Posts

Showing posts from 2025

२० नोव्हेंबर १६७०छत्रपती शिवरायांची आरमारासह सुरतेकडे कूच.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० नोव्हेंबर १६३५ शाहजहान त्याच्या दुसऱ्या दख्खन मोहिमेसाठी निघाला. निजामशाही संपवायची ह्या ध्येयाने तो निघाला होता. त्याने हांडियाजवळ ४ जानेवारी १६३६ ला नर्मदा ओलांडली. इथूनच ९ जानेवारीला आदिलशाहला पत्राने तंबी दिली की निजामशाहीमधल्या शाहजी राजा बरोबर असलेल्या सरदारांना पाठिंबा मिळता कामा नये. वर हे सुद्धा लिहीले की त्याने देय असलेली वार्षिक खंडणी १० मार्च १६३६ पर्यंत दौलताबादला पाठवावी. ह्यासाठी शाहजहानने सोलापूर, त्याच्या आसपासचा परिसर व वांगीचा भाग निजामशाहिकडील भाग आदिलशाहला देऊ केले. ह्या परिसरातून वर्षाला नऊ लक्ष होनाचे उत्पन्न येत होते. १९ जानेवारी १६३६ ला शेख दबीर व इतर काही आदिलशाही वकील शाहजहानला भेटले. त्यानंतर ५ फेब्रुवारीला शाहजहानने खानजमान, खानदौरान व शाहिस्ताखान यांना निजामशाहीचा परिसर जिंकण्यासाठी धाडले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० नोव्हेंबर १६६६ ९ वर्षांचे बाल शंभूराजे आज रोजी आग्राहून सुटल्यानंतर सुखरूप "किल्ले राजगड" वर पोचले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० नोव्हेंबर १६७० छत्रपती शिवरायांची आरमारासह सुरतेकडे कू...

१३ नोव्हेंबर १६५९छत्रपती शिवरायांनी मायणी, खटाव जिंकले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १३ नोव्हेंबर १६५९ छत्रपती शिवरायांनी मायणी, खटाव जिंकले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १३ नोव्हेंबर १६६८ छत्रपती शिवरायांकडून गोव्यामध्ये सप्तकोटीश्वर मंदिर बांधण्यास सुरुवात. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १३ नोव्हेंबर १६७३ मुंबईकर सूरतकरांना १३ नोव्हेंबर १६७३ ला लिहितात: "सिद्दीने तक्रारी केल्या असताना सुभेदाराचे आमच्याबद्दल इतके मन आहे हे वाचून आनंद झाला. आता बंदरांत असलेल्या बादशहाच्या दोन गलबतांना आम्ही चांगले वागविले हे पाहून बादशाहाविषयी आमचे मनांत पूज्यबुध्दी आहे हे त्याला दिसून येईल ... फ्रेचांनी जर इतक्या तोफा आणि इतके शिसें ( गोळे ) राजापूरला पाठविले असतील, तर शिवाजीला सिद्दाविरुध्द चांगले आरमार सज्ज करणस बरे पडेल. कारण त्याने आमच्याकडे मागणी केली परंतु आमच्याजवळ पुष्कळ तोफा असूनही आम्ही तुमच्या सूरतेतील हितसंबंधाकडे लक्ष देऊन तोफा दिल्या नाहीत." सूरतकरांनी १३ नोव्हेंबर १६७४ ला उत्तर लिहिले जे:'  "शिवाजीच्या तोफांच्या मागणीबद्दल कळविण्यांत आले. त्यावर आमचे मत असे आहे की, अशा कृत्याने बादशहाला घुस्सा येईल.  फ्रेंचानी नुक...

१२ नोव्हेंबर १६५९छत्रपती शिवरायांनी "कराड" प्रांत जिंकला

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ नोव्हेंबर १६५९ छत्रपती शिवरायांनी "कराड" प्रांत जिंकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ नोव्हेंबर १६६७ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची सरहद्द पोर्तुगीज प्रदेशाला भिडली होती. त्यावेळचा पोर्तुगीज विजरई कोंदी दि सांव्हिसेंती हा फारच धर्मान्ध होता. त्याने बारदेश मधील चार हजार हिंदूंचे सक्तीने धर्मांतर केले होते. आणि इतर हिंदू लोकांना २ महिन्याच्या आत बारदेश व गोवा सोडून जाण्यास सांगितले. शिवाय पोर्तुगीजांच्या आश्रयाला गेलेले कोकणातील देसाई त्यांच्या मदतीने स्वराज्यातील प्रदेशावर धाडी घालत असत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी बारदेशवर ५ हजार पायदळ व १ हजार घोडदळ घेऊन मोहीम काढली. १० नोव्हेंबर पासून सलग तीन दिवस महाराजांच्या सैन्याने या भागात धुमाकूळ घालत अनेक धर्मान्ध पोर्तुगीजाना ठार केले. या मोहिमेत महाराजांनी पोर्तुगीज व कोकणातील फितूर देसायांना कायमचा धडा शिकवला. महाराजानी या मोहिमेत १३०० कैदी पकडले. शिवाय त्यांना यातून १५० लक्ष होनांची लुटही मिळाली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ नोव्हेंबर १६८३ किल्ले फोंड्यावर प्रचंड...

