Posts

२६ नोव्हेंबर १६७०बागलाणची मोहिमदुसऱ्या सुरत मोहिमेनंतर छत्रपती शिवाजी महाराज बागलाण प्रांतावर निघाले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ नोव्हेंबर १६२९ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजी, जिजाबाई यांच्या सासूबाई उमाबाईसाहेब या बहुधा यावेळी येथे असाव्यात असे वाटते त्यांनी फक्त ३ महिनेपूर्वी वेरुळच्या घृष्नेश्वराची अभिषेकपूजा तिमनभट शेडगे यांस सांगून त्याबद्दल नेमणूक करून दिली त्यावरून आजीने येथे आपल्या नातवाचे आपल्या मांडीवर कौतुक केले असावे असे मानतात, तर्क आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ नोव्हेंबर १६६४ छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये कल्याण भिवंडी जिंकून कल्याणच्या खाडीत आपल्या आरमाराची स्थापना केली. पुढच्या काळात या आरमाराने परकीय सत्ताना समर्थपणे टक्कर देऊ शकेल अशी प्रगती केली होती. महाराजांच्या वाढत्या आरमारी सामर्थ्याने त्याकाळी अनेक अफवा पसरत होत्या. फेब्रुवारी १६६५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथमच आरमारी जहाजातून प्रवास करत बसरूर वर स्वारी केली होती. पण त्यापूर्वीच इंग्रजांच्या पत्रातून महाराजांच्या आरमारी सामर्थ्याचे दर्शन घडत होते. ते असे, "शिवाजी विजयी आणि अनिर्बंध असून त्याचे सामर्थ्य रोज वाढत असल्याने सभोवतालीच्या राजांना त्याची मोठी दहशत...

२४ नोव्हेंबर १६८३!! शंभू ने सुरु केले तांडव रुद्राचे तांडव !!"छत्रपति शंभूराजे" केवळ ४० मराठे सैन्यासह स्टीफन उर्फ जुवे बेटावर उतरले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ नोव्हेंबर १६७२ अली आदिलशहा द्वितीयचा मृत्यू  विजापूरचा आली आदिलशहा ह्याच्या मृत्युनंतर (२४ नोव्हेंबर १६७२) आदिलशाहीचे सारे वैभव संपुष्टात आले. होते. त्याच्या नंतर त्याचा वारस सिकंदर हा वयाने लहान असलेला गादीवर आला.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ नोव्हेंबर १६८३ !! शंभू ने सुरु केले तांडव रुद्राचे तांडव !! "छत्रपति शंभूराजे" केवळ ४० मराठे सैन्यासह स्टीफन उर्फ जुवे बेटावर उतरले. मराठ्यांच्या तोफांच्या आवाजाने गोव्यातील लोक व शस्त्र हाती धरलेले ख्रिश्चन लोक "पादरी" शहराच्या तटबंदीकडे पळत सुटले. ४०० फिरंग्यांपैकी ३०० जण जवळच्या टेकडीपर्यंत जाईपर्यंत जिवंत राहिले. टेकडीवरचे मराठे मागे फिरले व थोड्याच वेळात मराठ्यांची नवी तुकडी फिरंग्यांवर तुटून पडली. सर्वत्र अंदाधुंदी माजली. धीर खचलेले फिरंगी सैन्य सैरावैरा पळत सुटले. ४ मराठा घोडेस्वारांनी फिरंगी व्हाइसरॉय चा पाठलाग सुरु केला पण त्यांच्या तावडीतून तो जखमी होऊन वाचला आणि कसाबसा खाडीपर्यंत जाऊन पोचला. त्याला व कॅप्टनला एका जहाजात बसून पळून जाताना "छत्रपती शंभूराजें...

