Posts

Showing posts from 2024

९ डिसेंबर १६७३छत्रपती शिवराय कर्नाटकातील कारवार येथे दाखल झाले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ९ डिसेंबर १६५४ इंदापूर येथील मशिदीसाठी एक चावर जमीन व तेल इत्यादिबाबत छत्रपति शिवाजीराजांचे पत्र. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ९ डिसेंबर १६५९ दौलोजीची कोकणावर चाल जेव्हा शिवाजी राजे प्रतापगड - वाई - सातारा - कोल्हापूर भागातल्या आदिलशाही चौक्या जिंकत होते तेव्हा त्यांचा सरदार दौलोजी तळ कोकणातून थेट राजापूर पर्यंत गेला होता असे इंग्रज व वलंदेज (Dutch) साधनांमधून दिसते. राजापूरच्या इंग्रजांच्या वखारीतून त्यांच्या सुरतेच्या वखारीला ९ डिसेंबर १६५९ ला लिहीलेल्या पत्रात हा उल्लेख सापडतो. अफजलवधाच्या धक्क्यातून सावरायला वेळ मिळायच्या आत झालेल्या ह्या अकस्मिक हल्ल्याने आदिलशाहीचे सगळे अधिकारी व सरदार हदरले. इंग्रजांच्या पत्रावरुन हे स्पष्ट आहे की १० डिसेंबर पर्यंत दौलोजी राजापूरला पोहोचला नव्हता. दाभोळच्या बंदरात अफजलखानची तीन जहाजे उभी होती. ह्याची माहिती छत्रपती शिवाजी राजाला होती व त्यांनी दौलोजीला ती जप्त करायला सांगितले होते. पण दौलोजी तिथे पोहोचायच्या आत महमूद शरीफने ती तेथून हलवली व राजापूरला पिटाळली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ९ डिसेंबर १६६६ पुर...

८ डिसेंबर १६७३छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांकडून बंकापूर जिंकले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ८ डिसेंबर १६६५ नेतोजी पालकरांनी विजापूरकरांकडून ताथवडा  उर्फ संतोषगड जिंकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ८ डिसेंबर १६७३ छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांकडून बंकापूर जिंकले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ८ डिसेंबर १६८० मुंबईकर इंग्रजांनी सुरतकरांना लिहीलेल्या पत्राची नोंद...! "राजाच्या हितसंबंधांना विरोध येईल अशा तऱ्हेने सिद्दीला आमच्या कडून मिळणारा आश्रय व मदत ही राष्ट्राच्या कायद्याप्रमाणे समर्थनीय ठरणार नाहीत हे उघड आहे. परंतु हल्लीच्या परिस्थितीत तो नियम आम्हास मोडावा लागणार हे स्पष्ट आहे. दोघांपैकी कोणाचा तरी रोष पत्करल्याशिवाय गत्यंतर नाही. हे अवघड असल्याचे लिहून लंडनला आपल्या गलबतास सुरक्षितता असणे गरजेचे आहे". छत्रपती संभाजीराजेंना समाधान वाटेल अशा काही अटी सिद्दीकडून लेखी मिळतील. तर मिळवाव्या. तरीसुद्धा सिद्दीला फार दुखवू नये. यावरून इंग्रजांचे दुटप्पीपणाचे धोरण किती स्पष्ट होते हे कळून येते. पण ते कात्रीत सापडले होते, हे निश्चित. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ८ डिसेंबर १६९९ औरंगजेब बादशाह अजिंक्यतारा घेण्यासाठी सरसावला. अजिंक्यताराचे किल्...

४ डिसेंबर १६७३छत्रपती शिवाजी महाराजांनी कारवार जिंकले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ डिसेंबर १६७३ छत्रपती शिवाजी महाराजांनी कारवार जिंकले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ डिसेंबर १६७९. शंभूराजे अखेर पन्हाळ्याला परतले. औरंगजेबाने दिलेरखानाला गुप्तपणे निरोप पाठविला की, "शंभूराजेला कैद करुन दिल्लीला पाठवा...!" अन् ही बातमी खुद्द संभाजीराजांना समजली...! संभाजीराजांनी ठरवलं इथून निसटायचं. अखेर येसूबाईसाहेबांनी पुरुषाचा पोषाख केला आणि रात्रीच्या अंधारांतून शंभूराजे सहकुटुंब पळाले (दि.२० नोव्हेँबर १६७९). त्यांनी तडख विजापूर गाठले. तिथून पुढे महाराजांकडून न्यायला आलेल्या मंडळींस येऊन सामील झाले (दि.३० नोव्हेंबर १६७९). तेथून तडक लांबच्या दौडी मारत दि.४ डिसेंबर १६७९ ला शंभूराजे अखेर पन्हाळ्याला येऊन दाखल झाले. संभाजीराजे परत आलेले ऐकून महाराजांस अत्यंत आनंद झाला. ते युवराजांना भेटायला पन्हाळगडास निघाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ डिसेंबर १६८० सुरतेहून इंग्रजांच्या दुसऱ्या एका वखारीला लिहिलेल्या पत्रातून संभाजीच्या सैन्याचा त्यांनी धस्का घेतल्याचे दिसते. बहादुरखानचे मुघल सैन्य ह्या काफिल्याजवळपास असल्याने बहुदा माल सुरक्षितपण...

