९ मार्च १६८९इ.स १६८९ - ९ मार्च रोजी संभाजीराजेंच्या अटकेची वार्ता ऐकून हरजी महाडिक यांनी केसो त्रिमल यांना जिंजीस अटक केली.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
९ मार्च १६५०
संत तुकाराम महाराज स्वर्गवासी
संत तुकाराम महाराज यांचा जन्म देहू (पुणे जिल्हा) येथे झाला, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, एकनाथाचे, रामायण इत्यादिंचा त्यांचा व्यासंग होता.
आपल्या जीवनातून व अभंगातून शुद्ध परमार्थधर्माच्या स्थापनेचे कार्य त्यांनी केले.
तुकारामांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत, त्यातल्या चार संभाव्य तारखा इ.स. १५६८, इ.स. १५७७, इ.स. १६०८ आणि इ.स. १५९८ या आहेत. इ.स. १६५० मध्ये त्यांना स्वर्गवास झाला.
तुकाराम म्हणजे दिवाळे निघाल्यामुळे असहाय होऊन ईश्वराच्या भक्तीकडे वळलेला, नीटपणे संसार करू न शकलेला, सदैव टाळ कुटत बसलेला, व्यवहारशून्य, भोळाभाबडा किंबहुना भोळसट संत, असे काहीसे त्यांचे चित्र अनेकदा आपल्यासमोर उभे करण्यात आले आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, येथील समाजमनावर प्रभाव गाजवत असलेल्या एका उद्दाम, अहंकारी आणि धर्माच्या नावावर अनीतीचा बाजार मांडणाऱ्या धर्मसत्तेला कडे आव्हान देणारा हा संत म्हणजे एक महान लढवय्या होता.'
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
९ मार्च १६६०
आपलेच राष्ट्रद्रोही...
महाराज पन्हाळ्यात अडकले असता स्वराज्याच्या नरडीचा घोट घेण्यासाठी मायमुलखातले कपाळकरंटे वळवळू लागले. केदारजी खोपडे, गोंदाजी पासलकर यांनी वतन मिळाले तर मदत करू अशा पत्रांना उत्तर देणारी फर्मान आदिलशहाकडून मिळाली...
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
९ मार्च १६६८
छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशीही, इंग्रज, सिध्दी, पोर्तुगिज, डच इ. सत्तांना आव्हान देऊन स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांचे नाव संपूर्ण हिंदुस्थानात गाजत होते. याचमुळे औरंगजेबाने शिवरायांना "राजा" ही पदवी सन्मानाने बहाल केली. तसेच छत्रपती संभाजी महाराज नव्याने मोगली मनसबदार झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
९ मार्च १६७३
छत्रपती शिवाजी महाराज ९ मार्च रोजी रायगडाहून निघाले ते पाचाडास आऊसाहेबांचे दर्शन, पोलादपूरास कविंद्र परमानंद यांचे दर्शन घेऊन प्रतापगडमार्गे पन्हाळगड बघण्यासाठी निघाले. कोंडाजी फर्जंदाने नुकताच काबीच केलेला पन्हाळगड ! गडावरील मंडळिंनी त्यांना येताना लांबूनच पाहिले व त्यांच्या दर्शनासाठी व स्वागतासाठी गडावर गडबड उडाली. गडावर दत्ताजी पंत वाकनीस होते. इतर सर्व मंडळी होती. त्यांची धांदल उडून गेली. महाराज गडावर पोचले. आनंदाचे उधाण आले. दत्ताजी पंतांनी अक्षरशः सोन्याची फुले महाराजांवर उधळून त्यांचे स्वागत केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
९ मार्च १६८९
इ.स १६८९ - ९ मार्च रोजी संभाजीराजेंच्या अटकेची वार्ता ऐकून हरजी महाडिक यांनी केसो त्रिमल यांना जिंजीस अटक केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
९ मार्च १७३१
१७३१ साली मराठ्यांनी फिरंग्यांना(पोर्तुगीज) उत्तर फिरंगाणत(वसई प्रांत) हल्ले करून जेरीस आणले होते. मराठ्यांच्या उत्पातामुळे पोर्तुगीज पुरते वैतागले होते. मराठ्यांचा प्रतिकार करण्यासाठी काय योजना केल्या आहेत त्याबद्दल ९ मार्च १७३१ रोजी उत्तर फिरंगाणच्या अधिकाऱ्याने गोव्याच्या पोर्तुगीज व्हाईसरॉयला पत्र लिहिले.
तो पत्रात लिहितो, 'मराठ्यांनी आपल्या मुलखातून पुरता पाय काढलेला नसला तरी त्यांची चढाई थांबली आहे. उलटपक्षी आम्ही मात्र त्यांच्या मुलुखात जाळपोळ करण्याचा क्रम चालू ठेवला आहे. लढाईच्या दंग्यामुळे मराठ्यांच्या व्यापारउदिमाला मोठाच धक्का बसून त्यांची नुकसानी झाली आहे. बहुधा ते आता तहास यावेत आम्ही त्यांची शेकडो बायकापोरे पकडली आहेत. त्यांना आम्ही लवकरच बाटविणार आहोत. तेही त्यांना(मराठ्यांना) मोठे भयच आहे. इंग्रज आपल्याशी(पोर्तुगीज) मिळून आहेत. साष्टीच्या वेळी त्यांच्याच मदतीमुळे निभाव लागला. पुढेही ते मदत खचित करतील. पेशव्यांचे मोगलांशी वैमनस्य आहे. पण मोगल मराठ्यांसारखा विश्वासघातकी आहे. कदाचित तो पेश्व्यासही सामील व्हावयाचा. आंग्र्याशी आपला बिघाड आहे. शिद्दीही बिघडला आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
९ मार्च १७४७
छत्रपती शाहूमहाराजांनी (राजमंडळातील काही सदस्य व काही सरदार यांच्या ) विरोधामुळे ९ मार्च १७४७ रोजी बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांना पेशवा पदावरून दूर केले. त्यामुळे ९ मार्च १७४७ ते १३ एप्रिल १७४७ पेशवेपद रिक्त.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩
Comments
Post a Comment