११ मार्च १६८९छत्रपती संभाजी महाराज बलिदानदिन...
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
११ मार्च १६७७
दक्षिणदिग्विजय मोहिम
दि. ११ मार्च १६७७ रोजी, राजे हैद्राबादहून निघाले . महाराज जिंजी, वेलोर, यमन गोंडा, आणि पोर्तो नोव्होचा कर्नाटकचा भाग विजापूरच्या ताब्यातून घ्यावयास निघाले. कुतुबशहाने १ हजार घोडदळ, ४ हजार पायदळ आणि एक अनुभवी सेनापती राजांच्या बरोबर दिला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
११ मार्च १६८९
छत्रपती संभाजी महाराज बलिदानदिन...
औरंगजेबाची अखेरंची सजा, "छत्रपती संभाजींच मस्तक कलम करा". आणि छत्रपति संभाजींच मस्तकं छाटलं गेलं. भाल्याच्या फाळाला अडकवलं आणि ""गुढीपाडव्याच् या आदल्या दिवशी महाराष्ट्रात संभाजींच्या मस्तकाची गुढी उभारंली". निघाली वाजत...गाजत! आली "इंद्रायणी - भीमेच्या" तीरावरं त्या रेतीत रोवला तो भल्याचा फाळं आणि मस्तकातनं रक्ताचा एक थेंब पडला "इंद्रायणी - भीमेच्या" पात्रात आणि थरारली ""इंद्रायणी - भीमा"" अरे!!! याच "इंद्रायणी - भीमेनं" पाहिलं होतं ते शौर्य, ते धाडसं, ते साहसं, तो पराक्रम, ती ज्वलाज्वलन तेजसनिष्ठा, ते धैर्य, तो संयम, मानवी जीवनाच्या चिरंतन तत्वाशी जुळंलेलं "छत्रपती संभाजींच" ज्ञाननातं. ती "इंद्रायणी - भीमा" छत्रपती संभाजींच्या मस्तकाकडं तिरक्या माना करून आसवं ढाळू लागल्या. गेली ३५० वर्ष झाली "इंद्रायणी - भीमा" अजून रडतेचाय. सांगतेय! खरा "सर्जा संभाजीराजा" अजून कळंलाच नाही.
"छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं... कसं जगावं !!! आणि छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवंल... कसं मरावं !!!... ती "इंद्रायणी - भीमा" आजही सांगतेय........
या स्वराज्याच्या धाकल धन्यास त्रिवार मानाचा मुजरा.
!! जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे 🚩🚩
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
११ मार्च १७९५
इतिहासातील प्रसिद्ध खर्ड्याची लढाई हैदराबादचा निजाम आणि मराठ्यांमध्ये ११ मार्च १७९५ रोजी झालीत, यात निजामाचा पराभव झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
११ मार्च १८१८
कोरीगड किल्ला इंग्रजांकडे
११ मार्च इ.स. १८१८ रोजी इंग्रज कर्नल प्राथरने लूट करण्याच्या उद्देशाने या किल्ल्यावर चढाई केली. तीन दिवस लढून यश येईना. शेवटी गडाच्या दारुकोठारावर तोफेचा गोळा पडला. प्रचंड स्फोटाने गडावर आगीचे साम्राज्य पसरले. नष्ट झालेल्या दारुकोठारामुळे व गडावरील प्राणहानीमुळे मराठ्यांनी शरणागती पत्करली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
११ मार्च १९२४
क्रांतिकारक हुतात्मा हेमू कलाणी जन्मदिन
जन्म : ११ मार्च १९२४
(मृत्यू : २१ जानेवारी १९४५)
हेमू कलाणी यांचा जन्म ११ मार्च १९२४ रोजी कलानी कुटुंबात सक्कर येथे झाला. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी पुढील शिक्षण टिळक हायस्कूलमधून घेतले. तिथेच त्यांनी राष्ट्रप्रेमाची दीक्षा घेतली. डॉ. मेघाराम कलानी यांनी कराची येथे स्वराज्य मंडळ नावाची संस्था स्थापन केली होती. या संस्थेमार्फत तरुणांनी स्वराज्य सेना सक्करमध्ये उभारली. या संघटनेचे नेतृत्व हेमू कलाणींकडे होते. आपल्या शाळेतील मित्रांना एकत्र करून हिंदूस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्याची शपथ घेतली. २३ ऑक्टोबर १९४२ रोजी लष्करी सैन्य घेऊन रेल्वेगाडी उडविण्याची योजना केली. योजनेप्रमाणे हेमू व त्यांच्या मित्रांनी रेल्वे रुळाच्या फिश प्लेट्स काढण्याच्या कामास सुरुवात केली. एवढ्यात संरक्षण पथकाचे शिपाई तेथे आले. हेमू कलाणींनी सर्व सहकार्यांना पळण्यास सांगितले. कोणीही पळण्यास तयार नव्हते. तरी हेमू कलाणींनी त्यांना दरडावून पळवून लावले. पण हेमू एकटेच शिपायांच्या हाती सापडले. लष्करी कोर्टापुढे त्यांना आणण्यात आले. त्यांचा अनन्वित छळ करूनही त्यांनी आपल्या सहकार्यांची नावे सांगितली नाहीत. हेमू कलाणींनी कोर्टाच्या कामात सहभागी होण्याचे नाकारले. बचावासाठी वकीलही दिला नाही. त्यांनी लष्करी कोर्टाला एकच उत्तर दिले, "गुलामी आणि दडपशाही यांचा प्रतिकार करण्याचा मला जन्मसिद्ध हक्क आहे. त्यासाठी मी जे काही केले त्याचा मला खेद वाटत नाही. लष्कराची सैनिक गाडी पाडण्यात मला अपयश आल्याने दुःख होत आहे."
लष्करी कोर्टाने हेमू कलाणींना आजन्म कारावासाची शिक्षा फर्मावली. पण लष्करी कमांडर लॉर्ड रिचर्डसन याने ती बदलून हेमू कलाणींना फाशी देण्याचे फर्मान काढले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩
Comments
Post a Comment