११ नोव्हेंबर १६७५छत्रपती शिवरायांनी "सातारा" प्रांत जिंकला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ नोव्हेंबर १६५७ औरंगजेबची पत्नी दिलरास बानूचे निधन औरंगजेबाने तख्त काबीज करण्याचा जणू चंगचं बांधला. तो बिदरहून उत्तरेकडे झेपावण्याकरिता संधी शोधत होता आणि त्याला ती मिळाली. ११ नोव्हेंबर, १६५७ रोजी त्याची पत्नी दिलरास बानू त्याच्या पाचव्या मुलास जन्म देताना मरण पावली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ नोव्हेंबर १६५९ छत्रपती शिवरायांनी अफझलखानाला ठार मारले आणि नंतर लगेच त्यांनी "वाई" सोडली. त्यांच्या घोड्यांच्या टापा वळाल्या त्या थेट कराडच्या दिशेने. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ नोव्हेंबर १६७५ छत्रपती शिवरायांनी "सातारा" प्रांत जिंकला. ११ नोव्हेंबर १६७५ रोजी सातारा काबीज झाला. महाराज साताऱ्यात गेले आणि गंभीर आजारी झाले. या आजराचे स्वरूप एवढे भयंकर होते की, त्यांच्या मृत्यूची अफवा झाली.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ नोव्हेंबर १६७५ विजापूरचा सरसेनापती बहलोलखान खवासखानाचे कोणतेच हुकुम पाळीत नव्हता. खावासखानाने अफगाण गटाचा बिमोड करण्यासाठी गुप्तपणे मोगलांचा दक्षिण सुभ्याचा सुभेदार बहादुरखान यास मदत मागितली. तसे बहादूरखान १९ ऑक्टोबर १६७५...

२४ऑक्टोंबर १६५७ साली कल्याण भिवंडीच्या लढाईत छत्रपती शिवरायांचा विजय होऊण, मराठा आरमार बंधणीला सुरवात झाली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ ऑक्टोबर १६२४ भातवडी येथे मोगलांचा सुभेदार लष्करखान व आदिलशाही मुल्ला महंमद ह्या दोघांच्या छावणीवर मलिक अंबरच्या सैन्याचा अचानक हल्ला झाला व मलिक अंबराने त्या दोघांच्या पाडाव केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ ऑक्टोबर १६५७ शिवाजी महाराजांनी उत्तर कोकणात मुसंडी मारत कल्याण - भिवंडी - शहापुर हा मूघली-विजापुर भाग काबीज केला. औरंगजेब दख्खनेवरुन दिल्लीला परतलेला आणि विजापुरच्या आदिलशहाचा मृत्यू ह्या १६५७ च्या सुरवातीच्या दख्खनेमधल्या राजकीय परिस्थितीचा फायदा उचलत शिवरायांनी उत्तर कोकण काबीज केले. १६५६ च्या जानेवारी मध्येच जावळी ते रायरी हा भाग ताब्यात घेत विजापुरचा उत्तर कोकणाशी थेट संपर्क त्यांनी जवळ-जवळ तोडला होताच. २४ऑक्टोंबर १६५७ साली कल्याण भिवंडीच्या लढाईत शिवरायांचा विजय होऊण, मराठा आरमार बंधणीला सुरवात  झाली. सागरावर प्रभुत्व निर्माण करावयाचे आसेल तर बलशाली आरमार (Navy) ऊभारले पाहीजे ही बाब शिवरायांच्या लक्षात आली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ ऑक्टोबर १६६६ आग्राच्या सुटकेनंतर, शिवाजी सुटला आता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबान...

२५ आॅक्टोबर १२९६संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ आॅक्टोबर १२९६ संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ आॅक्टोबर १६४५ छत्रपती शिवाजी महाराज लालमहल येथे मुक्कामी 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ ऑक्टोबर १६७० मोरोपंत पिंगळे पेशवे पंतप्रधान यांनी शिवनेरी जिंकण्यासाठी शिकस्त केली पण त्यात त्यांना अपयश आले. पण त्यांनी पुढे घुसून नाशिकजवळील ब्रह्मगिरी जिंकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ ऑक्टोंबेर १६७९ छत्रपती शिवाजी महाराजांचे पायदळ आणि घोडदळाप्रमाणे आरमार ही त्याच दर्जाचे होते, शिवरायांच्या आरमाराचे हालचाली इतक्या प्रभावी होत्या की त्यांचे उल्लेख पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिश साधनात आढळतात त्याचेच एक उदाहरण - २५ ऑक्टोंबेर १६७९ ला सुरतवाले लिहतात की, शिवरायांच्या आरमाराला आम्ही फार वेळ टक्कर देऊ असे आम्हास वाटत नाही आरमार उभारणीच्या वेळी लाकडाचे महत्व मोठे होते, त्याकाळी जंगले दाट होती आणि लाकूड ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची यासंबधी आज्ञा अशी होती याचा उल्लेख आज्ञापत्र साधनात येतो " स्वराज्यातील आंबे, फणस हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची परंतु त्या...

