Posts

Showing posts from March, 2025

श्रीज्ञानदेवांची_गुढी

Image
#श्रीज्ञानदेवांची_गुढी श्रीज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथराज #ज्ञानेश्वरी मध्ये गुढी या शब्दाला चार वेळा स्थान दिले आहे. या चारही ओव्या वेगवेगळ्या अध्यायांत आहेत. साहजिकच श्रीमाऊलींनी या शब्दाची योजना त्यांच्या समृद्ध साहित्यात केल्याने त्याला #सौभाग्य प्राप्त झाले आहे. पण नेमका त्या शब्दाची योजना कशी केली आहे हे आपण बघुया. पहिले अध्याय चार मधील उल्लेख पाहू...  अधर्माची अवधी तोडी | दोषांची लिहिली फाडी |  सज्जनांकरवी गुढी | सुखाची उभवी || भक्तांचा कैवार घेऊन भगवंत जेव्हा सगुण साकार होऊन अवतरतो तेव्हा त्याच्याकरवी संपूर्ण अज्ञानाचा अंधकार नाहीसा होतो. #जगताचा पालन करता #जगन्नाथ इथे अधर्माचा शेवट करितो, पापांचा जमाखर्च फाडून टाकितो आणि साधुपुरुषांच्या करवी भक्तीचा प्रसार करवून सर्वत्र सुखाच्या #गुढ्या उभारतो. इथे गुढी हा शब्द #सौख्यप्राप्ती आणि धर्माची विजयपताका म्हणून योजला आहे. दुसरा उल्लेख अध्याय सहामध्ये आहे.  ऐके संन्यासी तोचि योगी | ऐसी एकवाक्यतेची जगी |  गुढी उभविली अनेगी | शास्त्रांतरी || संन्यास आणि योग यातील मूळ प्राप्तीचा उद्देश हा भिन्न नसून एकच आहे असे भगवान श...

सरदार जोत्याजीराव पाटणकर

सरदार जोत्याजीराव पाटणकर (बकुळीचा वाडा) इ. स.१७४२ -१७६३ चांदजीरावांचे पुत्र सुभानराव यांना एकच पुत्र होता त्यांचे नाव ज्योत्याजीराव असें होते. है फार पराक्रमी व शुर होते. मराठ्यांच्या राज्यांत पूर्वजांनीं पराक्रमानें मिळविलेल्या जहागिरींत राहन हिस्सेरशी करीत बसणें त्यांच्या स्वभावाला आवडत नसे. स्वतंत्रपणें आपल्या पराक्रमांने नवीन जहागीर मिळवून लौकिक वाढावावा अशा स्तुत्य हेतूनें जोत्याजीराव निजामाच्या राज्यांत गेले व त्या ठिकाणीं त्यांनीं अनेक पराक्रम करून थोड्यांच काळांत तीन लक्षांची जहागिरी मिळविली, हे शक्तिमान्, साहसी व युद्धकलानिपुण होते. तलवार, बंदूक, भाला वगैरे त्यावेळी उपलब्ध असलेल्या सर्व श्त्रांचा उपयोग निरनिराळ्या प्रसंगीं ते मोठ्या कुशलतेनें करीत, यामूळें त्यांच्याशीं युद्ध करणें इतर योध्यास फार धोक्याचे वाटे.जोत्याजीराव धर्नुविद्येतही निपुण होते. त्यामुळें उंचस्थानीं हत्तीवर अंबारींत बसून कित्येक वेळा ते लढत. शाहमहाराजांच्या कारकिदीत कित्येक मराठे सरदार निजामास मिळ्ाले. त्यांपैकीं बहतेक इकडील दरबारची इतराजी झाल्यामुळें तिकडे गेलेले होते, परंतु जोत्याजीरावांची स्थिती तशी नव्...

छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त पुण्यस्मरण आभिवादन...