२ डिसेंबर १६६७छत्रपती शिवराय व पोर्तुगीज यांच्यात सहसंमतीने दोन्ही बाजुने तहास मान्यता.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २ डिसेंबर १६६७ छत्रपती शिवराय व पोर्तुगीज यांच्यात सहसंमतीने दोन्ही बाजुने तहास मान्यता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २ डिसेंबर १६६९ संभाजीराजे, सरसेनापती प्रतापराव गुजर, निराजी रावजी यांना त्यांच्या २५०० फौजेसह अटक करा, अशी खबर औरंगजेबने शहजादा  मुअज्जमकडे पत्राद्वारे पोचवली. पण हे पत्र पोचण्याआधीच मुअज्जमला ही खबर कळाली, मग त्याने शंभूराजे आणि मराठी सैन्याला निघून जायचा सल्ला दिला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २ डिसेंबर १६८३  दुर्गादास राठोड मध्यस्थीसाठी पोर्तुगीज व्हाईसरायकडे छत्रपती संभाजी महाराजांच्या आज्ञेवरून दुर्गादास राठोड गोव्याच्या पोर्तुगिजांच्या भेटीत गेला. या भेटीत पोर्तुगिजांचा मानस काय आहे, औरंगजेबास ते कितपत मदत करणार याचा कानोसा घेण्याचे काम त्याच्यावर सोपविण्यात आले. परंतु छत्रपती संभाजी महाराजांचे अधिक्रृत  पत्र जवळ नसल्याने दुर्गादास राठोड याला भेटीस बोलावले नाही ! 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २ डिसेंबर १७०२ डिसेंबर १७०२ मध्ये फोंडा किल्ला मराठयांनी सर केला, फोंड्याचा किल्लेदार म्हणून कृष्णाजी अनंत यांची नेमणूक ताराबाईंनी केल...

२६ नोव्हेंबर १६७०बागलाणची मोहिमदुसऱ्या सुरत मोहिमेनंतर छत्रपती शिवाजी महाराज बागलाण प्रांतावर निघाले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ नोव्हेंबर १६२९ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजी, जिजाबाई यांच्या सासूबाई उमाबाईसाहेब या बहुधा यावेळी येथे असाव्यात असे वाटते त्यांनी फक्त ३ महिनेपूर्वी वेरुळच्या घृष्नेश्वराची अभिषेकपूजा तिमनभट शेडगे यांस सांगून त्याबद्दल नेमणूक करून दिली त्यावरून आजीने येथे आपल्या नातवाचे आपल्या मांडीवर कौतुक केले असावे असे मानतात, तर्क आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ नोव्हेंबर १६६४ छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये कल्याण भिवंडी जिंकून कल्याणच्या खाडीत आपल्या आरमाराची स्थापना केली. पुढच्या काळात या आरमाराने परकीय सत्ताना समर्थपणे टक्कर देऊ शकेल अशी प्रगती केली होती. महाराजांच्या वाढत्या आरमारी सामर्थ्याने त्याकाळी अनेक अफवा पसरत होत्या. फेब्रुवारी १६६५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथमच आरमारी जहाजातून प्रवास करत बसरूर वर स्वारी केली होती. पण त्यापूर्वीच इंग्रजांच्या पत्रातून महाराजांच्या आरमारी सामर्थ्याचे दर्शन घडत होते. ते असे, "शिवाजी विजयी आणि अनिर्बंध असून त्याचे सामर्थ्य रोज वाढत असल्याने सभोवतालीच्या राजांना त्याची मोठी दहशत...

२४ नोव्हेंबर १६८३!! शंभू ने सुरु केले तांडव रुद्राचे तांडव !!"छत्रपति शंभूराजे" केवळ ४० मराठे सैन्यासह स्टीफन उर्फ जुवे बेटावर उतरले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ नोव्हेंबर १६७२ अली आदिलशहा द्वितीयचा मृत्यू  विजापूरचा आली आदिलशहा ह्याच्या मृत्युनंतर (२४ नोव्हेंबर १६७२) आदिलशाहीचे सारे वैभव संपुष्टात आले. होते. त्याच्या नंतर त्याचा वारस सिकंदर हा वयाने लहान असलेला गादीवर आला.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ नोव्हेंबर १६८३ !! शंभू ने सुरु केले तांडव रुद्राचे तांडव !! "छत्रपति शंभूराजे" केवळ ४० मराठे सैन्यासह स्टीफन उर्फ जुवे बेटावर उतरले. मराठ्यांच्या तोफांच्या आवाजाने गोव्यातील लोक व शस्त्र हाती धरलेले ख्रिश्चन लोक "पादरी" शहराच्या तटबंदीकडे पळत सुटले. ४०० फिरंग्यांपैकी ३०० जण जवळच्या टेकडीपर्यंत जाईपर्यंत जिवंत राहिले. टेकडीवरचे मराठे मागे फिरले व थोड्याच वेळात मराठ्यांची नवी तुकडी फिरंग्यांवर तुटून पडली. सर्वत्र अंदाधुंदी माजली. धीर खचलेले फिरंगी सैन्य सैरावैरा पळत सुटले. ४ मराठा घोडेस्वारांनी फिरंगी व्हाइसरॉय चा पाठलाग सुरु केला पण त्यांच्या तावडीतून तो जखमी होऊन वाचला आणि कसाबसा खाडीपर्यंत जाऊन पोचला. त्याला व कॅप्टनला एका जहाजात बसून पळून जाताना "छत्रपती शंभूराजें...

