स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

स्वराज्याचे तिसरे छत्रपती व छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर आपल्या राजकीय मुत्सद्दीपण, युद्धकौशल्य आणि व्यवहारचातुर्याने स्वराज्याची धुरा सलग ११ वर्षे सांभाळणारे स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. 

छत्रपती राजाराम हा सन १६७०च्या २४ फेब्रुवारीला जन्म झाला . जन्मतानाने ते पायाकडून जन्मले म्हणून सर्वजन चिंतित झाले असतां, छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पातशाही पालथी घालेल असे भविष्य वर्तविले. प्रत्यक्षात जरी छत्रपती राजाराम महाराज पातशाही पालथी घालण्यत प्रतिकूल काळात मोठे धैर्य दाखवून योगदान दिले आणि त्यानीं पातशहाला झुंजवत ठेवून यश मिळू दिले नाही, पातशाही खिळखिळी केली. 

 प्रतिस्पर्धी मोगलांनी फोडा आणि वतने देऊन मराठी लोकांना स्वराज्याचा बाबतीत निष्क्रिय करणे सुरू केले होते.

 वतनदारीची जी पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी मोडली होती ती परत वर आली. याचा आपल्या छोट्या स्वराज्याला  फार तोटा झाला. त्यातच महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. लालूच, दुष्काळ आणि वतनाचा लोभ ही तीन कारणे एकत्र आल्यामुळे स्वराज्यातील बहुतेक वतनदार, इनामदार व सरदार मोगलांना जाऊन मिळूं लागले होते.छत्रपती संभाजीराजेच्या काळात शेवटच्या काही वर्षात औरंगजेब स्वतः दक्षिणेत असल्यामुळे मराठा सरदारांना मोगली सत्तेत समाविष्ट करण्यासाठी मोगलांनी वतने देणे सुरू केले होते.

मोगलांचा वेढा स्वराज्याभोवती घट्ट होत होता. छत्रपती राजाराम महाराजांनी गड सोडून किल्लेदारांना व मोठ्या सरदारांना भेट देण्यास आरंभ केला, त्यांना आपल्या बाजुस वळविण्यास बोलनी लावली. बरेच सरदार मोगलांस मिळाले होते, त्यांची चाचपणी केली. होता होईतो मराठी मातीतील लोकांना एकत्र आणण्याचे सुरू केले. 

धर्मवीर छत्रपती संभाजीराजेच्या मृत्यनंतर स्वराज्याचा बराचसा भाग अगदी काहीच दिवसात मोगली अमंलाखाली आनला होता.

स्वराज्य राहून राहुन सातारा-परळी, विशाळगड, रत्नागिरीचा काही भाग व मोजकेच  किल्ले ऐवढे मर्यादित झाले होते अशी परिस्थिती निर्माण झाली होती. 
अशा बिकट परिस्थितीमध्ये छत्रपती राजाराम महाराजांची प्रत्यक्षात छत्रपती म्हणून कारकीर्द सुरू झाली.

छत्रपती राजाराम राजे प्रत्यक्षात पहिली लढाई १० जून १६८९ला प्रतापगडच्या पायथ्याशी झाली असे उल्लेख आढळतो.

छत्रपती राजाराम महाराजांचं दिल्ली जिंकायचे स्वप्न होते. काही पत्रांमधून स्पष्ट उल्लेख आढळतात. 

राजाराम महाराज स्वतः ह्या वेळी पन्हाळ्यास होते. मोगलांनी पन्हाळ्यास देखील वेढा घातला. राजाराम महाराजांवर संकटावर संकटे येत होती.

रामचंद्रपंत जे संभाजीच्या काळात स्वराज्यात अमात्य होते त्यांना "हुकुमतपन्हा" हा किताब दिला गेला व प्रतिनिधीस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ठरविले गेले.

   छत्रपती राजाराम महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटले व जिंजीच्या मार्गावर लागले. भवानीने दुसऱ्यांदा पन्हाळ्यावर महाराष्ट्राला साथ दिली.

 राजाराम महाराज सुटल्याचे बहादुरखानाला लक्षात आले. तुंगभद्रा नदीतीरी भीषण संग्राम झाला. महाराज स्वत लढत लढत नदीत उडी मारुन निसटून गेले. बेदनूरला राणी चेन्नामा राज्य करत होती. तिने औरंगजेबाची पर्वा न करता महाराजांना आश्रय दिला व त्यांची सुखरूप रवानगी जिंजीला केली. जिंजीकडे हरजीराजे महाडीक होते. पुढे राजांनी जिंजी हस्तगत केली.

जिंजीसारख्या ८००-९०० मैल दूर असलेल्या प्रदेशातून राजाराम महाराजांनी ओरंगजेबाविरुद्ध दोन आघाड्या उघडल्या होत्या.

अशातच  संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाच्या तुळापूर येथील छावणीवर अंधारात हल्ला चढवला व प्रत्यक्ष औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणले. 
 