२२ नोव्हेंबर १६५६छत्रपती शिवरायांचा मसुरवर हल्ला२२ नोव्हेंबर १६५६ च्या एका फर्मानात शिवरायांच्या मसूरवरील छाप्याचा उल्लेख सापडतो

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २२ नोव्हेंबर १६५६ छत्रपती शिवरायांचा मसुरवर हल्ला २२ नोव्हेंबर १६५६ च्या एका फर्मानात शिवरायांच्या मसूरवरील छाप्याचा उल्लेख सापडतो. आदिलशाही सरदार मुहम्मद इखलासखानला हे फर्मान मिळाले होते. त्याला कर्नाटकाचा सुभेदार नेमले होते व शिवरायांच्या त्या भागातील हलचालींवर पायबंद घालायचा आदेश त्याला दिला होता. आदिलशाहीतील घडामोडींच्यावेळेचा शिवरायांच्या हलचालींबाबतचा हा सगळ्यात जुना संदर्भ आहे. मुहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर उद्भवलेल्या आदिलशाहीतील कलहाबद्दल शिवरायांना बहुतेक कल्पना होती. वरील फर्मान मुहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर आठरा दिवसांनी लिहीले आहे. त्यामुळे आदिलशाहीतील अस्थिरतेचा लाभ घेऊन शिवरायांनी मसूरवरील छापा घातला असावा. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २२ नोव्हेंबर १६६५ किल्ले पुरंदरच्या ऐतिहासिक तहामध्ये ठरल्याप्रमाणे विजापूरच्या मोहीमेसाठी छत्रपती शिवराय मुघलांकडून लढण्यासाठी "मिर्झाराजे जयसिंग" यांच्या छावणीत दाखल. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २२ नोव्हेंबर १६८७ गोवळकोंड्याची कुतुबशाही जिंकून घेतल्यावर औरंगजेबाने त्या राज्यातील जो भाग...

२१ नोव्हेंबर १६५८छत्रपती शिवरायांनी तिमाजी उंडेला दिलेले होन पुन्हा स्वराज्यात दाखल करून घेतले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ नोव्हेंबर १६५८ छत्रपती शिवरायांनी तिमाजी उंडेला दिलेले होन पुन्हा स्वराज्यात दाखल करून घेतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ नोव्हेंबर १६७९ मराठ्यांनी खांदेरी बेटाच्या सर्वात उंच टेकडीवर एक पांढरा ध्वज फडकावला. इंग्रज व सिद्दी या दोघांनी ते पहिले सिद्दी थळच्या जवळ नांगरून होता तर इंग्रज नागावच्या खाडीजवळ नांगरून होते. त्यांना वाटले की ही शरणागतीची खून आहे म्हणून दोघांनी दोन छोटे मचवे वेगवेगळ्या वेळी बेटाकडे पाठवले. इंग्रजांना मराठ्यांनी काहीच उत्तर दिले नाही व त्या माच्याकडे दुर्लक्ष केले. इंग्रजांनी मग मराठ्यांना परिचित असणारा सार्जंट कली या डच माणसाला मराठ्यांकडे पाठवले. मराठ्यांनी त्याला सांगितले की ही सांकेतिक खूण आमच्या किनाऱ्यावरील माणसांकरिता आहे तेव्हा आपण जावे. कलीने या वेळी आपण मायनाक भंडारींसाठी मुंबईहून एक पत्र आणले आहे व त्याने ते येऊन घेऊन जावे असा एक निरोप दिला यावर मराठ्यांनी त्याला ते आणून द्यावे असे सांगितले व मायनाकही त्याला उत्तर देईल असे सांगितले. त्यांने कलीला हे देखील सांगितले की तुम्ही बारा महिने इथे ताल देऊन...

२० नोव्हेंबर १६६६९ वर्षांचे बाल शंभूराजे आज रोजी आग्राहून सुटल्यानंतर सुखरूप "किल्ले राजगड" वर पोचले.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० नोव्हेंबर १६३५ शाहजहान त्याच्या दुसऱ्या दख्खन मोहिमेसाठी निघाला. निजामशाही संपवायची ह्या ध्येयाने तो निघाला होता. त्याने हांडियाजवळ ४ जानेवारी १६३६ ला नर्मदा ओलांडली. इथूनच ९ जानेवारीला आदिलशाहला पत्राने तंबी दिली की निजामशाहीमधल्या शाहजी राजा बरोबर असलेल्या सरदारांना पाठिंबा मिळता कामा नये. वर हे सुद्धा लिहीले की त्याने देय असलेली वार्षिक खंडणी १० मार्च १६३६ पर्यंत दौलताबादला पाठवावी. ह्यासाठी शाहजहानने सोलापूर, त्याच्या आसपासचा परिसर व वांगीचा भाग निजामशाहिकडील भाग आदिलशाहला देऊ केले. ह्या परिसरातून वर्षाला नऊ लक्ष होनाचे उत्पन्न येत होते. १९ जानेवारी १६३६ ला शेख दबीर व इतर काही आदिलशाही वकील शाहजहानला भेटले. त्यानंतर ५ फेब्रुवारीला शाहजहानने खानजमान, खानदौरान व शाहिस्ताखान यांना निजामशाहीचा परिसर जिंकण्यासाठी धाडले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० नोव्हेंबर १६६६ ९ वर्षांचे बाल शंभूराजे आज रोजी आग्राहून सुटल्यानंतर सुखरूप "किल्ले राजगड" वर पोचले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० नोव्हेंबर १६७० छत्रपती शिवरायांची आरमारासह सुरतेकडे कू...