१७ ऑक्टोबर इ.स. १६७०** दाऊदखान व छत्रपती शिवराय यांच्यात फार मोठे युद्ध झाले व त्यात दाऊदखानाचा दणदणीत पराभव झाला.*

*१७ ऑक्टोबर इ.स. १६७०* * दाऊदखान व छत्रपती शिवराय यांच्यात फार मोठे युद्ध झाले व त्यात दाऊदखानाचा दणदणीत पराभव झाला.*

१६ ऑक्टोबर १६८०छत्रपती संभाजीराजे यांनी कोकणातील "चाफळ" येथील रामनवमी उत्सवासाठी वार्षिक इनाम चालवण्याचा हुकूम आजच्या दिवशी दिला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १६ ऑक्टोबर १६७० युद्ध हे होणारच हे महाराजांना अचूक ठाऊक होते. प्रश्न एकच होता की सुरतेवरून आणलेला खजिना कसा राखायचा. खजिन्यासकट पळ काढणे हे शक्य नव्हते आणि काही लोकांना खजिना घेऊन पुढे जाण्यास सांगणे हे ही शक्य नव्हते कारण खजिना पुढे पाठवायचा म्हणजे घोडदळ सोबत द्यावे लागेल कारण पायदळ लवकर पुढे जाणार नाही. जर घोडदळ पुढे पाठवले तर दाऊदखानाचा सामना फक्त पायदळानिशी करणे ही सोपे नव्हते, आणि आपल्या सैनिकांना सुद्धा याची भनक लागू द्यायची नव्हती. शेवटी शिवराय ते शिवरायच, शेवटच्या क्षणाला कोणाच्या डोक्यात कधी येऊच शकणार नाही असे निर्णय घेण्याचे त्यांचे कौशल्य कामी आले. १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री त्यांना समजले की पहाटेच्या वेळी आपली व दाऊदखानाच्या सैन्याची गाठ पडणार. म्हणून रात्रीच्या वेळी खजिना वाहणारी घोडी व बैले पायदळासोबत सप्तशृंगी व वणीच्या मार्गाने पाठवली आणि मुख्य सैन्य दाऊदखानाच्या दिशेने पाठवले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १६ ऑक्टोबर १६७९ विजापूर जिंकून घेण्यासाठी दिलेरखानाने ऑगस्ट १६७९ ला कूच केले. त्यामुळे विजापूरचे रक्षण करण्यासाठी मस...

१२ आॅक्टोबर १६७३मराठा फौजेचा वाई जवळील "किल्ले पांडवगड" वर हल्ला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ ऑक्टोबर १६५९ पंताजी गोपीनाथांची वकील म्हणून निवड अफजलखानाचा वकील आला मग रिवाजानुसार आपलाही वकील खानाकडे जायला हवा हे मनोमन ठरवून गोपीनाथपंथांची निवड केली. ही निवड केवळ वकील म्हणून साधीसुधी नव्हती तर खानाच्या गोटात शिरून खानाच्या छावनीचा संपूर्ण अंदाज बांधणे शत्रुपक्षाच्या मनीचे हेतू जाणता आले तर पाहावे या हेतूने ही निवड होती. आणि म्हणूनच पंताजी गोपीनाथ यांचे बरोबर काही हुषार हेर‌ हुजऱ्यांच्या रुपाने शिवरायांनी पाठवून आपले फासे टाकायला सुरुवात केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ आॅक्टोबर १६७३ मराठा फौजेचा वाई जवळील "किल्ले पांडवगड" वर हल्ला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ ऑक्टोबर १६८० स्वराज्याचे पंतप्रधान मोरेश्वर त्रिंबक पिंगळे यांचे श्रीमान रायगडावर महानिर्वाण झाले. त्यांच्या ज्येष्ठ पुत्राचे सांत्वन करून छत्रपती शंभुराजांनी त्यांना पेशवेपद दिले. निळोपंत हे स्वराज्याचे पेशवे बनले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ ऑक्टोबर १६८१ छत्रपती संभाजी महाराज राज्यपदावर आल्यावर त्यांच्याविरोधात काही मंत्र्यानी कट केला होता. मंत्र्यानी या कटात सुलतान अ...