२२ नोव्हेंबर १६५६छत्रपती शिवरायांचा मसुरवर हल्ला२२ नोव्हेंबर १६५६ च्या एका फर्मानात शिवरायांच्या मसूरवरील छाप्याचा उल्लेख सापडतो

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २२ नोव्हेंबर १६५६ छत्रपती शिवरायांचा मसुरवर हल्ला २२ नोव्हेंबर १६५६ च्या एका फर्मानात शिवरायांच्या मसूरवरील छाप्याचा उल्लेख सापडतो. आदिलशाही सरदार मुहम्मद इखलासखानला हे फर्मान मिळाले होते. त्याला कर्नाटकाचा सुभेदार नेमले होते व शिवरायांच्या त्या भागातील हलचालींवर पायबंद घालायचा आदेश त्याला दिला होता. आदिलशाहीतील घडामोडींच्यावेळेचा शिवरायांच्या हलचालींबाबतचा हा सगळ्यात जुना संदर्भ आहे. मुहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर उद्भवलेल्या आदिलशाहीतील कलहाबद्दल शिवरायांना बहुतेक कल्पना होती. वरील फर्मान मुहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर आठरा दिवसांनी लिहीले आहे. त्यामुळे आदिलशाहीतील अस्थिरतेचा लाभ घेऊन शिवरायांनी मसूरवरील छापा घातला असावा. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २२ नोव्हेंबर १६६५ किल्ले पुरंदरच्या ऐतिहासिक तहामध्ये ठरल्याप्रमाणे विजापूरच्या मोहीमेसाठी छत्रपती शिवराय मुघलांकडून लढण्यासाठी "मिर्झाराजे जयसिंग" यांच्या छावणीत दाखल. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २२ नोव्हेंबर १६८७ गोवळकोंड्याची कुतुबशाही जिंकून घेतल्यावर औरंगजेबाने त्या राज्यातील जो भाग...

२१ नोव्हेंबर १६५८छत्रपती शिवरायांनी तिमाजी उंडेला दिलेले होन पुन्हा स्वराज्यात दाखल करून घेतले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ नोव्हेंबर १६५८ छत्रपती शिवरायांनी तिमाजी उंडेला दिलेले होन पुन्हा स्वराज्यात दाखल करून घेतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ नोव्हेंबर १६७९ मराठ्यांनी खांदेरी बेटाच्या सर्वात उंच टेकडीवर एक पांढरा ध्वज फडकावला. इंग्रज व सिद्दी या दोघांनी ते पहिले सिद्दी थळच्या जवळ नांगरून होता तर इंग्रज नागावच्या खाडीजवळ नांगरून होते. त्यांना वाटले की ही शरणागतीची खून आहे म्हणून दोघांनी दोन छोटे मचवे वेगवेगळ्या वेळी बेटाकडे पाठवले. इंग्रजांना मराठ्यांनी काहीच उत्तर दिले नाही व त्या माच्याकडे दुर्लक्ष केले. इंग्रजांनी मग मराठ्यांना परिचित असणारा सार्जंट कली या डच माणसाला मराठ्यांकडे पाठवले. मराठ्यांनी त्याला सांगितले की ही सांकेतिक खूण आमच्या किनाऱ्यावरील माणसांकरिता आहे तेव्हा आपण जावे. कलीने या वेळी आपण मायनाक भंडारींसाठी मुंबईहून एक पत्र आणले आहे व त्याने ते येऊन घेऊन जावे असा एक निरोप दिला यावर मराठ्यांनी त्याला ते आणून द्यावे असे सांगितले व मायनाकही त्याला उत्तर देईल असे सांगितले. त्यांने कलीला हे देखील सांगितले की तुम्ही बारा महिने इथे ताल देऊन...