१९ नोव्हेंबर १६७०छत्रपती शिवराय रायगडाहून मुंबई जवळनागाव येथे आले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १९ नोव्हेंबर १६६१ छत्रपती शिवाजी महाराजांचे सुमारे २००० स्वार जुन्नर परगण्यात खंडणी वसूल करीत असल्याची खबर शाईस्तेखानाला पुण्यात समजली. म्हणून शाईस्तेखानाने जाधवराव, शेख हमीद, ईस्माईलखान, सैफ खान वगैरे सरदारांस जुन्नर व अंबेगाव परगण्यात रवाना केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १९ नोव्हेंबर १६६५ पुरंदरच्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराज सरनौबत नेताजी पालकरांसह ९००० फौज घेऊन मिर्झाराजांच्या कुमकेस विजापूरस्वारी साठी रवाना. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १९ नोव्हेंबर  १६६७ १९ नोव्हेंबर १६६७ ते २२ नोव्हेंबर या काळात छत्रपती शिवप्रभुचे वास्तव्य गोमंतक भूमीत कोलवाळ गावात होते. पोर्तुगिजांचा बंदोबस्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज दोन हजार घोडदळ ३००० पायदळासमावेत कोलवाळ येथे आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे व पोर्तुगिजांचे युद्ध कोलवाळ किल्ल्याच्या परिसरात झाले. पोर्तुगिजांचा विरोध फार वेळ टिकला नाही. मराठे सैनिक बार्देशमध्ये घुसले. बार्देशस्वारी बाबतची दुसरी बाजू महत्त्वाची आहे. सन १६६७ मध्ये असणारा पोर्तुगीज गव्हर्नर साव्हेसेंती याने १६६७ सप्...

१७ नोव्हेंबर १६६७छत्रपती शिवरायांनी पोर्तुगीजांकडे आपला वकील पाठवला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १७ नोव्हेंबर १६६७ छत्रपती शिवरायांनी पोर्तुगीजांकडे आपला वकील पाठवला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १७ नोव्हेंबर १६७९ मुंबईकर सूरतेला १७ नोव्हेंबर १६७९ ला लिहितात : "आमची ' डोव्ह" नावाची गुराब शत्रूच्या हाती सापडली. तीवर ६ रांगा शिपाई, अंमलदार, वगैरे होते. त्यांत २० जण युरोपीय होते. त्यांची भरती होणे अशक्य आहे. शिवाय तीवरील तोफा आता खांदेरीवरुन आमच्यावरच रोखल्या जात आहेत याचा विचार करुन दुसऱ्या गुराबा अशाच हाती लागू नयेत म्हणून मदती करितां दुसरी शिबाडे व एक तिरवटी तारु पाठविले.... ह्या प्रकरणाचा निकाल करण्याबद्दल तुमचे विचार कळले. आम्हीच बोलणे करण्याकरिता इसम पाठविला, तर खांदेरी न सोडतां मध्यंतरीच्या काळांत तो तटबंदी पुरी करुन तेथेच तो जबरदस्त होऊन बसेल. मुंबईच्या व्यापाराला व वसातीला त्रासदायक होईल; आणि मुंबई बेट या त्रासामुळे ओसाड पडेल.... पोर्तुगीजांनी सर्व तर्हेने आपल्याशी मित्रत्त्व दाखवून छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच्या मुलुखांतून जाण्यास बंदी करुन स्वतः बंदोबस्त करुन शिवाय आमची शिबाडे मचवा बंदोबस्ताकरितां आपल्या ह...