१० मार्च १६७७५ फेब्रुवारी १६७७ ते १० मार्च १६७७ या कालावधीमध्ये हैदराबाद येथील भागानगर मधील मुक्काम आटोपून छत्रपती शिवरायांचे दक्षिण दिग्विजयसाठी दक्षिणेकडे प्रस्थान.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१० मार्च १६१५
मोघल साम्राज्याचा कडवा, धर्मवेडा बादशहा औरंगजेब याचा जन्म.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१० मार्च १६४९
स्वराज्य संकल्पक थोरले महाराज साहेब "शहाजीराजे" यांना कैद करून आदीलशाही सरदार "अफझलखान" विजापूर मध्ये आला. यावेळी "किल्ले जिंजी" ची अपार लूट एकूण ८६ हत्तींवर लादून त्याने विजापूरात नेली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१० मार्च १६५९
शिवापट्टण गाव वसविले.
या दिवशी महाराज राजगडावरून जामखेड येथील (खर्डा किल्ला) शिवापट्टण येथे आल्याची नोंद आहे. याच दिवशी हे गाव वसविण्याचे कार्य पूर्ण झाले. तसेच वर्ष प्रतिपदा येथेच साजरी करण्याचे महाराजांनी ठरविले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१० मार्च १६७३
किल्ले रायगडहून किल्ले पन्हाळगडाकडे जाताना वाटेत छत्रपती शिवरायांचा किल्ले प्रतापगडवर मुक्काम.
प्रतापगडावर भवानी देवीची महाराजांकडून पूजा.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१० मार्च १६७७
५ फेब्रुवारी १६७७ ते १० मार्च १६७७ या कालावधीमध्ये हैदराबाद येथील भागानगर मधील मुक्काम आटोपून छत्रपती शिवरायांचे दक्षिण दिग्विजयसाठी दक्षिणेकडे प्रस्थान.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१० मार्च १६७९
मुंबईकर इंग्रजांचे सुरतेला पत्र
दिलेर ने दिलेरपणे छत्रपती संभाजीराजांचे स्वागत करताना एक हत्ती, तीन घोडे, पोशाख, तलवार, चौघडा हा नजराना दिला. शिवाय छत्रपती संभाजीराजांना ७००० स्वार आणि ७००० जातीच्या मनसबीचे आलमगीर बादशहाचे फर्मान हाती दिले. छत्रपती संभाजीराजे दिलेरच्या छावनित आल्याने दिलेरला निम्मा दक्षिण देश फत्ते केल्याचा आनंद झाला होता.
छत्रपती संभाजीराजांच्या दिलेरखानाला जावून मिळन्याच्या या नवीन आणि अनपेक्षित खेळीने सिद्धिमसूद आणि दिलेरची ८० हजार फौज जी चालून येण्यास तयारच होती, त्या प्रयत्नांच खिळ बसली गेली. याचे वर्णन प्रत्यक्ष इंग्रजांनी करून ठेवले हे बरे. मुंबईहुन सुरतला गेलेले हे पत्र असे होते. " शहजादा दक्षिणेस येवून २ महीने झाले आणि छत्रपती शिवाजींचा मुलगा छत्रपती संभाजी दिलेरखानाकडे पळून गेला. परंतु छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यामध्ये ठाणे धरून बसलेले असून मोगल अन आदिलशहा या दोघांनाही ते मोजीत नाहीत. किंवा यापैकी कोणीही त्यांच्यावर चालून जात नाही."
या पत्राची तारीख आहे १० मार्च १६७९.
आता आपणच विचार करा हे कसे घडले. छत्रपती संभाजीराजे १३ डिसेंबरला दिलेरच्या छावनित गेले. तेव्हा पासून म्हणजे १० मार्च हे पत्र लिहालेले गेले. तोवर सगळे स्तब्ध कसे. ना विजापरकरांनी स्वराज्यावर हमला केला ना दिलेरने स्वराज्याविरोधात मोहिम उघडली या दोन्ही शत्रूंना जागच्या जागी खिळवुन ठेवण्याचे यशस्वी राजकारण कोणी केले! याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजीराजे अन छत्रपती संभाजीराजांच्या या अभूतपूर्व खेळीने. छत्रपती संभाजीराजे विशिष्ट उद्देशाने दिलेरला मिळाले असावेत यावर परमानंद यानेही चांगला प्रकाश टाकला आहे. छत्रपती संभाजी राजांनी दिलेरला बहुत किल्ले व बाकीचा मुलुख हस्तगत करून देतो अशी आश्वासने देऊन चांगलेच प्रेरित केले आणि आश्चर्य म्हणजे दिलेरनेही लगेच विश्वास ठेवून विजापुरकरांच्या दिशेने आपला मोर्चा वळवीला. पहा याला म्हणतात की नाही खरा गनिमिकावा?? कालपर्यंत स्वराज्यावर एकत्र चालून जाणारे दोन मित्र छत्रपती संभाजी राजांच्या या वचनामुळे एकमेकांविरुद्ध लढायला तयार झाले. अन हो अजुन एक छत्रपती शिवाजीमहाराजांनी हंबीरमामांना आदेश दिला पाठलाग करा अन पाहा, "छत्रपती संभाजीस वाटेतच पकडून