२० नोव्हेंबर १६६६९ वर्षांचे बाल शंभूराजे आज रोजी आग्राहून सुटल्यानंतर सुखरूप "किल्ले राजगड" वर पोचले.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० नोव्हेंबर १६३५ शाहजहान त्याच्या दुसऱ्या दख्खन मोहिमेसाठी निघाला. निजामशाही संपवायची ह्या ध्येयाने तो निघाला होता. त्याने हांडियाजवळ ४ जानेवारी १६३६ ला नर्मदा ओलांडली. इथूनच ९ जानेवारीला आदिलशाहला पत्राने तंबी दिली की निजामशाहीमधल्या शाहजी राजा बरोबर असलेल्या सरदारांना पाठिंबा मिळता कामा नये. वर हे सुद्धा लिहीले की त्याने देय असलेली वार्षिक खंडणी १० मार्च १६३६ पर्यंत दौलताबादला पाठवावी. ह्यासाठी शाहजहानने सोलापूर, त्याच्या आसपासचा परिसर व वांगीचा भाग निजामशाहिकडील भाग आदिलशाहला देऊ केले. ह्या परिसरातून वर्षाला नऊ लक्ष होनाचे उत्पन्न येत होते. १९ जानेवारी १६३६ ला शेख दबीर व इतर काही आदिलशाही वकील शाहजहानला भेटले. त्यानंतर ५ फेब्रुवारीला शाहजहानने खानजमान, खानदौरान व शाहिस्ताखान यांना निजामशाहीचा परिसर जिंकण्यासाठी धाडले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० नोव्हेंबर १६६६ ९ वर्षांचे बाल शंभूराजे आज रोजी आग्राहून सुटल्यानंतर सुखरूप "किल्ले राजगड" वर पोचले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० नोव्हेंबर १६७० छत्रपती शिवरायांची आरमारासह सुरतेकडे कू...

१९ नोव्हेंबर १६७०छत्रपती शिवराय रायगडाहून मुंबई जवळनागाव येथे आले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १९ नोव्हेंबर १६६१ छत्रपती शिवाजी महाराजांचे सुमारे २००० स्वार जुन्नर परगण्यात खंडणी वसूल करीत असल्याची खबर शाईस्तेखानाला पुण्यात समजली. म्हणून शाईस्तेखानाने जाधवराव, शेख हमीद, ईस्माईलखान, सैफ खान वगैरे सरदारांस जुन्नर व अंबेगाव परगण्यात रवाना केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १९ नोव्हेंबर १६६५ पुरंदरच्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराज सरनौबत नेताजी पालकरांसह ९००० फौज घेऊन मिर्झाराजांच्या कुमकेस विजापूरस्वारी साठी रवाना. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १९ नोव्हेंबर  १६६७ १९ नोव्हेंबर १६६७ ते २२ नोव्हेंबर या काळात छत्रपती शिवप्रभुचे वास्तव्य गोमंतक भूमीत कोलवाळ गावात होते. पोर्तुगिजांचा बंदोबस्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज दोन हजार घोडदळ ३००० पायदळासमावेत कोलवाळ येथे आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे व पोर्तुगिजांचे युद्ध कोलवाळ किल्ल्याच्या परिसरात झाले. पोर्तुगिजांचा विरोध फार वेळ टिकला नाही. मराठे सैनिक बार्देशमध्ये घुसले. बार्देशस्वारी बाबतची दुसरी बाजू महत्त्वाची आहे. सन १६६७ मध्ये असणारा पोर्तुगीज गव्हर्नर साव्हेसेंती याने १६६७ सप्...

१७ नोव्हेंबर १६६७छत्रपती शिवरायांनी पोर्तुगीजांकडे आपला वकील पाठवला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १७ नोव्हेंबर १६६७ छत्रपती शिवरायांनी पोर्तुगीजांकडे आपला वकील पाठवला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १७ नोव्हेंबर १६७९ मुंबईकर सूरतेला १७ नोव्हेंबर १६७९ ला लिहितात : "आमची ' डोव्ह" नावाची गुराब शत्रूच्या हाती सापडली. तीवर ६ रांगा शिपाई, अंमलदार, वगैरे होते. त्यांत २० जण युरोपीय होते. त्यांची भरती होणे अशक्य आहे. शिवाय तीवरील तोफा आता खांदेरीवरुन आमच्यावरच रोखल्या जात आहेत याचा विचार करुन दुसऱ्या गुराबा अशाच हाती लागू नयेत म्हणून मदती करितां दुसरी शिबाडे व एक तिरवटी तारु पाठविले.... ह्या प्रकरणाचा निकाल करण्याबद्दल तुमचे विचार कळले. आम्हीच बोलणे करण्याकरिता इसम पाठविला, तर खांदेरी न सोडतां मध्यंतरीच्या काळांत तो तटबंदी पुरी करुन तेथेच तो जबरदस्त होऊन बसेल. मुंबईच्या व्यापाराला व वसातीला त्रासदायक होईल; आणि मुंबई बेट या त्रासामुळे ओसाड पडेल.... पोर्तुगीजांनी सर्व तर्हेने आपल्याशी मित्रत्त्व दाखवून छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच्या मुलुखांतून जाण्यास बंदी करुन स्वतः बंदोबस्त करुन शिवाय आमची शिबाडे मचवा बंदोबस्ताकरितां आपल्या ह...