अक्कलकोट राज्याचे संस्थापक श्रीमंत फतेहसिंहराजे भोसले यांची समाधी, राजधानी रायगड १७३३ साली फतेहसिंह भोसले व पंतप्रतिनिधी यांच्या संयुक्त मोहिमे द्वारा स्वराज्यात शामिल झाला ..

Image
अक्कलकोट राज्याचे संस्थापक श्रीमंत फतेहसिंहराजे भोसले यांची समाधी, राजधानी रायगड १७३३ साली फतेहसिंह भोसले व पंतप्रतिनिधी यांच्या संयुक्त मोहिमे द्वारा स्वराज्यात शामिल झाला ..

११ आॅक्टोबर १६७३छत्रपती शिवरायांनी "बंकापूर" वर चढाई केली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ आॅक्टोबर १६७३ छत्रपती शिवरायांनी "बंकापूर" वर चढाई केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ ऑक्टोबर १६७९ खांदेरीच्या नाकेबंदिकारिता पाठविलेल्या सैन्यामुळे मुंबईतील सैन्य कमी झाले व मुंबईचा धोका वाढला. मराठे साष्टी (ठाणे) मधून मुंबई वर चालून येण्याचा प्रयत्न करीत आहेत असे इंग्रजांना कळले परंतु तेथील पोर्तुगीजांनी त्यांना अडवल्यामुळे मुंबईकर इंग्रजांच्या जीवात जीव आला व त्यांनी त्वरित ५० टोपाझ सैनिकांची भरती रक्षणार्थ केली. सुंदरजी प्रभू नामक छत्रपती शिवाजीराजांचा एक हेर मुंबईमध्ये गुपचूप माहिती जमा करीत असताना इंग्रजांच्या तावडीत सापडला. इंग्रजांनी त्याच्या कडून माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात अपयश येऊन इंग्रजांनी त्याला कैदेत टाकले. तसेच मुंबईतील काही गरीब रहिवाश्यांना चौलच्या आस-पास टेहळणी करिता पाठवले व त्यांना आदेश दिला कि त्यांनी दर ३-४ दिवसांनी मुंबईला मराठ्यांच्या हालचालीबद्दल खबर कळवावी. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ ऑक्टोबर १७८० दि. ११ ऑक्टोबर १७८० रोजी हालेचा मुक्काम उल्हास नदीकाठावर असलेल्या बदलापूरानजीक कुळगाव ...

१० आॅक्टोबर १६७५"किल्ले सिंहगड" वरील सुभा कचेरीत छत्रपती शिवरायांची गोतसभा.गडाखालील ३४ गावातील कारभारी पाटील या मसलतीस हजर होते.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १० आॅक्टोबर १६६४ छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजी घोरपडेला मुधोळ येथे ठार केले. आदिलशहाने १६६४ साली छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि कोकणात अंकुश ठेवण्यासाठी खवास खानयाची नेमणूक केली आणि त्याला मदत करण्यासाठी वाडीचे देशमुख लखम सावंतआणि खेमसावंत यांनीही ठरवले परंतु खवास खानाचा या मोहिमेत पराभव झाला हे समजताच आदिलशहाने बाजी घोरपडे यास शिवरायांवर चालून जाण्यास सांगितले हे वृत्त शिवाजी महाराजांना समजता सत्यांनी मुधोळ येथे असलेल्या चालून येणाऱ्या बाजी घोरपडे वर हल्ला चढवला आणि त्याला ठार केले. याच बाजी घोरपडेच्या मदतीने शहाजीराजे यांना जिंजी जवळ अटक झाली होती. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १० ऑक्टोबर १६७३ १० ऑक्टोबर १६७३ रोजी सिद्दी संबळ आपल्या आरमारासह इंग्रजांची परवानगी न घेता मुंबई बंदरात आला आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मालकीची पेण व नागोठणे नदीवरील ठाणी त्याने उद्ध्वस्त केली. सिद्दी संबळने तेव्हा अनावश्यक रक्तपात केला आणि कित्येक माणसे, स्त्रीया व मुले पळवून गुलाम बनवून आपल्याबरोबर मुंबईस आणिली. काही प्रमाणात व्यापारास उपद्रव झाला. त्...