 लगेच पंधरा दिवसात घोरपडे बंधूंनी झुल्फिकारखानावर हल्ला चढवून त्याचे पाच हत्ती पळवून आणले. मराठी सैन्यातील मुख्य सरदारांची दुसरी फळी तयार व्हायला सुरुवात झाली. स्वराज्यावर आलेल्या संकटांमध्ये  छत्रपती राजाराम महाराज यांच्या नेतृत्वामध्ये मराठा साम्राज्य मोगलांशी लढत होते.

 जवळ पैसे नाही, सरदार नाही, सैन्य नाही अशा काळात सरदारांना परत बोलाविण्यासाठी त्यांनी वतनदारी देणे सुरू केले.सरदार धनाजी जाधव,  सरदार संताजी घोरपडे हे दोघे सरदार व वतनदार होते पण दोघेही देशप्रेम स्वराज्य प्रेम नावाची चीज बाळगून होते.

सरदार धनाजी जाधव व सरदार संताजी घोरपडे यांनी अकस्मात हल्ले करायला सुरुवात केली. ह्या दोघांसोबत हुकुमतपन्हा, प्रतिनिधी, घोरपडे बंधू (बहिर्जी व मालोजी) आणि स्वराज्यातील इतर सर्व सरदारांनी अनेक छोट्या आघाड्या उघडल्या. दिवसरात्र पायपीट करून हे लोक हल्ले करून अकस्मात माघार घेत. यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वामध्ये मोघलांच्या बलाढ्य सेनेला महाराष्ट्रभर घायाळ करून सोडले. प्रतापगडच्या पायथ्यास  छत्रपती राजाराम महाराज हत्तीवरून लडाई लढत होते असे उल्लेख आढळतो.आणि हत्तीवरून लढणारे एकमेव छत्रपती म्हणून छत्रपती राजाराम महाराज हे होते.

जिंजीवरच झुल्फिकारखानाने हल्ला केला. त्याला मदत होती फ्रेंच सैन्याची. महाराज परत अडचणीत आले. जिंजी किल्ला मोठा कठीण. लढवायला मजबूत. महाराजांनी स्वराज्यात मदतीसाठी सांगावा धाडला आणि दिवसरात्र वाटचाल करत सरदार धनाजी जाधव व सरदार संताजी कर्नाटकात येऊन पोचले. त्यांनी शाहजादा कामबक्ष व झुल्फिकारखान या मोगली सरदारांचा धुव्वा उडवत परत एकदा जिंजीच्या आजूबाजूच्या परिसर जिंकून घेतला. 

हनुमंतराव घोरपडे या सरदारास  व सरदार कृष्णाजी घोरपडे यांना छत्रपती राजाराम महाराज पत्राद्वारे कळवतात तुम्ही जर दिल्ली घेतली तर  अडीज लक्ष होन आम्ही तुम्हाला एवढे होन देऊ. म्हणजे छत्रपती राजाराम महाराज यांना दिल्ली जिंकण्याचा स्वप्न होतं. फक्त दिल्लीच नाही विजापूर भागानगर अशी विविध प्रदेशाचे उल्लेख आलेले आहेत त्या त्या  प्रदेशानुसार नुसार रखम वेगवेगळी आहे . अशीं सरदार घोरपडे  यांच्या पत्र व्यवहारांमधून दिसते.

छत्रपती राजाराम महाराज जिंजी वरून इसवी सन १६९८ मध्ये महाराष्ट्रात आले. कोकणातील सागरी किल्ल्याची पाहणी केली. पुढे पुण्यशील पित्याच्या स्मरणार्थ सिंधुदुर्ग मध्ये शिवराजेश्वर मंदिर उभारले.

सततच्या दगदगीमुळे आणि आजारपणामुळे छत्रपती राजाराम महाराज वयाच्या ३० मध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.
फाल्गुन कृष्ण ९ शके १६२१ म्हणजे ३ मार्च १७०० मध्ये पुण्याजवळील सिंहगड येथे त्यांचा मृत्यू झाला.

नंतर छत्रपती राजाराम व नंतर त्यांचा पत्नी महाराणी ताराबाई यांनी राज्यकारभार पाहिला
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर आपल्या राजकीय मुत्सद्दीपण, युद्धकौशल्य आणि व्यवहारचातुर्याने स्वराज्याची धुरा सलग ११ वर्षे सांभाळणारे स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचा आज स्मृतीदिन ... ( ३ मार्च १७०० - सिंहगड ) 
माहिती संकलन:-नितिन घाडगे.
 छत्रपती राजाराम महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏

अधिक माहितीसाठी खालील लिंक पहावी 

http://nitinghadage.blogspot.com/2025/03/blog-post_3.html

Comments

  1. श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

    ReplyDelete
    Replies
    1. श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

महाराज शिवाजी राजे ऑफ तंजावर साहेबांचे आज पुण्यात स्वागत व सत्कार करण्याचे संधी मिळाली. विविध इतिहास अभ्यासकांना महाराज साहेबांनी आज मोलाचे मार्गदर्शन केले.

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४