१५ नोव्हेंबर १६६४छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेला पहिला जलदुर्ग "सिंधुदुर्ग" या गडाचा पाया घातला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ नोव्हेंबर १६६४ छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेला  पहिला जलदुर्ग "सिंधुदुर्ग" या गडाचा पाया घातला.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ नोव्हेंबर १६६७ "छत्रपती शिवराय" डिचोली (बिचोलिम), गोवा येथे मुक्कामी. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ नोव्हेंबर १६७१ चौल सुभ्यामधले वतनदार, देशमुख आणि देशपांडे त्या भागाच्या सुभेदारीचे काम नीट चालू देत नसत.  "उत्तम सुभेदार पाठवला असतानाही तुम्ही त्याच्याशी नसते वाद घालता आणि सुभेदारीचे काम होऊ देत नाही हे चालणार नाही. तुम्ही त्या सुभेदाराचा निर्णय मान्य करा व तसे न केल्यास तुम्हाला शासन होइल. काही मुलाहिजा होणार नाही" असे छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रात रोखठोकपणे म्हटले आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ नोव्हेंबर १६७९ १५ नोव्हेंबर १६७९ रोजी संगमनेर येथे झालेल्या लढाई नंतर छत्रपती शिवरायांनी दि. १९ नोव्हेंबर रोजी अगदी अल्पकाळ पट्टा या दुर्गावर वास्तव्य केले तेव्हापासून आजतागायत या दुर्गाचे नांवच विश्रामगड म्हणूनच रुढ झालेत. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ नोव्हेंबर १६७९ गव्हर्नर आंतोनिक ...

श्री खंडोबा आणि बाणाई विवाहस्थळ श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असून खंडोबाची महाराष्ट्रात ८ प्रमुख ठिकाणे आहेत, पैकी अणदूर-मैलारपूर (नळदुर्ग) महत्वाचे स्थान म्हणून ओळखले जाते

Image
श्री खंडोबा आणि बाणाई विवाहस्थळ श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असून खंडोबाची महाराष्ट्रात ८ प्रमुख ठिकाणे आहेत, पैकी अणदूर-मैलारपूर (नळदुर्ग) महत्वाचे स्थान म्हणून ओळखले जाते. दमयंती राणीच्या भक्तीसाठी श्री खंडोबा नळदुर्ग येथे प्रकट झाले, अशी आख्यायिका आहे. श्री खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह नळदुर्ग जि. उस्मानाबाद येथे झाला होता म्हणून या स्थानाला अन्यन्यसाधारण महत्व आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अणदूर व मैलारपूर (नळदुर्ग) या दोन्ही ठिकाणी खंडोबाची मंदिरे असून दोन्ही ठिकाणचे अंतर चार कि.मी. आहे. खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने व मैलारपूर (नळदुर्ग) येथे पावणे दोन महिने वास्तव्य असते. मंदिरे दोन आणि मूर्ती एक अशी परंपरा शेकडो वर्षांपासून सुरु आहे. तसेच अणदूरहुन नळदुर्गला आणि नळदुर्गहुन अणदूरला देवाची मूर्ती नेताना दोन्ही गावातील मानकऱ्यामध्ये आजही लेखी करार केला जातो. #खंडोबा #कुलदैवत #24k

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४

Image
श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त छबिना १३/११/२०२४ निमसोड गावात श्री सिद्धनाथ देवाची मोठी यात्रा भरते. मंदिरासमोर तुळशीविवाह लावला जातो. मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित असतात. दिपमाळला तेल घातला जात.तुळशी विवाह दिवशी छबिना निघतो.  श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त छबिना व्हिडिओ श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त श्रींची रथातून मिरवणूक प्रारंभ दुसरा दिवस म्हणजे मुख्य दिवस सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं जय घोषत उत्साहात यात्रा पार पडते. हजारो भाविक गुलाल खोबऱ्याची उधळण करतात.सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं जय घोषत निमसोड नगरी दुमदुमून जाते. रथावर अक्षरशहा पैशाचा पाऊस पडतो. नाथबाबा चा वार्षिक यात्रेचा मुख्य दिवस असतो. सकाळी मानकरीयांचे धज दीप माळ ते मंदिराचा कळस असे वाजत गाजत मिरवणूकीत बांधले जातात. सकाळी नऊ वाजल्यापासूनच उत्सवाला सुरुवात होते. गावातील ग्रामस्थ मानकरी उपस्थित श्रीफळ वाढवून पूजन केले जाते.  श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त रथयात्रा निमसोड चे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेला हजारो भाविक उपस्थित असतात. गुलाल खोबऱ्याची उध...