Image
बालपण :- महापराक्रमी, कर्तृत्वान माणसांच्या बाबतीत तुकाराम महाराज एका अभंगात असं म्हणतात.   न लगे चंदना सांगावा परिमळ वनस्पतिमेळ हाकारूनी अंतरीचे धावे स्वभावें बाहेरी  धरिता ही परी आवरे ना….   किल्ले पुरंदराचे भाग्य उजळले १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदराचे जणू भाग्य उजळले आणि त्याच्या साक्षीने स्वराज्याचा वारसा पुढे नेणारा ‘संभाजी’ नामक महापराक्रमी, जगातला सर्वोत्तम पुत्र,जन्माला आला. शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांच्या आनंदाला तर पारावार उरला नाही. चंद्रकोरीप्रमाणे लहानग्या संभाजी राजांच्या लीला वाढत होत्या. पण आपल्या पुत्राची वैभवशाली कारकीर्द कर्तबगार महाराणी सईबाईंना पाहता आली नाही.      पुण्याजवळील कापूर होळ येथील धाराऊ गाडे पाटील यांनी संभाजी महाराजांना लहानपणी स्वतःचं दूध आई होऊन पालन केले . शिवाय राजमाता जिजाऊ यांनी सांभाळ व शिक्षण दिले. त्यांच्या सावत्र आई पुतळाबाई यांचा खूप जीव संभाजी राजा वरती होता.  कोवळ्या वयात वडील छत्रपती शिवाजी महाराजांकडून  संभाजी महाराजांना राजकारणाचे धडे  मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान ...

२८ मार्च १६७०मराठा फौजेचा माहुली गडावर ताबा.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २८ मार्च १६७० आग्र्याहून सुटल्यानंतर छत्रपती शिवरायांनी उठवलेल्या वादळी झंझावाताला रोखण्यासाठी औरंगजेबाने मुघल सरदार दाऊदखानला दख्खनमध्ये पाठवले. आजच्या दिवशी दाऊदखान फौजफाटा घेऊन नगरला पोहोचला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २८ मार्च १६७० मराठा फौजेचा माहुली गडावर ताबा. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २८ मार्च १७३७ बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.  मे १७३६ मध्ये दिल्लीच्या बादशहाकडून अनेक किल्ले, जहागिर्‍या आणि पन्नास लक्ष रुपये मिळण्याचा तह झाला पण तो पुरा न झाल्याने २८ मार्च १७३७ रोजी पेशव्यांनी थेट दिल्लीवर धडक मारून दुसर्‍या दिवशी रामनवमीस यात्रा लुटली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड, सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र. "जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

,**सरसेनापती संताजीराव घोरपडे यांचे पुत्र राणोजी घोरपडे ,,*

*इ,सन,(१७०१ ते १७०२)* *सरसेनापती संताजीराव घोरपडे यांचे पुत्र राणोजी घोरपडे ,,* *राणोजींच्या नेत्रदीपक* *यशाकडे.इतिहासकारांचे जावे तसे लक्ष गेले नाही ,*  , *वीर राणोजी घोरपडे यांच्या हालचाली व पराक्रम* , *सन . १७०१ व १७०२ ही वर्षे यांनी गाजवुन मलकापूर येथे बादशहाच्या सैन्याच्या पिछाडीवर त्यांचा धाडसी हल्ला आणि सातारच्या किल्याला त्यांनी दिलेला शह या त्यांच्या दोन मोठ्या कामगिरी ,* *इ,स. २० एप्रिल १७०१* *वीर राणोजी घोरपडे 🚩⚔️* *पन्हाळा वेढा चालू राणोजी घोरपडे वीस हजार सैन्यासहित चिकोडी ऐनापुराकडुन पन्हाळ्याच्या दिशेने शहजादा बेदारबख्त सोळा हजार स्वरासहीत राणोजींच्या विरुद्ध रवाना,* , *३० एप्रिल १७०१* *राणोजी घोरपडे यांच्या विरुद्ध बेदारबख्तची रवानगी बरोबर बावीस हजार स्वार ,* , *२५ नोव्हेंबर १७०१* *संताजींचा मुलगा राणोजी घोरपडे आंब्याचे ठाणे उध्वस्त करून. मिरजेकडे जातात ,,,* , *६ डिसेंबर १७०१* *राणोजी घोरपडे यांचा हल्ला मलकापूर येथे मोगल सैन्यांच्या पिछाडीवर राणोजींचा जबरदस्त हल्ला,,* , *२३ डिसेंबर १७०१ बातमी* *राणोजी घोरपडे हे कराड भागात धामधूम करीत आहे, धान्याची रसद त्यांनी घेतली ...