८ आॅक्टोबर १६६८"छत्रपती शिवराय" आणि "आदिलशहा" यांच्यात तह झाला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ८ ऑक्टोबर १६५९ छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडी दाखल खान वळवळ करत होता त्याला अटकाव करणे गरजेचे होते. त्यामुळे मनी ठाम निश्चय करूनच राजे स्वदुःख बाजूला सारून अफजल मोहीमेसाठी जावळी परिसराची पाहणी करून प्रतापगडी पूर्व तयारी करण्यासाठी दाखल झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ८ आॅक्टोबर १६६८ "छत्रपती शिवराय" आणि "आदिलशहा" यांच्यात तह झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ८ ऑक्टोबर १६७९ केग्वीन खांदेरीला पोचला मुंबईकरांना आता पक्की खबर मिळाली की दौलतखान मोठे आरमार (सुमारे २० गुराबा) घेवून खांदेरीच्या दिशेने येत आहे. तेव्हा युद्धासाठी सज्ज असे मोठे आरमार आता अनुभवी कॅप्टन रिचर्ड केग्वीन याच्या नेतृत्वाखाली खांदेरीच्या नाकेबंदिकारिता पाठवण्याचा निर्णय मुंबईकरांनी घेतला. ह्या नाविक सैन्यामध्ये रिवेंज ही १ फ्रीगेट तर होतीच शिवाय २ गुराबा (यातील एकीचे नाव डव्ह होते), ३ शिबाडे , २ मचवे होते. ह्या सर्व ताफ्यावर सुमारे २०० अधिक सैनिक तसे इतर नावाडी लोक होते. इंग्रजांना वाटत होते की हे आरमार पुरेसे आहे. तरी त्यांनी कॅप्टन केग्वीन ला आदेश दिले क...

श्रमनिद्रा ....तुळजाभवानी मातेची...🌹🙏🏻🌹

Image
श्रमनिद्रा .... तुळजाभवानी मातेची... 🌹🙏🏻🌹 𖣔॥श्री तुळजाभवानी आई प्रसन्न॥𖣔 ※❖!!*कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे सीमोल्लंघन व श्रमनिद्रा*!!❖※ •✦!!*श्री तुळजाभवानी देवीच्या मुळ मूर्तीस १०८ सुती साड्याची पिळे ( दिंड) नेसवून संरक्षक कवच तयार केले जाते...देवीची मुख्य चलमूर्ती पालखी मध्ये ठेवतात व पुजारी ती पालखी घेऊन मंदिरा भोवती एक पूर्ण प्रदक्षिणा घेतात व मंदिरात असलेल्या पिंपळाच्या पारा वर पालखी ठेऊन साखर भाताचा नैवेद्य दाखवून मानाच्या आरत्या ओवाळतात व सिंहाच्या गाभाऱ्यात असलेल्या मानाच्या पलंगे (तेली) लाकडी पलंगावर मूर्ती अलगद ठेवली जाते. देवी च्या निद्रेस श्रम निद्रा म्हणतात.*!!✦• •✿!!*महिषासुर दैत्याबरोबर नऊ दिवस चाललेल्या घनघोर युद्धानंतर देवीने महिषासुराचा वध केला . युद्धात दमल्याने देवी निद्रा घेण्यासाठी मंचकी जाते.*!!✿• ✦!!*आज पासून चालू झालेली देवीची श्रम निद्रा ०६ तारखेपर्यंत चालणार असून ०७ आक्टोबर च्या पहाटे देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना होईल.*!!✦ ❖!!*दि.०७-१०-२०२५* *मंगळवार* या दिवशी आश्विनी मंदीर पौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे...*!!❖ ✿*!!आईराजा उदो उदो..*!!✿ ...

इनाम कमिशन आणि तर्जुमा

Image
इनाम कमिशन आणि तर्जुमा                                  डॉ. संतोष यादव  आज महाराष्ट्रासह भारतात जमिनींचा वाद विकोपाला जाताना दिसत आहे  रोज कोर्ट, कचे-या, महसुली सुनावण्या यात सर्व सामान्य मनुष्य भरडला जातोय  नेमक्या या जमीनी आपल्या कडे आल्या कशा   इमान मिळालेली जमीन म्हणजे काय ? ती जमीन नेमकी आम्हाला दिली कोणी ? यावर टाकलेला एक प्रकाश .  मुघल काळापासून जमिनी इनाम देण्याची प्रथा होती  ती निजामकाळ, आदिलशहा, कुतुबशाही, इमादशाही, बरीदशाही यात जशीच्या तशी चालत आली  पण छत्रपती शिवाजी महाराजांनी इनामी वतने पद्धत काही प्रमाणात थांबवून रेाख रक्कम पगार किंवा तनखा दिल्या   पुढे पेशव्यांनी मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी पुन्हा इनामी पद्धती सुरू केल्या  हे इनाम कोणत्या जमीनी , गावे , देवस्थान, हाडोळा, चोळी बांगडी यासाठी दिल्या जात    *इनाम कमिशन*  सन १८५२ साली ब्रिटीश राजवटी दरम्यान स्थापन करण्यात आलेला हा एक महत्वाचा आयोग होता  हा आयोग भा...