१३ नोव्हेंबर १६५९छत्रपती शिवरायांनी मायणी, खटाव जिंकले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १३ नोव्हेंबर १६५९ छत्रपती शिवरायांनी मायणी, खटाव जिंकले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १३ नोव्हेंबर १६६८ छत्रपती शिवरायांकडून गोव्यामध्ये सप्तकोटीश्वर मंदिर बांधण्यास सुरुवात. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १३ नोव्हेंबर १६७३ मुंबईकर सूरतकरांना १३ नोव्हेंबर १६७३ ला लिहितात: "सिद्दीने तक्रारी केल्या असताना सुभेदाराचे आमच्याबद्दल इतके मन आहे हे वाचून आनंद झाला. आता बंदरांत असलेल्या बादशहाच्या दोन गलबतांना आम्ही चांगले वागविले हे पाहून बादशाहाविषयी आमचे मनांत पूज्यबुध्दी आहे हे त्याला दिसून येईल ... फ्रेचांनी जर इतक्या तोफा आणि इतके शिसें ( गोळे ) राजापूरला पाठविले असतील, तर शिवाजीला सिद्दाविरुध्द चांगले आरमार सज्ज करणस बरे पडेल. कारण त्याने आमच्याकडे मागणी केली परंतु आमच्याजवळ पुष्कळ तोफा असूनही आम्ही तुमच्या सूरतेतील हितसंबंधाकडे लक्ष देऊन तोफा दिल्या नाहीत." सूरतकरांनी १३ नोव्हेंबर १६७४ ला उत्तर लिहिले जे:'  "शिवाजीच्या तोफांच्या मागणीबद्दल कळविण्यांत आले. त्यावर आमचे मत असे आहे की, अशा कृत्याने बादशहाला घुस्सा येईल.  फ्रेंचानी नुक...

१२ नोव्हेंबर १६५९छत्रपती शिवरायांनी "कराड" प्रांत जिंकला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ नोव्हेंबर १६५९ छत्रपती शिवरायांनी "कराड" प्रांत जिंकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ नोव्हेंबर १६६७ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची सरहद्द पोर्तुगीज प्रदेशाला भिडली होती. त्यावेळचा पोर्तुगीज विजरई कोंदी दि सांव्हिसेंती हा फारच धर्मान्ध होता. त्याने बारदेश मधील चार हजार हिंदूंचे सक्तीने धर्मांतर केले होते. आणि इतर हिंदू लोकांना २ महिन्याच्या आत बारदेश व गोवा सोडून जाण्यास सांगितले. शिवाय पोर्तुगीजांच्या आश्रयाला गेलेले कोकणातील देसाई त्यांच्या मदतीने स्वराज्यातील प्रदेशावर धाडी घालत असत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी बारदेशवर ५ हजार पायदळ व १ हजार घोडदळ घेऊन मोहीम काढली. १० नोव्हेंबर पासून सलग तीन दिवस महाराजांच्या सैन्याने या भागात धुमाकूळ घालत अनेक धर्मान्ध पोर्तुगीजाना ठार केले. या मोहिमेत महाराजांनी पोर्तुगीज व कोकणातील फितूर देसायांना कायमचा धडा शिकवला. महाराजानी या मोहिमेत १३०० कैदी पकडले. शिवाय त्यांना यातून १५० लक्ष होनांची लुटही मिळाली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ नोव्हेंबर १६८३ किल्ले फोंड्यावर प्रचंड...

२ नोव्हेंबर १६७७छत्रपती शिवरायांनी तंजावरची ठाणी जिंकली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २ नोव्हेंबर १६७७ छत्रपती शिवरायांनी तंजावरची ठाणी जिंकली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २ नोव्हेंबर १६८९ छत्रपती राजाराम महाराज जिंजीत दाखल हरजीराजे महाडिकांच्या निधनानंतर जिंजीचा सर्व कारभार शिवरायांची कन्या अंबिकाबाई यांच्याकडे आला. राजारामांचे दक्षिणेतील आगमन त्यांच्या अधिकारावर गदा आणणारे ठरले. त्यामुळे त्यांनी आपल्या सावत्रभावाला विरोध करायचा ठरवले. २८ ऑक्टोबर १६८९ रोजी राजाराम वेल्लोरच्या कोटात पोहोचले. तेथून त्यांनी आपल्या सावत्रबहिणीकडे आपला वकील पाठवला व जिंजीचा किल्ला स्वाधीन करण्याविषयी निरोप दिला. परंतु उलट अंबिकाबाईंनी राजारामांविरुद्ध लढण्याचा पावित्रा घेतला. त्या वेल्लोरच्या दिशेने ससैन्य निघाल्या. पण वाटेत त्यांच्या सैन्य अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली. आपली लंगडी बाजू बघता त्यांनी माघार घेतली. राजाराम महाराजांना दक्षिणेतील विविध मराठी किल्लेदार, ठाणेदार, मुलकी, प्रशासनिक व लष्करी अधिकाऱ्यांनी स्वराज्याचे छत्रपती म्हणून मान्यता देण्यास सुरुवात केली. त्यामुळे अंबिकाबाईंचा विरोध पूर्णपणे निष्प्रभ ठरला व त्यांनी जिंजी किल्...