१८ मार्च १६७९छत्रपती शिवरायांनी विजापुरांकडून बहाद्दुर बांडा किल्ला जिंकला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १८ मार्च १५९४ स्वराज्य संकल्पक महाराज साहेब शहाजीराजे भोसले यांचा वेरुळ (महाराष्ट्र) येथे जन्म (मृत्यू २३ जानेवारी १६६४) छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील व निजामशाही – आदिलशाहीतील एक मातब्बर सरदार. ऐतिहासिक कागदपत्रांत त्यांचा शाहजी किंवा स्याहजी असाही नामोल्लेख आढळतो. त्यांच्या जन्मतारखेविषयी एकमत नाही. बहुतेक तज्ज्ञ बिकानेर आणि जोधपूर येथील उपलब्ध जन्मपत्रिकांतील तारीख (१६ मार्च १५९४) ग्राह्य धरतात. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १८ मार्च १६७९ छत्रपती शिवरायांनी विजापुरांकडून बहाद्दुर बांडा किल्ला जिंकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १८ मार्च १६८० आदिलशाहित सर्जाखानाला विजापुरी सैन्याचा मुख्य सेनापती केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १८ मार्च १६८८ हरजीराजे महाडिक त्रिणामल्लीहून कंचीवर गेले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १८ मार्च १७६० चैत्री पाडाव्याच्या शुभ मुहूर्तावर राजमाता जिजाऊंचे माहेरघर सिंदखेदराजा येथून सदाशीव भाऊ यांनी आपल्या सहकार्यांसह उत्तरेकडे प्रयाण केले. त्यावेळी ५० हजारांची फौज सोबत होती. शिंदे-होळकर मार्गात मिळणार होते. अहमदशाह अब्दाली याच्या आक्रमणापा...

१५ मार्च १६७०छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी मोगलांकडून जिंकून घेतली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ मार्च १६६१ छत्रपती शिवाजी राजांनी राजापुरची इंग्रजांची वखार खणून काढून पन्हाळ्याचा सूड उगवला. राजापूरकर इंग्रजांनी सिद्दी जौहरला सहाय्य करून महाराज वेढ्यात आडकलेले असताना, निशाण लाऊन पन्हाळ्यावर तोफा डागल्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ मार्च १६६९ पैशाअभावी मुलीच्या लग्नाची टाळाटाळ करणाऱ्या विठोजी हैबतराव शिळीमकारास जिजाऊ साहेबांनी २५ होन रोख व ५०० माणसांचे सामान देवून त्याच्या मुलीचे लग्न गोमाजी नाईक यांच्या मुलासोबत झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ मार्च १६७० छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी मोगलांकडून जिंकून घेतली. कल्याण व भिवंडीकरांनी आजचा दिवस सणासारखा साजरा करावा. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ मार्च १६७० माहुली गडावर मनोहरदासने छत्रपती शिवरायांचा छापा हेरून मराठ्यांवर हल्ला चढवला व ह्या लढाईत १ हजार मराठे कापले गेले. हि गोष्ट छत्रपती शिवरायांच्या जिव्हारी सलू लागली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ मार्च १६८० छत्रपती राजाराम महाराजांचे जानकीबाईंशी लग्न वीरगती लाभलेल्या सरनौबत प्रतापराव गुजरांची लेक जानकीबाई. छत्रपती शिवाजी महाराजांच्या च...