३ आॅक्टोबर १६५७"छत्रपती शिवराय" कल्याण भागात पोचले, तिथल्या प्रदेशाचा आढावा घेतला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३ आॅक्टोबर १६५७ "छत्रपती शिवराय" कल्याण भागात पोचले, तिथल्या प्रदेशाचा आढावा घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३ आॅक्टोबर १६७० "द्वितीय सुरत लूट" - प्रथम दिन... छत्रपती शिवरायांनी पुन्हा एकदा सुरत लुटली. "पेशवे मोरोपंत पिंगळे" आणि "सरनोबत प्रतापराव गुजर" यांच्या समवेत १०,००० घोडदळ व ५००० पायदळ घेऊन दुसऱ्यांदा सुरत लुटण्यासाठी पहिल्या सुरत लुटीच्या मार्गानेच आज पोचले. सुरत येथील मुघल अधिकाऱ्याला पाठवलेल्या पत्राचे स्वैर मराठी भाषांतर - "बादशहामुळेच मला माझ्या जनतेचे आणि देशाचे रक्षण करण्यासाठी फौज उभी करावी लागत आहे. तेंव्हा त्या फौजेचा खर्च तुम्हीच द्यायला हवा. मी तिसर्यांदा आणि शेवटचे सुरतेच्या उत्पन्नाचा चौथा भाग मागत आहे." 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३ आक्टोबर १६७७ छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक स्वारीवर असताना त्यांनी ३ आक्टोबर १६७७ साली चेन्नईमधील काली कम्बल मंदिरात जाऊन देवीची पूजा करून बांधकामाची मुहूर्तमेढ रोवली. अगदी दोन दिवस महाराजांनी तेथेच मुक्काम केला. पुढे महाराजापासून प्रेरणा घेऊन...

२ आॅक्टोबर १६७०दुसऱ्यांदा सुरत लुटण्यासाठी छत्रपती शिवराय १५००० फौजेनिशी सुरतजवळ ५ कोस अंतरावर येऊन पोचले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २ आॅक्टोबर १६७० दुसऱ्यांदा सुरत लुटण्यासाठी छत्रपती शिवराय १५००० फौजेनिशी सुरतजवळ ५ कोस अंतरावर येऊन पोचले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २ ऑक्टोबर १६७० मोघलांच्या वतीने औरंगाबादला छावणी करून शहाजादा मुअज्जम कारभार बघत होता. पण तो शिवाजी महाराजांना फितूर असल्याची औरंगजेबाला शंका होती. म्हणून त्याने मुअज्जमला परत बोलावून त्या जागी दिलेरखानाची नेमणूक केली. या संदर्भात मुंबईकर इंग्रजांकडून सुरतेच्या इंग्रजांना पत्र गेले.  "सुलतान मुअज्जमने शिवाजी महाराज व इतर राजे यांच्या मदतीने बापाशी लढण्याकरिता मोठे सैन्य उभारले. कित्येकांच्या मते तो औरंगजेबावर स्वारी करण्याकरिता आग्र्याला गेला. दुसरे कित्येक म्हणतात की, बापाने तह करून त्यास दख्खनचे राज्य व गुजरात प्रांत दिल्याने तो परत फिरला." 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २ ऑक्टोबर १८०४ २ ऑक्टोबर १८०४ मध्ये पेशव्यांनी गायकवाडांस अहमदाबादचा इजारा वार्षिक रू. ४ लाखांच्या करारान १० वर्षाच्या बोलीने दिला. त्याची वहिवाट भगवंतराव गायकवाडांस सांगितली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २ आॅक्टोबर १८६९ राष्ट्रपिता महात्मा गांध...

३० सप्टेंबर १६७७छत्रपती शिवरायांनी मद्रास इंग्रज गव्हर्नरकडे तोफा व इंजिनिअर्सची मागणी केली

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० सप्टेंबर १६५९ स्वराज्यावर चालून आलेला आदीलशाही सरदार "अफझलखान" याने १२ मावळ मधील रोहीड खोरेचे वतनदार आणि स्वराज्याशी कायम एकनिष्ठ असणारे "कान्होजी जेधे" त्यांचे सुपुत्र व छत्रपती शिवरायांचे बालमित्र "बाजी जेधे" यांना स्वराज्यविरोधी जाण्यासाठी पत्र पाठविले. पण "बाजी जेधे" यांनी ते धुडकावून लावले आणि छत्रपती शिवाजी महाराजांसमोर मुजरा करावयास हजर झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० सप्टेंबर १६६४ १६६४-६५ वर्षाच्या मध्यान्हात औरंगजेबाचा अनेक वर्षाचा स्वराज्यावरील क्रोध चालून आला. हा क्रोध, कधीकाळचे जयपुरचे राजे मिर्झाराजे जयसिंग ह्या सरदाराच्या रूपाने चालून आला. धूर्त राजकारणी, चाणाक्ष मुत्सद्दी, महापराक्रमी आणि बुद्धिने तल्लख असलेल्या मिर्झाराजांचे हे गुणविशेष मात्र परकियांच्या पुढे झुकत होते, आणि हेच शल्य इतिहासात त्यांच्यावर दिसते. अर्थात त्यांना यात कसलाही कमीपणा वाटत नसे. तर असे हे मिर्झाराजे दख्खन मोहिमेकरीता ३० सप्टेंबर १६६४ रोजी मुक्रर झाले. दिल्ली दरबारातील मोठ्या-मोठ्या सरदारांसह दिलेरखा...