१ नोव्हेंबर १६७८छत्रपती शिवरायांनी तंजावरच्या उत्तरेकडील मुलुख जिंकला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १ नोव्हेंबर १६७६ "छत्रपती संभाजीराजे" हे त्यांच्या पत्नी "महाराणी येसूबाई साहेब" यांच्यासोबत शृंगारपुरात येऊन राहिले.. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १ नोव्हेंबर १६७८ छत्रपती शिवरायांनी तंजावरच्या उत्तरेकडील मुलुख जिंकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १ नोव्हेंबर १६७९ मराठ्यांचा खांदेरीला पुरवठा, इंग्रजांचा त्यांचा पाठलाग आणि मराठ्यांनी त्यांना चुकवणे किंबहुना बऱ्याचदा तर इंग्रजांना पिच्छा करायला लावून आपल्या जाळात अडकवणे आणि दूर नेवून एखादा मचवा पकडणे हा मराठ्यांचा व्यवसाय अगदी व्यवस्थित सुरु होता. गनिमी काव्याचा हा सागरावरील केलेला बहुदा हा पहिलाच प्रयोग असावा ! .इंग्रज या रोजच्याच उपद्व्यापामुळे जेरीस आले. केग्वीन या त्रासाने वैतागला आणि त्याने १ नोव्हेंबर १६७९ रोजी मुंबईला जे इतिहासप्रसिद्ध पत्र लिहिले त्याचा हा सारांश - “नागाव नदीच्या मुखाशी नौका ठेवण्याच्या बेताविषयी गेल्या पत्रात आपल्याला कळवले होते त्याप्रमाणे दिवसा ते शक्य नाही आणि रात्री चंद्र मावळेपर्यंत गस्त देऊनही उपयोग नाही कारण शत्रूची गलबते उशिराने येतात व वल्ही म...

३१ ऑक्टोबर १६८३छत्रपती संभाजीराजे गोव्यानजीक म्हणजेच "किल्ले फोंडा" सीमेवर दाखल झाले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३१ ऑक्टोबर १६२४ थोरले महाराज "शहाजीराजे" यांचे बंधू शरीफजीराजे हे भातवडीच्या लढाईदरम्यान धारातिर्थी पडले. इतिहासामध्ये ‘भातवडीचं युद्ध’ म्हणून एक लढाई प्रसिद्ध आहे. ३१ ऑक्टोबर १६२४ रोजी ही लढाई लढली गेल्याची नोंद आहे. अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही मुळापासून नष्ट करण्यासाठी भारतभरातील सर्व इतर सत्ता एकत्र आल्या होत्या. पण ते तितकेसे सोपे नव्हते, कारण निजामशाहीकडे शहाजी राजे आणि शरीफजी राजे हे भोसले घराण्यातील २ पराक्रमी योद्धे होते. तलवारी भिडल्या आणि निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजे आणि शरीफजीराजे निजामाचा वजीर मलिक अंबरच्या साथीने भल्या मोठ्या शत्रू पक्षांच्या सेनेला कापत सुटले. अशक्य वाटणाऱ्या या युद्धात शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला, पण त्यांना आपले बंधू शरीफजी राजे यांना मात्र गमवावे लागले. जर शरीफजी राजे जास्त काळ जगले असते, तर मराठ्यांच्या इतिहासामध्ये अजून काही पराक्रमी गाथांची नोंद नक्की झाली असती !  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३१ ऑक्टोबर १६७९ छत्रपती संभाजी राजे व दिलेरखान यांची विजापूरला मोर्चे बांधणी...

३० ऑक्टोबर १६७७"दक्षिण दिग्विजय मोहीम"छत्रपती शिवरायांनी "तिरुवनमलाई" येथील अरुणाचलेश्वर शिवमंदिराचा जिर्णोद्धार करून तिथे दीपोत्सव केला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० ऑक्टोबर १६७७ "दक्षिण दिग्विजय मोहीम" छत्रपती शिवरायांनी "तिरुवनमलाई" येथील अरुणाचलेश्वर शिवमंदिराचा जिर्णोद्धार करून तिथे दीपोत्सव केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० आॅक्टोबर १६८४ किल्ले रायगडच्या फितुरीचा कट करण्याच्या कारणास्तव छत्रपती संभाजीराजे यांनी "पंत राहुजी सोमनाथ", "गंगाधर पंत", "मानाजी मोरे", "वासुदेव पंत" यांना कैद करण्याचे आदेश दिले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० ऑक्टोबर १९२८ लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणार्‍या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला.  त्यातच पुढे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचा अंत झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड, सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र. "जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