*१३ मार्च इ.स.१६६५**मिर्झाराजे जयसिंग यांच्या परवानगीनंतर मिर्झाराजाच्या फौजांनी दिलेरखानाच्या नेतृत्वाखाली किल्ले पुरंदरला वेढा टाकला.आणि सुरू झाला मराठ्यांचा एल्गार.*

*१३ मार्च इ.स.१६६५* *मिर्झाराजे जयसिंग यांच्या परवानगीनंतर मिर्झाराजाच्या फौजांनी दिलेरखानाच्या नेतृत्वाखाली किल्ले पुरंदरला वेढा टाकला.आणि सुरू झाला मराठ्यांचा एल्गार.*

११ मार्च १६८९छत्रपती संभाजी महाराज बलिदानदिन...

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ मार्च १६७७ दक्षिणदिग्विजय मोहिम दि. ११ मार्च १६७७ रोजी, राजे हैद्राबादहून निघाले . महाराज जिंजी, वेलोर, यमन गोंडा, आणि पोर्तो नोव्होचा कर्नाटकचा भाग विजापूरच्या ताब्यातून घ्यावयास निघाले. कुतुबशहाने १ हजार घोडदळ, ४ हजार पायदळ आणि एक अनुभवी सेनापती राजांच्या बरोबर दिला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ मार्च १६८९ छत्रपती संभाजी महाराज बलिदानदिन... औरंगजेबाची अखेरंची सजा, "छत्रपती संभाजींच मस्तक कलम करा". आणि छत्रपति संभाजींच मस्तकं छाटलं गेलं. भाल्याच्या फाळाला अडकवलं आणि ""गुढीपाडव्याच् या आदल्या दिवशी महाराष्ट्रात संभाजींच्या मस्तकाची गुढी उभारंली". निघाली वाजत...गाजत! आली "इंद्रायणी - भीमेच्या" तीरावरं त्या रेतीत रोवला तो भल्याचा फाळं आणि मस्तकातनं रक्ताचा एक थेंब पडला "इंद्रायणी - भीमेच्या" पात्रात आणि थरारली ""इंद्रायणी - भीमा"" अरे!!! याच "इंद्रायणी - भीमेनं" पाहिलं होतं ते शौर्य, ते धाडसं, ते साहसं, तो पराक्रम, ती ज्वलाज्वलन तेजसनिष्ठा, ते धैर्य, तो संयम,...

१० मार्च १६७७५ फेब्रुवारी १६७७ ते १० मार्च १६७७ या कालावधीमध्ये हैदराबाद येथील भागानगर मधील मुक्काम आटोपून छत्रपती शिवरायांचे दक्षिण दिग्विजयसाठी दक्षिणेकडे प्रस्थान.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १० मार्च १६१५ मोघल साम्राज्याचा कडवा, धर्मवेडा बादशहा औरंगजेब याचा जन्म. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १० मार्च १६४९ स्वराज्य संकल्पक थोरले महाराज साहेब "शहाजीराजे" यांना कैद करून आदीलशाही सरदार "अफझलखान" विजापूर मध्ये आला. यावेळी "किल्ले जिंजी" ची अपार लूट एकूण ८६ हत्तींवर लादून त्याने विजापूरात नेली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १० मार्च १६५९ शिवापट्टण गाव वसविले. या दिवशी महाराज राजगडावरून जामखेड येथील (खर्डा किल्ला) शिवापट्टण येथे आल्याची नोंद आहे. याच दिवशी हे गाव वसविण्याचे कार्य पूर्ण झाले. तसेच वर्ष प्रतिपदा येथेच साजरी करण्याचे महाराजांनी ठरविले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १० मार्च १६७३ किल्ले रायगडहून किल्ले पन्हाळगडाकडे जाताना वाटेत छत्रपती शिवरायांचा किल्ले प्रतापगडवर मुक्काम. प्रतापगडावर भवानी देवीची महाराजांकडून पूजा. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १० मार्च १६७७ ५ फेब्रुवारी १६७७ ते १० मार्च १६७७ या कालावधीमध्ये हैदराबाद येथील भागानगर मधील मुक्काम आटोपून छत्रपती शिवरायांचे दक्षिण दिग्विजयसाठी दक्षिणेकडे प्रस्थान. 🏇🚩🏇🚩🏇...