२९ सप्टेंबर १६८९सरसेनापती श्रीमंत हरजीराजे परसोजी राजेमहाडिक स्मृतीदिन

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २९ सप्टेंबर १६३५ स्वतः शहाजहान बादशहा थोरले महाराज साहेब फर्जद शहाजीराजेंचा बीमोड करण्यासाठी निघाला आणि तडक दौलताबादेस आला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २९ सप्टेंबर १६८२ मुंबईकर इंग्रजांचे सुरतकरांना पत्र छत्रपती संभाजीराजेंच्या भीतीने मुंबईकर इंग्रज सिद्दीला मुंबईत आश्रय देत नव्हते पण सुरतकर इंग्रजांच्या दडपणामुळे ९ मे १६८२ ला त्यांना सिद्दीला मुंबईत प्रवेश देणे भाग पडले. सिद्दी कासम मुंबईत आल्याचे समजताच मराठ्यांनीही आपली ४० गलबते खांदेरीवर पाठवली. तरीही सिद्दीने ऑगस्ट अखेरीस नागोठणे येथे जाऊन मराठी मुलखात लूटमार केली व बऱ्याच लोकांची नाके कापली आणि एका हवालदाराला पकडून नेले. तरीही सुरतकर मुंबईकरांना सिद्दीला १० हजार रुपयांचा सर्व प्रकारचा माल आणि त्यांच्या कुटुंबांना मुंबईत आसरा द्यायला सांगत होते. सिद्दीला मदत करण्याच्या सुरतकर इंग्रजांच्या या धोरणाबद्दल नापसंती व्यक्त करत मुंबईकरांनी लिहिले की, "मागील वेळेप्रमाणेच याही वेळी सिद्दीचे लोक राहिल्याने अन्नाचे दुर्भिक्ष वाढेल, दृष्ट लोकांना आसरा देऊन त्यांच्याशी सामोपचाराने वागणे क...

२७ सप्टेंबर १७२९सरसेनापती खंडेराव दाभाडे यांची पुण्यतिथी.त्यांची समाधी तळेगाव दाभाडे येथील 'श्रीमंत सरसेनापती दाभाडे श्री बनेश्वर मंदिर' येथे आहे.

 ⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ सप्टेंबर १६६५ औरंगजेबाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तहाचे फर्मान व शंभूराजेंच्या मनसबदारीचे फर्मान येऊन दाखल. मिर्झाराजांच्या हुकुमाने छत्रपती शिवाजी महाराज तळकोकणातून येऊन मिर्झाच्या छावणीत दाखल. ऐतिहासिक किल्ले पुरंदरच्या तहाची अंमलबजावणी सुरु. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ सप्टेंबर १७०७ शंकराजी नारायण पंतसचिवांचे देहावसान २७ सप्टेंबर १७०७ रोजी श्री क्षेत्र आंबवडे येथे झाले.  रामचंद्र पंतांबरोबर महाराष्ट्रात वावरणारा त्यांचा जोडीदार शंकराजी नारायण हा मावळातील शिरवळपासून वाई-सातारा पर्यंतच्या अवघड प्रदेशाचा माहितगार मोठा युक्तिबाज व हर तऱ्हेने कार्य सिद्धीस नेणारा होता. मावळातील लोकात त्याचे चांगले वजन होते. औरंगजेबाने मावळातील किल्ले घेण्याचा सपाटा लावताच शंकराजीने मावळी फौज उभी करून ते बादशहाच्या कब्जातून परत घेतले. तो अत्यंत धाडसी व उलाढाल्या करण्यात तरबेज होता. हाती घेतलेल्या कमी सबब सांगत तो कधी आला नाही. रामचंद्रपंतांवर त्याची पूर्ण निष्ठा होती. मावळातील किल्ले लगोलग घेण्यात त्याने चांगलीच हुशारी दाखवली. वतने प...

