मंडळी जनरल स्मिथच्या फौजेत मिसळले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२० फेब्रुवारी १८१८
इंग्रज आणि सिंहगड
नोव्हेंबर १८१७ मध्ये पुणे जिंकल्यावर इंग्रजांनी धडाधड मराठ्यांचे किल्ले घेण्याचा सपाटा लावला. सिंहगड आणि आसपासच्या किल्ल्यांचा ताबा घ्यायची जबाबदारी ब्रीगेडीअर जनरल थिओडोर प्रिट्झलरवर सोपवण्यात आली. ह्या कामगिरीसाठी मद्रास आणि मुंबई रेजिमेंटचे एकूण ४१०० सैनिक त्याला देण्यात आले. 
प्रिट्झलरने आधी किल्ल्याची नीट पाहणी केली. त्याच्या असे लक्षात आले की खोल दरी आणि उंच चढ असल्याने किल्ल्यावर उत्तरेकडून हल्ला करणे फार कठीण आहे. पण सिंहगडाच्या उत्तरेला पुणे असल्याने तेथून काही मदत येऊ नये म्हणून त्याने २ / ९ बॉम्बे इन्फन्ट्री आणि काही घोडेस्वार उत्तरेकडे सिंहगड आणि पुणे ह्यांच्या मध्ये ठेवून दिले. 
गडावर १५०० ते २००० शिबंदी होती अशी माहिती प्रिट्झलरला मिळाली. २० फेब्रुवारी १८१८ रोजी त्याने किल्ल्यावर काही चढाया करून पाहिल्या तेव्हा त्याच्या लक्षात आले की फक्त दक्षिण आणि पश्चिमेकडून गडावर व्यवस्थित हल्ला करता येऊ शकतो - उत्तरेकडून अजिबात नाही. पण पूर्वेकडूनही थोडासा दबाव बनवणे गरजेचे आहे कारण तिथून गडावरचे सैन्य दक्षिणेला मारा करू शकतं. ह्या पाहणीनुसार त्याने त्याच्या सैन्याची वाटणी आणि रचना केली. माऱ्याचा मुख्य जोर दक्षिणेकडून आणि पश्चिमेकडून होता. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

महाराज शिवाजी राजे ऑफ तंजावर साहेबांचे आज पुण्यात स्वागत व सत्कार करण्याचे संधी मिळाली. विविध इतिहास अभ्यासकांना महाराज साहेबांनी आज मोलाचे मार्गदर्शन केले.

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४