९ मार्च १६८९इ.स १६८९ - ९ मार्च रोजी संभाजीराजेंच्या अटकेची वार्ता ऐकून हरजी महाडिक यांनी केसो त्रिमल यांना जिंजीस अटक केली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ९ मार्च १६५० संत तुकाराम महाराज स्वर्गवासी संत तुकाराम महाराज यांचा जन्म देहू (पुणे जिल्हा) येथे झाला, भगवद्‍गीता, ज्ञानेश्वरी, एकनाथाचे, रामायण इत्यादिंचा त्यांचा व्यासंग होता. आपल्या जीवनातून व अभंगातून शुद्ध परमार्थधर्माच्या स्थापनेचे कार्य त्यांनी केले.  तुकारामांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत, त्यातल्या चार संभाव्य तारखा इ.स. १५६८, इ.स. १५७७, इ.स. १६०८ आणि इ.स. १५९८ या आहेत. इ.स. १६५० मध्ये त्यांना स्वर्गवास झाला. तुकाराम म्हणजे दिवाळे निघाल्यामुळे असहाय होऊन ईश्वराच्या भक्तीकडे वळलेला, नीटपणे संसार करू न शकलेला, सदैव टाळ कुटत बसलेला, व्यवहारशून्य, भोळाभाबडा किंबहुना भोळसट संत, असे काहीसे त्यांचे चित्र अनेकदा आपल्यासमोर उभे करण्यात आले आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, येथील समाजमनावर प्रभाव गाजवत असलेल्या एका उद्दाम, अहंकारी आणि धर्माच्या नावावर अनीतीचा बाजार मांडणाऱ्या धर्मसत्तेला कडे आव्हान देणारा हा संत म्हणजे एक महान लढवय्या होता.' 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ९ मार्च १६६० आपलेच राष्ट्रद्रोही... महाराज पन्हाळ्य...

८ मार्च १६७०पुरंदरच्या तहात गमावलेला पुरंदर वज्रगड निळोपंत मुजुमदारांनी छापा घालून मोगलांकडून कब्जा केला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ८ मार्च १५४६ पोर्तुगीज राजाकडून गोव्याच्या गव्हर्नरला एक फर्मान आले. ते फर्मान असे. 'गोव्यातील हिंदूंच्या मूर्तींचा नाश करा. त्यांची देवळे पाडा. हिंदूंना धार्मिक उत्सव करण्यास बंदी घाला. ब्राम्हणांना गोवे प्रांताबाहेर हाकलून द्या. सरकारी अधिकाराच्या जागा फक्त जे ख्रिस्ती धर्म स्वीकारतील त्यांनाच द्या.'  ह्या फर्मानाची ताबडतोब अंमलबजावणी झाली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ८ मार्च १६७० पुरंदरच्या तहात गमावलेला पुरंदर वज्रगड निळोपंत मुजुमदारांनी छापा घालून मोगलांकडून कब्जा केला. किल्लेदार रसिउद्दिन पंतांच्या हाती पडला. गड फत्ते झाला. ज्या पुरंदरासाठी दिलेरखान व मिर्झाराजांनी जंग जंग अतोनात प्रयत्न केले, आणि तरिही अखेरपर्यंत जो त्यांना मिळाला नाही, तोच पुरंदर निळोपंतांनी २४ तासात काबीच केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ८ मार्च १६७३ नरवीर कोंडाजी फर्जंद...🚩 इ.स ८ मार्च १६७३ रोजी रायगड येथे कोंडाजींनी पन्हाळा फत्ते केल्याची बातमी जासुदामार्फत कळाली कोंडाजींच्या शूरत्वाची बातमी समजताच छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर दाखल झाले कोंडाजींची पन्ह...