२६ सप्टेंबर १६८९छत्रपती राजाराम महाराज पन्हाळ्याहून जिंजीकडे रवाना झाले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ सप्टेंबर १६७३ छत्रपती शिवरायांनी श्यामजी नाईक यांना सिद्दी मसूदशी बोलणी करण्यासाठी पाठवले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ सप्टेंबर १६७७ छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमे वेळी जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला व त्याच्या बंदोबस्तासाठी पुष्कळ पायदळ व घोडदळ ठेवून दिले. त्यांनी १४ मोठे किल्ले व ७२ मजबूत टेकडया काबीज केल्या. कर्नाटकातील बहुतेक सधन लोकांकडून अपार द्रव्य घेतले. महाराजांनी कर्नाटकांत जिंकलेल्या किल्ल्यांची डागडुजी व जिंकलेल्या प्रांतांचा बंदोबस्त रघुनाथ नारायण हणमंते यांनी केली म्हणून छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी त्यांस २६ सप्टेंबर १६७७ या दसऱ्याच्या मुहूर्तावर दख्खनची मजमू व जिंजी प्रांताचा सरसुभा असे महत्त्वाचे अधिकार सोपविले. हणमंते यांनी कर्नाटक प्रांताचा बंदोबस्त चांगला ठेवून त्यांत आणखी भर घातली. पण छत्रपती श्री संभाजी महाराजांविरुद्ध जे कट रायगढला शिजले त्यांत हणमंते यांचे अंग आहे असे छत्रपती संभाजी महाराजांस कळून आले तेव्हा त्यांस कैद कर...

२४ सप्टेंबर १६७४छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेकछत्रपती शिवाजी महाराज्यांचा राज्याभिषेक जेष्ठ शुक्ल त्रयोदशी अर्थात ६ जून १६७४ रोजी रायगडावर पूरोहित गागाभट्ट यांच्या मार्गदर्शनाने वैदीक पद्धतीने संपन्न झाला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ सप्टेंबर १६५६ स्वराज्यात सुपे हा परगणा होता. हा शहाजीराजांच्या जहागिरीतच होता मात्र तो त्यांनी त्यांचे शालक (पत्नी तुकाबाईंचे सख्खे बंधू) संभाजी मोहिते यांच्या ताब्यात दिला होता. मोहिते तिथे गढीत रहात होते. या मोहित्यांची एक मुलगी अण्णुबाई हिचे लग्न व्यंकोजीराजांशी तर, मोहिते घराण्यातीलच (बहुधा संभाजी मोहित्यांचीच मुलगी) सोयराबाई यांचे लग्न शिवाजीराजांशी झाले होते. त्यामुळे मोहित्यांचे भोसले घराण्याशी मोठे नातेसंबंध होते. मात्र हे मोहितेमामा कारभार योग्य पद्धतीने करत नव्हते. लाच घेणे, दुसर्याचे वतन हिसकावून घेणे वगैरै प्रकार ते करत होते. शहाजीराजे व शिवााजीराजांनाही ते जुमानत नव्हते. एकदा शिवाजीराजांनी पत्र पाठवून त्यांना आज्ञा केली की, 'पागा  घेऊन पुणे मुक्कामी येणे!' मात्र मोहित्यांनी या पत्राचे उत्तर पाठवले नाही उलट, पत्र घेऊन आलेल्या जासूदाला उर्मटपणे म्हणाले, 'शहाजीराजे समक्ष असता हे मालक नाहीत... काही आपले पायाकडे पाहून करावे!' संभाजी मोहिते काही केल्या जुमानत नाहीत हे शिवाजीराजांना समजले. स्वराज्यात अ...

२३ सप्टेंबर १६८०छत्रपती संभाजीराजांनी तुळजाभवानीस श्रुन्गारलेला हत्ती व २० सहस्त्र होणांचे दान म्हणून देऊ केले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ सप्टेंबर १६३३ मुरार जगदेव हे विजापूर दरबारचे सरदार, या दिवशी सूर्यग्रहण होते, हा योग साधून त्यांनी आपले सोन्यारुपाने तुलादान केले. हे तुलादान पुण्यापासून १० कोसावर भीमा व इंद्रायणी नद्यांच्या संगमात वसलेला नांगरगावास झाले, तेथे संगमेश्वराचे मंदिर बांधले त्यामुळे या गावाचे नामकरण होऊन तुळापुर झाले. ३०० वर्षांपूर्वी यादवांचे राज्य बुडाल्यानंतर एवढा मोठा तुळादान विधी झाला नव्हता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ सप्टेंबर १६४३ अदिलशहाने पोर्तुगीजांना पत्र पाठवले, त्यांच्या चौल किल्ल्याच्या परिसरात याकुतशहा व फत्तेखान हे २ बंडखोर आणि ज्याला ते मलिक म्हणतात असा १ मुलगा अशा तिघांना आश्रय दिला आहे, त्यांना पोर्तुगीजांनी आपल्या मुलखातून हाकलून द्यावे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ सप्टेंबर १६७३ इ.स. १६६१ मध्ये शिवाजी महाराजांनी इंग्रजांची राजापूरची वखार लुटली होती, तिची भरपाई मिळावी अशा मागणीचा अनेकवेळा अयशस्वी प्रयत्न इंग्रजांनी केला. हे प्रलंबित प्रकरण मिटवण्याकरिता छत्रपती शिवाजीराजांशी बोलणीकरिता इंग्रजांनी 'नारायण शेणवी' यास २३ सप्टेंबर १...