१५ मार्च १६७०छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी मोगलांकडून जिंकून घेतली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१५ मार्च १६६१
छत्रपती शिवाजी राजांनी राजापुरची इंग्रजांची वखार खणून काढून पन्हाळ्याचा सूड उगवला. राजापूरकर इंग्रजांनी सिद्दी जौहरला सहाय्य करून महाराज वेढ्यात आडकलेले असताना, निशाण लाऊन पन्हाळ्यावर तोफा डागल्या.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१५ मार्च १६६९
पैशाअभावी मुलीच्या लग्नाची टाळाटाळ करणाऱ्या विठोजी हैबतराव शिळीमकारास जिजाऊ साहेबांनी २५ होन रोख व ५०० माणसांचे सामान देवून त्याच्या मुलीचे लग्न गोमाजी नाईक यांच्या मुलासोबत झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१५ मार्च १६७०
छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी मोगलांकडून जिंकून घेतली. कल्याण व भिवंडीकरांनी आजचा दिवस सणासारखा साजरा करावा.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१५ मार्च १६७०
माहुली गडावर मनोहरदासने छत्रपती शिवरायांचा छापा हेरून मराठ्यांवर हल्ला चढवला व ह्या लढाईत १ हजार मराठे कापले गेले. हि गोष्ट छत्रपती शिवरायांच्या जिव्हारी सलू लागली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१५ मार्च १६८०
छत्रपती राजाराम महाराजांचे जानकीबाईंशी लग्न
वीरगती लाभलेल्या सरनौबत प्रतापराव गुजरांची लेक जानकीबाई. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील हे शेवटचे मोठे मंगल कार्य. यानंतर १९ दिवसांनी त्यांचे रायगडावर देहावसान झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१५ मार्च १६८३
औरंगजेब दक्षिणेत उतरल्यापासून मराठा-मोघल संघर्ष जागोजागी सुरूच होते. आजच्याच दिवशी मराठ्यांचा सरदार विठोजी हा ४,००० स्वारांनिशी मोघलांवर तुटून पडला. मोठी चकमक झाली. आजच्याच दिवशी सरसेनापती हंबीरराव मोहिते २०,००० स्वार व १०,००० पायदळ घेऊन कोकणात उतरले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१५ मार्च १७१९
छत्रपती शाहुंनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपदी नियुक्त केल्यावर लगेचच बाळाजींनी पश्चिम किनारपट्टीवरील सर्वशक्तिमान सरखेल कान्होजी आंग्रे यांना छत्रपती शाहू महाराजांच्या सेवेत आणून मोठा डाव जिंकला. मुत्सद्दी बाळाजींनी परिस्थितीचा योग्य फायदा घेत थेट दिल्लीच्या राजकारणात हात घालून सहा सुभ्यांच्या सनदा मिळविल्या. सनदा मिळाल्यानंतर मराठ्यांचा उत्तरेत मुक्त संचार सुरू झाला. १५ मार्च १७१९ रोजी स्वराज्याच्या सनदा मिळवून राजमाता येसूबाईसाहेब यांना घेऊन २० मार्च १७१९ मराठी फौजा स्वराज्याकडे निघाल्या.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१५ मार्च १७७९
शपथक्रिया - महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांची
एखाद्या कार्यात दुसऱ्याच्या सोबतीने पुढे जाताना महत्वाचा असतो तो 'विश्वास'. दुसऱ्याच्या मनात काही काळंबेरं असेल तर त्याचा फटका दोघांनाही बसणार, अशा वेळी एकमेकांवरचा विश्वास दृढ व्हावा यासाठी तुळशीपत्र - बेलबंढारा  देऊन 'बंधुत्वाची शपथ' घेतली जाई. 
१५ मार्च १७७९ रोजीच्या पात्रातला हा उल्लेख पहा, 
महादजी लिहतात :  सरदारी माझी - फडनवीशी त्याची (नानाची), बंधुत्वाप्रमाणे वर्तन करू, ज्यात सरदारीचे कल्याण ते संधान चालवू, जो अनिष्ट चिंतील त्याचे पारिपत्य करू. आम्ही बेलबंढारा पाठवला आहे. आपण बंधुत्वाविषयी संशय न मानावा. आपण आहा तेथे मी आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

महाराज शिवाजी राजे ऑफ तंजावर साहेबांचे आज पुण्यात स्वागत व सत्कार करण्याचे संधी मिळाली. विविध इतिहास अभ्यासकांना महाराज साहेबांनी आज मोलाचे मार्गदर्शन केले.

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४