७ ऑक्टोबर १६७०दुसऱ्यांदा सुरत लुटीनंतर शिवराय परतीच्या मार्गावर निघाले.दुसरीकडे जबरदस्त धक्का बसलेल्या मुघल फौजेची लढाईसाठी हालचाल सुरू. शहजादा मुअज्जमने दाऊदखानाला मराठ्यांना बागलाण-नाशिक येथे अडवण्यास सांगितले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ७ ऑक्टोबर १६५९ रुई द लैतांव व्हीएगश यांचे मुंबईस निवेदन ! "मी रुई द लैतांव जाहीर करतो की, मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे जहाजे बांधण्याच्या कामावर कल्याण येथे होतो. माझ्या हाताखाली काही काळे आणि गोरे लोक होते. शिवाजी महाराज यांनी पेण येथे आणि अन्यत्र २० युद्ध नौका बांधावयास घेतलेल्या होत्या. त्याचा उपयोग दांड्याच्या सिद्दिविरुध्द होणार असल्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जाहीर केले होते. या कामावर मी देखरेख करीत असता एके दिवशी वसईच्या कॅप्टनी माझ्या कडे जुआंव द सालाझार यांना पाठवुन मला कळविले की छत्रपती शिवाजी महाराज जे आरमार बांधित आहे. त्याचे काम जर तुम्ही बंद पडले तर तुमच्या हातुन तुमच्या देशाची आणि तुमच्या राजाची मोठीच सेवा घडेल मी माझ्या राजाचा इमानी प्रजाजन असल्याने त्यांच्या हितसंबंधांना बाधा येईल असे क्रुत्य माझ्या हातुन होणे इष्ट नाही असा विचार करून वसईच्या कॅप्टनचा आदेश पाळण्याचे मी ठरवले. माझ्या हाताखाली गोरे काळे आणि बायका मुले मिळुन ४०० लोक होते. त्यांच्या शिवाय बाटगे लोक होते ते वेगळे आम्ही सगळ्यांनी छ...

६ आॅक्टोबर १६७४छत्रपती शिवराय कल्याणमार्गे "पाली" येथे दाखल झाले.आणि येथूनच रामनगरचा काही भाग जिंकून स्वराज्यात दाखल करून घेतला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ६ आॅक्टोबर १६७४ छत्रपती शिवराय कल्याणमार्गे "पाली" येथे दाखल झाले. आणि येथूनच रामनगरचा काही भाग जिंकून स्वराज्यात दाखल करून घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ६ आॅक्टोबर १६७६ "दक्षिण दिग्विजय मोहीम" "छत्रपती शिवराय" दक्षिणेतील मोहीमेसाठी आज किल्ले रायगडवरून निघाले. आजच्या दिवशी दसरा होता. राजाभिषेक सोहळ्यानंतर प्रथमच महाराजांनी एवढ्या मोठ्या मोहीमेसाठी सिमोल्लंघन केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ६ ऑक्टोबर १६८६ सण १६८५ नंतर इंग्रजानी आपली दुटप्पी वागणूक बदलत छत्रपती शंभूराजेंशी  मैत्री ठेवण्याचे धोरण ठेवले होते. मुघलांशी बिघडलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर लंडनहून सुरतकर आणि मुंबईकर यांना शंभूराजेंशी मैत्री राखण्यास सांगण्यात आले होते तसेच त्यांना तोफखाना आणि दारुगोळाही पुरवण्यास कळवले होते. याच दरम्यान सिद्दीच्या हालचाली पूर्वीप्रमाणेच सुरू होत्या. १६८६ साली सिद्दीने केलेल्या लुटीने चेऊल प्रांतातील रहिवासी परागंदा झाले होते व मुलुख ओस पडला होता. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात सिद्दीने मराठ्यांचे काही किल्ले घेतले. ...

३० सप्टेंबर १६६५औरंगजेबने पाठवलेले आग्रा भेटीचे फर्मान छत्रपती शिवरायांनी स्विकारले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० सप्टेंबर १६५९ स्वराज्यावर चालून आलेला आदीलशाही सरदार "अफझलखान" याने १२ मावळ मधील रोहीड खोरेचे वतनदार आणि स्वराज्याशी कायम एकनिष्ठ असणारे "कान्होजी जेधे" त्यांचे सुपुत्र व छत्रपती शिवरायांचे बालमित्र "बाजी जेधे" यांना स्वराज्यविरोधी जाण्यासाठी पत्र पाठविले. पण "बाजी जेधे" यांनी ते धुडकावून लावले आणि छत्रपती शिवाजी महाराजांसमोर मुजरा करावयास हजर झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० सप्टेंबर १६६४ १६६४-६५ वर्षाच्या मध्यान्हात औरंगजेबाचा अनेक वर्षाचा स्वराज्यावरील क्रोध चालून आला. हा क्रोध, कधीकाळचे जयपुरचे राजे मिर्झाराजे जयसिंग ह्या सरदाराच्या रूपाने चालून आला. धूर्त राजकारणी, चाणाक्ष मुत्सद्दी, महापराक्रमी आणि बुद्धिने तल्लख असलेल्या मिर्झाराजांचे हे गुणविशेष मात्र परकियांच्या पुढे झुकत होते, आणि हेच शल्य इतिहासात त्यांच्यावर दिसते. अर्थात त्यांना यात कसलाही कमीपणा वाटत नसे. तर असे हे मिर्झाराजे दख्खन मोहिमेकरीता ३० सप्टेंबर १६६४ रोजी मुक्रर झाले. दिल्ली दरबारातील मोठ्या-मोठ्या सरदारांसह दिलेरखा...