७ मार्च १६४७इ.स. १६४७ मधे सतरा वर्षांच्या छत्रपती शिवरायांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ७ मार्च १६४७ इ.स. १६४७ मधे सतरा वर्षांच्या छत्रपती शिवरायांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवरायांनी कोंढाणा(सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.या शिवाय तोरणगडा समोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ७ मार्च १६४७ शहाजीराजे यांचे सेवक व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे साक्षीदार दादाजी कोंडदेव यांचे पुणे येथे वृद्धापकालाने निधन. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ७ मार्च १६६५ सिंहगडाखाली मार खाल्लेला महाराजा जसवंतसिंह राठोड पुण्यातच हाय हाय करीत बसला होता. त्याने छत्रपती छत्रपती शिवरायांविरूद्ध नंतर एकही पाऊल उचलले नव्हते. मिर्झा राजांना पुण्याचा अम्मल देऊन टाकून जसवंतसिंह याच दिवशी दिल्लीला निघून गेला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ७ मार्च १६८० आजच्या दिवशी छत्रपती राजाराम महाराजांची मुंज रायगडावर झाली. लगेच आठ दिवसांनी १५ मार्च रोजी राजाराम...

स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

Image
स्वराज्याचे तिसरे छत्रपती व छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर आपल्या राजकीय मुत्सद्दीपण, युद्धकौशल्य आणि व्यवहारचातुर्याने स्वराज्याची धुरा सलग ११ वर्षे सांभाळणारे स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.  छत्रपती राजाराम हा सन १६७०च्या २४ फेब्रुवारीला जन्म झाला . जन्मतानाने ते पायाकडून जन्मले म्हणून सर्वजन चिंतित झाले असतां, छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पातशाही पालथी घालेल असे भविष्य वर्तविले. प्रत्यक्षात जरी छत्रपती राजाराम महाराज पातशाही पालथी घालण्यत प्रतिकूल काळात मोठे धैर्य दाखवून योगदान दिले आणि त्यानीं पातशहाला झुंजवत ठेवून यश मिळू दिले नाही, पातशाही खिळखिळी केली.   प्रतिस्पर्धी मोगलांनी फोडा आणि वतने देऊन मराठी लोकांना स्वराज्याचा बाबतीत निष्क्रिय करणे सुरू केले होते.  वतनदारीची जी पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी मोडली होती ती परत वर आली. याचा आपल्या छोट्या स्वराज्याला  फार तोटा झाला. त्यातच महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. लालूच, दुष्काळ आणि वतनाचा लोभ ही तीन कारणे एकत्र आल्यामुळे स्वराज्यातील बहुतेक वतन...

१ मार्च १६५९कोकणातील सावंत आणि भोसले यांच्याबरोबर छत्रपती शिवरायांचा करार झाला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १ मार्च १५७२ प्रतापसिंह महाराणा झाला प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापास १ मार्च १५७२ रोजी महाराणा केले. तो महाराणा झाला त्यावेळी राजधानी चितोड शत्रूच्या हातात गेली होती. अनेक राजपूत अधिपतींनी अकबराचे स्वामित्व पतकरले होते व काहींनी आपल्या मुली त्यास देऊन शरीरसंबंध जोडला होता; पण राणाप्रतापने त्याच्यापुढे मान लवविली नाही. त्याने चितोड अकबराच्या हातून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि आपले वास्तव्य अकबराच्या सैन्याच्या दृष्टिक्षेपापासून दूर ठिकाणी केले. प्रजेला अरवलीच्या डोंगराळ भागात, जेथे अकबराचा उपद्रव पोहोचणार नाही, अशा ठिकाणी वस्ती करण्यास लावले. तेथेच त्याने काही भागात शेती केली. मेवाडचा मैदानी प्रदेश ओसाड करून टाकला आणि आपली राजधानी गोगुंड येथे नेली. सर्व डोंगरभागांतून अभेद्य असे किल्ले बांधले व ते शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १ मार्च १६३० शाहजहान बऱ्हाणपूरला पोहोचला. इथे रावरतनच्या हाताखाली दहा हजारांचे दळ बनवले. वाशीमची बाजू धरून ठेवणे व तेलंगाण नियंत्रणाखाली...