इकडे आणावा. बहुत दौडिने फौजेने पाठलाग करवा." आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाटक पहा कसे बेमालुम. छत्रपती संभाजीराजांच्या जवळ फक्त ३०० स्वार आणि पाठलाग करणार्या हंबीरमामा यांच्या जवळ २५००० फौज. हंबीररावांनी महाराजांच्या आदेशाप्रमाने अत्यंत वेगाने पाठलाग केला दरम्यान छत्रपती संभाजी राजांनी वाटेत दोन दिवस मुक्काम केला तरी तरी मोहिते त्यांना पकडू शकले नाही ??? खरोखरच हंबीरराव मोहित्यांनी जर कसूर केली असती तर महाराजांनी त्यांनी कान उघडनी नसती केली का???? बर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाप्रमाणे मोहित्यांनी वर्षभर दरम्यान कोणतीच मोहिम हातात घेतली नाही का?? म्हणजे फक्त छत्रपती संभाजीराजांचा नुसता पाठलाग करत होते का?? अहो खुळे आहोत आपण सगळे, राजे होते ते छत्रपती शिवाजीराजे. पाठलाग करण्याच्या बहान्याने ते छत्रपती संभाजीराजानां बाहेरून संरक्षण पुरवत होते जेव्हा छत्रपती शिवाजीराजांचा आदेश आला अन कामगिरी फत्ते झाली की छत्रपती संभाजीराजांना सुखरूप स्वराज्यात आनने. मला वाटते हे वाचल्यावर तुमच्या डोक्यातले बरेच प्रश्न कायमचे मेले असतील. अहो आम्हाला आमचा इतिहास कधी कळला नाही तेथे छत्रपती शिवाजीराजे अन छत्रपती संभाजीराजे काय डांबले कळणार ?
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१० मार्च १६७९
छत्रपती शिवरायांचे सरदार "थोरले आनंदराव" यांनी विजापूरच्या आदीलशहाकडून "बाळापूर" जिंकले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१० मार्च १७००
छत्रपती शिवाजी द्वितीय (छत्रपती राजाराम पुत्र) यांचे किल्ले विशाळगडावर मंचकारोहण झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१० मार्च १७०४
औरंगजेबने स्वताच्या ८९व्या वाढदिवशी कानंद खोरे मधील "किल्ले तोरणा" उर्फ "प्रचंडगड" जिंकला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१० मार्च १७३७
१० मार्च १७३७ मध्ये, उत्तरेत मोहीम करत असताना, शिंदे-होळकर यांच्या फौजेचा, मोगल सरदार सादतखान यांच्यासोबत आग्र्याजवळ सामना झाला. अचानक घडलेल्या या चकमकीमध्ये, नुकसान टाळण्यासाठी मराठा फौजेने माघार घेतली. खरे तर यामध्ये सादतखानाच्या शौर्यापेक्षा,
मराठ्यांचा बचावात्मक पवित्राच जास्त होता पण सादतखानाने मोगली सवयीनुसार "आपण मराठ्यांना हरवले"
अश्या आशयाचे पत्र लिहिले आणि सर्वजण "फते मुबारकचा जश्न मनवण्यात मग्न झाले."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१० मार्च १७३९
मानाजी आंग्रेंनी द्रोणागिरी उर्फ उरणचा किल्ला जिंकला
उरण शहर हे स्थापन झाल्यापासुन चंद्रगुप्त मौर्य व समुद्रगुप्त मौर्य यांची दिर्घकाल राजवट. देवगिरिचे यादव, पोर्तुगीज, आदिलशाह, इंग्रज व १० मार्च १७३९ ला मानजी आंग्रे यांनी उरणचा कोट, द्रोणागिरी किल्ला व उरणचा परिसर जिंकून घेतला.
उरण शहर वसन्यापूर्वी येथे जंगल होते. हे जंगल केगाव, नागांव, द्रोणगिरी, करंजा ते जासई, खोपटे खाडी पर्यंत पसरलेले होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१० मार्च १८९७
सावित्री, क्रांतिज्योति, सावित्रीबाई फ़ुले यांची पुण्यतिथी
आधुनिक युगात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात मोलाची कामगिरी करता आहेत. भारतीय स्त्रीला हे स्वातंत्र्य मिळवून देण्यात सावित्रीबाई फुले यांचा सिंहाचा वाट आहे. त्यांच्या पतीसह त्यांनी शिक्षण प्रसाराचे आणि समाज सुधारणेचे काम करण्यात आयुष्य खर्ची केले.
ज्या काळात स्त्रीला चूल व मुल या बंधनात अडकवून ठेवले होते, त्या काळात जात, धर्म, लिंग यावर आधारित समाजव्यवस्थेला न जुमानता सावित्रीबाईंनी स्त्रीमुक्तीचा व स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. १ मे, १८४७ साली त्यांनी दलितवस्तीत शाळा चालू केली व सगुणाऊला शाळा चालवण्यास नेमले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩
Comments
Post a Comment